ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
ब्लाॅग नं.2026/123. दिनांकः 3 मे, 2026. मित्रांनो , ग्रेट निकोबार प्रकल्प : पर्यावरण आणि राष्ट्रीय सुरक्षेचा समतोल साधणारा,भारताचा हा निर्णायक टप्पा आहे , असं म्हटलं तर ते चुकीच ठरणार नाही.पण मोदी सरकारच्या धोरणाला नव्हे,तर देशहिताच्या आणि देशाच्या सुरक्षिततेच्या प्रत्येक मुद्द्याला विरोध करायचा,हे व्रत हाती घेतलेल्या लोकांनी,यांस पर्यावरणाच्या आडून विरोध सुरु केला आहे.या प्रकल्पाविषयी जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमधून. सविस्तरः भारताच्या विकासयात्रेत काही प्रकल्प असे आहेत , जे फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे तर सामरिक , भूराजकीय आणि भविष्यातील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ग्रेट निकोबार प्रकल्प हा त्यापैकीच एक प्रकल्प आहे.अलीकडे या प्रकल्पावर राजकीय स्तरावर चर्चा रंगली आहे.काहींनी पर्यावरणीय कारणांवरून विरोध दर्शवला , तर माजी वायुसेना प्रमुखांनी,या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत,स्पष्टपणे सांगितले की , भारतासाठी हा प्रकल्प केवळ विकास नव्हे,तर हिंद महासागरातील भारताची सामरिक उपस्थिती मजबूत करणारा टप्पा आहे. ग्रेट निकोबार कुठे आहे आणि का महत्त्वा...