ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...
Blog No.2024/021. Date: -30 th , January,2024. मित्रांनो, आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची 76 वी पुण्यतिथि.मी ब्लॉग लिहितांना राजकारणी लोकांना टाळायचं हा माझा निर्णय कटाक्षाने पाळतो. पण महात्मा गांधीं हे केवळ राजकारणी नव्हते.ते एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते.त्यामुळे त्यांची ओळख ही राजकारणी अशी नाहीच.त्यांच्यावर लोक कितीही टीका करोत त्यांचे स्वतंत्रता आंदोलनातील योगदान उल्लेखनीय होते,हे निश्चित. सविस्तर आजकाल आपल्या नेत्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत किंवा विचारांची लढाई हे खूप वेळा ऐकायला मिळते.पण ठळकपणे मांडता येतील असे महात्मा गांधी यांचे विचार होते. Gandhian Thoughts हा विषय सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजमधे अॅडमिशन मिळविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या पीएमटीमध्ये असायचा. असायचा यासाठी लिहिले कारण आताचे मला माहित नाही. पण पूर्वी होता. ...