Skip to main content

Posts

Showing posts with the label psychological

Select your Language

व्यथांच्या कथा 2 — शिक्षण संपलं, पण प्रश्न संपले नाहीत!

  ब्लॉग नं. 2026/ 237.   दिनांक: 25 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा 2 — शिक्षण संपलं , पण प्रश्न संपले नाहीत! मित्रांनो, कॉलेज संपलं , पण परीक्षा संपत नाही.कॉलेजच्या जीवनावर आधारित “इम्तेहान” हा विनोद खन्नाचा चित्रपट आठवतोय. “इम्तेहान” म्हणजे परीक्षाच, जीवनाची परीक्षा,संघर्ष सुरू होतो,नोकरी मिळविण्यासाठी.कधी अपयश पदरी पडतं. पण खचून जायचं नसतं. मला अशा वेळी नेमकं आठवायचं, या “इम्तेहान” मधलं किशोरकुमारचं गाणं, “रुक जाना नही,तु कभी हारके, कांटोपे चलके मिलेंगे साये बहारके”. अतिशय अर्थपूर्ण आणि भावपूर्ण गीत. ही गाणी आपल्याला बरंच काही शिकवून जातात.                               शाळेत दाखल झाल्यापासून मुलांच्या मागे परीक्षा लागतात.    शाळा संपली , कॉलेज संपलं , पदवी हातात आली की, तरुणांच्या आयुष्यातला संघर्ष संपतो , असं आपल्याला वाटतं. पण खरं तर तिथूनच,एका वेगळ्या संघर्षाची सुरुवात होते. “ आता पुढे काय ?” हा प्रश्न अ...

व्यथांच्या कथा भाग 1 शाळकरी मुलांच्या मनातलं कोण ऐकणार?

ब्लॉग नं. 2026/236.   दिनांक: 24 ऑगस्ट, 2026.     व्यथांच्या कथा भाग 1 — शाळकरी मुलांच्या मनातलं कोण ऐकणार?   मित्रांनो ,  तुम्हाला आठवतंय, मिली चित्रपटातील एक गीत,जे लता  मंगेशकर यांनी गाईले होते आणि जया भादुरी, हो तेव्हा त्या जया भादुरीच होत्या.त्यांच्यावर चित्रित झाले होते.त्याचे बोल होते, “ मैंने कहा फूलों से.. . मैंने कहा फूलों से , " हँसो " तो वो खिलखिला के हँस दिए,और ये कहा , " जीवन है भाई , मेरे भाई , हँसने के लिए, हँसने के लिए.” गीतकार योगेश यांचं हे गीत. लहानपण हे खरंच हसण्याचं असतं.पण मी आज काल मुलांच्या,विशेषतः माझ्या नातवंडांच्या पिढीकडे बघतो आणि काही गोष्टी मनांत ते येतात,त्या शब्दबद्ध केल्या आहेत.             लहानांना व्यथा असतात?  आपण मोठ्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करतो ; पण घरात , शाळेत आणि समाजात वावरणाऱ्या लहान मुलांच्या मनातही अनेक व्यथा दडलेल्या असतात , याचा आपण अनेकदा विसर पडतो.शाळेत जाणाऱ्या मुलाचं आयुष्य वरवर पाहता किती सुंदर वाटतं! स...

मानसिक आरोग्य जगातील सर्वात जास्त दुर्लक्षित गोष्ट

ब्लॉग नं. 2026/ 221.   दिनांक: 9 ऑगस्ट, 2026. मानसिक आरोग्य: आजच्या युगातील सर्वात महत्त्वाची गरज आपण रोजच्या आयुष्यात आरोग्याबद्दल बोलताना , नेहमी शारीरिक आजारांचा उल्लेख करत असतो जसे की सर्दी , खोकला , मधुमेह किंवा उच्च रक्तदाब.पण या सर्व धावपळीत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाकडे दुर्लक्ष करतो , तो म्हणजे आपले मानसिक आरोग्य . चला तर मग आज आपण या विषयावर आज थोडे अधिक जाणून घेऊ. सविस्तर:   " शरीर निरोगी तर मन निरोगी" असे आपण ऐकत आलो आहोत , पण ख रं तर जर मन निरोगी असेल , तरच शरीरही उत्तम साथ देऊ शकते.म्हणूनच , आजच्या तीव्र स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात , मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे केवळ गरजेचे नाही , तर अनिवार्य झाले आहे. मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय ? मानसिक आरोग्य म्हणजे केवळ मानसोपचार किंवा मानसिक आजार नसणे नव्हे.यात आपल्या भावना , विचार आणि सामाजिक वर्तन यांचा समावेश होतो.आपण ताणतणाव कसा हाताळतो , इतरांशी कसे संबंध ठेवतो आणि आयुष्यात कठीण प्रसंगात कसे निर्णय घेतो , हे सर्व आपल्या मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असते. उदासीनता ( Depression), चिंता ( A...

समजूतदार माणसं इतरांपासून अंतर ठेवायला का लागतात?

