
आज बऱ्याच दिवसांनी
मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलो होतो.15 दिवस झाले,पाऊस स्वतः उसंत घेत नव्हता आणि
आपल्याला उसंत घेऊ देत नव्हता. घरात बसून बसून कंटाळलेले मन,म्हटलं बाहेर पडलो तर ताजेतवाने
होईल,प्रसन्न वाटेल. आपलं कसं असतं, आपण पाऊस नाही आला तरी परेशान असतो आणि तो आला
तरी.रस्त्याने चालू लागलो.बाजूच्या धरणीने हिरवा अंगरखा
पांघरला होता.जणू पावसाच्या आगमनाने ती खुष होऊन तिने नवे वस्त्र परिधान केले होते.
झाडे हिरव्या हिरव्या पानाने हिरवीकंच दिसत होती. निसर्गाकडे कुठला कुंचा आहे माहित
नाही. प्रत्येक हिरवा रंग दुसऱ्या पेक्षा वेगळा भासतो.एकही झाड निशपर्ण नव्हते.
किती छान वाटत होतं. मैदानात एका ठिकाणी पाणी साचल होतं,आपण डबक म्हणतो त्याला. पण
त्याच पाण्यात चिमण्या,मैना, बुलबुल सारखे आणि इतर कधीही दृष्टीस न पडणारे छोटे
छोटे पक्षी विहार करीत होते.अंगावर पाणी घेऊन ते पंखांनी झटकून आपले पंख वाळवत
होते.कुतहुल म्हणून तिथेच थोडा वेळ उभा राहिलो. ते इतक्या मिनिटांत आज इतके चालले
तर एवढ्या calories कमी होतात,हे
बाजूला ठेऊन.कारण इतर दिवशी ते सर्व पूर्ण करता येईल हो,पण हे सुख नेहमी मिळेल असं
नाही.बऱ्याच वेळानी एक ट्रक तिथून गेला आणि त्याच्या आवाजाने ते सगळे पक्षी उडून
गेले. कुठे तरी एखादं दुसरं फुलपाखरू दिसतं होतं.लहानपणची आठवण झाली. चाळीसगांवला
टेक्सटाइल मिल कंपाऊंड मधे क्वार्टर मधे आम्ही रहात होतो.फुलपाखरांच्या मागे धावत
असू. फिक्कट पिवळ्या रंगांची ती फुलपाखर जे फूल दिसेल त्या फुलावर बसत असतं.कधी
कधी प्रत्येक झाडावर दिसे. कुठे गेली ती सगळी फुलपाखर.आता दुर्मिळ झालेल एखाद
फुलपाखरू दिसलं की खूप बरं वाटतं. असं वाटून गेलं की निसर्ग म्हणजे ही झाडं,
पानफुल, हे छोटे मोठे पक्षी हे पावसाळ्याचा किती आनंद घेतांना दिसतात.आपण मात्र
काही ना काही कारण शोधत असतो तक्रार करण्याचे. पाऊस कमी आला तरी तक्रार आणि जास्त
आला तरी. त्याच्या आशा कमी किंवा जास्त येण्याच्या कृत्याला आपण जबाबदार आहोत,हे
मात्र आपण सोयीस्करपणे विसरतो.आपण निसर्गाचा एक भाग आहोत, पण त्याला आपण जेवढे
नुकसान पोहोचवित आहोत. त्याच्या कैक पटीने आपले नुकसान होतं आहे.मी जवळपास रोज
मॉर्निंग वॉकला जातो.पण आजचा मॉर्निंग वॉक वेगळेच समाधान देऊन गेला
प्रसाद नातु, पुणे.
8888818589
Comments
Post a Comment