Skip to main content

Posts

Showing posts with the label Politics

टाइप 5 मधुमेह

ब्लाॅग नं.2025/150 दिनांकः 31 मे, 2025. मित्रांनो,  मधुमेहाचा नवा प्रकार: प्रकार ५ मधुमेह – एक नवा दृष्टिकोन एप्रिल २०२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने (IDF) मधुमेहाच्या एका नवीन प्रकाराला अधिकृत मान्यता दिली – प्रकार ५ मधुमेह. या नवीन प्रकारामुळे जगभरातील आरोग्य क्षेत्रात नवी जागरूकता निर्माण झाली आहे. प्रकार ५ मधुमेह विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. अंदाजानुसार, सुमारे २० ते २५ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. प्रकार ५ मधुमेह म्हणजे काय? प्रकार ५ मधुमेहाला "गंभीर इन्सुलिन-कमी असलेला मधुमेह" (Severe Insulin-Deficient Diabetes - SIDD) म्हणूनही ओळखले जाते. हा मधुमेह इतर प्रकारांपेक्षा वेगळा आहे. कुपोषणामुळे होणाऱ्या चयापचय विकारांशी त्याचा थेट संबंध असून, विशेषतः किशोरवयीन आणि तरुण प्रौढांवर त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो. दीर्घकाळ कुपोषणामुळे शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. परिणामतः, शरीर इन्सुलिनची निर्मिती पुरेशा प्रमाणात करू शकत नाही. यामुळे चयापचय स्थिरता राखणे कठीण होते. टाइप १ आणि ...

प्रणव मुखर्जी पंतप्रधान झाले असते तर?

ब्लॉग नं. 2024/30 6   दिनांक:- 16 डिसेंबर , 2024. मित्रांनो ,              मराठीमध्ये एक म्हण आहे, “आत्याबाईला मिशा असत्या  तर काका म्हटलं असतं.” काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना एक सवय आहे,म्हणण्यापेक्षा खोड आहे,जुन्या जुन्या गोष्टी उकरून काढून ते असं झालं असतं तर तसं झालं नसतं,अशी विधान करून ते चर्चेत राहतात.इतक्यात त्यांनी असेच एक विधान केले आहे,आजच्या ब्लॉगमध्ये त्यावर चर्चा करूया. सविस्तर:                          काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे की, 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल , ज्यात भाजपने सत्ता मिळवली होती , कॉंग्रेसने UPA- 2 सरकारच्या काळात, प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनवले असते आणि डॉ. मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती बनवले असते,तर कदाचित चित्र वेगळे असते. त्यांच्या ' अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स ' या नवीन पुस्तकावर चर्चा करताना त्यांनी हे मत व्यक्त केले...

महाराष्टातील सरकार स्थापनेतील गोंधळ

ब्लॉग नं. 2024/29 3 . दिनांक: 4 डिसेंबर,2024. मित्रांनो,             महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा गोंधळ 10 दिवस होऊन गेले तरी संपला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री इतरांची काळजी करण्याऐवजी स्वतःची काळजी घेण्यात मश्गुल आहेत. 2022 ला पाच वर्षे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पार्टीच्या आदेशानुसार दुय्यम पद स्वीकारलं. आणि केवळ अडीच वर्षे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या एकनाथ शिंदे यांना आता उपमुख्यमंत्री होणे अपमानास्पद वाटतंय.गंमत आहे ना. तिकडे विरोधी पक्ष जो पराभव झाला आहे,त्यातून अजून बाहेर पडायला तयार नाही.स्वीकारायला तयार नाही की आपला पराभव झाला आहे. ते EVM मध्येच अडकला आहे. या विषयावर आहे आजचा ब्लॉग.     सविस्तर:             2022 ला ध्यानीमनी नसतांना, आताचे काळजीवाहू मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.ते पूर्वीच्या शिवसेनेत असते. तर त्याना हे पद कधी मिळाले असते कां? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला हवा. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस ज्यांन...

महाराष्ट्रातील निवडणूक निकाल (Maharashtra Election Results)

ब्लॉग नं. 2024/284 दिनांक: 24  नोव्हेंबर, 2024   मित्रांनो             महाराष्ट्रातील महायुतीच्या महाविजयाने,गेल्या दोन अडीच वर्षात कानावर पडणारे खोका, मिंद्धे सरकार, गद्दार, बाप चोरला,चिन्ह चोरले इत्यादि इत्यादि, हे यापूर्वी कधीही न ऐकलेले शब्द यापुढे कानावर पडणार नाहीत अशी आशा आहे.महाराष्ट्रातील जनतेने,जी या पाच वर्षात झालेल्या घटनांमुळे जेरीस आली होती. या वेळेस महायुतीला ऐतिहासिक कौल देऊन त्या अस्थिरतेचा सोक्षमोक्ष लावला आहे.या विषयावर आहे आजचा हा दूसरा ब्लॉग. सविस्तर:             मी शेवटची बातमी वाचली तेव्हा महायुती 221 आणि भारतीय जनता पक्षाला 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी पक्षाला (अजित पवार) 50 जागा अशी स्थिती होती. भारतीय जनता पक्षाला आजवरच्या सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना विशेष जागा मिळाल्या नाहीत. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या जागांत विदर्भाचा वाटा मोठा आहे.महाविकास आघाडीतल्या एकाही विरोधी पक्ष नेता पद मिळेल, एवढ्या सुद्धा जागा मिळविता...

आगामी विधानसभा निवडणुका-मविआचा चेहरा कोण?

Blog No. 2024/ 1 38 .   Date: 30th ,June  2024 मित्रांनो,             शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज होत असताना , महाविकास आघाडी ( MVA) गठबंधनचा   मुख्यमंत्री पदाचा उमेदवार किंवा चेहरा कोण असावा याबद्दल मत व्यक्त करतांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इतका योग्य आणि लायक उमेदवार दूसरा नसल्याचे म्हटले आहे. त्यावरुन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. यावर आहे माझा आजचा ब्लॉग. सविस्तर:             यावर सविस्तर चर्चा करण्यापूर्वी महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदासाठी संभाव्य उमेदवार कोण आहे,हे बघू या.   1. शिवसेना ( UBT):    - उद्धव ठाकरे: माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व , उद्धव ठाकरे यांचे मोठे पाठबळ आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील MVA ...