ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...
ब्लाॅग नं.2026/117. दिनांक:-27 एप्रिल,2026. मित्रांनो , रिकाम्या हातांचे मर्म: जुने सोडल्याशिवाय नवीन मिळणार कसं ? आपल्याकडे एक म्हण आहे , ' जुने जावे नूतन यावे '. ऐकायला हे जितके सोपं वाटतं , तितकंच आचरणात आणायला कठीण असतं.मानवी स्वभाव मुळातच ' संग्रह ' करण्याचा आहे.मग तो संग्रह वस्तूंचा असो , आठवणींचा असो किंवा मनात साठवलेल्या जुन्या रागाचा.पण आपण कधी हा विचार केला आहे का , की जर आपले दोन्ही हात जुन्या ओझ्याने भरलेले असतील , तर नियती जेव्हा आपल्याला काहीतरी नवीन देऊ इच्छिते , तेव्हा ते स्वीकारायला आपले हात रिकामे कुठे आहेत ? यालाच रिकाम्या हातांचे मर्म ' असे म्हणतात.आज याच विषयावर सविस्तर बोलू या. सविस्तरः 1. संचय करण्याची वृत्ती : प्रगतीतील अडथळा- बऱ्याचदा आपण एखादी वस्तू वर्षानुवर्षे वापरत नाही , तरीही ती टाकून देत नाही.कारण असतं ' अटॅचमेंट '. हीच गोष्ट विचारांच्या बाबतीतही घडते.कोणाबद्दल तरी असलेला जुना राग , भूतकाळातील अपयशाची भीती किंवा "मीच बरोबर आहे" हा अहंकाराचा ठाम विचार , आपण हे सर्व इतक्या घट्ट धरून ठेवतो की ...