Skip to main content

Posts

Showing posts with the label social

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

ग्रेट निकोबार प्रकल्प

ब्लाॅग नं.2026/123. दिनांकः 3 मे, 2026. मित्रांनो , ग्रेट निकोबार प्रकल्प  : पर्यावरण आणि राष्ट्रीय सुरक्षेचा समतोल साधणारा,भारताचा हा निर्णायक टप्पा आहे , असं म्हटलं तर ते चुकीच ठरणार नाही.पण मोदी सरकारच्या धोरणाला नव्हे,तर देशहिताच्या आणि देशाच्या सुरक्षिततेच्या प्रत्येक मुद्द्याला विरोध करायचा,हे व्रत हाती घेतलेल्या लोकांनी,यांस पर्यावरणाच्या आडून विरोध सुरु केला आहे.या प्रकल्पाविषयी जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमधून. सविस्तरः भारताच्या विकासयात्रेत काही प्रकल्प असे आहेत , जे फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे तर सामरिक , भूराजकीय आणि भविष्यातील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ग्रेट निकोबार प्रकल्प हा त्यापैकीच एक प्रकल्प आहे.अलीकडे या प्रकल्पावर राजकीय स्तरावर चर्चा रंगली आहे.काहींनी पर्यावरणीय कारणांवरून विरोध दर्शवला , तर माजी वायुसेना प्रमुखांनी,या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत,स्पष्टपणे सांगितले की , भारतासाठी हा प्रकल्प केवळ विकास नव्हे,तर हिंद महासागरातील भारताची सामरिक उपस्थिती मजबूत करणारा टप्पा आहे. ग्रेट निकोबार कुठे आहे आणि का महत्त्वा...

SIR आणि विरोधकांचे आंदोलन

ब्लॉग नं. 2025/329. दिनांकः- 23  नोव्हेंबर , 2025.   मित्रांनो ,  नुकतीच राष्ट्रीय निवडणूक आयोगाने काही राज्यात SIR अर्थात Special Intensive Review राबविणार असल्याचे ठरविले. अन् लगेच विरोधी पक्षाने त्याविरुध्द बोंबा मारायला सुरुवात केली. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरुद मिरविणाऱ्या लोकशाहीतील विरोधी पक्ष हे दाखले परदेशातील देतात.पण परदेशात विशेषतः ब्रिटन मधील Contructive Opposition ही पध्दत कुठे भारतात आहे. जर निवडणूक आयोग राबवत असलेली SIR तुम्हाला मंजूर नाही. तर तुमच्याकडे पर्यायी प्रणाली आहे कां ? नाही. म्हणून तर तुम्ही केवळ विरोधाकरिता विरोध करत आहात , हे योग्य नाही आणि यावर आहे आजचा माझा ब्लॉग. सविस्तरः SIR वरील विरोधी पक्षांचे आक्षेप: तथ्य , भीती आणि वास्तवाचा सखोल आढावा भारतात मतदारयादीचे शुद्धीकरण हा एक नियमित पण अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. यातील सर्वात मोठा आणि व्यापक टप्पा म्हणजे # Special Intensive Revision (SIR) . पण हा उपक्रम सुरू होताच , काही ठिकाणी विरोधी पक्षांचा आक्षेप , निदर्शने , टीका व राजकीय वाद निर्माण झालेत. या आंदोलनांच्या मागचे म...

ब्रेकअपसाठी पुरुष किती जबाबदार?

