ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
ब्लॉग नं. 2024/30 6 दिनांक:- 16 डिसेंबर , 2024. मित्रांनो , मराठीमध्ये एक म्हण आहे, “आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं.” काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना एक सवय आहे,म्हणण्यापेक्षा खोड आहे,जुन्या जुन्या गोष्टी उकरून काढून ते असं झालं असतं तर तसं झालं नसतं,अशी विधान करून ते चर्चेत राहतात.इतक्यात त्यांनी असेच एक विधान केले आहे,आजच्या ब्लॉगमध्ये त्यावर चर्चा करूया. सविस्तर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे की, 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल , ज्यात भाजपने सत्ता मिळवली होती , कॉंग्रेसने UPA- 2 सरकारच्या काळात, प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनवले असते आणि डॉ. मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती बनवले असते,तर कदाचित चित्र वेगळे असते. त्यांच्या ' अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स ' या नवीन पुस्तकावर चर्चा करताना त्यांनी हे मत व्यक्त केले...