Skip to main content

Posts

Showing posts with the label Motivational

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

नविन वर्ष सकारात्मकतेचे जावो

  ब्लॉग नं: 2026/001. दिनांक:1 जानेवारी ,2026.   मित्रांनो ,             आज 1 जानेवारी 2026, म्हणजे वर्षाचा पहिला दिवस.वेगवेगळे संकल्प निश्चित करण्याचा दिवस. काही तरी नवं करण्याचे ठरविण्याचा दिवस.मी तीन वर्षापूर्वी रोज नियमितपणे ब्लॉग लिहिण्याचे ठरविले आणि गेली तीन वर्षे ते अव्याहतपणे निभावले. या काळात 1,000 च्यावर ब्लॉग लिहिले. व्हिवर्सची संख्या 3,500 पर्यन्त पोहोचली. ब्लॉगची वाचनसंख्या 1,10,000 वर जाऊन पोहोचली. एकंदरीत माझं लिखाण वाचकांना आवडतंय याचा हा पुरावाच आहे.माझ्या आरोग्य,आहार विषयक ब्लॉगना जास्त वाचक आहेत.आज मी तुम्हाला थोड्या वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे.  सविस्तर:             मित्रांनो, “मन चिंती ते वैरी न चिंती” असं म्हटलं जातं.आपण पूर्वी या गोष्टीकडे विशेष गांभीर्याने पहात नव्हतो. पण जीवनात कटकटी वाढल्या,ताण तणाव वाढले,तसे मानसशास्त्र देखिल मानवाच्या विश्वाला व्यापू लागले.अन त्यातून मन हे किती महत्वाचे आहे.हे लक्षात येऊ लागले आहे.आजकाल तर, Mind ...

खरा आनंद म्हणजे काय ?

  ब्लॉग नं: 2025/32 4. दिनांक:1 8 नोव्हेंबर, 2025      मित्रांनो, X या समाज मध्यामावर जेव्हा, एका वापरकर्त्याने ( User ) खरा आनंद म्हणजे काय यावर आपले विचार शेअर केले. त्यानंतर X  वर एक विचारशील चर्चा व्हायरल झाली आहे , ज्यामध्ये असे सुचवण्यात आले आहे की,आनंद  पैशाने किंवा आरामाने खरेदी करता येणारे नाही.त्याने असा युक्तिवाद केला की,ती "मनाची स्थिती" आहे. आपला मुद्दा मांडण्यासाठी , त्याने जपानमधील जीवनाची तुलना भारतातील जीवनाशी केली, दोन समाज जे वरवर पाहता एकमेकांपासून भिन्न दिसतात.आजच्या ब्लॉगवर त्यावर चर्चा करू या. सविस्तर:   एका वापरकर्त्याने, X वर पोस्ट लिहितांना म्हटले आहे की, “मला माहित आहे की खराब रस्ते , प्रचंड वाहतूक , गर्दी असलेल्या गाड्या आणि कामाचे लांब तास यामुळे हे अंतर्ज्ञानाच्या विरुद्ध वाटते. परंतु या मताबद्दल द्वेष केला जाण्याच्या जोखमीवर - मी ते वापरून पाहतो ," त्याने त्याच्या X पोस्टची सुरुवात केली. अलीकडेच टोकियोला भेट दिलेल्या वापरकर्त्याने म्हटले की शहरात "प्रथम जगातील देशाच्या कल्पना करण्यायोग्य प्रत्येक लक्झरी" कशी ...

