Skip to main content

Posts

Showing posts with the label Religious

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

भाऊबीज भावनिक नात्यांचे सुंदर प्रतीक .

ब्लाॅग नं.2025/298. दिनांकः 23 ऑक्टोबर, 2025. ब्लॉग नं. 2025/298. दिनांकः 2 3 ऑक्टोबर , 2025.   मित्रांनो , भाऊबीजचे महत्व आणि साजरी करण्यामागील कारण दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील शेवटचा आणि अतिशय भावनिक असा दिवस , म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण आणि भाऊ यांच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होते. महाराष्ट्रात तसेच भारतातील इतर अनेक भागात हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.आजचा ब्लॉग याच विषयावर आहे. 🌸   भाऊबीजचे महत्व: भाऊबीज हा केवळ सण नाही तर , बंधुभगिनीच्या नात्यातील ममत्व , स्नेह , आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे.या दिवशी बहीण आपल्या भावाला घरी आमंत्रित करते.त्याला ओवाळते , त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते. बदल्यात भाऊही बहिणीला भेटवस्तू किंवा रोख रक्कम देतो आणि तिच्या आनंदासाठी शुभेच्छा देतो. ही एक परंपरा आहे जी बहीण-भावाच्या नात्याला अधिक दृढ करते आणि एकमेकांबद्दलचे प्रेम वाढवते. 🕉️   भाऊबीज साजरी करण्यामागील कथा: भाऊबीजेच्या साजरीकरणामागे अनेक कथा सांगितल्या जातात , त्यामधील एक प्रसिद्ध कथा सांगितल...

बलिप्रतिपदा : दैत्यराज बलीच्या पुनरागमनाचा दिव्य उत्सव

  ब्लॉग नं. 2025/297. दिनांकः 22 ऑक्टोबर , 2025. मित्रांनो , बलिप्रतिपदा : दैत्यराज बलीच्या पुनरागमनाचा दिव्य उत्सव 🪔 दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे , आणि या दिवाळीतील चौथा दिवस म्हणजे  बलिप्रतिपदा.महाराष्ट्रात विशेष श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवसाला बली पद्मिनी , पाडवा , वीरप्रतिपदा किंवा द्युतप्रतिपदा अशी विविध नावे आहेत. हा दिवस केवळ धार्मिकच नाही , तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे.आजचा ब्लॉग याच विषयावर आहे.   🌞 बलिप्रतिपदा म्हणजे काय ? हिंदू पंचांगानुसार , कार्तिक महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच,अमावास्येनंतरच्या पहिल्या दिवशी बलिप्रतिपदा साजरी केली जाते. दिवाळीच्या या चौथ्या दिवशी दैत्यराज महाबली याचा पृथ्वीवर पुनरागमन होत असल्याचा पौराणिक समज आहे. गुजरात , राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही भागांत या दिवसाला नववर्षाचा प्रारंभ मानतात. विक्रम संवत्‌ नववर्षाची सुरुवात या तिथीपासूनच होते. हा दिवस हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मानला जातो,याचा अर्थ म्हणजे कोणतेही शुभकार्य या दिवशी निर्बंधाविना करता य...

लक्ष्मी पूजन एक मंगल सोहळा

  ब्लॉग नं. 2025/296. दिनांकः 21 ऑक्टोबर , 2025.   मित्रांनो , लक्ष्मीपूजन : महाराष्ट्रात दिवाळीतील सर्वात मंगल सोहळा भारतभर साजरी होणारी दिवाळी ही प्रकाश , आनंद आणि संपन्नतेचा उत्सव मानली जाते.पण महाराष्ट्रात या दिवाळीचे वेगळेच रंग दिसतात. चार ते पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवातील सर्वात पवित्र दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस . हा दिवस म्हणजे केवळ देवपूजा नसून घराघरात श्रद्धा , स्वच्छता , सौंदर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक असतो.आजचा ब्लॉग हा या विषयावर आहे. 🌼 दिवाळीचा तिसरा दिवस — लक्ष्मीपूजन: धनत्रयोदशी आणि नरकचतुर्दशी नंतर येणारा दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस . हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावास्येला हा दिवस येतो.हा दिवस अंधारावर प्रकाशाचा , दुर्गुणांवर सद्गुणांचा आणि दरिद्र्यावर समृद्धीचा विजय दर्शवतो. महाराष्ट्रात या दिवशी लोक सकाळीच घर झाडून स्वच्छ करतात.घरातील प्रत्येक कोपरा , देवघर , ओटा , अंगण , दार , खिडक्या आणि छतापर्यंत प्रत्येक जागा प्रकाशित ठेवली जाते.कुठे अंधार असू नये हे बघितलं जातं.   कारण असा समज आहे की , जिथे स्व...

