Skip to main content

Posts

Showing posts with the label Finance

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

डिजिटल अटक घोटाळा म्हणजे काय?

  ब्लॉग नं. 2026/2 3. दिनांक: 2 3 जानेवारी , 2026 .   मित्रांनो , डिजिटल अटक घोटाळा म्हणजे काय आणि त्याची कार्यपद्धती काय आहे ? डिजिटल अटक हा एक डिजिटल फसवणुकीचा प्रकार/ऑनलाइन घोटाळा आहे , ज्यामध्ये फसवणूक करणारे सीबीआय , ईडी , आरबीआय किंवा पोलीस,यांसारख्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या किंवा सरकारी संस्थांचे अधिकारी असल्याचे भासवून व्यक्ती किंवा व्यवसायांना लक्ष्य करतात.लक्ष्यित व्यक्तींवर कथित करचुकवेगिरी , मनी लाँडरिंग , अंमली पदार्थांची तस्करी किंवा आर्थिक गैरव्यवहार,यांसारख्या गुन्ह्यांचे आरोप केले जातात. ते ' जामीन ' किंवा ' सुरक्षा ठेव ' च्या बहाण्याने पैसे उकळण्यासाठी भीती आणि एकाकीपणाच्या डावपेचांचा वापर करतात. डिजिटल अटक मागे घेण्यासाठी किंवा संबंधित व्यक्तीला मुक्त करण्यासाठी , फसवणूक करणारे त्यांच्यावर पैसे भरण्यासाठी दबाव टाकतात. आजच्या ब्लॉगमध्ये याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.   सविस्तर: अ) सुरुवात: तुम्हाला कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेचा अधिकारी,असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून कॉल , एसएमएस,ईमेल किंवा आजकाल व्हॉटसअपचा व्हिडिओ कॉल येत...

ऑटोपे ही एक स्वयंचलित पेमेंट सिस्टम

  ब्लॉग नं. 2025/35 4 . दिनांक: 1 8 डिसेंबर, 2025. मित्रांनो, " ऑटोपे ही एक स्वयंचलित पेमेंट सिस्टम आहे, जी कंपन्यांना तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्याची, किंवा बिल आणि खर्च भरण्यासाठी,एका निश्चित वेळापत्रकानुसार,तुमच्या क्रेडिट कार्डवर शुल्क आकारण्याची परवानगी देते ," असे गेटश्योरचे आर्थिक सल्लागार आणि सीईओ रिकिन शाह म्हणतात. "हे आवर्ती बिल भरणे अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी डिझाइन केले आहे." याविषयी आहे आजचा ब्लॉग. सविस्तर:  दरमहा बिल भरणे सुलभ करण्यासाठी,तुमच्या आर्थिक टूलबॉक्समध्ये हे एक उत्तम साधन आहे , परंतु कोणते बिल ऑटोपे करायचे हे ठरवताना,अनेक घटक विचारात घेतले पाहिजेत. सुरुवातीला , जर तुम्हाला खात्री असेल की तुम्ही पूर्ण पैसे देऊ शकता,तरच तुमचे मासिक बिल भरण्यासाठी स्वयंचलित पेमेंट वापरा. "अन्यथा , तुम्ही एक शिल्लक जमा करू शकता,ज्यामुळे तुम्हाला व्याज आकारले जाईल आणि ते तुमच्या बिलांवर लक्ष ठेवण्याच्या तुमच्या प्रयत्नांना कमकुवत करू शकते ," क्रेडिट कर्माच्या कम्युनिकेशन्स आणि ब्रँडच्या माजी उपाध्यक्ष डाना मरीनाउ म्हणतात. "जर तुम्हा...

