Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

अल्झायमर एक कठीण रोग

 Blog No.2024/018. 

Date: -27th, January,2024.         

 

मित्रांनो,

     आजकाल जरा जास्त प्रमाणात अल्झायमर या रोगाबद्दल बोललं जातंय, ऐकायला मिळतंय,वाचायला मिळतंय.कदाचित लोकांचे आयुर्मान वाढल्यामुळे हा रोग झालेल्यांची संख्या वाढली असेल,वाढत असेल.म्हणून या रोगाबद्दल आणि याच्या प्रारंभिक लक्षणांबद्दल आपण आज थोडे जाणून घेणार आहोत.यातील काही लक्षणे सर्वसामान्यपणे कमी प्रमाणात प्रत्येकात आढळून येतात. म्हणून लगेच आपल्याला अल्झायमर झालाय असे होतं नाही.पण ही लक्षणे जर एकत्रितपणे आढळल्यास,आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क प्रस्थापित करून आपल्या शंकेचे निरसन करून घेऊ शकतो.कारण या आजारावर अद्याप तरी कायम स्वरूपी असा उपचार शोधून काढण्यात तज्ञांना यश आले नाही.त्यामुळे प्रारंभिक अवस्थेत जर त्याचे निदान झाले तर त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते.आजचा ब्लॉग या विषयावर.

प्रास्ताविक                    

अल्झायमर हा एक डिजनरेटिव्ह रोग आहे जो मेंदूच्या पेशी नष्ट करतो,ज्यांना न्यूरॉन्स म्हणतात.1906 साली अलोइस अल्झायमर नावाच्या जर्मन डॉक्टरने हा शोधून काढला.म्हणून रोगाचे नांव देखिल या डॉक्टरच्या नावाने पडले असावे असे म्हणतात.स्मृतिभ्रंशाच्या या आजारावर अद्याप कायमस्वरूपी स्वरूपाचा उपचार सापडलेला नाही.त्यामुळे अल्झायमरच्या सुरुवातीच्या काही लक्षणांची जाणीव असणे महत्त्वाचे आहे.रोगाचे लवकर निदान झाले तर त्याची लक्षणे कमी करता येऊ शकतात.

जर तुम्ही तुमच्या स्कूटरची किल्ली किंवा घराची किल्ली कुठे ठेवली हे सतत विसरत असाल किंवा अलीकडील घटना किंवा नवीन माहिती तुम्ही विसरत असाल,तर हे कदाचित तुमच्या विसराळूपणामुळे असेल.किंवा कदाचित,तुम्हाला अल्झायमर विकसित होण्याचा धोका असू शकतो.अल्झायमरची लक्षणे खालील प्रमाणे आहेत.  

स्वतःला व्यक्त करण्यात अडचण

तुम्हाला जर योग्य शब्द शोधण्यात खूप त्रास असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला अल्झायमर रोग आहे.पण तुम्हाला वाक्य पूर्ण करण्यात अडचण निर्माण होत असेल किंवा तुम्ही साधे शब्द विसरत असेल किंवा तुम्ही कुणाला चुकीच्या नावाने हाक मारत असाल,तुम्हाला तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना ओळखणे कठीण जात असेल,तर तुम्हाला अल्झायमरचा आजार होण्याचा धोका जास्त असतो.

दैनंदिन कामे पूर्ण करण्यात अडचण

तुमचे वॉशिंग मशीन कसे वापरायचे हे तुम्हाला आठवत नसेल,एवढेच काय तर तुम्ही दात कसे घासायचे ते विसरले असाल,तर ही अल्झायमरच्या सर्वात सुरुवातीच्या लक्षणे असू शकतात.तुमची नित्याची कामे करण्यात तुम्हाला अडचण जात असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.   

दिशाहीनता

अल्झायमरच्या प्रारंभिक लक्षणांपैकी एक म्हणजे दिशा विसरणे किंवा कोणता दिवस आहे हे विसरणे. ही लक्षणे आढळल्यास ती हलक्यात घेऊ नयेत आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

छोट्या छोट्या बेरीज वजाबाक्या करता न येणे   

            तुम्हाला जर साध्या साध्या बेरजा किंवा वजाबाक्या करण्यात जर त्रास होत असेल किंवा करता येत नसतील तर हे सुद्धा अल्झायमरच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे.

वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवणे

नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या वस्तू चुकीच्या पद्धतीने ठेवण्याची प्रवृत्ती जेव्हा विकसित होते जसे की  वॉशिंग मशीनमध्ये खरकटी भांडी किंवा डिशवॉशरमध्ये मळलेले कपडे टाकणे आणि मग ते कुठे ठेवलेत हे न आठवणे.ही अल्झायमरची लक्षणे असू शकतात.

आरशात स्वतःला न ओळखणे

आरशात स्वतःची प्रतिमा स्वतःला अनोळखी व्यक्तीची वाटणे हे अल्झायमरचे लक्षण असू शकते.

दृष्टी समस्या

वयाशी संबंधित दृष्टी कमी होणे आणि चष्मा घालावा लागणे हे सामान्य आहे. अल्झायमर असोसिएशन म्हणते तुम्हाला नजरेने अंतर मोजता येत नसेल किंवा रंग कोणता हे ओळखण्याची क्षमता तुम्ही गमावली असेल तर हे सामान्य नाही.या लक्षणांशिवाय सतत मूड बदलत रहाणे, एकटे रहाण्याची इच्छा होणे, व्यक्तिमत्वात होणारे बदल, कुठलेही काम करण्याचा उत्साह कमी होणे,स्वतःहून काहीही करावेसे न वाटणे,अंगातील ऊर्जा कमी होणे,थकवा वाटणे, समन्वय साधण्यात अडचणी येणे,मनात विचित्र विचित्र विचार येणे किंवा आयुष्यावरील नियंत्रण कमी झाल्याची भावना निर्माण होणे.हे जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला अल्झायमर आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

समारोप

          आपल्यात आढळून येणाऱ्या एखाद दुसऱ्या लक्षणामुळे आपल्याला तो रोग झाला आहे असे वाटून घेण्यात काही अर्थ नाही.तर त्याची अधिकाधिक लक्षणे किंवा साधारणपणे असामान्य वाटणारी लक्षणे जाणवणे असे झाल्यास आपला संशय दूर करून घेणे आवश्यक असते.कारण काही वेळा लोक मला अमुक एक अमुक रोग झाला आहे असे स्वतःच निदान करून घेऊन मग त्यावर चिंता करून आणखी एखाद्या मानसिक रोगास जन्म देत असतात.त्यापेक्षा डॉक्टरकडे जाऊन निदान करून घेणे आवश्यक असते. डॉक्टरने एकदा “तुम्हाला काहीही झालेले नाही” असे ठणकावून सांगितले की आपण निर्धास्त जगू शकतो.     

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 प्रसाद नातु, पुणे.

image courtesy.wikipedia 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...