Skip to main content

Posts

साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पाच प्रभावी उपाय

  ब्लॉग नं. 2026/119. दिनांक:- 29  एप्रिल ,2026.   मित्रांनो , टाईप 2 मधुमेह,ही आता केवळ एक आरोग्य समस्या राहिलेली नाही ; हे एक दैनंदिन आव्हान झालं आहे , ज्याच्यासोबत लाखो लोक जगायला शिकत आहेत.औषढण यांत भूमिका बजावत असली तरी , खरा बदल घडवणारी गोष्ट जीवनशैलीत आहे.हैदराबादस्थित न्यूरोलॉजिस्ट , डॉ. सुधीर कुमार , जे सीएमसी वेल्लोरचे पदवीधर आहेत , त्यांनी नुकतंच ' एक्स ' (X) वर पाच पुरावा-आधारित उपाय सांगितले , जे केवळ गोळ्यांपुरते मर्यादित नाहीत.त्यांचा सल्ला काय आहे ? आहार , व्यायाम , विश्रांती आणि आत्म-जागरूकता या मूलभूत गोष्टींवर प्रभुत्व मिळवा . हेच ते आधारस्तंभ आहेत,जे रक्तातील साखर खऱ्या अर्थाने नियंत्रणात ठेवतात.चला सविस्तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये.   सविस्तर: 1. तुमच्या आहाराचा पुनर्विचार करा: अन्न हे औषध आहे , पण ते हुशारीने निवडलं तरच.डॉ.कुमार, कडधान्ये , संपूर्ण धान्य , भाज्या आणि कमी चरबीयुक्त प्रथिने,यांसारख्या कमी ग्लायसेमिक असलेल्या पदार्थांवर,लक्ष केंद्रित करण्याची शिफारस करतात. थोड्या प्रमाणात आरोग्यदायी चरबी (फॅट्स) संतुलन साधते , तर रिफाइ...
Recent posts

व्हिटॅमिन डी सोबत के2 महत्वाचे

  ब्लॉग नं. 2026/118. दिनांक:- 28  एप्रिल ,2026.   मित्रांनो , कॅल्शियमच्या गोळ्यांपलीकडे: मजबूत हाडांसाठी फक्त दूध आणि गोळ्या पुरेशा आहेत का ? अनेकांना असं वाटतं की,रोज एक कॅल्शियमची गोळी घेतली किंवा ग्लासभर दूध प्यायलं की,हाडांचे आरोग्य सुरक्षित झाले. पण तुम्हाला माहिती आहे का ? हाड म्हणजे केवळ कॅल्शियम साठवण्याची निर्जीव पेटी नाही , तर त्या जिवंत पेशी ( Living Tissue) आहेत. ती सतत झिजत असते आणि स्वतःची पुनर्बांधणी करत असते. आजच्या धावपळीच्या आणि शहरी जीवनशैलीत,हाडांचे आरोग्य राखणे हे केवळ पूरक आहारापुरते मर्यादित न राहता , ती एक दैनंदिन जीवनशैली बनणे गरजेचे आहे.आजचा ब्लॉग याच विषयाला समर्पित आहे. सविस्तर: 1 . हाड: एक जिवंत यंत्रणा : अस्थिरोग तज्ञांच्या मते , हाडांच्या आरोग्यासाठी केवळ कॅल्शियम पुरेसे नाही.हाडांची मजबूती टिकवण्यासाठी एका त्रिसूत्रीची गरज असते: ·         व्हिटॅमिन डी: कॅल्शियम शोषून घेण्यासाठी. ·         प्रथिने ( Proteins): हाडांच्या संरचनेसाठी आणि ताकदीसाठी. · ...

रिकाम्या हाताचे मर्म

ब्लाॅग नं.2026/117. दिनांक:-27 एप्रिल,2026. मित्रांनो , रिकाम्या हातांचे मर्म: जुने सोडल्याशिवाय नवीन मिळणार कसं ? आपल्याकडे एक म्हण आहे , ' जुने जावे नूतन यावे '. ऐकायला हे जितके सोपं वाटतं , तितकंच आचरणात आणायला कठीण असतं.मानवी स्वभाव मुळातच ' संग्रह ' करण्याचा आहे.मग तो संग्रह वस्तूंचा असो , आठवणींचा असो किंवा मनात साठवलेल्या जुन्या रागाचा.पण आपण कधी हा विचार केला आहे का , की जर आपले दोन्ही हात जुन्या ओझ्याने भरलेले असतील , तर नियती जेव्हा आपल्याला काहीतरी नवीन देऊ इच्छिते , तेव्हा ते स्वीकारायला आपले हात रिकामे कुठे आहेत ? यालाच रिकाम्या हातांचे मर्म ' असे म्हणतात.आज याच विषयावर सविस्तर बोलू या. सविस्तरः  1.  संचय करण्याची वृत्ती : प्रगतीतील अडथळा- बऱ्याचदा आपण एखादी वस्तू वर्षानुवर्षे वापरत नाही , तरीही ती टाकून देत नाही.कारण असतं   ' अटॅचमेंट '. हीच गोष्ट विचारांच्या बाबतीतही घडते.कोणाबद्दल तरी असलेला जुना राग , भूतकाळातील अपयशाची भीती किंवा "मीच बरोबर आहे" हा अहंकाराचा ठाम विचार , आपण हे सर्व इतक्या घट्ट धरून ठेवतो की ...

मर्यादेपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी घेताय ! थांबा !

