ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...
ब्लाॅग नं.2026/123. दिनांकः 3 मे, 2026. मित्रांनो , ग्रेट निकोबार प्रकल्प : पर्यावरण आणि राष्ट्रीय सुरक्षेचा समतोल साधणारा,भारताचा हा निर्णायक टप्पा आहे , असं म्हटलं तर ते चुकीच ठरणार नाही.पण मोदी सरकारच्या धोरणाला नव्हे,तर देशहिताच्या आणि देशाच्या सुरक्षिततेच्या प्रत्येक मुद्द्याला विरोध करायचा,हे व्रत हाती घेतलेल्या लोकांनी,यांस पर्यावरणाच्या आडून विरोध सुरु केला आहे.या प्रकल्पाविषयी जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमधून. सविस्तरः भारताच्या विकासयात्रेत काही प्रकल्प असे आहेत , जे फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे तर सामरिक , भूराजकीय आणि भविष्यातील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ग्रेट निकोबार प्रकल्प हा त्यापैकीच एक प्रकल्प आहे.अलीकडे या प्रकल्पावर राजकीय स्तरावर चर्चा रंगली आहे.काहींनी पर्यावरणीय कारणांवरून विरोध दर्शवला , तर माजी वायुसेना प्रमुखांनी,या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत,स्पष्टपणे सांगितले की , भारतासाठी हा प्रकल्प केवळ विकास नव्हे,तर हिंद महासागरातील भारताची सामरिक उपस्थिती मजबूत करणारा टप्पा आहे. ग्रेट निकोबार कुठे आहे आणि का महत्त्वा...