Skip to main content

Posts

Showing posts with the label Religious

टाइप 5 मधुमेह

ब्लाॅग नं.2025/150 दिनांकः 31 मे, 2025. मित्रांनो,  मधुमेहाचा नवा प्रकार: प्रकार ५ मधुमेह – एक नवा दृष्टिकोन एप्रिल २०२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने (IDF) मधुमेहाच्या एका नवीन प्रकाराला अधिकृत मान्यता दिली – प्रकार ५ मधुमेह. या नवीन प्रकारामुळे जगभरातील आरोग्य क्षेत्रात नवी जागरूकता निर्माण झाली आहे. प्रकार ५ मधुमेह विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. अंदाजानुसार, सुमारे २० ते २५ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. प्रकार ५ मधुमेह म्हणजे काय? प्रकार ५ मधुमेहाला "गंभीर इन्सुलिन-कमी असलेला मधुमेह" (Severe Insulin-Deficient Diabetes - SIDD) म्हणूनही ओळखले जाते. हा मधुमेह इतर प्रकारांपेक्षा वेगळा आहे. कुपोषणामुळे होणाऱ्या चयापचय विकारांशी त्याचा थेट संबंध असून, विशेषतः किशोरवयीन आणि तरुण प्रौढांवर त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो. दीर्घकाळ कुपोषणामुळे शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. परिणामतः, शरीर इन्सुलिनची निर्मिती पुरेशा प्रमाणात करू शकत नाही. यामुळे चयापचय स्थिरता राखणे कठीण होते. टाइप १ आणि ...

खंजरी भजन स्पर्धा आणि निर्व्याज शाबासकी

ब्लॉग नं. 2025/128 दिनांक: 9 मे, 2025.     मित्रांनो ,             नुकतीच मला बँकेतून सेवानिवृत्त होऊन पाच वर्षे झालीत.बँकेत असतांना कुठे कुठे फिरलो आणि या फिरण्यातून,या प्रवासातून काही मनोरंजक गोष्टी घडल्या आणि काही मनावर परिणाम करून गेल्या.परवा 7 मे, 2025 होती.जुने फोटो पहात असतांना सहज माझी नजर,एका फोटोतील तारखेकडे गेली. 7 मे, 2000, म्हणजे 25 वर्षे झाली त्या प्रसंगाला आणि आठवणी दाटून आल्या.तुम्हाला देखील वाचायला आवडेल,म्हणून शेअर करतो, आजच्या ब्लॉगमध्ये.                                     सविस्तर: चंद्रपुर जिल्हातील राजुरा तालुक्यांत राजुऱ्यापासून 13 कि.मी.वर विहीरगांव येथे बॅकेची शाखा होती. 25 सप्टेंबर 1999 ला,मी   राजुरा येथून विहीरगांवला जॉइन होण्यासाठी,आपली राजदुत मोटार सायकल घेऊन निघालो.मी पहिल्यांदाच एका शाखेचा मॅनेजर म्हणून चार्ज घेणार होतो.रस्ता बघितलेला नव्हता,पण कुठून जायचं एवढं फक्त माहित होत.आजच्या सारखा म...

स्तोत्र, मंत्र, आणि जपाचे महत्व

ब्लॉग नं. 2025/12 3 . दिनांक: 4 मे, 2025. मित्रांनो ,  हिंदू धर्मामध्ये स्तोत्र , मंत्र , आणि जप हे अत्यंत शक्तिशाली व उर्जेने भरलेले मानले जातात.साधा ' ॐ ' चा जप असो किंवा प्रसिद्ध ' कालभैरव अष्टकम ', प्रत्येक मंत्र व स्तोत्रामध्ये अशी एक ऊर्जा असते जी इतर कशानेही साध्य होऊ शकत नाही. हे पवित्र शब्द व कंपनांमध्ये आध्यात्मिक सामर्थ्य आहे आणि योग्य उद्देश , समज , आणि सातत्याने जपल्यास , हे मंत्र लोकांभोवतीची ऊर्जा बदलून सकारात्मक गोष्टी आकर्षित करतात.आज आपण अशा 6 मंत्राबाबत जाणून घेणार आहोत. सविस्तर: गायत्री मंत्र: गायत्री मंत्र हा सर्वात प्रसिद्ध मंत्रांपैकी एक आहे , जो पूर्ण सभागृहाची ऊर्जा उंचावण्याचे सामर्थ्य राखतो. या मंत्राचे शब्द आहेत . ॐ भूर्भुवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धियो यो नः प्रचोदयात्॥ या मंत्राद्वारे , आपण देवतांना आणि उच्च शक्तींना विनंती करतो की , त्यांनी आपल्याला बुद्धी व जीवनाविषयी स्पष्ट दृष्टी दिली पाहिजे , आणि आपली उद्दिष्टे व स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली पाहिजे.जेव्हा एखाद्या व्यक्तीचे उद्दिष्ट स्प...