CIBIL स्कोअर: तुमच्या आर्थिक आरोग्याचा आरसा

  ब्लॉग नं. 2025/245. दिनांक : 3 सप्टेंबर 2025 मित्रांनो , 💳 CIBIL स्कोअर: तुमच्या आर्थिक आरोग्याचा आरसा             आजच्या काळात कार कर्ज , गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घ्यायचं झालं तर बँक किंवा वित्तीय संस्था सर्वात आधी एकच गोष्ट पाहते,तो म्हणजे तुमचा अर्थात, CIBIL Credit Information Bureo Of India Limited चा स्कोअर पहाते.तुम्हाला कर्ज द्यायचे किंवा नाही,हे याच सिबिल स्कोरवर अवलंबून असते आणि व्याजाच्या दरात काही सूट मिळेल कां. हे देखिल सिबिल स्कोरवरून ठरते.हा स्कोअर म्हणजे तुमच्या कर्ज फेडण्याच्या शिस्तीचा आणि जबाबदार वर्तनाचा पुरावा.आजच्या या ब्लॉगमध्ये आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.   सविस्तर: 📊 CIBIL स्कोअर म्हणजे काय ? CIBIL स्कोअर हा 0 ते 900 या दरम्यान असतो. 700 वरील स्कोअर चांगला मानला जातो. 800 वरील स्कोअर सर्वात उत्कृष्ट मानला जातो.जास्त स्कोअर म्हणजे कर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त , तसेच कमी व्याजदरावर कर्ज मिळण्याची संधी. 📑 तुमचा CIBIL अहवाल काय सांगतो ? CIBIL अहवाल हा तुमच्या क्रेड...

एटीएम व्यवहार शुल्क वाढले

ब्लॉग नं. 2025/120. दिनांक: 2 मे, 2025.   मित्रांनो,             कालपासून म्हणजेच 1 मे, 2025 पासून एटीएम व्यवहार शुल्क  ( ATM Charges ) वाढविण्यात आले आहेत,अर्थात एटीएम मधून पैसे काढायचे असतील तर ज्यादा चार्ज द्यावा लागेल. अर्थात दर महिन्याला ज्या मोफत वापराच्यावर पैसे काढले तर हे दर लागू होते. आजच्या ब्लॉगमध्ये सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर:             कालपासून एटीएम व्यवहार शुल्क वाढले आहे.ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) व्यवहार शुल्कात कालपासून , करण्यात आली आहे अर्थात बँका मासिक मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांसाठी 2 रुपयांनी वाढ करणार आहेत.भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केल्यानंतर हे घडले आहे की, बँकांना मोफत वापरापेक्षा जास्त व्यवहारांसाठी एटीएम पैसे काढण्याचे शुल्क वाढविण्यास परवानगी देण्यात आली आहे.“मोफत व्यवहारांव्यतिरिक्त , ग्राहकाकडून प्रति व्यवहार कमाल 23 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. हे 1 मे 2025  पासून लागू झाले. ” असे आरबीआयने 2...

रेपो दर कमी,पण बँकांचे व्याज दर?

ब्लॉग नं  20 25/100 . दिनांक: 10 एप्रिल, 2025. मित्रांनो ,           आजचा हा शंभरावा ब्लॉग.2023 च्या 5 जानेवरीपासून मी दररोज ब्लॉग लिहायला सुरुवात केली.पण गेली 2 वर्षे मी सतत रोज एक असे शंभर ब्लॉग लिहू शकलो नव्हतो.घरांत नसणे,काही परिवारीक कार्यक्रम वगैरे होते.पण या वर्षी ते सर्व असतांना देखिल सतत 100 दिवस मी ब्लॉग लिहितो आहे.म्हणून आजचा ब्लॉग ब्लॉग मी माझं आवडतं क्षेत्र अर्थात बँकिंगवर लिहायचं ठरविलं. रिझर्व्ह बँकेने ( RBI) सलग दुसऱ्यांदा रेपो दर कमी केला आहे.पण बँका ज्यांचे व्याजाचे दर मुख्यतः रेपो दराशी निगडीत असतात,त्या याचा फायदा कर्जदारांना करून देणार आहेत कां? या बाबत आज आपण जाणून घेणार आहोत.     सविस्तर: रेपो रेट म्हणजे रिजर्व बँक ऑफ इंडिया , भारतातील बँक आणि वित्तीय संस्थांना सरकारी प्रतिभूती गहाण ठेवून घेऊन , त्याच्या तारणावर जे कर्ज देते , त्या कर्जावर आकारलेला व्याज दर.   भारतातील बँकांना कर्ज कां घ्यावे लागते , असा प्रश्न तुमच्या मनांत येऊ शकतो.बँकाकडे जे डिपॉजिट गोळा होत असते , त्यातील 4. 0 % इतकी रक्कम कॅशच्या स...

