Skip to main content

Posts

Showing posts with the label MSME

टाइप 5 मधुमेह

ब्लाॅग नं.2025/150 दिनांकः 31 मे, 2025. मित्रांनो,  मधुमेहाचा नवा प्रकार: प्रकार ५ मधुमेह – एक नवा दृष्टिकोन एप्रिल २०२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने (IDF) मधुमेहाच्या एका नवीन प्रकाराला अधिकृत मान्यता दिली – प्रकार ५ मधुमेह. या नवीन प्रकारामुळे जगभरातील आरोग्य क्षेत्रात नवी जागरूकता निर्माण झाली आहे. प्रकार ५ मधुमेह विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. अंदाजानुसार, सुमारे २० ते २५ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. प्रकार ५ मधुमेह म्हणजे काय? प्रकार ५ मधुमेहाला "गंभीर इन्सुलिन-कमी असलेला मधुमेह" (Severe Insulin-Deficient Diabetes - SIDD) म्हणूनही ओळखले जाते. हा मधुमेह इतर प्रकारांपेक्षा वेगळा आहे. कुपोषणामुळे होणाऱ्या चयापचय विकारांशी त्याचा थेट संबंध असून, विशेषतः किशोरवयीन आणि तरुण प्रौढांवर त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो. दीर्घकाळ कुपोषणामुळे शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. परिणामतः, शरीर इन्सुलिनची निर्मिती पुरेशा प्रमाणात करू शकत नाही. यामुळे चयापचय स्थिरता राखणे कठीण होते. टाइप १ आणि ...

किशोरावस्थेतील काही प्रसंग

मित्रांनो    चाळीसगाव सुटलं. तसा मी ही आपला प्रवास किशोरवस्थेकडे सुरू केला होता.आमच्या ध्यानी मानी नसतांना आबासाहेबांना सिकंदराबादच्या   डी.बीआर.मिल्स कडून नोकरीची ऑफर आली.ते इंटरव्ह्यु साठी गेले अन तिकडे कामावर रुजू झाले.आबासाहेब आता डी.बीआर.मिल्स, सिकंदराबाद येथे नोकरीला लागले होते.1970 साली रु.1200/-पगाराची नोकरी म्हणजे गंमत नव्हती.हैदराबाद आणि सिकंदराबादच्या मधोमध, टॅंक बंद रोडच्या समोर, डी.बीआर.मिल्स अर्थात दिवाण बहादूर रामगोपाल मिल्स. विस्तीर्ण पसरलेला हुसैन सागर अगदी समोर होता.त्यात एक रोटरी पार्क होता. डी.बीआर.मिल्स.ही सिकंदराबाद आणि हैदराबादच्या सीमा रेषेवर होती. कवाडीगुडा हे त्या भागाचे नांव जिथे ही मिल होती.घरातून टॅंक बंद रोडची ट्राफिक दिसत असे.               चाळीसगाव सारख्या लहान गावातून एकदम हैदराबाद-सिकंदराबाद सारख्या मोठ्या गावात रहायला जाणे.एक चॅलेंज होतं हे. हैदराबाद आता इतके मोठे नसले तरी जवळपास 350 वर्षाचा इतिहास आणि एकेकाळी निझामाची राजधानी असलेले शहर होते.हैदराबाद आणि सिकंदराबाद ही जु...

कोविड 19 , एम.एस एम. ई.उद्योग आणि वारश्याचे नियोजन (Succession Planning )

  मित्रांनो ,  आपण सगळेच जाणता आहात कि , कोविड 19 ने अखिल जगताला कसे आणि किती नुकसान पोहोचवले आहे.जीवित हानी तर झालीच. पण अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत.जागतिक अर्थव्यवस्थेला ह्याचा खूप मोठा धक्का बसला.आपला भारत देश ह्या जगाचाच हिस्सा किंवा भाग आहे.त्यामुळे भारताची देखील अपरिमित हानी झाली.अर्थ व्यवस्थेला खीळ बसली.भारत हा सामान्यतः सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांनी व्यापलेला देश.   भारताच्या एकूण जी डी पी च्या 36.9%  इतके योगदान सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांचे (उत्पादन क्षेत्र ) 2020-21 ह्या कालखंडाचा विचार करता होते.तेच निर्यातीत ह्याच कालखंडात 49.5% सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांचे राहिले आहे.जवळपास 15 करोंड लोकांना सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.(सौजन्य सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय , केंद्र सरकार) ह्याच कालखंडात मजुरांच्या   स्थलांतरांचा विषय ऐरणीवर आला.हे    स्थलांतर केलेले मजूर आपल्या गांवी परतले.पण नंतर सगळे कामावर हजर झाले नाहीत किंवा ते अनेक कौटुंबिक समस्यांमुळे कामावर परतू शकले नाहीत.जसे घराकडील...