Skip to main content

Posts

Showing posts with the label Religious

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

गुढी पाडवा: नविन वर्षाच्या शुभेच्छा

ब्लॉग नं. 2026/078. दिनांकः 19 मार्च , 2026.   मित्रांनो , 🌸 गुढी पाडवा: नववर्षाची आनंदमयी सुरुवात 🌸 गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी सण आहे. हिंदू पंचांगानुसार चैतन्यपूर्ण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजेच मराठी नववर्षाची सुरुवात मानली जाते. या दिवशी प्रत्येक घरात नवीन आशा , ऊर्जा आणि सकारात्मकतेचा संचार होतो. आज या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या आनंददायी शुभेच्छा. सविस्तरः 🌿   गुढी पाडव्याचे महत्त्वः आज काल हे पहायला मिळतं की , ज्या सणांमधे ऐश्वर्य , श्रीमंती , मोठेपणा दाखविण्याची असते किंवा जो सण धूमधडाक्यात करायचा असतो , अशा सणांचं महत्व वाढलंय. या सणांमधून संस्कृतीचे दर्शन होतं , संस्काराचं पावित्र्य कळतं , जपलं जातं. ते सण तेवढे उत्साहाने साजरे होत नाहीत.खरं तर गुढी पाडवा हा केवळ सण नाही , तर तो नवीन सुरुवात , विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे.यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा सांगितल्या जातात: भगवान श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत येताना लोकांनी गुढी उ...

भाऊबीज भावनिक नात्यांचे सुंदर प्रतीक .

ब्लाॅग नं.2025/298. दिनांकः 23 ऑक्टोबर, 2025. ब्लॉग नं. 2025/298. दिनांकः 2 3 ऑक्टोबर , 2025.   मित्रांनो , भाऊबीजचे महत्व आणि साजरी करण्यामागील कारण दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील शेवटचा आणि अतिशय भावनिक असा दिवस , म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण आणि भाऊ यांच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होते. महाराष्ट्रात तसेच भारतातील इतर अनेक भागात हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.आजचा ब्लॉग याच विषयावर आहे. 🌸   भाऊबीजचे महत्व: भाऊबीज हा केवळ सण नाही तर , बंधुभगिनीच्या नात्यातील ममत्व , स्नेह , आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे.या दिवशी बहीण आपल्या भावाला घरी आमंत्रित करते.त्याला ओवाळते , त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते. बदल्यात भाऊही बहिणीला भेटवस्तू किंवा रोख रक्कम देतो आणि तिच्या आनंदासाठी शुभेच्छा देतो. ही एक परंपरा आहे जी बहीण-भावाच्या नात्याला अधिक दृढ करते आणि एकमेकांबद्दलचे प्रेम वाढवते. 🕉️   भाऊबीज साजरी करण्यामागील कथा: भाऊबीजेच्या साजरीकरणामागे अनेक कथा सांगितल्या जातात , त्यामधील एक प्रसिद्ध कथा सांगितल...

बलिप्रतिपदा : दैत्यराज बलीच्या पुनरागमनाचा दिव्य उत्सव

  ब्लॉग नं. 2025/297. दिनांकः 22 ऑक्टोबर , 2025. मित्रांनो , बलिप्रतिपदा : दैत्यराज बलीच्या पुनरागमनाचा दिव्य उत्सव 🪔 दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे , आणि या दिवाळीतील चौथा दिवस म्हणजे  बलिप्रतिपदा.महाराष्ट्रात विशेष श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवसाला बली पद्मिनी , पाडवा , वीरप्रतिपदा किंवा द्युतप्रतिपदा अशी विविध नावे आहेत. हा दिवस केवळ धार्मिकच नाही , तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे.आजचा ब्लॉग याच विषयावर आहे.   🌞 बलिप्रतिपदा म्हणजे काय ? हिंदू पंचांगानुसार , कार्तिक महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच,अमावास्येनंतरच्या पहिल्या दिवशी बलिप्रतिपदा साजरी केली जाते. दिवाळीच्या या चौथ्या दिवशी दैत्यराज महाबली याचा पृथ्वीवर पुनरागमन होत असल्याचा पौराणिक समज आहे. गुजरात , राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही भागांत या दिवसाला नववर्षाचा प्रारंभ मानतात. विक्रम संवत्‌ नववर्षाची सुरुवात या तिथीपासूनच होते. हा दिवस हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मानला जातो,याचा अर्थ म्हणजे कोणतेही शुभकार्य या दिवशी निर्बंधाविना करता य...

