Skip to main content

Posts

Showing posts with the label Motivational

टाइप 5 मधुमेह

ब्लाॅग नं.2025/150 दिनांकः 31 मे, 2025. मित्रांनो,  मधुमेहाचा नवा प्रकार: प्रकार ५ मधुमेह – एक नवा दृष्टिकोन एप्रिल २०२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने (IDF) मधुमेहाच्या एका नवीन प्रकाराला अधिकृत मान्यता दिली – प्रकार ५ मधुमेह. या नवीन प्रकारामुळे जगभरातील आरोग्य क्षेत्रात नवी जागरूकता निर्माण झाली आहे. प्रकार ५ मधुमेह विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. अंदाजानुसार, सुमारे २० ते २५ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. प्रकार ५ मधुमेह म्हणजे काय? प्रकार ५ मधुमेहाला "गंभीर इन्सुलिन-कमी असलेला मधुमेह" (Severe Insulin-Deficient Diabetes - SIDD) म्हणूनही ओळखले जाते. हा मधुमेह इतर प्रकारांपेक्षा वेगळा आहे. कुपोषणामुळे होणाऱ्या चयापचय विकारांशी त्याचा थेट संबंध असून, विशेषतः किशोरवयीन आणि तरुण प्रौढांवर त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो. दीर्घकाळ कुपोषणामुळे शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. परिणामतः, शरीर इन्सुलिनची निर्मिती पुरेशा प्रमाणात करू शकत नाही. यामुळे चयापचय स्थिरता राखणे कठीण होते. टाइप १ आणि ...

निद्रिस्त मनाची अदभूत शक्ती

Blog No. 2025/116   Date 27 एप्रिल, 2025. मित्रांनो ,              आज मी तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे. माणसाचे जीवन हे सकारात्मक अंगाने घेतले तर खूप छान आहे , हे जीवन आपल्याला जगायला मिळणे हीच खरं तर खूप आनंददायी गोष्ट आहे. एकूण काय सकारात्मक अंगाने विचार केला तर , आपल्याला ह्यात आनंदच दिसून येतो. पण नकारात्मक अंगाने विचार केला तर हेच जीवन खूप त्रासदायक आहे असे वाटून जातं.त्याची सुरुवात आपण करतो ती अगदी आई वडिलांनी आपल्याला लहानपणी मनासारखे वागू दिले नाही इथपासून.शाळेत शिक्षकांनी चूक नसतांना मलाच मारले , कॉलेज मनासारखे मिळाले नाही , नोकरी मनासारखी मिळाली नाही , नोकरीत पोस्टिंग मनासारखे मिळाले नाही , बॉस मनासारखा मिळाला नाही , अगदी बायको देखिल मनासारखी मिळाली नाही.बापरे ! नकारात्मक अंगाने विचार केला तर किती गोष्टी विरुद्ध गेल्या असं दिसतं. पण मित्रांनो , काही गोष्टींना काय बऱ्याचशा गोष्टींना आपण जबाबदार असतो.कारण प्रत्येक गोष्टीचा विचार आपण नकारात्मक करत असतो , आणि आपल्या विचार करण्याचा परिणाम नकारात्...

स्वतःला सिद्ध करण्याचा संघर्ष: भगवद्गीतेतून आत्ममूल्याची पुनर्व्याख्या

  ब्लॉग नं. 2025/092 दिनांक: 3 एप्रिल, 2025. मित्रांनो, आयुष्यात असा एक क्षण येतो,कधीकधी नोकरीच्या मुलाखतीत अयशस्वी होण्याच्या स्थितीत , कधीकधी पहाटे 2 वाजता छताकडे पाहत असताना - जेव्हा प्रश्न येतो: मी या गोष्टींचा सामना करायला किंवा लढायला पुरेसा पडत नाही का ? आणि एखाद्याला तुम्ही जे करायला हवे होते ते करताना पाहिल्यावर तर निश्चित अशी शंका येते.तुम्हाला थकवा येत असेल , प्रेम , यश , प्रशंसा किंवा कुणाचा आपलेपणा प्राप्त करण्यासाठी श्रम करावे लागत असतील.तुम्हाला कल्पना आहे, तुमचा अपुरेपणासाठीचा हा हताश शोध एका सदोष कल्पनेवर आधारित आहे ? आजच्या ब्लॉगमध्ये यावर चर्चा करू.   1.स्वतःचे मूल्यमापन करण्याचे तंत्र चुकीचे: लहानपणापासून , आपल्याला निकालांवरून स्वतःचे मोजमाप करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. चांगले गुण मिळविले म्हणजे तुम्ही हुशार आहात.तुम्हाला उच्च पगाराची नोकरी म्हणजे तुम्ही यशस्वी आहात.तुम्हाला कुणाची प्रशंसा मिळाली तरच तुम्ही पात्र आहात. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक मूलगामी गोष्ट सांगतात: "तुमचा तुमच्या कर्मांवर अधिकार आहे , पण तुमचा कर्मांच्या फळांवर क...

विचार करा, अतिविचार करू नका.

ब्लॉग नं: 2025/059 दिनांक: 28 फेब्रुवरी, 2025. मित्रांनो:             बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस एखाद्याला सांगितलं जातं की, तू विचार अजिबात करत नाहीस आणि हे सारे विचार न करण्याचे परिणाम आहेत.अन काही वेळेस असंही म्हटलं जात की, तू ना अतिविचार करतोस,त्याचे हे परिणाम आहेत.मग नेमकं करायचं काय हा प्रश्न मनांत उभा राहतो. उत्तर आहे,विचार करा पण अति-विचार करू नका. कारण विचार करण्याचे सकारात्मक परिणाम असू शकतात,पण अति-विचाराचे अधिकाधिक वेळा नकारात्मक परिणाम दिसून येतात.आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये अति-विचार म्हणजे काय? अति-विचाराचे काय परिणाम होतात आणि तो कसा थांबवावा? हे जाणून घेणार आहोत.                                           अति-विचार म्हणजे काय ? आणि तो कसा थांबवावा ? अति-विचार म्हणजे काय ? अति-विचार म्हणजे एखाद्या समस्येचा किंवा परिस्थितीचा पुनःपुन्हा विचार करणे , ज्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो. हा विचारांचा वेग एवढा जास्त ...