Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

लकी पेन

                                                                                                              आज सकाळी सकाळीच मोबाईलची रिंग वाजली . तस धावतच फोन घेतला. तर समोरून माझा मित्र सदा भोजनी ओरडलाच “ राजा लेका अभिनंदन “ . मी म्हटले  “कशाबद्धल? काय केले आहे मी? “.  “अरे कुण्या गावच पाखरू ला साहित्य अकादमी पुरस्कार  जाहिर झाला आहे. काल पासून मी, सारे मित्र , साहित्य अकादमीतले तुझे मित्र,  सारेच तुला शोधत आहेत ,  आहेस कुठे ?." त्याने एका दमात सारे सांगितले अन विचारले देखिल.              “अरे काय सांगतो आहेस? खरं काय ? मी काल पासून निवांत मिळावा म्हणून सातपुड्याच्या पायथ्याशी माझ गाव आहे तिथे आलो आहे. इथे रेंज चा जरा प्रोब्लेम आहे. म्हणूनच फोन स्वीच...

एक अनोखी सहल अंतिम भाग

कालेश्वरम् मंदिर आलापल्ली वरून ठरल्याप्रमाणे आम्ही 6.30 ला निघालो. आलापल्ली ते अहेरी कालचाच रस्ता होता. अहेरी ते सिरोंचा वेगळा रोड होता. त्या रस्त्यावरून खरे तर आम्ही पहिल्यांदाच जात होतो. ह्या रोड बध्दल राजुरा येथे असतांना लोक सांगत असत कि अहेरीच्या पुढे एवढे घनदाट जंगल आहे की दिवसा देखिल सुर्याचा प्रकाश पुर्णपणे मिळत नाही. आम्ही अहेरीहून निघालो . खुप दाट जंगल होतं. म्हणजे जंगलात डोकावून पाहिल तर विशेष दूरच दिसत नव्हतं. वेगवेगळ्या फुलांचे सुवास येत होते. रस्त्याच्या दुतर्फा झाडे असल्याने अशा कमानीतून आमची कार पुढे जात होती. कित्येक झाडांनी वेगवेगळे आकार धारण केलेले होते. हाॅरर फिल्म मध्ये अशाच झाडांचे शुटींग करित असावेत. हिरवा या एकाच रंगाच्या विविध छटा पहायला मिळाल्या. त्या वेळी मोबाईल इतका प्रगत नव्हता अन्यथा त्या सगळ्या छटा कॅमेर्यात कैद करता आल्या असत्या. तंत्रज्ञानाचा चांगला वापर ही खुप आहे. मध्येच एखादा  ओहोळ रस्त्याला ओलांडून जातांना मिळाला. जंगलातून आलेले स्वच्छ निर्मळ पाणी. खाली उतरून पाय बुडवायची ईच्छा व्हायची पण बाजूला घनदाट जंगल बघून मनांतच रहायची. आमची कार...