लक्ष्मी पूजन एक मंगल सोहळा

  ब्लॉग नं. 2025/296. दिनांकः 21 ऑक्टोबर , 2025.   मित्रांनो , लक्ष्मीपूजन : महाराष्ट्रात दिवाळीतील सर्वात मंगल सोहळा भारतभर साजरी होणारी दिवाळी ही प्रकाश , आनंद आणि संपन्नतेचा उत्सव मानली जाते.पण महाराष्ट्रात या दिवाळीचे वेगळेच रंग दिसतात. चार ते पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवातील सर्वात पवित्र दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस . हा दिवस म्हणजे केवळ देवपूजा नसून घराघरात श्रद्धा , स्वच्छता , सौंदर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक असतो.आजचा ब्लॉग हा या विषयावर आहे. 🌼 दिवाळीचा तिसरा दिवस — लक्ष्मीपूजन: धनत्रयोदशी आणि नरकचतुर्दशी नंतर येणारा दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस . हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावास्येला हा दिवस येतो.हा दिवस अंधारावर प्रकाशाचा , दुर्गुणांवर सद्गुणांचा आणि दरिद्र्यावर समृद्धीचा विजय दर्शवतो. महाराष्ट्रात या दिवशी लोक सकाळीच घर झाडून स्वच्छ करतात.घरातील प्रत्येक कोपरा , देवघर , ओटा , अंगण , दार , खिडक्या आणि छतापर्यंत प्रत्येक जागा प्रकाशित ठेवली जाते.कुठे अंधार असू नये हे बघितलं जातं.   कारण असा समज आहे की , जिथे स्व...

नरक चतुर्दशी कां साजरी करतात?

  ब्लॉग नं. 2025/295. दिनांकः 20 ऑक्टोबर , 2025.   मित्रांनो ,             दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या वेळेस रविवारी त्रयोदशी असल्याने चतुर्दशी आज म्हणजे सोमवारी आली. भारतात नरक चतुर्दशीचा दिवस हा दुष्टतेवर धर्माच्या प्रकाशाचा विजय म्हणून साजरा केला जातो.भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. प्रत्येक सणामागे एक सुंदर परंपरा , धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक कारण दडलेले असते. दीपावलीचा सण म्हणजे आनंद , प्रकाश आणि सकारात्मकतेचा उत्सव. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाची प्रथा आहे. आज आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर: 🌞 नरक चतुर्दशीची कथा: पुराणांनुसार , प्राचीन काळी नरकासुर नावाचा एक असुर होता. तो अत्यंत शक्तिशाली आणि अहंकारी होता.त्याने आपल्या बलाचा गैरवापर करून देवता , ऋषी आणि निरपराध स्त्रियांना त्रास दिला.त्याच्या अत्याचारामुळे पृथ्वीवरील जनतेत भयाचे वातावरण निर्माण झाले.अखेर , देवतांनी भगवान श्रीकृष्णाकडे मदतीसाठी धाव घेतली. भगवान श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामेच्या साहाय्याने,नर...

दिवाळी फक्त सण नव्हे व्यवसाय पर्वणी

  ब्लॉग नं. 2025/29 4. दिनांक: 19 ऑक्टोबर, 2025.   मित्रांनो,             काल धन त्रयोदशी झाली आणि उद्या नरक चतुर्दशी.आज मात्र काहीच नाही.सध्या आपण दिवाळी किंवा दीपावली,हा आपला सर्वात मोठा सण साजरा करत आहोत.या सणाला जसं पौराणिक महत्व आहे,तसंच त्याला एक व्यवसायिक संबंधाची जोड देखिल आहे.खरीपाचा हंगाम संपून शेतकऱ्याच्या हाती चार पैसे येतात.पूर्वीच्या काळी सर्व काही शेतकऱ्याच्या हातच्या पैश्यावर अवलंबून असायचं आणि एकदा शेतकऱ्याच्या हातात पैसे आले की,ते आपल्या मनात वर्षभरात साठवून ठेवलेली कामे सुरू करीत असत.यावर आहे आजचा ब्लॉग.   सविस्तर:             दिवाळी हा एक सण एक उत्सव आहे.कारण दिवाळी ही आपण साजरी करत असतो.दिवाळी साजरी करण्यामागे,चार हातांना काम मिळणे हा उद्देश होताच.अगदी दिवाळीचा पहिला दिवस घेतला तर,सुरुवात होत असे बाहेर रांगोळी काढण्यापासून ते त्यात रंग भरण्यापर्यंत . हे रांगोळी साहित्य आणि रांगोळीचे रंग तयार करणाऱ्या कारागिरांना,काम आणि पैसे या निमित्...