Skip to main content

Posts

सूर्यप्रकाशात राहूनही व्हिटॅमिन डीची कमतरता कां?

  ब्लॉग नं. 2026/109. दिनांक: 19 एप्रिल, 2026.   मित्रांनो,             काही वेळेस रक्त चाचणी केली आणि ब्लड रिपोर्ट आला की, आपल्या लक्षात येतं की, सूर्यप्रकाशात राहूनही व्हिटॅमिन डीची कमतरता आहे.खरं तर,आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की , " सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्रोत आहे." मग भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात , जिथे वर्षाचे बाराही महिने कडक ऊन असतं , तिथे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे रुग्ण का वाढत आहेत ? आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घ्या यामागची कारणे आणि उपाय ! सविस्तर: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( ICMR) च्या अहवालानुसार , भारतातील शहरी आणि निमशहरी भागातील,लोकसंख्येमध्ये व्हिटॅमिन डीची मोठी कमतरता दिसून आली आहे.दररोज उन्हात वावरणाऱ्या लोकांनाही,जेव्हा ' व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी ' असल्याचे कळते , तेव्हा प्रश्न पडतो की नक्की चूक कुठे होतेय ? चला तर मग , यामागचे वैज्ञानिक कारण आणि आपण करत असलेल्या सामान्य चुका समजून घेऊया. 1. सूर्यप्रकाशाची चुकीची वेळ: व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी,त्वचेचा सूर...
Recent posts

बाळाच्या आहारात मीठ आणि साखर: कधी द्यावी, कधी टाळावी?

ब्लॉग नं.  2026/108 दिनांक:  18,  एप्रिल  2026. मित्रांनो , 🍼   बाळाच्या आहारात मीठ आणि साखर: कधी द्यावी , कधी टाळावी ? तुमच्या घरांत कुणी 1 वर्ष किंवा 2 वर्षाचे, मुलाचे/मुलीचे, स्वतःचे,नवजात बाळ असेल, तर आजचा ब्लॉग अवश्य वाचा.नवजात बाळाच्या आहाराबाबत पालकांमध्ये अनेक प्रश्न असतात.त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, “बाळाला मीठ आणि साखर कधी द्यावी ?”   पोषणतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ यांचे एकमत असे आहे की, 1. वर्षापर्यंत बाळाला मीठ देऊ नये, 2. वर्षांपर्यंत बाळाला साखर (विशेषतः अतिरिक्त साखर) देऊ नये. या मागील वैज्ञानिक कारणे आणि योग्य मार्गदर्शन,आपण आजच्या ब्लॉगमध्ये समजून घेऊया. सविस्तर: 1. वर्षापर्यंत मीठ का टाळावे ? 1. बाळाची किडनी (मूत्रपिंड) अजून विकसित होत असतं, लहान बाळाची किडनी पूर्ण विकसित नसते. त्यामुळे जास्त मीठ (सोडियम) शरीरावर ताण आणू शकते. 2. नैसर्गिक अन्नातून पुरेसे सोडियम मिळते, आईचं दूध , फॉर्म्युला दूध , डाळ , भात , भाज्या यामध्ये नैसर्गिकरित्या सोडियम असते. त्यामुळे वेगळे मीठ घालण्याची गरज नसते. 3. भविष्...

डोळ्यांकडे दुर्लक्ष करताय? महागात पडू शकतं !

ब्लॉग नं. 2026/ 107. दिनांक: 17 एप्रिल, 2026.       मित्रांनो , डोळ्यांकडे दुर्लक्ष करताय ? ' या ' 5  लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात! आपल्याला पाच ज्ञानेंद्रिये लाभली आहेत ,  त्यापैकी  ' दृष्टी '  हे सर्वात महत्त्वाचे आहे. पण दुर्दैवाने , जोपर्यंत डोळ्यांत काही मोठी समस्या जाणवत नाही , तोपर्यंत आपण त्याकडे लक्ष देत नाही. कामाचा ताण ,  वाढते वय किंवा स्क्रीनचा अतिवापर समजून,आपण डोळ्यांच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो.आजच्या ब्लॉगमध्ये , याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.   सविस्तर: जागतिक आकडेवारीनुसार ,  सुमारे  90   टक्क्यांहून अधिक   दृष्टीदोष,टाळता येण्यासारखे असतात. तरीही लाखो लोक वेळेवर उपचार न मिळाल्याने , अंधत्वाचा सामना करत आहेत.ऑर्बिस (इंडिया) चे कंट्री डायरेक्टर   डॉ. ऋषी राज बोरा   यांच्या मते ,  डोळ्यांनी दिलेले काही  ' सायलेंट '  संकेत ओळखणे,ही काळाची गरज आहे.चला जाणून घेऊया डोळ्यांची अशी 5 लक्षणे , जी भविष्यातील मोठ्या संकटाची चाहूल असू शकतात: 1. दृष्टी वार...

