ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
Blog No. 2024/ 11 2 . Date: 3 1 st ,May 2024 मित्रांनो , रेफ्रिजरेटर हे कमी तापमानात अन्न आणि पेये साठवण्यासाठी वापरले जाणारे , सामान्य घरगुती उपकरण आहे.त्याचे प्राथमिक कार्य म्हणजे जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांची वाढ कमी करणे , ज्यामुळे नाशवंत वस्तूंचे शेल्फ लाइफ वाढते.साधारणतः, रेफ्रिजरेटर म्हणजे काय आणि त्याचे कार्य काय,याचे थोडक्यात उत्तर हे आहे. रेफ्रिजरेटर मध्ये काय काय ठेवू नये,याची यादी खरं म्हणजे खूप मोठी आहे.आपण आजकाल रेफ्रिजरेटरचा उपयोग कपाटासारखा करतो.पण रेफ्रिजरेटर आजारांना कारणीभूत ठरू शकतात ? होय , तुम्ही बरोबर वाचलंत. कसे ते सविस्तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: काही खाद्य पदार्थ किंवा वस्तु जर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या,तर त्या विषारी आणि मानवी वापरासाठी अयोग्य बनू शकतात.खाद्यपदार्थ रेफ्रिजरेट करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अन्नाची उष्णता कमी करणे , त्याचे तापमान कमी करणे आणि ते जास्त काळ टिकवून ठेवणे.पण डॉ.डिंपल जांगडा , एक आयुर्वेद आंत आरोग्य प्र...