संत गजानन महाराज प्रगट दिन

Blog No.2025/051.  Date: -20th, February,2025 मित्रांनो ,             आज माघ वद्य सप्तमी म्हणजेच संत गजानन महाराज, शेगाव यांचा प्रगट दिन.याच दिवशी शेगावीचे संत गजानन महाराज शेगांवला प्रगटले.देविदास या ब्राम्हण व्यक्तीकडे ऋतु शांतीचे जेवण सुरू होते,त्यात पंक्ती सुरू होत्या,त्या पंक्तीतिल उष्ट्या पत्रावळीवरील अन्नाची शिते वेचून महाराज खात बसले होते.देविदासच्या घरासमोर बाहेर रस्त्याच्या कडेला टाकल्या जात होत्या.शेगांव निवासी बंकटलाल हा एक भाविक गृहस्थ आणि त्याचा मित्र दामोदर पंत यांच्या दृष्टीस संत गजानन महाराज तिथे बसलेले दिसले.हा खूप मोठा योगीराज असावा,त्यांनी महाराजांसाठी आतून पक्वान्न भरलेले ताट समोर आणून ठेवले आणि तांब्या भरून पाणी आणून ठेवले.पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत तेथील गाई गुरांसाठी असलेल्या   ओढ्यातील गढूळ पाणी प्यायले.यावरून अन्न हे पूर्णब्रम्ह आहे,ते वाया घालवू नये. हा संदेश संत गजानन महाराजांनी दिला. सविस्तर:-             त्या नंतर संत गजानन ज...

महाकुंभला जाताय? मग हा ब्लॉग वाचूनच जा.

  ब्लॉग नं.2025/04 6   दिनांक: 1 5 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             प्रयागराग,अयोध्या आणि वाराणसी अशी तीन दिवसांची आणि जाणं-येणं धरून 5 पाच दिवसाची यात्रा आटोपून आम्ही नागपूरला परतलो.आम्ही दोघं पुण्याहून, माझा मधला भाऊ-त्याची पत्नी असे दोघे नागपूरहून आणि माझा धाकटा भाऊ,त्याची फॅमिली असे चार जण मिळून आम्ही नागपूरहून निघायचं ठरवलं.पुण्याहून आणि हैदराबादहून जरी प्रयागराग,अयोध्या आणि वाराणसी ही तिन्ही ठिकाणे दूर वाटतं असली तरी,नागपूरहून त्यामानाने जवळ आहेत. म्हणून आम्ही नागपूरहून एकत्र निघायचं ठरवलं. सविस्तर:             नागपूरहून सुभेदार ट्रॅवलर्सची एक 13 सीटर ट्रॅवलर बूक केली. इतक्या दूरच्या प्रवासासाठी जरी ती आरामदायक नाही, तरी 200-250 किमी पर्यन्त जायला हरकत नाही,असा विचार केला.नागपूर तो रिवा या जवळपास 11.30 तासाच्या प्रवासात,प्रत्यक्षात तो तेवढा नाही 9.25 तासांचा आहे.पण thanks टू महाराष्ट्र अँड मध्य प्रदेश पोलिस जे पैसे कमविण्याचे हे चांगले साधन...

काशी विश्वनाथाचे दर्शन,माझा अनुभव

ब्लॉग नं.2025/04 5   दिनांक: 1 4 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             आमच्या या यात्रेतील शेवटचा टप्पा होता,वाराणसी.वाराणसी किंवा बनारस किंवा काशी अशा तीन नावांनी ओळखले जाणारे हे शहर, गंगा नदीच्या काठी वसलेले आहे. प्रयागराजला गंगा,यमुना आणि सरस्वतीच्या संगमानंतर ही नदी काशीला पोहोचते.12 ज्योतिर्लिंगामद्धे अग्रक्रम या मंदिरास दिला जातो.वाराणसी हे प्रयागराजच्या पूर्वेस 122 किमीवर आणि अयोध्येच्या दक्षिणेस 219 किमी वर स्थित आहे,जिथे सध्या कुंभमेळया दरम्यान पोहोचण्यास 4.30 तास लागतात.आम्हाला पोहोचवयास 6.30 तास लागले,कारण त्या दिवशी खूप गर्दी होती.अयोध्येहून सुल्तानपुर,जौनपूर मार्गाने आपण वाराणसीला पोहोचतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मतदार संघ असल्याची चुणूक तेथील रस्त्यांवरून दिसून येते.आमचे हॉटेल काशी विश्वनाथ मंदिरापासून बरेच दूर होते. आजचा ब्लॉग वाराणसी वर आहे. सविस्तर:             सर्वात आधी आपण या मंदिराविषयी थोडे जाणून घेऊ. काशी विश्वनाथ मंदिर हे मूळ...

अयोध्येतील श्रीरामचंद्राचे दर्शन: माझा अनुभव

ब्लॉग नं.2025/04 4   दिनांक: 1 3 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             प्रयागराजचे स्नान आटोपल्यावर,तिथे असलेल्या प्रचंड गर्दीमुळे आणि प्रत्येक ठिकाणी पायी पायी चालत जावे लागत असल्याने,आम्ही प्रयागराजला इतरत्र फिरू शकलो नाही. आणि हा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. In fact ,बरेच लोक केवळ स्नान आटोपून आपापल्या घरी निघाले होते.पण आम्ही इतक्या दूर आल्यासारखे अयोध्या आणि वाराणसीला जाऊन येऊ असा विचार करून गेलो होतो. त्यामुळे आम्ही प्रयागराज कडून अयोध्येला निघालो. प्रयागराज ते अयोध्या हे अंतर केवळ 164 किमीचे,हे अंतर कापण्यासाठी नियमित मार्गाने गेल्यास सध्या 4.15 तास लागतात. पण अयोध्येला जाणारी गर्दी वाढल्याने,आम्हाला नियमित मार्ग म्हणजे प्रयागराजहून प्रतापगढ आणि सुल्तानपुरहून जाता न आल्याने जौनपूर, सुल्तानपुर या 254 किमीच्या दूरच्या मार्गाने जावे लागले.जे अंतर कापण्यास हेवि ट्रॅफिकमुळे आम्हाला 8 ते 9 तास लागले.अयोध्येतील श्रीराम दर्शन यावर आजचा ब्लॉग. सविस्तर:           ...