ब्लाॅग नं. 2026/227 . दिनांकः 15 ऑगस्ट, 2026. मित्रांनो , आज भारताचा 80 वा स्वतंत्रता दिवस आपण साजरा करत आहोत. यानिमित्त आपणा सर्वास खूप खूप शुभेच्छा. आजच्या या ब्लॉगमधून, आपण या गोष्टीची चर्चा करणार आहोत की, देशापुढील आव्हाने कुठली आणि लोकशाही पुढील आव्हाने कुठली आहेत. सविस्तरः संसदेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपल. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी, म्हणजेच खासदार, हे आपल्या तर्फे आपल्या मतदारसंघातील किंवा देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न, संसदेच्या अधिवेशनात मांडत असतात. या प्रश्नांची सरकारकडून उत्तर मागितली जातात. या अर्थाने संसदेचे अधिवेशन ही एक प्रकारे सरकारची परीक्षा असते. दैनंदिन कामकाजातून जे प्रश्न मार्गी लागत नाहीत, ते लोकहिताचे आणि देशहिताचे प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य, संसदेच्या अधिवेशनातून होत असतं किंवा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा असते. पण पावसाळी अधिवेशनात, संसदेच्या प्रत्येक सभागृहाचं म्हणजेच लोकसभेचे 114 तास आणि राज्यसभेचे प्रत्ये 114 तास.असे एकूण 228 तास एवढे काम होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मात्र लोकसभेचे 17 तास आणि राज्यसभेचे 38 तास असे एकूण 55 तास ए...
ब्लाॅग नं.2026/226. दिनांकः 14 ऑगस्ट 2026. मित्रांनो , पावसाळ्यात डेंग्यूपासून सांभाळा पावसाळा सुरू झाला की , वातावरण आल्हाददायक होते ; पण त्याचबरोबर अनेक संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढतो.ठिकठिकाणी साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण ठरते. त्यातून डेंग्यूचा प्रसार होण्याची शक्यता वाढते.आजच्या ब्लॉगमध्ये आपण डेंग्यूचा आजार कसा होतो,उपाय आणि काळजी यावर सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर: डेंग्यू एक विषाणूजन्य आजारः डेंग्यू हा Aedes डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे.विशेषतः Aedes aegypti हा डास घराच्या आसपास साचलेल्या स्वच्छ किंवा तुलनेने स्वच्छ पाण्यातही वाढू शकतो.त्यामुळे केवळ मोठी गटारे किंवा अस्वच्छ जागाच नव्हे , तर घरातील छोटी छोटी पाणी साठण्याची ठिकाणेही धोकादायक ठरू शकतात. डेंग्यूचा डास आपल्या घरातच तर वाढत नाही ना ? घराभोवती पडलेले जुने टायर , नारळाच्या करवंट्या , प्लास्टिकच्या बाटल्या , कुंड्यांच्या खालील ट्रे , उघड्या पाण्याच्या टाक्या , बादल्या किंवा इतर भांडी यामध्ये पाणी साचले असेल तर ते डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण बनू शकते. ही काळजी घ्या...