Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

अर्थसंकल्प 2024 पासून अपेक्षा

 Blog No.2024/015. 

Date: -20th, January,2024.       

मित्रांनो.  

        1 फेब्रुवारी,2024 ला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन या मोदी सरकारचा शेवटचा (कारण आता 2024 ला निवडणूक आहे,सरकार नरेंद्र मोदी यांचेच असेल,पण या दुसऱ्या टर्मचा शेवटचा)अर्थसंकल्प आहे आणि तो पूर्ण अर्थसंकल्प नसणार. कारण पुढील काही महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे.त्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल.दरवेळेसचे अर्थमंत्र्यांचे बजेट बघता या बजेटमधे काही लोकप्रिय घोषणा होतील असे मला वाटतं नाही. पण प्रत्येकाला  काही अपेक्षा आहेत आणि पगारदार कर्मचाऱ्यांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या बोलण्यातून अर्थमंत्र्यांकडून काही अपेक्षा आहेत असे त्यांच्याशी बोलतांना जाणवते. त्या मी थोडक्यात मांडत आहे.

1.       महागाई निर्देशांक आणि पगाराच्या उत्पन्नातील वाढ लक्षात घेता करमुक्त उत्पन्नाची सीमा जी रु.250,000 आहे ती वाढली पाहिजे अशी अपेक्षा आहे. किती वाढवायची हे अर्थमंत्र्यांनी ठरवावे.

2.       स्टँडर्ड deduction हे रु.50,000/- वरुन रु.100,000/- करण्यात यावे.  

3.       80 सी अंतर्गत वजावट रु. 1.50 लाखाची सीमा ही 2014 पासून बदललेली नाही, ती वाढावी अशी अपेक्षा आहे.किती वाढवायची हे अर्थमंत्र्यांनी ठरवावे.  

4.       हाऊसिंग लोन च्या इनस्टालमेंटची वजावट मिळते ती 80 सी अंतर्गत न ठेवता,ती वेगळ्या  कलमाखाली मिळावी.त्याची सीमा किंवा मर्यादा रु.3.00 लाख एवढी असावी, जेणेकरून त्यांत कमीतकमी 6 महिन्याचे कर्जाचे हफ्ते एवढी वजावट मिळू शकेल आणि गृहकर्ज घेण्याऱ्यास प्रलोभन मिळेल आणि रीयल इस्टेटला सुद्धा प्रोत्साहन दिल्या सारखे होईल.सध्या 80 सी अंतर्गत पी.एफ. एलआयसी प्रीमियम इत्यादिची बचत समाविष्ट असल्याने,खऱ्या अर्थाने हाऊसिंग लोनचे हफ्ते यासाठीच्या वजावटीचा लाभ मिळत नाही.    

5.       ज्या ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न केवळ पेन्शन किंवा ठेवीवरील व्याज (सुपर अॅन्युएशन फंड) या स्वरूपात आहे त्यांना आयकर रिटर्न भरण्यापासून सूट मिळावी.

6.       हेल्थ इन्शुरेंस कंपन्या त्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत क्लेम सेटलमेंट साठी अधिक रक्कम द्यावी लागते.ह्या नावाखाली वाढीव प्रीमियम आकारतात.जे नोकरदार आहेत ते सेवानिवृत्त झाल्यावर,त्यांच्या पालक संस्थेकडून (parent institute) कडून हेल्थ इन्शुरेंसचा प्रीमियमचा दर कमी असावा यासाठी काही मदत करीत नाहीत.अशाप्रकारे या पालक संस्थेकडून (parent institute) हेल्थ इन्शुरेंसच्या प्रीमियममधे काही रक्कम गुंतविण्यात आली.तर त्या रकमेचा ह्या पालक संस्थांना,कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत समावेश करता यावा.यासाठी तरतूद करण्यात यावी.किंवा हेल्थ इन्शुरेंसचा प्रीमियम कसा कमी करता येईल याचा विचार अर्थमंत्र्यांनी करायला हवा. किंवा  

7.       आयुष्यमान भारत ही योजना रु.10.00 लाख पर्यन्त उत्पन्न असणाऱ्या सर्व  वरिष्ठ नागरिकांसाठी लागू केली जावी. 

समारोप

       पगारदार कर्मचाऱ्यांच्या तसेच ज्येष्ठ नागरिक यांची गणना भारतीय जनता पार्टीच्या मतदारांमद्धे केली जाते.पण काही झाले तरी त्यांचे मत आपल्याला मिळेल या भ्रमात न रहाता,भाजपाने त्यांच्या अपेक्षांची दखल घ्यावी एवढेच मी म्हणेन.        तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु, पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...