ब्लाॅग नं.2026/125. दिनांकः 5 मे, 2026. मित्रांनो , आजकालच्या मुलांना म्हणजे नातवंडाना, डोळे येणे ही कल्पनाच खुप भारी वाटते. आपले डोळे तर already आहेत,मग डोळे येतात म्हणजे काय आबा? या प्रश्नाचं उत्तर माझे डोळे किंवा त्याचे डोळे (अर्थात त्याचे न येवोत, ही मनातल्या मनात प्रार्थना) आल्याशिवाय सांगता यायचं नाही.आणि आल्यावरही त्याला डोळे येणे कां म्हणतात, हे सांगता येणं तसं कठीणच.तर सकाळी झोपेतून उठताच तुमच्या डोळ्यांतून पाणी येतंय? पापण्या चिकटल्या आहेत? जाणून घ्या यामागची कारणे आणि उपाय, आजच्या ब्लाॅगमधे. सविस्तरः डोळे हे आपल्या शरीराचे अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील अवयव आहेत. या सुंदर जगाचे दर्शन घडवणारे आपले डोळे केवळ पाहण्याचे काम करत नाहीत, तर ते आपल्या आरोग्याबद्दलचे अनेक संकेतही देतात. आपण बऱ्याचदा ऐकले असेल की, "डोळे बोलके असतात," पण कधीकधी हे डोळे स्वतःच काही समस्या सांगण्याचा प्रयत्न करत असतात. विशेषतः सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांतून पाणी येणे, पापण्या एकमेकांना चिकटणे किंवा डोळ्यांत जळजळ होणे, अशा समस्या अनेकांना भेडसावतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्...
ब्लाॅग नं.2026/123. दिनांकः 3 मे, 2026. मित्रांनो , ग्रेट निकोबार प्रकल्प : पर्यावरण आणि राष्ट्रीय सुरक्षेचा समतोल साधणारा,भारताचा हा निर्णायक टप्पा आहे , असं म्हटलं तर ते चुकीच ठरणार नाही.पण मोदी सरकारच्या धोरणाला नव्हे,तर देशहिताच्या आणि देशाच्या सुरक्षिततेच्या प्रत्येक मुद्द्याला विरोध करायचा,हे व्रत हाती घेतलेल्या लोकांनी,यांस पर्यावरणाच्या आडून विरोध सुरु केला आहे.या प्रकल्पाविषयी जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमधून. सविस्तरः भारताच्या विकासयात्रेत काही प्रकल्प असे आहेत , जे फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे तर सामरिक , भूराजकीय आणि भविष्यातील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ग्रेट निकोबार प्रकल्प हा त्यापैकीच एक प्रकल्प आहे.अलीकडे या प्रकल्पावर राजकीय स्तरावर चर्चा रंगली आहे.काहींनी पर्यावरणीय कारणांवरून विरोध दर्शवला , तर माजी वायुसेना प्रमुखांनी,या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत,स्पष्टपणे सांगितले की , भारतासाठी हा प्रकल्प केवळ विकास नव्हे,तर हिंद महासागरातील भारताची सामरिक उपस्थिती मजबूत करणारा टप्पा आहे. ग्रेट निकोबार कुठे आहे आणि का महत्त्वा...