Skip to main content

Posts

लोकशाहीपुढील आव्हाने

ब्लाॅग नं. 2026/227 . दिनांकः 15 ऑगस्ट, 2026. मित्रांनो , आज भारताचा 80 वा स्वतंत्रता दिवस आपण साजरा करत आहोत. यानिमित्त आपणा सर्वास खूप खूप शुभेच्छा. आजच्या या ब्लॉगमधून, आपण या गोष्टीची चर्चा करणार आहोत की, देशापुढील आव्हाने कुठली आणि लोकशाही पुढील आव्हाने कुठली आहेत. सविस्तरः संसदेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपल. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी, म्हणजेच खासदार, हे आपल्या तर्फे आपल्या मतदारसंघातील किंवा देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न, संसदेच्या अधिवेशनात मांडत असतात. या प्रश्नांची सरकारकडून उत्तर मागितली जातात. या अर्थाने संसदेचे अधिवेशन ही एक प्रकारे सरकारची परीक्षा असते. दैनंदिन कामकाजातून जे प्रश्न मार्गी लागत नाहीत, ते लोकहिताचे आणि देशहिताचे प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य, संसदेच्या अधिवेशनातून होत असतं किंवा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा असते. पण पावसाळी अधिवेशनात, संसदेच्या प्रत्येक सभागृहाचं म्हणजेच लोकसभेचे 114 तास आणि राज्यसभेचे प्रत्ये 114 तास.असे एकूण 228 तास एवढे काम होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मात्र लोकसभेचे 17 तास आणि राज्यसभेचे 38 तास असे एकूण 55 तास ए...

Select your Language

Recent posts

पावसाळ्यात डेंग्यूपासून सांभाळा

ब्लाॅग नं.2026/226. दिनांकः 14 ऑगस्ट 2026. मित्रांनो , पावसाळ्यात डेंग्यूपासून सांभाळा पावसाळा सुरू झाला की , वातावरण आल्हाददायक होते ; पण त्याचबरोबर अनेक संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढतो.ठिकठिकाणी साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण ठरते. त्यातून डेंग्यूचा प्रसार होण्याची शक्यता वाढते.आजच्या ब्लॉगमध्ये आपण डेंग्यूचा आजार कसा होतो,उपाय आणि काळजी यावर सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर: डेंग्यू एक विषाणूजन्य आजारः डेंग्यू हा Aedes डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे.विशेषतः Aedes aegypti हा डास घराच्या आसपास साचलेल्या स्वच्छ किंवा तुलनेने स्वच्छ पाण्यातही वाढू शकतो.त्यामुळे केवळ मोठी गटारे किंवा अस्वच्छ जागाच नव्हे , तर घरातील छोटी छोटी पाणी साठण्याची ठिकाणेही धोकादायक ठरू शकतात. डेंग्यूचा डास आपल्या घरातच तर वाढत नाही ना ? घराभोवती पडलेले जुने टायर , नारळाच्या करवंट्या , प्लास्टिकच्या बाटल्या , कुंड्यांच्या खालील ट्रे , उघड्या पाण्याच्या टाक्या , बादल्या किंवा इतर भांडी यामध्ये पाणी साचले असेल तर ते डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण बनू शकते. ही काळजी घ्या...

पायांचे व्यायाम आणि मधूमेहावर परिणाम

ब्लॉग नं. 2026/ 225.   दिनांक: 13 ऑगस्ट, 2026. मित्रांनो , पायांचे व्यायाम रक्तातील साखरेवर नेमका काय परिणाम करतात ? अलीकडेच फिटनेस ट्रेनर रितिक चौधरी यांनी , इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे दावा केला की , " पायांचे साधे व्यायाम" रक्तातील साखर " 52 % पर्यंत कमी" करू शकतात.मधुमेहाच्या रुग्णांमध्ये साखरेचे नियंत्रण सुधारण्यासाठी या व्हिडिओत शरीराच्या खालच्या भागाचे ( lower-body) व्यायाम सुचवण्यात आले होते. परंतु , या दाव्यात नक्की किती तथ्य आहे ? ' इक्विलिब्रियम जिम ' चे फिटनेस ट्रेनर प्रदीप गिल यांच्या मदतीने याविषयी सविस्तर जाणून घेऊया , आजच्या ब्लॉगमध्ये.    सविस्तर: पायांच्या व्यायामाचा रक्तातील साखरेवर होणारा परिणाम मधुमेहाच्या व्यवस्थापनात नियमित व्यायाम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.शरीरातील मोठ्या स्नायूंचा , विशेषतः पायांच्या स्नायूंचा वापर केल्यास रक्तातील ग्लुकोजचा वापर वाढतो: ग्लुकोजचा वापर: पायांचे स्नायू आकाराने मोठे असतात. व्यायामादरम्यान ते ऊर्जेसाठी रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात शोषून घेतात. इन्सुलिन संवेदनशीलतेत सुधारणा: पायांच्या हालचालींमुळे शरी...