ब्लॉग नं: 2025/278. दिनांक: 4   ऑक्टोबर ,2025.   मित्रांनो , 💭 विवाहाचा पाया: परंपरा की सत्य ? – पुरुषांच्या मनातून स्त्रियांच्या नजरेतून विवाहाकडे पाहताना अनेक कटू सत्यं उलगडतात. पण या सगळ्या चर्चेत एक प्रश्न कायम मागे राहतो – पुरुष काय विचार करतो ? विवाहाच्या परंपरागत संकल्पना , समाजाने दिलेल्या अपेक्षा , आणि स्वतःचं आयुष्य यामध्ये पुरुषही गोंधळलेला असतो.म्हणुन ब्रेकअप साठी नेहमी पुरूषच जबाबदार असतो का ? आजच्या ब्लॉग मधे पाहूया. सविस्तर: 🌿 पुरुष आणि जबाबदारीचे ओझे: लहानपणापासूनच त्याला शिकवलं जातं –“तू कुटुंबाचा आधार आहेस.” “तुझ्या खांद्यावर घर चालणार आहे.”म्हणून विवाहानंतर तो स्वतःच्या भावना , आवडी , स्वप्नं बाजूला ठेवतो आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात गुरफटतो. तो प्रेम करतो , पण ते दाखवणं कमी होतं. कारण समाज म्हणतो – “पुरुष भावनिक होत नाहीत.”आणि हळूहळू , तो न बोलताच अंतर वाढवत जातो. 🌸 तो काय अनुभवतो ? पत्नीची नाराजी दिसली की तो अपराधीपणाने जगतो.पण कधी कधी त्यालाही वाटतं – “माझ्या भावनांना कुणी समजत नाही.” तो जेवढं कमावतो , तेवढंच प्रेमाचं मोजमाप मानलं जातं...

ब्रेक अप साठी स्त्री जबाबदार आहे का?

ब्लॉग नं: 2025/277 दिनांक: 3   ऑक्टोबर ,2025.   मित्रांनो , आजकाल आपण बर्‍याच वेळा , ब्रेकअप च्या बातम्या ऐकतो. याला कधी पुरुष जबाबदार असतो तर कधी स्त्री तर कधी दोघेही. आता पुरुष प्रधान समाज व्यवस्था तितकीशी राह्यली नाही , म्हणत असलो तरी ब्रेक अपचा दोष किंवा कारण स्त्री असली पाह्यजे असे म्हणतात.पण वास्तव काय असू शकतं हे आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. सविस्तर: विवाहाचा पाया: परंपरा की सत्य ? स्त्रीच्या मनातून: पिढ्यान्‌पिढ्या आपण ऐकत आलो आहोत की,“विवाह हा समाजाचा पाया आहे.तो पवित्र आहे , स्थैर्य देणारा आहे आणि स्त्रीच्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे.”पण खरा प्रश्न असा आहे की , या पायाचा आधार नेमका कशावर आहे ? शांततेवर ? का सहनशीलतेवर ? आज भारतातील अनेक स्त्रिया , या प्रश्नाला प्रामाणिकपणे सामोऱ्या जात आहेत.त्या विवाह संस्था नाकारत नाहीत , पण त्या नात्यात स्वतःला हरवण्याची तयारी मात्र करत नाहीत. एकत्र असतानाही एकटेपणाची सल: लग्न झालं म्हणजे नेहमीच “मोल जाणलं जाणं” असतं असं नाही.सोशल मीडियावर कौटुंबिक फोटो , सण-वारातील एकत्रित क्षण , घराच्या...

लिव्ह-इन रिलेशनशिप: बदलती नाती, समाजाची नव्या विचारांशी गाठ

ब्लॉग नं. 2025/195 दिनांक: 15 जुलै , 2025. मित्रांनो ,  विवाहाच्या संकल्पनेत , आता लिव्ह-इन रिलेशनशिप हा एक नवा प्रकार उदयास आला. साधारणतः १९९० च्या दशकात लिव्ह-इन रिलेशनशिपला भारतात या संकल्पनेला सुरुवात झाली. नवरा आणि बायको यांना एकमेकांना व्यवस्थित जाणून घेणे शक्य व्हावे म्हणून वर्ष , सहा महिने कायदेशीर विवाह न करता एकत्र रहाणे हा या संकल्पनेचा अर्थ. अर्थात , सगळेच लोक ज्याप्रमाणे हा रस्ता निवडत नसले , तरी जास्त फॉरवर्ड लोकांच्या मध्ये हे प्रमाण अधिक बघायला मिळते. काही वेळेस नंतर लग्न करणे हे ध्येय देखील नसते.आजच्या ब्लॉग मध्ये  लिव्ह-इन रिलेशनशिप बद्दल जाणून घेणार आहोत.          👫   लिव्ह-इन रिलेशनशिप: बदलती नाती , समाजाची नव्या विचारांशी गाठ हल्लीच्या काळात नात्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. लग्नाआधी काही काळ एकत्र राहणे , म्हणजेच लिव्ह-इन रिलेशनशिप , हा ट्रेंड भारतात देखील हळूहळू स्वीकारला जाऊ लागला आहे. काहींना हा प्रकार आधुनिक वाटतो , काहींना अस्वीकार्य. पण हे नातं समाज , कायदा , आणि वैयक्तिक जीवनावर नेमका कस...

