Skip to main content

Posts

व्यथांच्या कथा-ज्येष्ठत्व म्हणजे आयुष्याची संध्याकाळ नव्हे, नव्या जीवनाची सुरुवात

  ब्लॉग नं. 2026/ 241.   दिनांक: 29 ऑगस्ट, 2026.   व्यथांच्या कथा  6 — ज्येष्ठत्व म्हणजे आयुष्याची संध्याकाळ नव्हे, नव्या जीवनाची सुरुवात मित्रांनो ,             मौसम या संजीव कुमार यांच्या चित्रपटातील गीत जे भूपेंद्र आणि लता मंगेशकर यांनी सुरेख गायले आहे. अगदी हीच भावना प्रत्येक प्रत्येक नागरिकाच्या मनांत असते, “दिल धुंडता, है फिर वही फुरसत के रात दिन.” खरंच हवा असतो निवांत.कुठली जबाबदारी नाही,नातवंडांना खेळवण्यासारखं दुसरं सुख नाही. मुलांचं लहानपण कसं गेलं, कळलंच नसतं. पण नातवंडांच बालपण जवळून अनुभवता येतं.पण माणूस म्हटलं की व्यथा काही सूटत नाहीत.                 आता आपण या मालिकेतील शेवटच्या आणि कदाचित सर्वांत संवेदनशील टप्प्यावर आलो आहोत. —ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा. ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी धावपळ केली , मुलांना वाढवलं , शिक्षण दिलं , घर उभं केलं , नोकरी केली , जबाबदाऱ्या पार पाडल्या... आज त्यांच्याकडे वेळ...

Select your Language

Recent posts

व्यथांच्या कथा-5 जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेला मध्यमवयीन माणूस

  ब्लॉग नं. 2026/ 240.   दिनांक: 28 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा  5 — जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेला मध्यमवयीन माणूस मित्रांनो , “पिया का घर” या चित्रपटातलं,किशोरकुमारने गायलेलं गीत आठवतंय. “ये जीवन है, इस जीवन का,यही है, यही है रंग रूप, थोडे गम है,थोडी खुशियां, यही है छाव धूप.” आजकालच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या मध्यमवयीन माणसाच्या जीवनाचं हे गाणं म्हणजे पोर्ट्रेट म्हणता येईल.” माणसाच्या आयुष्यातला मध्यमवयीन काळ कदाचित सर्वांत गुंतागुंतीचा असतो. एका बाजूला मुलांच्या भविष्याची चिंता. दुसऱ्या बाजूला वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी, पेक्षाही त्यांची वाढती आजारपणं,  त्यात नोकरी , घराचा खर्च , कर्जाचे हप्ते , मुलांचं शिक्षण , मुलीचं लग्न , स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष... आणि या सगळ्यांच्या मध्ये स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवतं. मध्यमवयीन व्यक्ती अनेकदा घरातील “ सगळं सांभाळणारी व्यक्ती” बनते. सगळ्यांच्या गरजा लक्षात ठेवताना स्वतःची गरज विसरते. मुलांना चांगलं भविष्य द्यायचं म्हणून, पालक स्वतःच्या इच्छा पुढे ढकलतात, मुरड घालतात.  आई...

व्यथांच्या कथा 4 — गर्दीत माणूस हरवतो तेव्हा.