निद्रिस्त मनाची अदभूत शक्ती

Blog No. 2025/116   Date 27 एप्रिल, 2025. मित्रांनो ,              आज मी तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे. माणसाचे जीवन हे सकारात्मक अंगाने घेतले तर खूप छान आहे , हे जीवन आपल्याला जगायला मिळणे हीच खरं तर खूप आनंददायी गोष्ट आहे. एकूण काय सकारात्मक अंगाने विचार केला तर , आपल्याला ह्यात आनंदच दिसून येतो. पण नकारात्मक अंगाने विचार केला तर हेच जीवन खूप त्रासदायक आहे असे वाटून जातं.त्याची सुरुवात आपण करतो ती अगदी आई वडिलांनी आपल्याला लहानपणी मनासारखे वागू दिले नाही इथपासून.शाळेत शिक्षकांनी चूक नसतांना मलाच मारले , कॉलेज मनासारखे मिळाले नाही , नोकरी मनासारखी मिळाली नाही , नोकरीत पोस्टिंग मनासारखे मिळाले नाही , बॉस मनासारखा मिळाला नाही , अगदी बायको देखिल मनासारखी मिळाली नाही.बापरे ! नकारात्मक अंगाने विचार केला तर किती गोष्टी विरुद्ध गेल्या असं दिसतं. पण मित्रांनो , काही गोष्टींना काय बऱ्याचशा गोष्टींना आपण जबाबदार असतो.कारण प्रत्येक गोष्टीचा विचार आपण नकारात्मक करत असतो , आणि आपल्या विचार करण्याचा परिणाम नकारात्...

स्वतःला सिद्ध करण्याचा संघर्ष: भगवद्गीतेतून आत्ममूल्याची पुनर्व्याख्या

  ब्लॉग नं. 2025/092 दिनांक: 3 एप्रिल, 2025. मित्रांनो, आयुष्यात असा एक क्षण येतो,कधीकधी नोकरीच्या मुलाखतीत अयशस्वी होण्याच्या स्थितीत , कधीकधी पहाटे 2 वाजता छताकडे पाहत असताना - जेव्हा प्रश्न येतो: मी या गोष्टींचा सामना करायला किंवा लढायला पुरेसा पडत नाही का ? आणि एखाद्याला तुम्ही जे करायला हवे होते ते करताना पाहिल्यावर तर निश्चित अशी शंका येते.तुम्हाला थकवा येत असेल , प्रेम , यश , प्रशंसा किंवा कुणाचा आपलेपणा प्राप्त करण्यासाठी श्रम करावे लागत असतील.तुम्हाला कल्पना आहे, तुमचा अपुरेपणासाठीचा हा हताश शोध एका सदोष कल्पनेवर आधारित आहे ? आजच्या ब्लॉगमध्ये यावर चर्चा करू.   1.स्वतःचे मूल्यमापन करण्याचे तंत्र चुकीचे: लहानपणापासून , आपल्याला निकालांवरून स्वतःचे मोजमाप करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. चांगले गुण मिळविले म्हणजे तुम्ही हुशार आहात.तुम्हाला उच्च पगाराची नोकरी म्हणजे तुम्ही यशस्वी आहात.तुम्हाला कुणाची प्रशंसा मिळाली तरच तुम्ही पात्र आहात. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक मूलगामी गोष्ट सांगतात: "तुमचा तुमच्या कर्मांवर अधिकार आहे , पण तुमचा कर्मांच्या फळांवर क...

विचार करा, अतिविचार करू नका.

ब्लॉग नं: 2025/059 दिनांक: 28 फेब्रुवरी, 2025. मित्रांनो:             बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस एखाद्याला सांगितलं जातं की, तू विचार अजिबात करत नाहीस आणि हे सारे विचार न करण्याचे परिणाम आहेत.अन काही वेळेस असंही म्हटलं जात की, तू ना अतिविचार करतोस,त्याचे हे परिणाम आहेत.मग नेमकं करायचं काय हा प्रश्न मनांत उभा राहतो. उत्तर आहे,विचार करा पण अति-विचार करू नका. कारण विचार करण्याचे सकारात्मक परिणाम असू शकतात,पण अति-विचाराचे अधिकाधिक वेळा नकारात्मक परिणाम दिसून येतात.आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये अति-विचार म्हणजे काय? अति-विचाराचे काय परिणाम होतात आणि तो कसा थांबवावा? हे जाणून घेणार आहोत.                                           अति-विचार म्हणजे काय ? आणि तो कसा थांबवावा ? अति-विचार म्हणजे काय ? अति-विचार म्हणजे एखाद्या समस्येचा किंवा परिस्थितीचा पुनःपुन्हा विचार करणे , ज्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो. हा विचारांचा वेग एवढा जास्त ...