Blog No.2024/019.
Date: -28th, January,2024.
मित्रांनो,
परवाच्या दिवशी मी बिहारचे भूतपूर्व
मुख्यमंत्री,जननायक म्हणून प्रसिद्धीस पावलेले स्व.कर्पूरी ठाकूर यांना भारत
सरकारचा सर्वोच्य नागरी सन्मान “भारतरत्न” (मरणोत्तर) प्रदान करण्याची घोषणा हा केंद्र सरकार आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचे म्हटले जात आहे,असे लिहिले होते.पण त्या
मास्टर स्ट्रोकचा इफेक्ट हो परिणाम म्हणण्यापेक्षा इफेक्ट जास्त परिणामकारक वाटतो,
इतक्या लवकर जाणवेल किंवा होईल असं वाटलं नव्हतं.मी कालपासून ब्लॉग लिहिण्यासाठी ज्या
बातमीची वाट पहात होतो. ती बातमी सकाळी 10.00 च्या सुमारास आली.बिहारचे मुख्यमंत्री
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. संध्याकाळी 7.00 वाजता पुन्हा मुख्यमंत्री
होण्यासाठी.पण या वेळेस एनडीए च्या सोबत.सर्वच अनाकलनीय, कल्पनातीत.
सविस्तर
असं म्हटलं जातं की आजकाल किंवा कलियुगात
जे घडतं आहे ते बऱ्यापैकी महाभारतात तुम्हाला आढळून येतं.पण मला असं वाटतं की बिहारचे
मुख्यमंत्री नितीश कुमार हे पात्र मात्र महाभारतकार महर्षी व्यास यांच्या महाभारतात
आढळतं नाही.जवळपास एक महिन्यापूर्वी जी व्यक्ती एनडीएच्या विरोधी इंडी आघाडीचा पंतप्रधान
पदासाठीचा चेहरा म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करा म्हणत होती.लोकशाही विरोधी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाडी करण्यासाठी देशभरच्या विरोधी पक्षांना एकत्र आणून
त्याचे मुख्य संयोजक होण्यासाठी धडपड करत होती.ती व्यक्ती पूर्ण यू टर्न घेऊन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए च्या सोबत जाण्यास तयार होते.
आणि हे असं घडण्याच कारण ही वेगवेगळे
सांगितलं जात आहे.स्व.कर्पूरी ठाकूर यांना भारत सरकारचा सर्वोच्य नागरी सन्मान
“भारतरत्न” (मरणोत्तर) प्रदान करण्याची घोषणा
करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगल्या माणसाची कदर करतात,ही जाणीव अचानक जनता दल
(यूनायटेड) या पक्षाला झाली. तसेच स्व.कर्पूरी ठाकूर यांनी राजकारणात परिवारवाद आणला
नाही,आणि आपल्या सोबत इंडी आघाडीचे सर्व पक्ष परिवारवादाचे पुरस्कर्ते आहेत,याचीही
अचानक जाणीव जनता दल (यूनायटेड) या पक्षाला झाली.असं ही ऐकायला मिळालं.मी मुद्दाम इंडी
आघाडी म्हणतो कारण इंडिया हा देश जरी विविधतेने नटला असला ज्यात विविध भाषा बोलणारे
लोक असले,ज्यात विविध जात,पंथ,धर्म,विचाराचे लोक असले तरी इंडिया हा देश एकसंघ आहे.
तो कधीच दुभंगू शकत नाही.हेच त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट आहे,हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे.
समारोप
भारताची
लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे म्हटले जाते.भलेही ती गुणात्मक दृष्ट्या
नसून संख्यात्मक दृष्ट्या सर्वात मोठी आहे.पण मोठी आहे म्हणूनच तर अशा अनाकलनीय, कल्पनातीत
गोष्टी इथे घडू शकतात.एकंदर इंडी आघाडीचे काही खरे नाही.त्यांचे एक शिलेदार “भारत जोडो”
म्हणत भारत जोडायला निघाले आहेत आणि ईकडे भारताच्या नावास साधर्म्य असलेली I.N.D.I.A
असे नाव ठेवलेली आघाडी मात्र जोडली जायच्या आधी दुभंगते आहे.हे खरचं
भारतीय लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल की सत्तेत येण्यासाठी नाही तर सत्ताधारी पक्षाच्या
निरंकुश कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष असावा यासाठी देखिल काही प्रयत्न
होत नाहीत.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
🙏
ReplyDeleteOppo sit in the extinction furnace. Will it awake itself from the deep slumber of given up attitude? Only time will tell. Well it's nothing impossible in Indian politics
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete