Skip to main content

Posts

Showing posts with the label Motivational

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

खरा आनंद म्हणजे काय ?

  ब्लॉग नं: 2025/32 4. दिनांक:1 8 नोव्हेंबर, 2025      मित्रांनो, X या समाज मध्यामावर जेव्हा, एका वापरकर्त्याने ( User ) खरा आनंद म्हणजे काय यावर आपले विचार शेअर केले. त्यानंतर X  वर एक विचारशील चर्चा व्हायरल झाली आहे , ज्यामध्ये असे सुचवण्यात आले आहे की,आनंद  पैशाने किंवा आरामाने खरेदी करता येणारे नाही.त्याने असा युक्तिवाद केला की,ती "मनाची स्थिती" आहे. आपला मुद्दा मांडण्यासाठी , त्याने जपानमधील जीवनाची तुलना भारतातील जीवनाशी केली, दोन समाज जे वरवर पाहता एकमेकांपासून भिन्न दिसतात.आजच्या ब्लॉगवर त्यावर चर्चा करू या. सविस्तर:   एका वापरकर्त्याने, X वर पोस्ट लिहितांना म्हटले आहे की, “मला माहित आहे की खराब रस्ते , प्रचंड वाहतूक , गर्दी असलेल्या गाड्या आणि कामाचे लांब तास यामुळे हे अंतर्ज्ञानाच्या विरुद्ध वाटते. परंतु या मताबद्दल द्वेष केला जाण्याच्या जोखमीवर - मी ते वापरून पाहतो ," त्याने त्याच्या X पोस्टची सुरुवात केली. अलीकडेच टोकियोला भेट दिलेल्या वापरकर्त्याने म्हटले की शहरात "प्रथम जगातील देशाच्या कल्पना करण्यायोग्य प्रत्येक लक्झरी" कशी ...

निद्रिस्त मनाची अदभूत शक्ती

Blog No. 2025/116   Date 27 एप्रिल, 2025. मित्रांनो ,              आज मी तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे. माणसाचे जीवन हे सकारात्मक अंगाने घेतले तर खूप छान आहे , हे जीवन आपल्याला जगायला मिळणे हीच खरं तर खूप आनंददायी गोष्ट आहे. एकूण काय सकारात्मक अंगाने विचार केला तर , आपल्याला ह्यात आनंदच दिसून येतो. पण नकारात्मक अंगाने विचार केला तर हेच जीवन खूप त्रासदायक आहे असे वाटून जातं.त्याची सुरुवात आपण करतो ती अगदी आई वडिलांनी आपल्याला लहानपणी मनासारखे वागू दिले नाही इथपासून.शाळेत शिक्षकांनी चूक नसतांना मलाच मारले , कॉलेज मनासारखे मिळाले नाही , नोकरी मनासारखी मिळाली नाही , नोकरीत पोस्टिंग मनासारखे मिळाले नाही , बॉस मनासारखा मिळाला नाही , अगदी बायको देखिल मनासारखी मिळाली नाही.बापरे ! नकारात्मक अंगाने विचार केला तर किती गोष्टी विरुद्ध गेल्या असं दिसतं. पण मित्रांनो , काही गोष्टींना काय बऱ्याचशा गोष्टींना आपण जबाबदार असतो.कारण प्रत्येक गोष्टीचा विचार आपण नकारात्मक करत असतो , आणि आपल्या विचार करण्याचा परिणाम नकारात्...

स्वतःला सिद्ध करण्याचा संघर्ष: भगवद्गीतेतून आत्ममूल्याची पुनर्व्याख्या

  ब्लॉग नं. 2025/092 दिनांक: 3 एप्रिल, 2025. मित्रांनो, आयुष्यात असा एक क्षण येतो,कधीकधी नोकरीच्या मुलाखतीत अयशस्वी होण्याच्या स्थितीत , कधीकधी पहाटे 2 वाजता छताकडे पाहत असताना - जेव्हा प्रश्न येतो: मी या गोष्टींचा सामना करायला किंवा लढायला पुरेसा पडत नाही का ? आणि एखाद्याला तुम्ही जे करायला हवे होते ते करताना पाहिल्यावर तर निश्चित अशी शंका येते.तुम्हाला थकवा येत असेल , प्रेम , यश , प्रशंसा किंवा कुणाचा आपलेपणा प्राप्त करण्यासाठी श्रम करावे लागत असतील.तुम्हाला कल्पना आहे, तुमचा अपुरेपणासाठीचा हा हताश शोध एका सदोष कल्पनेवर आधारित आहे ? आजच्या ब्लॉगमध्ये यावर चर्चा करू.   1.स्वतःचे मूल्यमापन करण्याचे तंत्र चुकीचे: लहानपणापासून , आपल्याला निकालांवरून स्वतःचे मोजमाप करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. चांगले गुण मिळविले म्हणजे तुम्ही हुशार आहात.तुम्हाला उच्च पगाराची नोकरी म्हणजे तुम्ही यशस्वी आहात.तुम्हाला कुणाची प्रशंसा मिळाली तरच तुम्ही पात्र आहात. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक मूलगामी गोष्ट सांगतात: "तुमचा तुमच्या कर्मांवर अधिकार आहे , पण तुमचा कर्मांच्या फळांवर क...

विचार करा, अतिविचार करू नका.

ब्लॉग नं: 2025/059 दिनांक: 28 फेब्रुवरी, 2025. मित्रांनो:             बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस एखाद्याला सांगितलं जातं की, तू विचार अजिबात करत नाहीस आणि हे सारे विचार न करण्याचे परिणाम आहेत.अन काही वेळेस असंही म्हटलं जात की, तू ना अतिविचार करतोस,त्याचे हे परिणाम आहेत.मग नेमकं करायचं काय हा प्रश्न मनांत उभा राहतो. उत्तर आहे,विचार करा पण अति-विचार करू नका. कारण विचार करण्याचे सकारात्मक परिणाम असू शकतात,पण अति-विचाराचे अधिकाधिक वेळा नकारात्मक परिणाम दिसून येतात.आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये अति-विचार म्हणजे काय? अति-विचाराचे काय परिणाम होतात आणि तो कसा थांबवावा? हे जाणून घेणार आहोत.                                           अति-विचार म्हणजे काय ? आणि तो कसा थांबवावा ? अति-विचार म्हणजे काय ? अति-विचार म्हणजे एखाद्या समस्येचा किंवा परिस्थितीचा पुनःपुन्हा विचार करणे , ज्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो. हा विचारांचा वेग एवढा जास्त ...