मेटफॉर्मिन: टाइप 2 मधुमेहावरील प्रभावी औषध

  ब्लॉग नं. 2026/ 224.   दिनांक: 12 ऑगस्ट, 2026. मित्रांनो , मेटफॉर्मिन: टाइप 2 मधुमेहावरील प्रभावी औषध आणि त्याचे कार्य  टाइप 2 मधुमेहाचे ( Type 2 Diabetes) निदान झाल्यानंतर,डॉक्टरांकडून सर्वात आधी सुचवले जाणारे औषध म्हणजे ' मेटफॉर्मिन ' (Metformin). मधुमेहाच्या व्यवस्थापनात हे एक अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाचे औषध मानले जाते.परंतु , हे औषध रक्तातील साखर नक्की किती प्रमाणात कमी करू शकते , असा प्रश्न अनेक रुग्णांच्या मनात असतो.ठाण्यातील KIMS हॉस्पिटल्समधील मधुमेहशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय नेगलूर या विषयी काय म्हणतात,अधिक जाणून घेऊया, आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: मेटफॉर्मिन रक्तातील साखर किती कमी करते ? मेटफॉर्मिनमुळे रक्तातील साखर नक्की किती कमी होईल , याचा असा कोणताही एकच आकडा सर्वांसाठी लागू होत नाही.याची परिणामकारकता प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते आणि ती खालील घटकांवर अवलंबून असते: 1.सुरुवातीची साखरेची पातळी: उपचारांपूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण किती होते. 2.मधुमेहाचा कालावधी: व्यक्तीला किती काळापासून मधुमेह आहे. 3.जीवनशैली: आहाराच्या...

सर्व काही व्यवस्थित असतांनाही थकवा जाणवतो?

  ब्लॉग नं. 2026/ 223.   दिनांक: 11 ऑगस्ट, 2026.   मित्रांनो ,             काही वेळेस तुम्हाला लक्षात येत नाही की, सर्व काही व्यवस्थित असतांनाही थकवा कां जाणवतो, असं आपल्याला वाटत असतं.पण त्याची जीवनशैली विषयक काही कारणं असू शकतात,काही वरवर न दिसणारी कारणं असू शकतात,जसे की लोहाची ( Iron ) कमतरता, थायरॉईडची समस्या,व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता इत्यादि.आजच्या या ब्लॉगमध्ये आपण या विषयावर चर्चा करूयात.                  1 .लोहाची कमतरता ( Iron-Deficiency Anaemia) : अनेक लोक रोजची कामे करत असतात , पण त्यांना नेहमीच थकवा , एकाग्रतेचा अभाव किंवा थोड्याशा श्रमाने धाप लागणे असा त्रास होतो. शरीरात लोह कमी असल्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते आणि पेशींपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही. महिला , गरोदर स्त्रिया , शाकाहारी लोक आणि पचनसंस्थेचे विकार असलेल्या लोकांमध्ये हा धोका जास्त असतो. 2 .थायरॉईडची समस्या ( Hypothyroidism) : थायरॉईड ग्रंथी मंदावल्यास (हा...

HbA1c बद्दलचे 4 गैरसमज

  ब्लॉग नं . 2026 /222.    दिनांक: 10  मे, 2026.      मित्रांनो , दरवर्षी लाखो भारतीय पॅथॉलॉजी लॅबमधून , आपला  HbA1c ( सरासरी साखर) रिपोर्ट  ' नॉर्मल '  आला की , बरेच जण सुटकेचा नि:श्वास सोडतात.पण हा एक आकडा , म्हणजेच सर्व काही आहे कां? भारतात  10  कोटींहून अधिक लोक , मधुमेहाने ग्रस्त असताना ,  केवळ एका चाचणीवर विसंबून राहणे धोक्याचे ठरू शकते.चला तर मग , HbA1c  शी संबंधित काही महत्त्वाचे गैरसमज , आजच्या ब्लॉगमध्ये   दूर करूया. सविस्तर: HbA1c  बद्दलचे  4  गंभीर गैरसमज: गैरसमज  1: 6.5 % पेक्षा कमी  HbA1c  म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात? हा सर्वात मोठा भ्रम आहे.  HbA1c  फक्त गेल्या  3  महिन्यांची रक्तातील साखरेची सरासरी सांगते.जेव्हा हा आकडा  6.5 % ओलांडतो ,  तेव्हा तुमच्या शरीरात , गेल्या  5  ते  10  वर्षांपासून इन्सुलिन प्रतिरोध ( Insulin Resistance)  शांतपणे वाढत असतो.नॉर्मल रिपोर्टचा अर्थ असा असू शकतो की , तुमचे शर...