Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

कोविड 19 , एम.एस एम. ई.उद्योग आणि वारश्याचे नियोजन (Succession Planning )

 


मित्रांनो

आपण सगळेच जाणता आहात कि, कोविड 19 ने अखिल जगताला कसे आणि किती नुकसान पोहोचवले आहे.जीवित हानी तर झालीच.पण अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत.जागतिक अर्थव्यवस्थेला ह्याचा खूप मोठा धक्का बसला.आपला भारत देश ह्या जगाचाच हिस्सा किंवा भाग आहे.त्यामुळे भारताची देखील अपरिमित हानी झाली.अर्थ व्यवस्थेला खीळ बसली.भारत हा सामान्यतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी व्यापलेला देश. 

भारताच्या एकूण जी डी पी च्या 36.9%  इतके योगदान सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (उत्पादन क्षेत्र ) 2020-21 ह्या कालखंडाचा विचार करता होते.तेच निर्यातीत ह्याच कालखंडात 49.5% सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे राहिले आहे.जवळपास 15 करोंड लोकांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.(सौजन्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय,केंद्र सरकार)

ह्याच कालखंडात मजुरांच्या  स्थलांतरांचा विषय ऐरणीवर आला.हे  स्थलांतर केलेले मजूर आपल्या गांवी परतले.पण नंतर सगळे कामावर हजर झाले नाहीत किंवा ते अनेक कौटुंबिक समस्यांमुळे कामावर परतू शकले नाहीत.जसे घराकडील आप्त स्वकियांचे निधन वगैरे.पण ह्या सोबतच जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यातून सावरून पुनः  उभे राहू पहात आहेत. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्या समस्या आपण थोडक्यात बघूच.पण   त्यातील सर्वात गंभीर समस्येचा आज मी इथे ऊहापोह करणार आहे. 

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या समोरील समस्या.

1.   खेळत्या भांडवलाची समस्या.

2.   बँकेकडून घेतलेल्या कर्ज खात्यांना एन.पी.ए.होण्यापासून वाचविण्याची समस्या.

3.   काम सोडून निघून गेलेल्या आणि अजून पावेतो परत न आलेल्या कुशल कामगारांची समस्या.  

4.   दुरावलेल्या ग्राहकांना पुनः आपल्या उद्योगाकडे आकर्षित करणे.

5.   कच्चा मालाचा पुरवठा क्रेडिट वर देणाऱ्या पुरवठादारांना क्रेडिट वर पुन्हा पुरवठा करण्यास राजी करणे.कारण कोविड 19 मुळे ते देखील अडचणीत आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

या आणि अश्या असंख्य समस्यांनी बेजार केले आहे.पण यापेक्षा मोठी समस्या ही वारसाहक्क नियोजनाची आहे.ही समस्या आधी नव्हती का?काय आहे ही समस्या,हे थोडक्यात समजावून घेऊ.ही समस्या आधी देखील भेडसावत असे पण ती कोविड 19 च्या उपद्रवामुळे अधोरेखित झाली आहे.

आपल्या देशांत अधिकाधिक उद्योग हे प्रोप्रायटर ह्या एकाच व्यक्ति भोवती केंद्रित झालेले आहे.प्रोप्रायटर हे स्वतः भांडवल गुंतविणार,तोच कामगारांची नियुक्ती करणार,तोच मशीनरी कुठली घ्यायची हे ठरविणार,ईत्यादी,ईत्यादी थोडक्यात काय तर एक खांबी तंबू.तो खांब कोसळला कि तंबू कोसळणारच.कोविड 19 च्या काळात असे अनेक उद्योगाचे स्वामी काळाच्या पडद्याआड गेले.काही उद्योगांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली.कुणाला काहीही माहित नाही.Contingency Plan वगैरे काहीच नाही. म्हणजे असे जर कधी घडले तर काय करायचे ह्याचे पूर्व नियोजन नसल्याने चांगल्या प्रकारे सुरू असलेल्या उद्योगाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

बरे हे प्रोप्रायटर असलेल्या ठिकाणीच झाले आहे का?नाही,भागीदारी फर्म सुरू करतांना, भागीदारी फर्म मधे कामाची विभागणी बरेचदा केली जाते.पण प्रत्येकाला प्रत्येक गतिविधीचे काम चलावू ज्ञान असायला हवे असे दिसत नाही.एखादे विशिष्ट कार्य करणाऱ्या भागीदाराचे बरे वाईट झाले तर तिथे देखील असा Contingency Plan असतो का? ह्याचे उत्तर बऱ्याच अंशी नाही असेच असेल.पण भागीदारीत निदान सातत्य राहते म्हणजे उद्योग सुरू राहू शकतो. तसेच खासगी कंपनीचे असते.कारण आपल्या देशांत closely held कंपनी मधे शक्य तो परिवारातले किंवा नाते संबंधातले लोक कंपनीचे भागधारक असतात. खासगी कंपनी स्थापन करण्यासाठी 2 सदस्य पुरेसे असतात.तिथे देखील Contingency Plan असतोच असे नाही.मृत्यु हा केव्हाही अपरिहार्य असला तरी कोविड 19 मुळे त्याला सार्वत्रिक स्वरूप प्राप्त झाले.त्यामुळे एक दोन नाही असंख्य उद्योगांना ही समस्या भेडसावत आहे.

हे सारे उद्योगाच्या मालकाच्या बाबतीत झाले.हेच कामगारांच्या बाबतीत झाले आहे.विशेषतः कुशल कामगाराच्या बाबतीत झाले आहे.त्यांचा मृत्यु झाला एवढेच नसून तो परराज्यातला कामगार आपल्या गांवी निघून गेला आणि काही कारणांमुळे परत आलेला नाही किंवा येऊ शकलेला नाही.श्रम विभागणीच्या तत्वाप्रमाणे कामाची विभागणी केली गेली पाहिजे,हे खरे असले तरी कुणीही कर्मचारी हा indispensable अर्थात अपरिहार्य नसायला हवा.हा नाही तर दूसरा असा पर्याय असायला हवा. कुणावरही विसंबून असणे/रहाणे केंव्हा ही धोक्याचेच.यासाठी जसे मालकांसाठी तसेच कामगारांसाठी succession planning आणि contingency plan तयार असणे गरजेचे आहे.मी पुन्हा पुन्हा सांगतोय कि हे आधी देखील गरजेचे होते.पण कोविड 19 मुळे ते अधोरेखित झाले आहे.पुढल्या भागांत बघू या. succession planning आणि contingency plan कसा तयार करावा.  

Comments

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...