Skip to main content

Posts

Showing posts with the label emotional

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या !

  ब्लॉग नं. 2025/30 7. दिनांक: 1 नोव्हेंबर 2025. मित्रांनो,   “या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या !” “ जिथे तुमची कदर नाही तिथे का राहावे ? भारतमातेला तुमची गरज आहे , आणि तुमचे स्वागत आहे!”  झोहो कॉर्पचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांचे हे शब्द केवळ एक ट्वीट नाहीत , तर प्रत्येक भारतीयाचे,  स्थलांतरितासाठी अंतर्मनाला स्पर्श करणारे आवाहन आहे.आज जगभरातील अनेक भारतीयांनी त्यांची बुद्धिमत्ता , कार्यकौशल्य आणि प्रामाणिकतेच्या जोरावर,परदेशात प्रतिष्ठा कमावली आहे.त्यांचे योगदान इतके मोठे आहे की,अमेरिकेच्या अर्थसंकल्पात भारतीय स्थलांतरितांनी गेल्या 30 वर्षांत सरासरी 1.7 दशलक्ष डॉलर इतके योगदान दिल्याचे आकडे सांगतात.हे सर्वात जास्त आहे,इतर कोणत्याही देशाच्या स्थलांतरितांपेक्षा.पण तरीही देखिल,अमेरिकेचे तोंडाळ राष्ट्रपती आपली मुक्ताफळे उधळीत आहेत.    वेम्बू यांनी याच आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना म्हटले. “ भारताने त्याचे सर्वोत्तम पाठवले.” ही ओळ वेदनादायक आहे आणि अभिमानास्पदही आहे.वेदना कारण भारताने आपली प्रतिभा गमावली आहे. आणि  अभिमान,कारण त्या प्रतिभेन...