Skip to main content

Posts

व्यायामामुळे स्नायूंना ग्लुकोज कसे मिळते?

  ब्लॉग नं. 2026/ 246.   दिनांक:   3 सप्टेंबर, 2026. मित्रांनो ,  व्यायाम करताना स्नायूंना ग्लुकोज घेण्यासाठी इन्सुलिनची गरज नसते का ? हा प्रश्न बरेच लोक विचारतांना दिसतात. हे वाक्य तुम्ही कदाचित ऐकले असेल. हे पूर्णपणे चुकीचे नाही ; उलट त्यामागे एक अतिशय महत्त्वाची वैज्ञानिक प्रक्रिया आहे. मात्र , याचा अर्थ असा अजिबात नाही की,मधुमेह असलेल्या व्यक्तीने इन्सुलिन किंवा डॉक्टरांनी दिलेली औषधे बंद करावीत.आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.  सविस्तर: स्नायूंना ग्लुकोजची गरज का असते ? आपण चालतो , धावतो , सायकल चालवतो किंवा strength training करतो , तेव्हा स्नायू मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरतात. या ऊर्जेसाठी glucose हा महत्त्वाचा स्रोत आहे.सामान्य परिस्थितीत रक्तातील glucose स्नायूंच्या पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी insulin महत्त्वाची भूमिका बजावते.इन्सुलिन रक्तातील glucose कमी करण्यासाठी स्वादुपिंडातून स्रवते आणि स्नायूंच्या पेशींना glucose आत घेण्यास मदत करते. पण व्यायामाच्या वेळी शरीराकडे glucose पेशींमध्ये पोहोचवण्याचा आणखी एक मार्ग सक्रिय होतो. व्य...

Select your Language

Recent posts

बटाटे आणि तांदूळ खाण्याची पद्धत बदला

  ब्लॉग नं. 2026/ 245.   दिनांक: 2 सप्टेंबर, 2026.   मित्रांनो ,  बटाटे आणि तांदूळ खाण्याची पद्धत बदला , रक्तातील साखरेवर ठेवा नियंत्रण! रक्तातील साखर (ब्लड शुगर) अचानक वाढण्यासाठी ,  अनेकदा कर्बोदकांना ( carbs) जबाबदार धरले जाते. पण , जर तुम्ही कर्बोदके खाताना थोडी योग्य पद्धत वापरली , तर हा धोका नक्कीच कमी करू शकता .    होय , रोजच्या आहारातील पदार्थ तयार करण्याच्या आणि खाण्याच्या पद्धतीत छोटेसे बदल करून , तुम्ही रक्तातील साखरेचे उत्तम नियंत्रण करू शकता. सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये.    सविस्तर: साखर अचानक वाढण्यावर नियंत्रण मिळवण्याचे उपाय : साखर अचानक वाढण्यावर ( spikes) नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक सोपे उपाय आहेत . जसे की जेवणात पदार्थ खाण्याचा क्रम बदलणे किंवा योग्य पदार्थांचे संयोजन ( pairing) करणे. याशिवाय , यात आणखी एक महत्त्वाचा उपाय आहे जो तापमानाशी संबंधित आहे. न्यु जर्सी येथील प्रसिद्ध एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. अलेसिया रोहनेल्ट यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे एक सोपा आणि प्रभावी पर्याय सांगितला आहे: " कर्बोदके थंड करून खा...