कॉर्टिसोल: शरीरातील 'स्ट्रेस हार्मोन

ब्लॉग नं : 2026/106.  दिनांकः 16 एप्रिल , 2026. मित्रांनो , कॉर्टिसोल ( Cortisol), त्याचे आरोग्यावरील परिणाम आजच्या धकाधकीच्या जीवनात ' तणाव ',(Stress) हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का , की जेव्हा आपण तणावात असतो , तेव्हा आपल्या शरीरात एक विशिष्ट संप्रेरक ( Hormone) वेगाने काम करू लागते ? त्यालाच  कॉर्टिसोल  असे म्हणतात. याला सामान्यतः ' स्ट्रेस हार्मोन ' म्हणून ओळखले जाते. कॉर्टिसोल म्हणजे काय ? त्याचे काय परिणाम होतात. या बद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: कॉर्टिसोल म्हणजे काय ? कॉर्टिसोल हे एक स्टिरॉइड हार्मोन आहे , जे आपल्या मूत्रपिंडाच्या वर असलेल्या अ‍ॅड्रिनल ग्रंथींद्वारे, ( Adrenal Glands) तयार केले जाते. जेव्हा आपल्या मेंदूला कोणत्याही धोक्याची किंवा तणावाची जाणीव होते , तेव्हा शरीरात कॉर्टिसोलची पातळी वाढते.हे हार्मोन आपल्याला ' लढा किंवा पळा ' (Fight or Flight) ,या परिस्थितीसाठी तयार करते.रक्तातील साखर वाढवणे , मेंदूचा ग्लुकोजचा वापर सुधारणे आणि पेशींची दुरुस्ती करणाऱ्या पदार्थांची,उपलब्धता वाढवण...

ज्येष्ठांमधील नैराश्य आणि त्यावरील उपाय

ब्लाॅग नं.2026/105 दिनांकः 15 एप्रिल, 2026. मित्रांनो , ज्येष्ठांमधील नैराश्य आणि त्यावरील उपाय वयोमानानुसार शरीरात बदल होणे स्वाभाविक आहे , पण जेव्हा मनाची उभारी संपते , तेव्हा जगणे ओझे वाटू लागते. अनेकदा आपण पाहतो की , घराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती अचानक चिडचिडी , रागीट किंवा कमालीची शांत होते. "आता माझी कोणाला गरज राहिलेली नाही ," ही भावना त्यांच्या मनात घर करू लागते. लोकमत पेपरमधील डॉ. दत्ता दातीर यांच्या लेखाच्या आधारे , आपण या समस्येचा आणि त्यावरील उपायांचा आढावा, आजच्या ब्लॉगमधे घेऊया. सविस्तरः नैराश्याची कारणे: मानसशास्त्रीय दृष्टिकोन प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांच्या सिद्धांतानुसार , उतारवयात माणूस दोन टोकांच्या भावनांमधून जात असतो: 'Generativity vs. Stagnation' ( उपयुक्तता विरुद्ध कुंठितता) आणि 'Ego Integrity vs. Despair' ( आत्मस्वीकार विरुद्ध निराशा).   कुंठिततेची भावना:   जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटते की,आपण पुढच्या पिढीसाठी काहीही ठोस करू शकलो नाही , तेव्हा मनात रिक्तता निर्माण होते.   अपेक्षाभंग : आयुष्यभर कुटुं...