एअर कंडिशनर बाबत केंद्राचे नवे धोरण

ब्लॉग नं: 2025/172 . दिनांक: 22 जून , 2025.   मित्रांनो , कधी तरी तुम्ही आणि तुम च्या घरातील सदस्य किंवा जोडीदार,यांच्यात एसीच्या तापमानावरून वाद झाला असेल. टीम 18 °C च्या सदस्यांना थंडगार वातावरण हवे असते , तर टीम 24 °C ला सौम्य थंडावा हवा असतो. मात्र , लवकरच हे "शीतयुद्ध" संपुष्टात येऊ शकते.कारण केंद्र सरकार संपूर्ण भारतात,एसी तापमानाचे नियमन लागू करण्याची योजना आखत आहे.आजचा ब्लॉग या विषयावर आहे. सविस्तर: सरकारचा प्रस्ताव आणि त्यामागील कारणे: नवीन प्रस्तावानुसार , एसीचे आता 20 °C पेक्षा कमी किंवा 28 °C पेक्षा जास्त तापमान सेट करता येणार नाही.सरकारचा हेतू कोणाच्या झोपेची काळजी घेणे नसून वीज बचतीचा आहे.2010 पासून,भारतात एसी वापरणाऱ्या घरांची संख्या तिप्पट झाली आहे.परिणामी , विजेची मागणीही 20% ने वाढली आहे. भारतात सध्या थंड होण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचे प्रमाण एकूण विजेच्या 10% इतके आहे. एसी तापमान आणि ऊर्जा बचत: एसी तापमान 24-26 °C दरम्यान ठेवले तर वीजेची बचत होऊ शकते.तापमान 20 °C वरून 24 °C पर्यंत वाढवल्यास वीज वापर 24% पर्यंत कमी होतो. यामुळे ग्राहकांचे...

आजकाल अनेक पुरुष अविवाहित रहाणे का स्वीकारतात?

ब्लॉग नं: 2025/170 दिनांक: 20 जून , 2025.   मित्रांनो , पूर्वी , भारतीय पुरुषांच्या आयुष्यात लग्न हा अंतिम टप्पा मानला जात असे.तो एक कर्तव्य , एक जबाबदारी , प्रौढत्वाचा एक शिक्का असे. पण आता हा प्रवास म्हणा,प्रवाह बदलत चालला आहे. विशेषतः 20 ते 30 या वयोगटातील पुरुष , लग्नाऐवजी अविवाहित राहण्याचा पर्याय निवडत आहेत. हे बंडखोरीसारखे नाही तर आत्मचिंतन आणि स्व-जागरूकतेचा भाग आहे. हे प्रेमापासून पळणे नाही,तर अवास्तव अपेक्षांपासून आणि मानसिक ताणांपासून स्वत:चा बचाव करण्याचा एक प्रयत्न आहे.आजचा ब्लॉग या विषयाला समर्पित आहे. सविस्तर:             भारतीय पुरुषांवर अपेक्षांचे वाढलेले ओझे, गैरसमज होण्याची भीती,आर्थिक ताण, तुटत चाललेली घरे, सासू सासऱ्यांच्या सोबत तणाव आणि भावनांना मोकळे करण्यासाठी जागा नसणे या गोष्टी यामुळे पुरुष , लग्नाऐवजी अविवाहित राहणे पसंत करत आहेत. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ.               1. अपेक्षांचे वजन: भारतीय कुटुंबांमध्ये मुलगा जन्माला येताच,त्याच्यावर कर्तव्ये ल...