ब्लॉग नं. 2026/ 215.   दिनांक: 3 ऑगस्ट, 2026. मित्रांनो, समजूतदार माणसं इतरांपासून अंतर ठेवायला का लागतात ? आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात , जी शांत , संयमी , समजूतदार आणि सगळ्यांशी जुळवून घेणारी असतात.कोणाशीही विनाकारण वाद घालायचा नाही , कुणाला दुखवायचं नाही आणि शक्य तितक्या प्रेमाने नातेसंबंध जपायचे , असा त्यांचा स्वभाव असतो.पण आश्चर्याची गोष्ट अशी की , आयुष्याच्या एका टप्प्यावर हीच माणसं इतरांपासून थोडं अंतर ठेवू लागतात. त्यांचा वावर कमी होतो , फोन कमी होतात , भेटीगाठी कमी होतात आणि ते स्वतःच्या विश्वात रमू लागतात.याचा अर्थ ते अहंकारी किंवा समाजविरोधी झाले आहेत , असा मात्र अजिबात नसतो.त्यांच्या या अश्या वागण्यामागे नेमकं काय कारण असतं,जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर:    खरं तर समजूतदार माणूस अंतर ठेवतो ते इतरांचा तिरस्कार करण्यासाठी नव्हे , तर स्वतःची मानसिक शांतता जपण्यासाठी.आयुष्याच्या अनुभवातून त्याला हळूहळू एक महत्त्वाची गोष्ट समजते,प्रत्येक नातं जपण्याची जबाबदारी आपली एकट्याची नाही.आपण कितीही प्रामाणिकपणे वागलो , तरी समोरची व्यक्ती तितक्य...

सोडून देण्याची कला अशी आत्मसात करा ! Letting Go Approach

ब्लॉक नं: 2026/211 दिनांक 30 जुलै 2026 मित्रांनो , मनातील राग , पश्चात्ताप किंवा दुःख जबरदस्तीने नाहीसे करण्यापेक्षा,आपल्या वर्तनात बदल करण्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक परिणामकारक ठरू शकते.   यासाठी सोडून देण्याची कला अशी आत्मसात करा ! जिला इंग्रजीत Letting Go Approach म्हणतात.यावर आजच्या ब्लॉगमध्ये सविस्तर विचार करू.    सविस्तर: काही गोष्टी आयुष्यातून निघून जातात , पण मनातून जात नाहीत. एखाद्याने केलेला अपमान , नात्यात झालेली फसवणूक , एखादी अपयशी संधी , जुनी चूक , मनात साठलेला राग किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलची कटुता… वर्षे उलटली तरी आपण त्या आठवणींना घट्ट धरून ठेवतो. समोरची व्यक्ती कदाचित पुढे गेलेली असते ; परिस्थिती बदललेली असते ; पण आपण मात्र त्याच प्रसंगात मानसिकदृष्ट्या अडकून राहतो. मग आपण स्वतःलाच म्हणतो, " मला हे सगळं विसरायचं आहे… पण मी विसरू शकत नाही." इथेच येते ' सोडून देण्याची कला '. सोडून देणे म्हणजे एखादी गोष्ट घडलीच नाही असे मानणे नव्हे.ज्याने आपल्याला दुखावले त्याला माफ करणे म्हणजे त्याच्या चुकीचे समर्थन करणेही नव्हे. सोडून देणे ...

पांढरे केस न रंगविणाऱ्यांबाबत मानसशास्त्र काय सांगते?

ब्लाॅग नं.2026/191. दिनांकः 10 जुले, 2026. मित्रांनो , पांढरे केस न रंगविणाऱ्यांबाबत मानसशास्त्र काय सांगते ? वय वाढत जाते तसे केस पांढरे होणे , ही निसर्गाची अगदी सामान्य प्रक्रिया आहे.मात्र , आजच्या काळात केस रंगविण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने , अनेक जण आपले पांढरे केस लपविण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी काही लोक मात्र अभिमानाने पांढरे केस स्वीकारतात.हा निर्णय केवळ सौंदर्याशी संबंधित नसून त्यामागे मानसशास्त्रीय दृष्टिकोनही दडलेला असतो. मानसशास्त्रज्ञांच्या मते , पांढरे केस न रंगविण्याचा निर्णय अनेकदा स्वतःचा स्वीकार ( Self-Acceptance) दर्शवतो. अशा व्यक्ती आपल्या वयाबद्दल किंवा दिसण्याबद्दल कमी असुरक्षित असतात. त्यांना समाज काय म्हणेल यापेक्षा , स्वतःच्या मनःशांतीला अधिक महत्त्व असते.आजच्या ब्लॉगमध्ये या विषयावर जाणून घेऊ. सविस्तर: 1. स्वतःशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती: अशा व्यक्तींना कृत्रिम प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा,वास्तव स्वीकारणे अधिक महत्त्वाचे वाटते. "मी जसा आहे तसाच आहे ," हा त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो.त्यामुळे त्यांच्या...