उच्च कोलेस्ट्रॉलला बऱ्याचदा 'सायलेंट किलर' म्हटले जाते

  ब्लॉग नं. 2026/ 244.   दिनांक: 1 सप्टेंबर, 2026.   मित्रांनो ,  उच्च कोलेस्ट्रॉलला ( High Cholesterol) बऱ्याचदा ' सायलेंट किलर ' (Silent Killer) म्हटले जाते. कारण शरीरात एलडीएल ( LDL) किंवा वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर , अनेक वर्षे कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत आणि आतून रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक ( Plaque) साचत राहतो. परंतु , हृदयविकाराचा झटका किंवा इतर गंभीर समस्या येण्याआधी आपले शरीर काही बारीक-सारिक संकेत देत असते.हाय - कोलेस्ट्रॉल हृदयापर्यंत पोहोचण्यापूर्वी शरीरावर जे 7 संकेत दिसतात , ते जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते , शरीरावर किंवा दैनंदिन हालचालींमध्ये दिसणारे 7 भौतिक संकेत जर वेळीच ओळखले , तर होणारा मोठा धोका टळू शकतो. शरीरावर दिसणारे हे 7 महत्त्वाचे संकेत खालील प्रमाणे; 1 .डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळसर पुरळ/गाठी ( Xanthelasma) : डोळ्यांच्या पापण्यांवर किंवा त्याच्या आसपासच्या त्वचेवर , फिकट पिवळ्या रंगाचे छोटे सुजलेले डाग किंवा मऊ गाठी दिसू लागतात. हे त्वचेखाली अतिरिक्त कोलेस्ट्रॉल जमा झाल्याचे थे...

मधूमेहात केवळ साखरेवर नियंत्रण पुरेसे नाही ?

  ब्लॉग नं. 2026/ 243.   दिनांक: 31 ऑगस्ट, 2026.   मित्रांनो ,  रक्तातील साखरेच्या नियंत्रणापलीकडे आधुनिक उपचारांची गरज भारतात टाईप 2 मधुमेहाची समस्या अत्यंत वेगाने वाढत असून , सध्या देशात 10 कोटींहून अधिक प्रौढ व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत.आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या ( IDF) अंदाजानुसार ,2050 पर्यंत ही संख्या 15 कोटींहून अधिक होण्याचा धोका आहे.धक्कादायक बाब म्हणजे , पाश्चात्य देशांच्या तुलनेत,भारतीयांना हा आजार सुमारे एक दशक आधीच जडतो.त्यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन केवळ रक्तातील साखर कमी करण्यापुरते मर्यादित न ठेवता , संपूर्ण शरीराचे आणि महत्वाच्या अवयवांचे रक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे.जाणून घेऊ याबद्दल आधी काही. सविस्तर: मधुमेह: केवळ साखरेची पातळी नव्हे , तर अनेक अवयवांचा धोका: मधुमेहाकडे केवळ ग्लुकोजची पातळी वाढणे म्हणून पाहणे चुकीचे ठरेल.रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास खालील गंभीर समस्या उद्भवू शकतात: 1. हृदयविकार आणि पक्षाघात ( Stroke) , 2.दीर्घकालीन मूत्रपिंड विकार ( Kidney Disease) , 3.मज्जातंतूंचे नुकसान ( Nerve Damage)...

व्यथांच्या कथा-प्रत्येक वयाची व्यथा वेगळी, पण वेदना सारखीच !

  ब्लॉग नं. 2026/ 242.   दिनांक: 30 ऑगस्ट, 2026.   “ व्यथांच्या कथा” या मालिकेचा समारोप : प्रत्येक वयाची व्यथा वेगळी , पण वेदना सारखीच! मित्रांनो , “ व्यथांच्या कथा” या मालिकेत आपण बालपणापासून ज्येष्ठत्वापर्यंतच्या वेगवेगळ्या वयोगटांकडे पाहिलं. शाळकरी मुलाची व्यथा—अपेक्षांचं ओझं.    तरुणाची व्यथा—भविष्याची अनिश्चितता. नोकरी करणाऱ्याची व्यथा—काम आणि जीवनातील संघर्ष. दररोज प्रवास करणाऱ्याची व्यथा—धावपळ आणि मानसिक थकवा. मध्यमवयीन व्यक्तीची व्यथा—जबाबदाऱ्यांचं ओझं. आणि ज्येष्ठ नागरिकांची व्यथा—एकटेपणा आणि आपलेपणाची गरज. व्यथा वेगवेगळ्या आहेत. परिस्थिती वेगवेगळी आहे. वय वेगळं आहे. पण एक गोष्ट मात्र समान आहे— प्रत्येकाला कुणीतरी समजून घ्यावं असं वाटतं. कुणीतरी आपलं म्हणावं. कुणीतरी शांतपणे ऐकावं. कुणीतरी न सांगताही मनातलं ओळखावं. म्हणून कदाचित आजच्या काळात, माणसाला पैशाइतकाच , सुविधांइतकाच आणि यशाइतकाच संवादाची आणि आपलेपणाची गरज आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांकडे, थोडं अधिक लक्ष देऊ या. मुलाला विचारू या—“काय झाल...

