ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...
ब्लॉग नं. 2025/30 7. दिनांक: 1 नोव्हेंबर 2025. मित्रांनो, “या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या !” “ जिथे तुमची कदर नाही तिथे का राहावे ? भारतमातेला तुमची गरज आहे , आणि तुमचे स्वागत आहे!” झोहो कॉर्पचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांचे हे शब्द केवळ एक ट्वीट नाहीत , तर प्रत्येक भारतीयाचे, स्थलांतरितासाठी अंतर्मनाला स्पर्श करणारे आवाहन आहे.आज जगभरातील अनेक भारतीयांनी त्यांची बुद्धिमत्ता , कार्यकौशल्य आणि प्रामाणिकतेच्या जोरावर,परदेशात प्रतिष्ठा कमावली आहे.त्यांचे योगदान इतके मोठे आहे की,अमेरिकेच्या अर्थसंकल्पात भारतीय स्थलांतरितांनी गेल्या 30 वर्षांत सरासरी 1.7 दशलक्ष डॉलर इतके योगदान दिल्याचे आकडे सांगतात.हे सर्वात जास्त आहे,इतर कोणत्याही देशाच्या स्थलांतरितांपेक्षा.पण तरीही देखिल,अमेरिकेचे तोंडाळ राष्ट्रपती आपली मुक्ताफळे उधळीत आहेत. वेम्बू यांनी याच आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना म्हटले. “ भारताने त्याचे सर्वोत्तम पाठवले.” ही ओळ वेदनादायक आहे आणि अभिमानास्पदही आहे.वेदना कारण भारताने आपली प्रतिभा गमावली आहे. आणि अभिमान,कारण त्या प्रतिभेन...