ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...
ब्लॉग नं: 2025/059 दिनांक: 28 फेब्रुवरी, 2025. मित्रांनो: बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस एखाद्याला सांगितलं जातं की, तू विचार अजिबात करत नाहीस आणि हे सारे विचार न करण्याचे परिणाम आहेत.अन काही वेळेस असंही म्हटलं जात की, तू ना अतिविचार करतोस,त्याचे हे परिणाम आहेत.मग नेमकं करायचं काय हा प्रश्न मनांत उभा राहतो. उत्तर आहे,विचार करा पण अति-विचार करू नका. कारण विचार करण्याचे सकारात्मक परिणाम असू शकतात,पण अति-विचाराचे अधिकाधिक वेळा नकारात्मक परिणाम दिसून येतात.आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये अति-विचार म्हणजे काय? अति-विचाराचे काय परिणाम होतात आणि तो कसा थांबवावा? हे जाणून घेणार आहोत. अति-विचार म्हणजे काय ? आणि तो कसा थांबवावा ? अति-विचार म्हणजे काय ? अति-विचार म्हणजे एखाद्या समस्येचा किंवा परिस्थितीचा पुनःपुन्हा विचार करणे , ज्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो. हा विचारांचा वेग एवढा जास्त ...