  ब्लॉग नं. 2026/ 239.   दिनांक: 27 ऑगस्ट, 2026.   व्यथांच्या कथा  4 — गर्दीत माणूस हरवतो तेव्हा... मित्रांनो ,             नोकरीसाठी मी देखिल अपडाऊन केलं,पण आजकालची गर्दी बघितली की, अक्षरक्ष: अंगावर काटे येतात. आपल्या कारमधून जायचं म्हणजे एक वेगळचं सुख होतं,पण आज ते सुख राहिलेलं नाही.अशा वेळी शोर या मनोजकुमारच्या चित्रपटातील एक गाणं आठवंत. “ जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह-ओ-शाम, के रस्ता कट जाएगा मितरा, के बादल छट जाएगा मितरा,के दुःख से झुकना ना मितरा,के एक पल रुकना ना मितरा,जीवन चलने का नाम. . ”   खरं आहे, शहराच्या रस्त्यावर सकाळी बाहेर पडा. थोडीही उसंत मिळत नाही.   बसस्थानकांवर गर्दी , रेल्वे स्थानकांवर गर्दी , रस्त्यांवर वाहनांची गर्दी , मेट्रोमध्ये गर्दी , ऑफिसमध्ये गर्दी... माणूस माणसांच्या समुद्रात रोज प्रवास करतो. पण गंमत अशी की, या प्रचंड गर्दीतही तो अनेकदा एकटा असतो. सकाळी घरातून निघताना वेळेची घाई. रस्त्यावर वाहतूक कोंडी. बस उशिरा. रेल्वे उशिरा. ऑफिसला पो...

व्यथांच्या कथा 3— नोकरी आहे, पगार आहे; पण समाधान कुठे आहे?

  ब्लॉग नं. 2026/ 238.   दिनांक: 26 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा  3— नोकरी आहे , पगार आहे ; पण समाधान कुठे आहे ? मित्रांनो ,             नोकरी लागते,पगार चांगला असतो,पण समाधान नसतं.काहींचा बॉस समजून घेणारा नसतो.कुठे लायकी नसणारा,पण पुढे पुढे करणारा प्रमोशन घेऊन जातो.आज काल दुसरीकडे स्विच होण्याचा ऑप्शन असतो. पण ते लगेच काही,नाही ना जमतं.या परिस्थितीवर अमोल पालेकरांच्या “बातो बातोमे” मधील   किशोरकुमारचं गीत आठवंत. “कहाँ तक ये मन को,अंधेरे छलेंगे, उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे” ची आठवण येते.पण त्यातील या ओळी ऐकून पुढे जायचं असतं. “कही सुख कही दुख, यही जिंदगी है,ये पतझड का मौसम घडी दो घडी है, नये फूल कल फिर डगरमे खिलेंगे.” असा आशावाद पुढे जगायची प्रेरणा देतो.                          नोकरी करणारा माणूस बाहेरून स्थिर: नोकरी करणारा माणूस आपल्याला बाहेरून पाहिला तर स्थिर दिसतो. महिन्याला...

व्यथांच्या कथा 2 — शिक्षण संपलं, पण प्रश्न संपले नाहीत!

  ब्लॉग नं. 2026/ 237.   दिनांक: 25 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा 2 — शिक्षण संपलं , पण प्रश्न संपले नाहीत! मित्रांनो, कॉलेज संपलं , पण परीक्षा संपत नाही.कॉलेजच्या जीवनावर आधारित “इम्तेहान” हा विनोद खन्नाचा चित्रपट आठवतोय. “इम्तेहान” म्हणजे परीक्षाच, जीवनाची परीक्षा,संघर्ष सुरू होतो,नोकरी मिळविण्यासाठी.कधी अपयश पदरी पडतं. पण खचून जायचं नसतं. मला अशा वेळी नेमकं आठवायचं, या “इम्तेहान” मधलं किशोरकुमारचं गाणं, “रुक जाना नही,तु कभी हारके, कांटोपे चलके मिलेंगे साये बहारके”. अतिशय अर्थपूर्ण आणि भावपूर्ण गीत. ही गाणी आपल्याला बरंच काही शिकवून जातात.                               शाळेत दाखल झाल्यापासून मुलांच्या मागे परीक्षा लागतात.    शाळा संपली , कॉलेज संपलं , पदवी हातात आली की, तरुणांच्या आयुष्यातला संघर्ष संपतो , असं आपल्याला वाटतं. पण खरं तर तिथूनच,एका वेगळ्या संघर्षाची सुरुवात होते. “ आता पुढे काय ?” हा प्रश्न अ...