ब्लॉग नं. 2026/ 242. दिनांक: 30 ऑगस्ट, 2026. “ व्यथांच्या कथा” या मालिकेचा समारोप : प्रत्येक वयाची व्यथा वेगळी , पण वेदना सारखीच! मित्रांनो , “ व्यथांच्या कथा” या मालिकेत आपण बालपणापासून ज्येष्ठत्वापर्यंतच्या वेगवेगळ्या वयोगटांकडे पाहिलं. शाळकरी मुलाची व्यथा—अपेक्षांचं ओझं. तरुणाची व्यथा—भविष्याची अनिश्चितता. नोकरी करणाऱ्याची व्यथा—काम आणि जीवनातील संघर्ष. दररोज प्रवास करणाऱ्याची व्यथा—धावपळ आणि मानसिक थकवा. मध्यमवयीन व्यक्तीची व्यथा—जबाबदाऱ्यांचं ओझं. आणि ज्येष्ठ नागरिकांची व्यथा—एकटेपणा आणि आपलेपणाची गरज. व्यथा वेगवेगळ्या आहेत. परिस्थिती वेगवेगळी आहे. वय वेगळं आहे. पण एक गोष्ट मात्र समान आहे— प्रत्येकाला कुणीतरी समजून घ्यावं असं वाटतं. कुणीतरी आपलं म्हणावं. कुणीतरी शांतपणे ऐकावं. कुणीतरी न सांगताही मनातलं ओळखावं. म्हणून कदाचित आजच्या काळात, माणसाला पैशाइतकाच , सुविधांइतकाच आणि यशाइतकाच संवादाची आणि आपलेपणाची गरज आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांकडे, थोडं अधिक लक्ष देऊ या. मुलाला विचारू या—“काय झाल...
ब्लॉग नं. 2026/ 241. दिनांक: 29 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा 6 — ज्येष्ठत्व म्हणजे आयुष्याची संध्याकाळ नव्हे, नव्या जीवनाची सुरुवात मित्रांनो , मौसम या संजीव कुमार यांच्या चित्रपटातील गीत जे भूपेंद्र आणि लता मंगेशकर यांनी सुरेख गायले आहे. अगदी हीच भावना प्रत्येक प्रत्येक नागरिकाच्या मनांत असते, “दिल धुंडता, है फिर वही फुरसत के रात दिन.” खरंच हवा असतो निवांत.कुठली जबाबदारी नाही,नातवंडांना खेळवण्यासारखं दुसरं सुख नाही. मुलांचं लहानपण कसं गेलं, कळलंच नसतं. पण नातवंडांच बालपण जवळून अनुभवता येतं.पण माणूस म्हटलं की व्यथा काही सूटत नाहीत. आता आपण या मालिकेतील शेवटच्या आणि कदाचित सर्वांत संवेदनशील टप्प्यावर आलो आहोत. —ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा. ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी धावपळ केली , मुलांना वाढवलं , शिक्षण दिलं , घर उभं केलं , नोकरी केली , जबाबदाऱ्या पार पाडल्या... आज त्यांच्याकडे वेळ...