ब्लॉग नं. 2026/ 238. दिनांक: 26 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा 3— नोकरी आहे , पगार आहे ; पण समाधान कुठे आहे ? मित्रांनो , नोकरी लागते,पगार चांगला असतो,पण समाधान नसतं.काहींचा बॉस समजून घेणारा नसतो.कुठे लायकी नसणारा,पण पुढे पुढे करणारा प्रमोशन घेऊन जातो.आज काल दुसरीकडे स्विच होण्याचा ऑप्शन असतो. पण ते लगेच काही,नाही ना जमतं.या परिस्थितीवर अमोल पालेकरांच्या “बातो बातोमे” मधील किशोरकुमारचं गीत आठवंत. “कहाँ तक ये मन को,अंधेरे छलेंगे, उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे” ची आठवण येते.पण त्यातील या ओळी ऐकून पुढे जायचं असतं. “कही सुख कही दुख, यही जिंदगी है,ये पतझड का मौसम घडी दो घडी है, नये फूल कल फिर डगरमे खिलेंगे.” असा आशावाद पुढे जगायची प्रेरणा देतो. नोकरी करणारा माणूस बाहेरून स्थिर: नोकरी करणारा माणूस आपल्याला बाहेरून पाहिला तर स्थिर दिसतो. महिन्याला...
ब्लॉग नं. 2026/ 237. दिनांक: 25 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा 2 — शिक्षण संपलं , पण प्रश्न संपले नाहीत! मित्रांनो, कॉलेज संपलं , पण परीक्षा संपत नाही.कॉलेजच्या जीवनावर आधारित “इम्तेहान” हा विनोद खन्नाचा चित्रपट आठवतोय. “इम्तेहान” म्हणजे परीक्षाच, जीवनाची परीक्षा,संघर्ष सुरू होतो,नोकरी मिळविण्यासाठी.कधी अपयश पदरी पडतं. पण खचून जायचं नसतं. मला अशा वेळी नेमकं आठवायचं, या “इम्तेहान” मधलं किशोरकुमारचं गाणं, “रुक जाना नही,तु कभी हारके, कांटोपे चलके मिलेंगे साये बहारके”. अतिशय अर्थपूर्ण आणि भावपूर्ण गीत. ही गाणी आपल्याला बरंच काही शिकवून जातात. शाळेत दाखल झाल्यापासून मुलांच्या मागे परीक्षा लागतात. शाळा संपली , कॉलेज संपलं , पदवी हातात आली की, तरुणांच्या आयुष्यातला संघर्ष संपतो , असं आपल्याला वाटतं. पण खरं तर तिथूनच,एका वेगळ्या संघर्षाची सुरुवात होते. “ आता पुढे काय ?” हा प्रश्न अ...