Blog No.2024/021.
Date: -30th, January,2024.
मित्रांनो,
आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची 76 वी पुण्यतिथि.मी ब्लॉग लिहितांना राजकारणी लोकांना टाळायचं हा माझा निर्णय कटाक्षाने पाळतो. पण महात्मा गांधीं हे केवळ राजकारणी नव्हते.ते एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते.त्यामुळे त्यांची ओळख ही राजकारणी अशी नाहीच.त्यांच्यावर लोक कितीही टीका करोत त्यांचे स्वतंत्रता आंदोलनातील योगदान उल्लेखनीय होते,हे निश्चित.
सविस्तर
आजकाल आपल्या नेत्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत किंवा विचारांची लढाई हे
खूप वेळा ऐकायला मिळते.पण ठळकपणे मांडता येतील असे महात्मा गांधी यांचे विचार होते.Gandhian
Thoughts हा विषय सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजमधे अॅडमिशन मिळविण्यासाठी
घेण्यात येणाऱ्या पीएमटीमध्ये असायचा. असायचा यासाठी लिहिले कारण आताचे मला माहित नाही.
पण पूर्वी होता.
अहिंसेच्या
मार्गाने करण्यात येणारा सत्याग्रह ही महात्मा गांधीची राष्ट्राला दिलेली देणगी आहे
असेच म्हणावे लागेल.कारण जगात इतरत्र आपल्या मागण्यांसाठी होणारी हिंसक निदर्शने बघितली
की गांधीजीचे केवढे मोठे उपकार या देशावर आहेत हे लक्षात येते. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात
मराठा आरक्षणासाठी निघालेले 51 शांततापूर्ण मोर्चे हे त्याचेच प्रतीक होय.असहकार मग
तो संपाच्या रूपाने कां असेना,हे देखिल विशेषतः कामगार संघटनांच्या दृष्टीने एक महत्वाचे
हत्यार आहे.
महात्मा
गांधींची अहिंसा, सत्य, साधेपणा,
स्वावलंबन आणि करुणा ही तत्त्वे केवळ स्वराज्यपूर्व काळासाठी अशी प्रासंगिक
नव्हती तर आजही 21 व्या शतकात ती तेवढीच लागू होतात आणि आवश्यकही आहेत.
1. आजच्या डिजिटल युगात,केवळ हिंसा
म्हणजे शारीरिक नसून ती ऑनलाइन परस्परसंवादापर्यंत विस्तारलेली आहे.सायबर गुंडगिरी,ऑनलाइन छळवणूक आणि द्वेषयुक्त भाषणाचा प्रसार यामुळे अहिंसेसाठी नवीन
वचनबद्धतेची गरज आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेषयुक्त मेसेज पाठविणे हे देखिल हिंसेचे
प्रतीक आहे. त्यामुळे या युगात अहिंसेचे महत्व अधिक वाढलेले आहे.
2. आजकालच्या चुकीची माहिती पुरविण्याच्या जगात सत्यतेचे महत्व देखिल वाढलेले आहे.
कुठल्याही चुकीच्या माहितीची आणि खोट्या बातम्यांची सत्यता पडताळून न पहाता ती पुढे
फॉरवर्ड करण्याची वृत्ती पहाता सत्यतेचे महत्व वाढले आहे. सत्यतेचे मूल्य टिकवून
ठेवण्यासाठी माध्यम साक्षरता शिक्षण, गंभीर
विचार कौशल्ये आणि तथ्य-तपासणीचे (Fact Checking) उपक्रम आवश्यक झाले आहेत.
3. महात्मा गांधींच्या साधेपणाच्या कल्पनेला आजच्या भोगवादी संस्कृतीने छेद दिला आहे.शाश्वत
जीवन जगण्याच्या जागतिक चळवळीत साधेपणाला खूप महत्व प्राप्त झाले आहे.
4. स्वावलंबन:-आत्मनिर्भर भारत हे स्वावलंबनाच्या दिशेने उचललेले पाऊल होय.स्थानिक
व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याने आणि छोट्या व्यवसायांना मदत केल्याने स्वालंबनाचे
उद्दिष्ट गाठता येऊ शकेल.
5. करुणा:- करुणेच्या तत्वाने जाती पाती आणि धर्मामधील तेढ नष्ट करता येईल. परस्पर
करुणेची आज संघर्ष वाढलेल्या जगाला गरज आहे. करुणेच्या तत्वात परस्पर सामंजस्याने राहण्याची
आणि वागण्याची शिकवण सामावलेली आहेत. म्हणूनच मी म्हणतो की महात्मा गांधीची ही पाच
तत्वे ही ब्रिटिश काल किंवा स्वतंत्रतापूर्व काळासाठी म्हणजेच प्रासंगिक नसून ती सर्वकालिक
आहेत.
समारोप
आज
जगात रशिया आणि युक्रेन संघर्ष, इराण आणि पाकिस्तान संघर्ष,चीन आणि तायवान संघर्ष.
इस्राइल आणि हमास या हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अहिंसा आणि करुणेचा महात्मा गांधी
यांचा विचार किती महत्वाचा आहे हे दिसून येते.रोज टीव्ही वर एकमेकाविरुद्ध करण्यात
येणारी हिंसक आणि खोटी विधाने बघता महात्मा गांधी इथेच होऊन गेले कां हा विचार मनाला
शिवून जातो.त्यातल्या त्यात आत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या योजनेमुळे महात्मा
गांधीच्या स्वावलंबन या विचाराला पुढे नेण्याचे कार्य चालू हे पाहून बरे वाटते.
आज महात्मा गांधींची 76 वी पुण्यतिथी.त्या थोर विचारवंताला,थोर
स्वतंत्र सेनानी आणि थोर महापुरुषाला माझी विनम्र श्रद्धांजली.तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी
घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
महात्मा गांधींच्या विचारांची आज गरज भासू लागली आहे
ReplyDeleteAlthough I am die-hard supporter of the statesmanship shown by Acharya Chanakya, Chatrapati Shivaji Maharaj, warriors who created Maratha supremacy upto 1818, freedom struggle of1857, the astute diplomacy shown by Bal Gangadhar Tilak and the list will be incomplete without the mention of garland of so many revolutionaries and their Supreme sacrifice, I still respect some of the Gandhi an thoughts like Antyodaya programme.
ReplyDelete