नरक चतुर्दशी कां साजरी करतात?

  ब्लॉग नं. 2025/295. दिनांकः 20 ऑक्टोबर , 2025.   मित्रांनो ,             दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या वेळेस रविवारी त्रयोदशी असल्याने चतुर्दशी आज म्हणजे सोमवारी आली. भारतात नरक चतुर्दशीचा दिवस हा दुष्टतेवर धर्माच्या प्रकाशाचा विजय म्हणून साजरा केला जातो.भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. प्रत्येक सणामागे एक सुंदर परंपरा , धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक कारण दडलेले असते. दीपावलीचा सण म्हणजे आनंद , प्रकाश आणि सकारात्मकतेचा उत्सव. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाची प्रथा आहे. आज आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर: 🌞 नरक चतुर्दशीची कथा: पुराणांनुसार , प्राचीन काळी नरकासुर नावाचा एक असुर होता. तो अत्यंत शक्तिशाली आणि अहंकारी होता.त्याने आपल्या बलाचा गैरवापर करून देवता , ऋषी आणि निरपराध स्त्रियांना त्रास दिला.त्याच्या अत्याचारामुळे पृथ्वीवरील जनतेत भयाचे वातावरण निर्माण झाले.अखेर , देवतांनी भगवान श्रीकृष्णाकडे मदतीसाठी धाव घेतली. भगवान श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामेच्या साहाय्याने,नर...

दिवाळी फक्त सण नव्हे व्यवसाय पर्वणी

  ब्लॉग नं. 2025/29 4. दिनांक: 19 ऑक्टोबर, 2025.   मित्रांनो,             काल धन त्रयोदशी झाली आणि उद्या नरक चतुर्दशी.आज मात्र काहीच नाही.सध्या आपण दिवाळी किंवा दीपावली,हा आपला सर्वात मोठा सण साजरा करत आहोत.या सणाला जसं पौराणिक महत्व आहे,तसंच त्याला एक व्यवसायिक संबंधाची जोड देखिल आहे.खरीपाचा हंगाम संपून शेतकऱ्याच्या हाती चार पैसे येतात.पूर्वीच्या काळी सर्व काही शेतकऱ्याच्या हातच्या पैश्यावर अवलंबून असायचं आणि एकदा शेतकऱ्याच्या हातात पैसे आले की,ते आपल्या मनात वर्षभरात साठवून ठेवलेली कामे सुरू करीत असत.यावर आहे आजचा ब्लॉग.   सविस्तर:             दिवाळी हा एक सण एक उत्सव आहे.कारण दिवाळी ही आपण साजरी करत असतो.दिवाळी साजरी करण्यामागे,चार हातांना काम मिळणे हा उद्देश होताच.अगदी दिवाळीचा पहिला दिवस घेतला तर,सुरुवात होत असे बाहेर रांगोळी काढण्यापासून ते त्यात रंग भरण्यापर्यंत . हे रांगोळी साहित्य आणि रांगोळीचे रंग तयार करणाऱ्या कारागिरांना,काम आणि पैसे या निमित्...

धनत्रयोदशी का साजरी केली जाते?

