Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

सकाळची सफर

  


आज बऱ्याच दिवसांनी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलो होतो.15 दिवस झाले,पाऊस स्वतः उसंत घेत नव्हता आणि आपल्याला उसंत घेऊ देत नव्हता. घरात बसून बसून कंटाळलेले मन,म्हटलं बाहेर पडलो तर ताजेतवाने होईल,प्रसन्न वाटेल. आपलं कसं असतं, आपण पाऊस नाही आला तरी परेशान असतो आणि तो आला तरी.रस्त्याने चालू लागलो.बाजूच्या धरणीने हिरवा अंगरखा पांघरला होता.जणू पावसाच्या आगमनाने ती खुष होऊन तिने नवे वस्त्र परिधान केले होते. झाडे हिरव्या हिरव्या पानाने हिरवीकंच दिसत होती. निसर्गाकडे कुठला कुंचा आहे माहित नाही. प्रत्येक हिरवा रंग दुसऱ्या पेक्षा वेगळा भासतो.एकही झाड निशपर्ण नव्हते. किती छान वाटत होतं. मैदानात एका ठिकाणी पाणी साचल होतं,आपण डबक म्हणतो त्याला. पण त्याच पाण्यात चिमण्या,मैना, बुलबुल सारखे आणि इतर कधीही दृष्टीस न पडणारे छोटे छोटे पक्षी विहार करीत होते.अंगावर पाणी घेऊन ते पंखांनी झटकून आपले पंख वाळवत होते.कुतहुल म्हणून तिथेच थोडा वेळ उभा राहिलो. ते इतक्या मिनिटांत आज इतके चालले तर एवढ्या calories कमी होतात,हे बाजूला ठेऊन.कारण इतर दिवशी ते सर्व पूर्ण करता येईल हो,पण हे सुख नेहमी मिळेल असं नाही.बऱ्याच वेळानी एक ट्रक तिथून गेला आणि त्याच्या आवाजाने ते सगळे पक्षी उडून गेले. कुठे तरी एखादं दुसरं फुलपाखरू दिसतं होतं.लहानपणची आठवण झाली. चाळीसगांवला टेक्सटाइल मिल कंपाऊंड मधे क्वार्टर मधे आम्ही रहात होतो.फुलपाखरांच्या मागे धावत असू. फिक्कट पिवळ्या रंगांची ती फुलपाखर जे फूल दिसेल त्या फुलावर बसत असतं.कधी कधी प्रत्येक झाडावर दिसे. कुठे गेली ती सगळी फुलपाखर.आता दुर्मिळ झालेल एखाद फुलपाखरू दिसलं की खूप बरं वाटतं. असं वाटून गेलं की निसर्ग म्हणजे ही झाडं, पानफुल, हे छोटे मोठे पक्षी हे पावसाळ्याचा किती आनंद घेतांना दिसतात.आपण मात्र काही ना काही कारण शोधत असतो तक्रार करण्याचे. पाऊस कमी आला तरी तक्रार आणि जास्त आला तरी. त्याच्या आशा कमी किंवा जास्त येण्याच्या कृत्याला आपण जबाबदार आहोत,हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरतो.आपण निसर्गाचा एक भाग आहोत, पण त्याला आपण जेवढे नुकसान पोहोचवित आहोत. त्याच्या कैक पटीने आपले नुकसान होतं आहे.मी जवळपास रोज मॉर्निंग वॉकला जातो.पण आजचा मॉर्निंग वॉक वेगळेच समाधान देऊन गेला      

 

                                                            प्रसाद नातु, पुणे. 

                                                            8888818589   

 

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...