RBI Governor Mr.Sanjay Malhotra

ब्लॉग क्रमांक 2024/301 तारीख:- 11, डिसेंबर, 2024. मित्रांनो,           RBI गव्हर्नर म्हणून श्री. शक्तिकांत दास यांच्या जागी कोण येणार हे जाणून घेण्यासाठी गेल्या आठवड्यापर्यंत सर्वांनाच उत्सुकता होती, कारण त्यांचा कार्यकाळ या महिन्याच्या २६ तारखेला संपत आहे आणि मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीसमोर त्यांच्या उत्तराधिकारी निवडण्यासाठी कोणतीही हालचाल किंवा संकेत नव्हते. श्री.दास. श्री. दास यांना आणखी मुदतवाढ मिळेल आणि कार्यालयात तीन टर्म असलेले ते RBI चे पहिले गव्हर्नर होतील अशी अटकळ होती. पण, आता एक घोषणा आली आहे की श्री. संजय मल्होत्रा ​​श्री. दास यांची जागा घेतील. या ब्लॉगवर सविस्तर चर्चा करूया. सविस्तर :           9 डिसेंबर, 2024 रोजी, मनीषा सक्सेना, सचिव, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती यांनी घोषित केले की श्री. संजय मल्होत्रा, IAS(RJ,1990) महसूल विभाग यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ते आरबीआयचे २६ वे गव्हर्नर असतील       ...

आपल्या परिवाराचं भविष्य सुरक्षित करा

ब्लॉग नं. 2024/282 दिनांक:- 21 नोव्हेंबर, 2024. मित्रांनो,             विमा त्यातही आयुर्विमा हे नांव ऐकलं तर लोक तुमच्यापासून दूर पळतांनाचे दिवस पाहिलेत मी. चांगले मित्र देखिल मित्र राह्यलेले नाहीत हे देखिल पाह्यले नाही.आजही परिस्थिति फारशी वेगळी आहे असं मला वाटतं नाही.पण इतक्यात मी सहज एक चेंज म्हणून पाच दिवस एक प्रसिद्ध विमा कंपनीच्या पाच दिवसांच्या वर्क शॉपला गेलो होतो. गेल्या पाच वर्षात मी 12 कथासंग्रह आणि 2 कादंबऱ्या लिहिल्या. थोडी मरगळ आली होती.ती   घालवायची म्हणून जायचं ठरवलं.रोज वाघोलीहून रामवाडीला जायचं,तिथून मेट्रो पकडून आनंदनगरला जायचं,अन तिथून विमा कंपनीच्या ऑफिसला जायचं असा दिनक्रम आणि प्रवास मस्त मजेत पार पडला.यावर आहे आजचा ब्लॉग. सविस्तर:       आश्चर्य म्हणजे हे वर्क शॉप मला पटवून गेलं की इन्शुरन्स केवळ कारचा,हौसहोल्ड गुडसचा आणि घराचा महत्वाचा नसतो तर आयुर्विमा देखिल महत्वाचा असतो. अर्थात कोविड 2019 ही जागतिक महामारी देखिल बऱ्याच लोकांना आयुर्विम्याचे महत्व शिकवून गेली.त्या इन्शुरन्स कंप...

डबल इंजिन सरकार म्हणजे काय? आणि कशासाठी?

Blog No 2024/271. दिनांक:12th,November, 2024  मित्रांनो, आज काल गोष्ट कॉमन झाली आहे ती म्हणजे राज्यातील निवडणुका असल्या की “राज्य का सर्वतोपरी विकास चाहते हो तो डबल इंजिन की सरकार चाहिये.” दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे किंवा आघाडीचे सरकार असावे हा एवढाच अर्थ अपेक्षित आहे कां? की यामागे आणखी काही असावे? याचाच शोध घ्यायचा प्रयत्न आजच्या ब्लॉग मध्ये केला आहे. तर वाचा सविस्तर.          सविस्तर:   कुठलेही राज्य आपल्या धोरणांप्रमाणे चालवायचे तर पैसा हवा. विशेषतः हे फुकट ते फुकट,यात सवलत त्यात सवलत, द्यायची असेल तर किंवा राज्यात समृद्धी मार्गासारखा एखादा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट करायचा असेल तर पैसा हवा.GST लागू झाल्यानंतर, भारतातील राज्यांच्या काही मोठ्या उत्पन्न स्रोतांचे एकत्रीकरण झाले किंवा GST अंतर्गत आले. मात्र, काही महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत राज्यांच्या अखत्यारीत राहिले. खालीलप्रमाणे राज्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी मुख्य स्रोत उपलब्ध आहेत:  1. राज्य GST (SGST):    - GST अंतर्गत राज्ये राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST) गोळा करतात, जो राज्यां...