  ब्लॉग नं.2026/116 दिनांक: 26 एप्रिल 2026. मित्रांनो ,           आजच्या काळात ' व्हिटॅमिन डी ' (Vitamin D) हे आरोग्याच्या जगातील सर्वात लाडकं सप्लिमेंट बनलं आहे. हाडे मजबूत करणे , रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि मन:स्थिती सुधारणे यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः भारतीयांमध्ये याची मोठी कमतरता आढळते , त्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ हे सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतात. परंतु , " अति तिथे माती" ही म्हण व्हिटॅमिन डीच्या बाबतीतही खरी ठरते. गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी घेणे तुमच्या जीवावर बेतू शकते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण या विषयावर सविस्तर चर्चा करूया. सविस्तर: ⚠️ व्हिटॅमिन डी इतर व्हिटॅमिन्सपेक्षा वेगळे का आहे ? व्हिटॅमिन सी सारखी जीवनसत्त्वे पाण्यात विरघळणारी असतात , जी शरीराबाहेर सहज टाकली जातात. मात्र , व्हिटॅमिन डी हे चरबी-विद्राव्य ( Fat-soluble) आहे. याचा अर्थ असा की,ते शरीरातील पेशींमद्धे ( Tissues) जमा होते.ते सहजपणे शरीराबाहेर पडत नाही.कालांतराने याची पातळी धोकादायक मर्यादेपर्यंत वाढू शकते.सूर्यप्रकाश किंवा अन्नातून व्हिटॅमिन ...

जेवणानंतर केल्या जाणाऱ्या या 6 सवयी टाळा

  ब्लॉग नं. 2026/115. दिनांक: 25 एप्रिल , 2026.   मित्रांनो ,             मला आठवतंय, 20 तारखेला,मी प्रत्येक जेवणानंतर दहा मिनिटे चालायला हवं,आणि त्यामुळे होणारे फायदे यावर एक ब्लॉग लिहिला होता.आज एक पोस्ट माझ्या वाचनांत आली, जेवणानंतर काय नाही करायला हवे. आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून ते मी तुम्हाला शेअर करत आहे.        सविस्तर: तुम्ही काय खाता याकडे जर तुम्ही लक्ष देत असाल , तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की,जेवणानंतर तुम्ही काय करता,हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे , कारण त्याचा तुमच्या पचनक्रियेवर आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो.तुम्ही झोपून राहता की थोडा वेळ चालता , यावर तुमचे शरीर अन्न कसे पचवते हे अवलंबून असते. जयपूर येथील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील मधुमेह आणि अंतःस्रावशास्त्र विभागातील डॉ. हेताश्वी गोंदलिया यांनी सांगितले की , “ जेवणानंतर लोकांच्या अशा अनेक सवयी आहेत , ज्यामुळे केवळ पचनक्रियाच बिघडत नाही , तर रक्तातील साखरेची पातळीही बिघडते.”    ...

डोळ्यासमोर अंधारी येणे आणि चक्कर येणे

ब्लॉग नं. 2026/114 दिनांक: 24, एप्रिल 2026. मित्रांनो , अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे आणि चक्कर ? दैनंदिन धावपळीत अनेकदा , आपल्याला अचानक डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटतं किंवा चक्कर ( Dizziness) येते.कधीतरी असं होणं सामान्य असलं , तरी वारंवार होणारी ही ' अंधारी ' ,शरीरातील एखाद्या मोठ्या बदलाचे संकेत असू शकते.आजच्या या लेखात आपण ही लक्षणे का जाणवतात आणि त्यावर घरगुती व आयुर्वेदिक उपाय काय आहेत , हे सविस्तर जाणून घेऊया. सविस्तर: 🩺 ही लक्षणे का जाणवतात ? ( वैद्यकीय कारणे) जेव्हा आपल्या मेंदूला किंवा डोळ्यांना होणारा रक्तपुरवठा , ऑक्सिजन किंवा ऊर्जेचा पुरवठा विस्कळीत होतो , तेव्हा शरीर आपल्याला चक्करीच्या स्वरूपात इशारा देते. याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत: ·         रक्तदाबातील चढउतार ( Low BP): रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे,मेंदूपर्यंत रक्त योग्य प्रमाणात पोहोचत नाही , ज्यामुळे डोळ्यासमोर अंधारी येते. ·         रक्तातील साखर कमी होणे ( Hypoglycemia): दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे,मेंदूला मिळणार...

थकवा आणि केसगळतीकडे दुर्लक्ष करताय?

  ब्लॉग नं. 2026/11 3 , दिनांक: 2 3 एप्रिल, 2026.    मित्रांनो, थकवा आणि केसगळतीकडे दुर्लक्ष करताय ? आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला सतत थकवा जाणवणे , सकाळी उठल्यावरही उत्साह न वाटणे किंवा अचानक केस गळायला लागणे , या गोष्टी सामान्य वाटू शकतात.पण याला ' वर्क स्ट्रेस ' किंवा ' बदलता ऋतू ' म्हणतो. पण खरं तर , तुमचे शरीर तुम्हाला आतून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.बघू या,देशात करण्यात आलेले एक सर्वेक्षण काय सांगतंय. संविस्तर: भारतातील एका मोठ्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की , अगदी सकस आहार घेणाऱ्यांमध्येही व्हिटॅमिन बी 12 , व्हिटॅमिन डी आणि लोहाची ( Iron) मोठी कमतरता आढळत आहे. ही कमतरता शांतपणे तुमच्या शरीराचे नुकसान करत असते. पोषक तत्वांची ' मूक ' भूमिका: का आहे ही कमतरता घातक ? जेव्हा या तीन घटकांची पातळी खालावते , तेव्हा शरीर हळूहळू संकेत देऊ लागते: व्हिटॅमिन बी 12: हे मज्जातंतूंचे आरोग्य आणि मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे विसरभोळेपणा , हात-पायांना मुंग्या येणे आणि प्रचंड मानसिक थकवा ज...