  ब्लॉग नं. 2025/29 3. दिनांक: 18 ऑक्टोबर, 2025. मित्रांनो,            तसं पाह्यला गेलं तर,वसू बारस पासून दिवाळी उत्सवाला सुरुवात होते.गाय आणि वासरू यांची या दिवशी पूजा केली जाते.दिवाळी हा आपल्या देशात साजरा करण्यात येणारा सगळ्यात मोठा सण आहे. पूर्वीच्या काळी,आजकाल ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे एकंदर हवामान प्रभावित झाले आहे,असे नव्हते.मृग नक्षत्राला पावसाळा सुरू व्हायचा,सगळ्या गोष्टी वेळेवर होत असल्याने दिवाळीला शेतकऱ्यांच्या हाताशी पैसा येत असे.त्यामुळे हा उत्सव कार्तिक महिन्यात साजरा केला जात असे. आज धनत्रयोदशी, आजच्या दिवसाची कथा आणि महत्व,आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.                 🌟 धनत्रयोदशी का साजरी केली जाते ? धनत्रयोदशी कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला साजरी केली जाते.या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला असे पुराणात सांगितले आहे. ते देवतांचे वैद्य मानले जातात आणि आयुर्वेदाचे जनक म्हणून त्यांची पूजा केली जाते.त्यामुळे या दिवशी आरोग्य , आयुष्य आणि सम...

नवरात्र केवळ धार्मिक नाही,तिला वैज्ञानिक आधार आहे

  ब्लॉग नं: 2025/27 0 . दिनांक: 2 6 सप्टेंबर, 2025.   मित्रांनो,           कधी तुम्हाला हा प्रश्न पडतो कां,की नवरात्र नऊ रात्रीच का असतं? आणि समजा पडला असेल आणि तुम्ही कुणाला विचारलं असेल,तर त्यानं योग्य,तुमच्या मनाला पटेल असं उत्तर दिलं कां? काल माझ्या वाचनात MSN वर ही पोस्ट आली.आणि मी वाचली देखिल. कारण मला उत्सुकता होती.मला वाचल्यावर कळलं की,या परंपरेत विज्ञान लपलेले किंवा दडलेले आहे.मला पटलं आणि आज मी तुम्हाला ब्लॉगच्या स्वरूपात शेअर करत आहे. सविस्तर:    नवरात्र ही,चंद्राच्या हालचाली आणि ऋतू बदलण्याशी जवळून जोडलेली आहे.ही स्थिती वर्षातून दोनदा येते , उन्हाळा आणि हिवाळा सुरू होताना.हा संक्रमणकालीन काळ आहे,जेव्हा मानवी शरीर सर्वात असुरक्षित असते.नऊ रात्री अमावस्येपासून नवव्या दिवसापर्यंत,चंद्राच्या संपूर्ण चक्राशी संबंधित असतात.प्राचीन ऋषींचा असा विश्वास होता की,निसर्गाच्या लयीशी सुसंगत असताना,शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करण्यासाठी,नऊ रात्री पुरेशा असतात. नऊ ही संख्या अनेक परंपरांमध्ये पूर्णतेचे प्रतिनिधित्व...

नवरात्र उत्सव

ब्लॉग नं. 2025/266 दिनांक: 22 सेप्टेंबर, 2025.                           मित्रांनो ,                          नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा                आज घटस्थापना,नवरात्राचा शुभारंभ.महाराष्ट्र हे उत्सवप्रिय राज्य म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्रात आज बऱ्याच शहरात दुर्गेची स्थापना करण्यात येते.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे  आराध्य दैवत आहेत आणि त्यांचे आराध्य दैवत तुळजापूरची तुळजाभवानी   होते.त्या अर्थाने महाराष्ट्रातील नवरात्र उत्सवाला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांची माहिती घेणार आहोत.   सविस्तर: महाराष्ट्रातील देवीची शक्तीपीठ आहेत.जी साडेतीन शक्तीपिठे म्हणून संबोधली जातात.ती आहेत, कोल्हापूरची अंबाबाई , तुळजापूरची तुळजा भवानी ,  माहूरगडची रेणुकामाता आणि नाशि...