Skip to main content

Posts

जिभेचा रंग-आरोग्य समस्यांचे संकेत

  ब्लॉग नं. 2026/14 9 . दिनांक: 2 9 मे, 2026.   मित्रांनो, आपण आरशात चेहरा पाहतो , त्वचेतील बदल पाहतो , पण जिभेकडे फार कमी लोक लक्ष देतात. प्रत्यक्षात , तुमची जीभ ही शरीराच्या आरोग्याचा आरसा मानली जाते. डॉक्टरांच्या मते , जिभेचा रंग , पोत , ओलावा आणि त्यावरील थर शरीरात सुरू असलेल्या अनेक आरोग्य समस्यांचे संकेत देऊ शकतात.डिहायड्रेशन , जीवनसत्त्वांची कमतरता , संसर्ग , पचनाच्या समस्या आणि अगदी तोंडाच्या कर्करोगापर्यंत अनेक आजारांची सुरुवातीची लक्षणे जिभेवर दिसू शकतात. आजच्या ब्लॉगमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर: World Health Organization च्या माहितीनुसार , जगभरात सुमारे 3.5 अब्ज लोक तोंडाच्या आरोग्याशी संबंधित,समस्यांनी प्रभावित आहेत.त्यामुळे तोंड आणि जिभेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. निरोगी जीभ कशी दिसते ? एक निरोगी जीभ साधारणतः गुलाबी रंगाची असते.तिच्या पृष्ठभागावर पॅपिला नावाचे छोटे उंचवटे असतात.सकाळी जिभेवर हलका पांढरा थर दिसणे सामान्य मानले जाते. नियमित ब्रशिंग , फ्लॉसिंग आणि जीभ स्वच्छ केल्यास तिचे आरोग्य चांगले राहते. गुलाबी जी...
Recent posts

महाराष्ट्रात ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ अर्थात SIR प्रक्रिया

  ब्लॉग नं. 2026/14 8 . दिनांक: 2 8 मे, 2026.   मित्रांनो,             महाराष्ट्रात ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ अर्थात SIR प्रक्रिया, 30 जून 2026 पासून सुरू होत आहे.  म्हणूनच आजच्या ब्लॉगमध्ये आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.भारतात निवडणुका म्हणजे, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचे नाव मतदार यादीत अचूक असणे, अत्यंत महत्त्वाचे असते.याच पार्श्वभूमीवर Election Commission of India म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाने,‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ ( Special Intensive Revision – SIR) ही मोठ्या प्रमाणावर मतदार पडताळणी मोहीम सुरू केली आहे. सविस्तर: ही मोहीम अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जात असून , कोट्यवधी मतदारांच्या नोंदींची तपासणी केली जाणार आहे. अनेक नागरिकांसाठी ‘एसआयआर’ हा शब्द नवीन असला , तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया म्हणजे,मतदार याद्यांची सखोल साफसफाई आणि अद्ययावत नोंदी तयार करण्याचा प्रयत्न आहे. एसआयआर ( SIR) मोहीम सुरू करण्यामागचे कारण काय ? निव...

LDL अर्थात ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी कसे कराल?

  ब्लॉग नं. 2026/14 7 . दिनांक: 2 7 मे, 2026.   मित्रांनो, LDL अर्थात ‘ बॅड’ कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी करा हे 5 सोपे बदल आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण फिटनेस , प्रोटीनयुक्त आहार आणि वजन नियंत्रण,यावर भर देतो , पण शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळींकडे अनेकदा दुर्लक्ष करतो.विशेषतः LDL म्हणजेच ‘बॅड’ कोलेस्टेरॉल,वाढल्यास ते हृदयासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते.रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊन, रक्तप्रवाहाला  अडथळा जातो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका , स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.या विषयावर आहे, आजचा ब्लॉग. सविस्तर:    पूर्वी ही समस्या केवळ वयस्कर लोकांमध्ये दिसत होती , पण आजकाल तरुणांमध्येही वाढलेले कोलेस्टेरॉल सामान्य झाले आहे. चुकीचा आहार , ताणतणाव , व्यायामाचा अभाव आणि झोपेची कमतरता,ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत.मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे,योग्य जीवनशैली अंगीकारल्यास LDL कोलेस्टेरॉल, मोठ्या प्रमाणात कमी करता येते. यूकेतील प्रसिद्ध सर्जन Dr. Karan Rajan ,यांनी स्वतःच्या दिनचर्येत केलेले काही महत्त्वाचे बदल, शेअर केले आहे...

उन्हाळ्यातील 'स्मार्ट हायड्रेशन':

ब्लॉग नं. 2026/14 6 . दिनांक: 2 6 मे, 2026.   मित्रांनो, उन्हाळ्यातील ' स्मार्ट हायड्रेशन ': कडकडीत उन्हाळा सुरू झाला की , आपल्याला सतत तहान लागते. पण तुम्हाला माहीत आहे का ? उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवणे म्हणजे,केवळ भरपूर पाणी पिणे नव्हे , तर शरीरातील खनिजांचा समतोल राखणे होय.तीव्र उष्णतेवर मात करण्यासाठी,सध्या वैद्यकीय आणि पोषणतज्ञ ' स्मार्ट हायड्रेशन ' ( अधिक हुशारीने हायड्रेशन करणे) यावर भर देत आहेत. चला तर मग जाणून घेऊया , उन्हाळ्यात हायड्रेशन का महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी कोणते आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत. सविस्तर: 1 . डिहायड्रेशन: एक छुपा धोका : अनेकदा आपल्याला वाटतं,की तहान लागली नाही म्हणजे शरीरात पाणी पुरेसे आहे.पण वैद्यकीय तज्ञांच्या मते , तहान लागणे हे डिहायड्रेशनचे खूप उशिरा मिळणारे संकेत आहेत.आणि एका विशिष्ट वयानंतर ते मिळनासे होतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशन हा एक छुपा धोका बनून येतो , ज्याचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर होतो. ·         आकलन क्षमतेवर परिणाम: शरीरातील पाण्याच्या प्रमा...

रिजर्व बॅंकेने विक्रमी लाभांश सरकारला दिला

  ब्लॉग नं. 2026/145 अ दिनांक: 25 मे, 2026     मित्रांनो,             आज एक बातमी वाचनात आली की, देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिजर्व बँक ऑफ इंडियाने,भारत सरकारला रु. 2.86 लाख कोटीचा लाभांश, ट्रान्सफर केला. 2014 ला एनडीएचे सरकार सत्तेत आल्यापासून, या ट्रान्सफरची माहिती व्हायला सुरुवात झाली. 1979 बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर Nationalised Bank नी देखिल, दर वर्षी लाभांश भारत सरकारला ट्रान्सफर केला.यांत गैर असं काही नव्हतं.कारण या बँकांची पूर्ण मालकी भारत सरकारची झाली होती.आणि लाभांशाच्या व्याख्येनुसार हा लाभांश,दर वर्षी भारत सरकारला ट्रान्सफर करण्यात येतो.यासाठी लाभांश या शब्दाची व्याख्या पाहू. " कोणत्याही कंपनीला किंवा संस्थेला वर्षभरात झालेल्या एकूण निव्वळ नफ्यापैकी ( Net Profit) जो हिस्सा ती आपल्या भागधारकांना ( Shareholders) किंवा मालकांना वाटप करते , त्याला ' लाभांश ' किंवा ' डिविडेंड ' असे म्हणतात."        रिजर्व बँकेतील भागधारक कोण? 100% भारत सरकार.त्यामुळे रिजर्व बँके...