व्यथांच्या कथा-ज्येष्ठत्व म्हणजे आयुष्याची संध्याकाळ नव्हे, नव्या जीवनाची सुरुवात

  ब्लॉग नं. 2026/ 241.   दिनांक: 29 ऑगस्ट, 2026.   व्यथांच्या कथा  6 — ज्येष्ठत्व म्हणजे आयुष्याची संध्याकाळ नव्हे, नव्या जीवनाची सुरुवात मित्रांनो ,             मौसम या संजीव कुमार यांच्या चित्रपटातील गीत जे भूपेंद्र आणि लता मंगेशकर यांनी सुरेख गायले आहे. अगदी हीच भावना प्रत्येक प्रत्येक नागरिकाच्या मनांत असते, “दिल धुंडता, है फिर वही फुरसत के रात दिन.” खरंच हवा असतो निवांत.कुठली जबाबदारी नाही,नातवंडांना खेळवण्यासारखं दुसरं सुख नाही. मुलांचं लहानपण कसं गेलं, कळलंच नसतं. पण नातवंडांच बालपण जवळून अनुभवता येतं.पण माणूस म्हटलं की व्यथा काही सूटत नाहीत.                 आता आपण या मालिकेतील शेवटच्या आणि कदाचित सर्वांत संवेदनशील टप्प्यावर आलो आहोत. —ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा. ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी धावपळ केली , मुलांना वाढवलं , शिक्षण दिलं , घर उभं केलं , नोकरी केली , जबाबदाऱ्या पार पाडल्या... आज त्यांच्याकडे वेळ...

व्यथांच्या कथा-5 जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेला मध्यमवयीन माणूस

  ब्लॉग नं. 2026/ 240.   दिनांक: 28 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा  5 — जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेला मध्यमवयीन माणूस मित्रांनो , “पिया का घर” या चित्रपटातलं,किशोरकुमारने गायलेलं गीत आठवतंय. “ये जीवन है, इस जीवन का,यही है, यही है रंग रूप, थोडे गम है,थोडी खुशियां, यही है छाव धूप.” आजकालच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या मध्यमवयीन माणसाच्या जीवनाचं हे गाणं म्हणजे पोर्ट्रेट म्हणता येईल.” माणसाच्या आयुष्यातला मध्यमवयीन काळ कदाचित सर्वांत गुंतागुंतीचा असतो. एका बाजूला मुलांच्या भविष्याची चिंता. दुसऱ्या बाजूला वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी, पेक्षाही त्यांची वाढती आजारपणं,  त्यात नोकरी , घराचा खर्च , कर्जाचे हप्ते , मुलांचं शिक्षण , मुलीचं लग्न , स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष... आणि या सगळ्यांच्या मध्ये स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवतं. मध्यमवयीन व्यक्ती अनेकदा घरातील “ सगळं सांभाळणारी व्यक्ती” बनते. सगळ्यांच्या गरजा लक्षात ठेवताना स्वतःची गरज विसरते. मुलांना चांगलं भविष्य द्यायचं म्हणून, पालक स्वतःच्या इच्छा पुढे ढकलतात, मुरड घालतात.  आई...