आज बऱ्याच दिवसांनी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलो होतो.15 दिवस झाले,पाऊस स्वतः उसंत घेत नव्हता आणि आपल्याला उसंत घेऊ देत नव्हता. घरात बसून बसून कंटाळलेले मन,म्हटलं बाहेर पडलो तर ताजेतवाने होईल,प्रसन्न वाटेल. आपलं कसं असतं, आपण पाऊस नाही आला तरी परेशान असतो आणि तो आला तरी. रस्त्याने चालू लागलो.बाजूच्या धरणीने हिरवा अंगरखा पांघरला होता.जणू पावसाच्या आगमनाने ती खुष होऊन तिने नवे वस्त्र परिधान केले होते. झाडे हिरव्या हिरव्या पानाने हिरवीकंच दिसत होती. निसर्गाकडे कुठला कुंचा आहे माहित नाही. प्रत्येक हिरवा रंग दुसऱ्या पेक्षा वेगळा भासतो.एकही झाड निशपर्ण नव्हते. किती छान वाटत होतं. मैदानात एका ठिकाणी पाणी साचल होतं,आपण डबक म्हणतो त्याला. पण त्याच पाण्यात चिमण्या,मैना, बुलबुल सारखे आणि इतर कधीही दृष्टीस न पडणारे छोटे छोटे पक्षी विहार करीत होते.अंगावर पाणी घेऊन ते पंखांनी झटकून आपले पंख वाळवत होते.कुतहुल म्हणून तिथेच थोडा वेळ उभा राहिलो. ते इतक्या मिनिटांत आज इतके चालले तर एवढ्या calories कमी होतात,हे बाजूला ठेऊन.कारण इतर दिवशी ते सर्व पूर्ण करता येईल हो,पण हे सुख नेहमी मिळेल असं नाही...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .