Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

लकी पेन

                                                                                                              आज सकाळी सकाळीच मोबाईलची रिंग वाजली . तस धावतच फोन घेतला. तर समोरून माझा मित्र सदा भोजनी ओरडलाच “ राजा लेका अभिनंदन “ . मी म्हटले  “कशाबद्धल? काय केले आहे मी? “.  “अरे कुण्या गावच पाखरू ला साहित्य अकादमी पुरस्कार  जाहिर झाला आहे. काल पासून मी, सारे मित्र , साहित्य अकादमीतले तुझे मित्र,  सारेच तुला शोधत आहेत ,  आहेस कुठे ?." त्याने एका दमात सारे सांगितले अन विचारले देखिल.              “अरे काय सांगतो आहेस? खरं काय ? मी काल पासून निवांत मिळावा म्हणून सातपुड्याच्या पायथ्याशी माझ गाव आहे तिथे आलो आहे. इथे रेंज चा जरा प्रोब्लेम आहे. म्हणूनच फोन स्वीच...

एक अनोखी सहल अंतिम भाग

कालेश्वरम् मंदिर आलापल्ली वरून ठरल्याप्रमाणे आम्ही 6.30 ला निघालो. आलापल्ली ते अहेरी कालचाच रस्ता होता. अहेरी ते सिरोंचा वेगळा रोड होता. त्या रस्त्यावरून खरे तर आम्ही पहिल्यांदाच जात होतो. ह्या रोड बध्दल राजुरा येथे असतांना लोक सांगत असत कि अहेरीच्या पुढे एवढे घनदाट जंगल आहे की दिवसा देखिल सुर्याचा प्रकाश पुर्णपणे मिळत नाही. आम्ही अहेरीहून निघालो . खुप दाट जंगल होतं. म्हणजे जंगलात डोकावून पाहिल तर विशेष दूरच दिसत नव्हतं. वेगवेगळ्या फुलांचे सुवास येत होते. रस्त्याच्या दुतर्फा झाडे असल्याने अशा कमानीतून आमची कार पुढे जात होती. कित्येक झाडांनी वेगवेगळे आकार धारण केलेले होते. हाॅरर फिल्म मध्ये अशाच झाडांचे शुटींग करित असावेत. हिरवा या एकाच रंगाच्या विविध छटा पहायला मिळाल्या. त्या वेळी मोबाईल इतका प्रगत नव्हता अन्यथा त्या सगळ्या छटा कॅमेर्यात कैद करता आल्या असत्या. तंत्रज्ञानाचा चांगला वापर ही खुप आहे. मध्येच एखादा  ओहोळ रस्त्याला ओलांडून जातांना मिळाला. जंगलातून आलेले स्वच्छ निर्मळ पाणी. खाली उतरून पाय बुडवायची ईच्छा व्हायची पण बाजूला घनदाट जंगल बघून मनांतच रहायची. आमची कार...