ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...
ब्लॉग नं. 2025/03 1 दिनांक: 31 जाने वारी,2025. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही बऱ्याचदा हे नक्कीच ऐकलं असेल की,तेलाचे सेवन केल्याने कार्बोहायड्रेट्स म्हणजेच पर्यायाने चरबी वाढते,अर्थात लठ्ठपणा वाढतो. पण आता देशातील विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देवी प्रसाद शेट्टी म्हणतात की, कार्बोहायड्रेट्स वाढण्यासाठी तेल खलनायक नाही.ते कां? आणि जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की तेल तुमच्या धमन्या बंद करण्याचे आणि तुमच्या हृदयाला नुकसान पोहोचवण्याचे मुख्य कारण आहे , तर तुम्ही पूर्णपणे बरोबर नाही आहात.कारण आता परिस्थिति बदलली आहे.सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: कार्बोहायड्रेट्स वाढण्यासाठी तेल खलनायक नाही हे सांगताना,डॉक्टरांनी निरोगी खाण्यासोबत सक्रिय जीवनशैलीचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.भारताचे सर्वोच्य नागरी पुरस्कार,पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी गौरवलेले डॉ.शेट्टी म्हणतात,“तेलाला दोष देऊ नका , परंतु मिठाई , साखर , भात , चपाती इत्यादि हे कार्बोहायड्रेट्स वाढण्यासाठीचे खलनायक आहेत. ” असे ते म्हणाले....