ब्लॉग नं. 2026/ 237. दिनांक: 25 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा 2 — शिक्षण संपलं , पण प्रश्न संपले नाहीत! मित्रांनो, कॉलेज संपलं , पण परीक्षा संपत नाही.कॉलेजच्या जीवनावर आधारित “इम्तेहान” हा विनोद खन्नाचा चित्रपट आठवतोय. “इम्तेहान” म्हणजे परीक्षाच, जीवनाची परीक्षा,संघर्ष सुरू होतो,नोकरी मिळविण्यासाठी.कधी अपयश पदरी पडतं. पण खचून जायचं नसतं. मला अशा वेळी नेमकं आठवायचं, या “इम्तेहान” मधलं किशोरकुमारचं गाणं, “रुक जाना नही,तु कभी हारके, कांटोपे चलके मिलेंगे साये बहारके”. अतिशय अर्थपूर्ण आणि भावपूर्ण गीत. ही गाणी आपल्याला बरंच काही शिकवून जातात. शाळेत दाखल झाल्यापासून मुलांच्या मागे परीक्षा लागतात. शाळा संपली , कॉलेज संपलं , पदवी हातात आली की, तरुणांच्या आयुष्यातला संघर्ष संपतो , असं आपल्याला वाटतं. पण खरं तर तिथूनच,एका वेगळ्या संघर्षाची सुरुवात होते. “ आता पुढे काय ?” हा प्रश्न अ...
ब्लॉग नं. 2026/236. दिनांक: 24 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा भाग 1 — शाळकरी मुलांच्या मनातलं कोण ऐकणार? मित्रांनो , तुम्हाला आठवतंय, मिली चित्रपटातील एक गीत,जे लता मंगेशकर यांनी गाईले होते आणि जया भादुरी, हो तेव्हा त्या जया भादुरीच होत्या.त्यांच्यावर चित्रित झाले होते.त्याचे बोल होते, “ मैंने कहा फूलों से.. . मैंने कहा फूलों से , " हँसो " तो वो खिलखिला के हँस दिए,और ये कहा , " जीवन है भाई , मेरे भाई , हँसने के लिए, हँसने के लिए.” गीतकार योगेश यांचं हे गीत. लहानपण हे खरंच हसण्याचं असतं.पण मी आज काल मुलांच्या,विशेषतः माझ्या नातवंडांच्या पिढीकडे बघतो आणि काही गोष्टी मनांत ते येतात,त्या शब्दबद्ध केल्या आहेत. लहानांना व्यथा असतात? आपण मोठ्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करतो ; पण घरात , शाळेत आणि समाजात वावरणाऱ्या लहान मुलांच्या मनातही अनेक व्यथा दडलेल्या असतात , याचा आपण अनेकदा विसर पडतो.शाळेत जाणाऱ्या मुलाचं आयुष्य वरवर पाहता किती सुंदर वाटतं! स...