ब्लॉग नं. 2026/ 243. दिनांक: 31 ऑगस्ट, 2026. मित्रांनो , रक्तातील साखरेच्या नियंत्रणापलीकडे आधुनिक उपचारांची गरज भारतात टाईप 2 मधुमेहाची समस्या अत्यंत वेगाने वाढत असून , सध्या देशात 10 कोटींहून अधिक प्रौढ व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत.आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या ( IDF) अंदाजानुसार ,2050 पर्यंत ही संख्या 15 कोटींहून अधिक होण्याचा धोका आहे.धक्कादायक बाब म्हणजे , पाश्चात्य देशांच्या तुलनेत,भारतीयांना हा आजार सुमारे एक दशक आधीच जडतो.त्यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन केवळ रक्तातील साखर कमी करण्यापुरते मर्यादित न ठेवता , संपूर्ण शरीराचे आणि महत्वाच्या अवयवांचे रक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे.जाणून घेऊ याबद्दल आधी काही. सविस्तर: मधुमेह: केवळ साखरेची पातळी नव्हे , तर अनेक अवयवांचा धोका: मधुमेहाकडे केवळ ग्लुकोजची पातळी वाढणे म्हणून पाहणे चुकीचे ठरेल.रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास खालील गंभीर समस्या उद्भवू शकतात: 1. हृदयविकार आणि पक्षाघात ( Stroke) , 2.दीर्घकालीन मूत्रपिंड विकार ( Kidney Disease) , 3.मज्जातंतूंचे नुकसान ( Nerve Damage)...
ब्लॉग नं. 2026/ 242. दिनांक: 30 ऑगस्ट, 2026. “ व्यथांच्या कथा” या मालिकेचा समारोप : प्रत्येक वयाची व्यथा वेगळी , पण वेदना सारखीच! मित्रांनो , “ व्यथांच्या कथा” या मालिकेत आपण बालपणापासून ज्येष्ठत्वापर्यंतच्या वेगवेगळ्या वयोगटांकडे पाहिलं. शाळकरी मुलाची व्यथा—अपेक्षांचं ओझं. तरुणाची व्यथा—भविष्याची अनिश्चितता. नोकरी करणाऱ्याची व्यथा—काम आणि जीवनातील संघर्ष. दररोज प्रवास करणाऱ्याची व्यथा—धावपळ आणि मानसिक थकवा. मध्यमवयीन व्यक्तीची व्यथा—जबाबदाऱ्यांचं ओझं. आणि ज्येष्ठ नागरिकांची व्यथा—एकटेपणा आणि आपलेपणाची गरज. व्यथा वेगवेगळ्या आहेत. परिस्थिती वेगवेगळी आहे. वय वेगळं आहे. पण एक गोष्ट मात्र समान आहे— प्रत्येकाला कुणीतरी समजून घ्यावं असं वाटतं. कुणीतरी आपलं म्हणावं. कुणीतरी शांतपणे ऐकावं. कुणीतरी न सांगताही मनातलं ओळखावं. म्हणून कदाचित आजच्या काळात, माणसाला पैशाइतकाच , सुविधांइतकाच आणि यशाइतकाच संवादाची आणि आपलेपणाची गरज आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांकडे, थोडं अधिक लक्ष देऊ या. मुलाला विचारू या—“काय झाल...