ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
Blog No.2023/27 5 Date:- 3 1 th ,October 2023. मित्रांनो, काल परवा मी कराडला गेलो होतो. परवा मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांच्या तर्फे कराड येथील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत माझ्या “चित्र आणि चेहरा” या कथा संग्रहासाठी माझा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.29 तारखेला सकाळी 10 चा कार्यक्रम होता.मला पुण्याहून 10 पर्यन्त कराडला पोहोचता येणार नाही,म्हणून 28 ऑक्टोबरला आम्ही कराडला गेलो.शनिवारी नृसिंहवाडी आणि खिद्रापुरला जाऊन दर्शन घ्यायचे ठरविले. त्याप्रमाणे श्री दत्तगुरूंच्या दर्शनानंतर आम्ही संध्याकाळी 5 च्या सुमारास खिद्रापुरकडे निघालो.कोजागिरी पौर्णिमेचा दिवस त्यामुळे सूर्य मावळल्यानंतर ही चंद्राच्या प्रकाशाची सोबत होती. त्यामुळे खिद्रापूरचे सौन्दर्य आधी सूर्य प्रकाशात न्याहाळले होते आता चंद्रप्रकाशात ही बघण्याचा आनंद घेऊ ही कल्पना. खिद्रापूर एक धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळ ...