Skip to main content

Posts

रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि 'कर्बोदके'

  ब्लॉग नं. 2026/13 8 . दिनांक: 1 8 मे, 2026.   मित्रांनो, रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि ' कर्बोदके ': जाणून घ्या शास्त्रोक्त माहिती सर्वसाधारणपणे असे मानले जाते की , रक्तातील साखर वाढण्यास केवळ कर्बोदके ( Carbohydrates) जबाबदार असतात.यामुळे अनेकजण आपल्या आहारातून धान्य पूर्णपणे बंद करतात.पण तज्ज्ञांच्या मते , सर्वच कर्बोदके शरीरासाठी घातक नसतात.खरं तर , काही विशिष्ट कर्बोदके तुमच्या शरीराच्या विरोधात नव्हे , तर शरीरासोबत काम करतात.या बाबत अधिक माहिती जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: इन्सुलिन प्रतिरोध ( Insulin Resistance) म्हणजे काय ? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसच्या मते , जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत , तेव्हा इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होतो.यामुळे ग्लुकोज रक्तप्रवाहात साचून राहते आणि स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन सोडावे लागते.एका सर्वेक्षणानुसार , 18 ते 44 वयोगटातील सुमारे 40 % अमेरिकन प्रौढांना ही समस्या जाणवते , ज्याची अनेकदा त्यांना जाणीवही नसते. संपूर्ण धान्ये इन्सुलिन प्रतिरोध सुधारण्यासाठ...
Recent posts

या सहा ब्लड टेस्ट सहा महिन्यातून एकदा करा

  ब्लॉग नं . 2026 /13 7 .    दिनांक: 1 7 मे, 2026.     मित्रांनो , आरोग्य हीच संपत्ती.हे विधान आता पूर्वीपेक्षाही अधिक खरे ठरते.संपूर्ण अन्न खाणे , अति-प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे,नियमित व्यायाम करणे , दररोज 8 तास झोपणे आणि 10,000 पावले चालणे,हे सर्वांगीण आरोग्यासाठी आवश्यक असले तरी , दीर्घकालीन आरोग्यासाठी नियमित तपासणी करणे हे देखील आवश्यक आहे.नियमित तपासणी केल्याने आजारपण टाळता येते , रोगाचे लवकर निदान होते आणि दीर्घ , निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते. पण कोणत्या तपासण्या कधी करायला हव्यात ? हे आजच्या ब्लॉगमध्ये वाचा आणि डायरीत नोट करुन ठेवा..    सविस्तर: या प्रश्नाचे उत्तर देताना , नवी दिल्लीतील द्वारका येथील,24 वर्षांचा अनुभव असलेले,मधुमेह तज्ञ डॉ. ब्रिजमोहन अरोरा यांनी,14 सप्टेंबर रोजीच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये , उत्तम आरोग्य राखण्यासाठी आणि भविष्यातील समस्या टाळण्यासाठी,व्यक्तींनी दर सहा महिन्यांनी करून घ्याव्यात,अशा सहा विशिष्ट वैद्यकीय चाचण्या सांगितल्या आहेत.त्या खालीलप्रमाणे आहेत. दर 6 महिन्यांनी करून घ्याव्यात अशा 6 वै...

कोलेस्ट्रॉल: खरोखर 'खलनायक' की शरीराचा 'मित्र'?

  ब्लॉग नं . 2026 /13 6 .    दिनांक: 1 6 मे, 2026.     मित्रांनो , कोलेस्ट्रॉल: खरोखर ' खलनायक ' की शरीराचा ' मित्र '? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत! आजच्या काळात ' कोलेस्ट्रॉल ' हा शब्द ऐकला की,आपल्या डोळ्यासमोर हृदयविकार , ब्लॉकेजेस आणि औषधांच्या गोळ्या येतात.पण तुम्हाला माहित आहे का ? कोलेस्ट्रॉल हे आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. अलीकडेच प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आलोक चोप्रा आणि डॉ. परिन संगोई यांनी,कोलेस्ट्रॉलबद्दलचे अनेक धक्कादायक, पण महत्त्वाचे वास्तव समोर आणले आहे.चला बघू या, हे डॉक्टर द्वय सांगतात ते. सविस्तर: कोलेस्ट्रॉल शरीरासाठी वाईट का नाही ? डॉ.आलोक चोप्रा यांच्या मते , कोलेस्ट्रॉलला विनाकारण खलनायक ठरवण्यात आले आहे.त्यांच्या युक्तिवादातील काही मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: ·         नैसर्गिक निर्मिती: आपल्या शरीरातील 85% कोलेस्ट्रॉल हे अन्नातून येत नाही , तर ते शरीर स्वतः तयार करते.जर एखादी गोष्ट शरीर स्वतः बनवत असेल , तर ती पूर्णपणे वाईट असू शकत नाही. ·       ...

