Skip to main content

Posts

Showing posts with the label environmental

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

एक अनोखा फाॅरेस्ट मॅन

ब्लाॅग नं.2025/249. दिनांकः 7 सप्टेंबर, 2025. मित्रांनो,   एका माणसाने घडवलेले जंगल – जादव ‘मोलाई’ पायेंग यांची अनोखी कहाणी कधी कधी एकच माणूस इतिहास घडवतो. आपल्या अढळ इच्छाशक्तीने आणि साध्या कृतीने तो संपूर्ण जगासाठी प्रेरणा बनतो.आजच्या ब्लॉगमध्ये वाचू या,आसाममधील जादव ‘मोलाई’ पायेंग यांची कथा ही अशाच एका अपूर्व कार्यकर्त्याची आहे. सविस्तर: मृत्यूच्या दृश्यातून जन्माला आलेली जिद्द सुमारे 35 वर्षांपूर्वी , अवघ्या 16 वर्षांच्या जादवने एक हृदयद्रावक दृश्य पाहिले.नदीकिनारी हजारो प्राण्यांचे मृतदेह विखुरलेले होते.पुरापासून वाचण्यासाठी झाडांशिवाय आसरा न मिळाल्याने,त्या निरपराध प्राण्यांचा शोकांत मृत्यू झाला होता.शेकडो मृत सापांचे , हरणांचे , रानडुकरांचे आणि इतर प्राण्यांचे निर्जीव डोळे जादवच्या मनावर कोरले गेले.त्या रात्री जादव झोपू शकला नाही. गावातील एका वृद्धाने सांगितलेले शब्द त्याच्या मनात ठसले – " जंगल नसले , तर प्राणी कुठे जातील ? त्यांना अन्न कुठे मिळेल ? " याच क्षणी त्याने प्राण्यांसाठी जंगल उभारण्याची प्रतिज्ञा केली. जंगल घडवणारा एकटा माणूसः फ...

धरतीवरचे त्रिदेव- निंबोणी, पिंपळ आणि वड

ब्लॉग नं.2025/234 . दिनांक: 24  ऑगस्ट, 2025. मित्रांनो, तुम्हाला कदाचित हे विचित्र वाटेल , खरं वाटणार नाही,पण हे सत्य आहे…मागील 68 वर्षांपासून पिंपळ , वड आणि नीम यांची लागवड सरकारी पातळीवर बंद करण्यात आली आहे. 😢 तसं पाह्यला गेलं तर पिंपळ, निंबोणी आणि वड किंवा वटवृक्ष हे तिन्ही अतिशय पर्यावरण पूरक असे वृक्ष आहेत .पण त्याकडे लक्ष देत कोण? आजचा माझा ब्लॉग आहे,याच विषयावर. सविस्तर: पिंपळ,वड आणि नीम किंवा निंबोणी या तिन्ही वृक्षांचे शास्त्रात एक वेगळे सांगितले आहे.आणि याला धार्मिक महत्व देण्यात आले.कारण धार्मिक कारण दिलं की लोकांना पटत असे, पण खरं कारण हे की हे वृक्ष  पर्यावरण संतुलन राखण्याचे,महत्वाचे कार्य करत असतात.कारण  पिंपळ हा कार्बन डाय ऑक्साईडचा  100 % शोषक वृक्ष आहे , वड हा कार्बन डाय ऑक्साईडचा  80 % शोषक वृक्ष आहे तर नीम  किंवा निंबोणी हा 75%. पण यांच्या ऐवजी लोकांनी परदेशी   युकॅलिप्टस   लावायला सुरुवात केली , जो जमिनेला जलविहीन करून टाकतो. 😠 आज सर्वत्र युकलिप्टस , गुलमोहर आणि इतर सजावटी झाडे दिसतात.आता जेव्हा वातावरणात शुद्धीकरण करणारी ...

झाडांना किती वेळा पाणी द्याल?

  ब्लॉग सं. 2025/21 2.   दिनांक: 30 जुलै, 2025 मित्रांनो,             आज जरा वेगळा विषय हाताळू असं मनांत आलं. रोज रोज आरोग्य विषयावर वाचून तुम्ही कंटाळले असाल, म्हणून आज जरा आपण आपला बगीच्या असला तर किंवा बाल्कनीत जी रोपं लावलेली असतात, किती वेळा पाणी द्यावे ? प्रभावी पाणी देण्याच्या विषयी काही माहिती शेअर करत आहे.आजच्या ब्लॉगमध्ये याविषयी काही टिप्स वाचनांत आल्या त्या शेअर करत आहे. सविस्तर: पाणी देणे ही वनस्पतींच्या/रोपांच्या किंवा झाडांच्या काळजी घेण्यातील सर्वात महत्वाची आणि अनेकदा गैरसमज असलेल्या पैलूंपैकी एक आहे.जरी ते सोपे वाटत असले तरी , तुमच्या झाडांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी दिल्याने,त्यांच्या आरोग्यात आणि वाढीमध्ये लक्षणीय फरक पडू शकतो.खूप कमी पाणी झाडांना डिहायड्रेटेड आणि तणावग्रस्त बनवू शकते , तर जास्त पाणी मुळांना कुजण्यास आणि इतर समस्यांना कारणीभूत ठरू शकते. यासाठी परिपूर्ण असे संतुलन शोधणे महत्त्वाचे आहे , कारण जास्त पाणी दिल्याने मुळे गुदमरतात , तर पाण्याखाली गेल्याने वनस्पतीची प्रकाशसंश्...