मूत्रपिंडाचे (Kidneys) आरोग्य कसे राखावे?

  ब्लॉग नं . 2026 /13 5 .    दिनांक: 1 5 मे, 2026.     मित्रांनो , मूत्रपिंड ( Kidneys) आरोग्य राखण्यासाठी काय करावे: आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक,म्हणजे मूत्रपिंड ( Kidneys). अनेकदा आपल्याला असे वाटते की , भरपूर पाणी पिणे म्हणजेच किडनीची काळजी घेणे. पाणी पिणे आवश्यक आहेच , पण किडनीचे कार्य केवळ पाण्यावर मर्यादित नसते. 12 मेच्या ब्लॉगमध्ये आपण किडनी विकाराच्या 5 संभावित कारणांवर चर्चा केली होती.आज आपण जीवन शैलीत 5 बदल केल्याने,किडनीच्या  आजारापासून स्वतःला कसे वाचवू शकतो,यावर चर्चा करणार आहोत. सविस्तर: आपले मूत्रपिंड शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे , खनिजांचे संतुलन राखणे आणि रक्तदाब नियंत्रित करणे , अशी महत्त्वाची कामे चोवीस तास करत असतात.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे , मूत्रपिंडाचे आजार अत्यंत ' शांतपणे ' शरीरात वाढतात.जोपर्यंत समस्या गंभीर होत नाही , तोपर्यंत त्याची लक्षणे दिसून येत नाहीत.म्हणूनच , किडनीच्या आरोग्यासाठी ' प्रोअॅक्टिव्ह ' राहणे गरजेचे आहे.जेके मेडोज वेलनेस इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ नेफ्रोलॉजी सल्लागार , डॉ. इशा...

चालण्यासाठी योग्य वेळ कोणती? सकाळ की संध्याकाळी

  ब्लॉग नं . 2026 /134 .    दिनांक: 14   मे, 2026.     मित्रांनो , चालणे हे सर्वात सोपा आणि कुठलाही खर्च करावा लागत नसलेला,व्यायाम प्रकार आहे.चालण्याच्या व्यायामाचा विचार करताना , सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी नेमकी कोणती वेळ निवडावी , याचा विचार आपण अनेकदा करतो. ' सकाळी चालावे की संध्याकाळी ?' हा विषय नेहमीच चर्चेचा राहिला आहे. फिटनेसप्रेमी , डॉक्टर आणि अगदी कुटुंबातील व्हॉट्सॲप ग्रुप्समधील सदस्यही,यापैकी कोणती वेळ अधिक चांगली आहे , यावर आपली ठाम मते मांडत असतात.काही लोकांना सकाळची वेळ शांत , प्रसन्न आणि उत्साहवर्धक वाटते , तर काहींच्या मते दिवसभराच्या कामाच्या धावपळीनंतर,संध्याकाळची वेळ अधिक सोयीस्कर ठरते.मात्र , प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ, ( Diabetologist) डॉ. व्ही.मोहन यांच्या मते , यामागील सत्य बहुतेकांना वाटते,त्यापेक्षा खूपच साधे आणि सोपे आहे.आजच्या ब्लॉगमध्ये हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर: ' डॉ. मोहन्स डायबिटीस स्पेशालिटीज सेंटर ' चे अध्यक्ष,आणि ' पद्मश्री ' पुरस्कार विजेते डॉ. मोहन यांनी , चालणे आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण,या...