Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

21 वे शतक आणि महात्मा गांधीचे विचार

 Blog No.2024/021. 

Date: -30th, January,2024.      

मित्रांनो,

            आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची 76 वी पुण्यतिथि.मी ब्लॉग लिहितांना राजकारणी लोकांना टाळायचं हा माझा निर्णय कटाक्षाने पाळतो. पण महात्मा गांधीं हे केवळ राजकारणी नव्हते.ते एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते.त्यामुळे त्यांची ओळख ही राजकारणी अशी नाहीच.त्यांच्यावर लोक कितीही टीका करोत त्यांचे स्वतंत्रता आंदोलनातील योगदान उल्लेखनीय होते,हे निश्चित. 

सविस्तर    

            आजकाल आपल्या नेत्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत किंवा विचारांची लढाई हे खूप वेळा ऐकायला मिळते.पण ठळकपणे मांडता येतील असे महात्मा गांधी यांचे विचार होते.Gandhian Thoughts हा विषय सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजमधे अॅडमिशन मिळविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या पीएमटीमध्ये असायचा. असायचा यासाठी लिहिले कारण आताचे मला माहित नाही. पण पूर्वी होता.

            अहिंसेच्या मार्गाने करण्यात येणारा सत्याग्रह ही महात्मा गांधीची राष्ट्राला दिलेली देणगी आहे असेच म्हणावे लागेल.कारण जगात इतरत्र आपल्या मागण्यांसाठी होणारी हिंसक निदर्शने बघितली की गांधीजीचे केवढे मोठे उपकार या देशावर आहेत हे लक्षात येते. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी निघालेले 51 शांततापूर्ण मोर्चे हे त्याचेच प्रतीक होय.असहकार मग तो संपाच्या रूपाने कां असेना,हे देखिल विशेषतः कामगार संघटनांच्या दृष्टीने एक महत्वाचे हत्यार आहे.    

            महात्मा गांधींची अहिंसा, सत्य, साधेपणा, स्वावलंबन आणि करुणा ही तत्त्वे केवळ स्वराज्यपूर्व काळासाठी अशी प्रासंगिक नव्हती तर आजही 21 व्या शतकात ती तेवढीच लागू होतात आणि आवश्यकही आहेत.

1.      आजच्या डिजिटल युगात,केवळ हिंसा म्हणजे शारीरिक नसून ती ऑनलाइन परस्परसंवादापर्यंत विस्तारलेली आहे.सायबर गुंडगिरी,ऑनलाइन छळवणूक आणि द्वेषयुक्त भाषणाचा प्रसार यामुळे अहिंसेसाठी नवीन वचनबद्धतेची गरज आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेषयुक्त मेसेज पाठविणे हे देखिल हिंसेचे प्रतीक आहे. त्यामुळे या युगात अहिंसेचे महत्व अधिक वाढलेले आहे.    

2.      आजकालच्या चुकीची माहिती पुरविण्याच्या जगात सत्यतेचे महत्व देखिल वाढलेले आहे. कुठल्याही चुकीच्या माहितीची आणि खोट्या बातम्यांची सत्यता पडताळून न पहाता ती पुढे फॉरवर्ड करण्याची वृत्ती पहाता सत्यतेचे महत्व वाढले आहे. सत्यतेचे मूल्य टिकवून ठेवण्यासाठी माध्यम साक्षरता शिक्षण, गंभीर विचार कौशल्ये आणि तथ्य-तपासणीचे (Fact Checking) उपक्रम आवश्यक झाले आहेत.

3.      महात्मा गांधींच्या साधेपणाच्या कल्पनेला आजच्या भोगवादी संस्कृतीने छेद दिला आहे.शाश्वत जीवन जगण्याच्या जागतिक चळवळीत साधेपणाला खूप महत्व प्राप्त झाले आहे.  

4.      स्वावलंबन:-आत्मनिर्भर भारत हे स्वावलंबनाच्या दिशेने उचललेले पाऊल होय.स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याने आणि छोट्या व्यवसायांना मदत केल्याने स्वालंबनाचे उद्दिष्ट गाठता येऊ शकेल.

5.      करुणा:- करुणेच्या तत्वाने जाती पाती आणि धर्मामधील तेढ नष्ट करता येईल. परस्पर करुणेची आज संघर्ष वाढलेल्या जगाला गरज आहे. करुणेच्या तत्वात परस्पर सामंजस्याने राहण्याची आणि वागण्याची शिकवण सामावलेली आहेत. म्हणूनच मी म्हणतो की महात्मा गांधीची ही पाच तत्वे ही ब्रिटिश काल किंवा स्वतंत्रतापूर्व काळासाठी म्हणजेच प्रासंगिक नसून ती सर्वकालिक आहेत.          

समारोप      

                  आज जगात रशिया आणि युक्रेन संघर्ष, इराण आणि पाकिस्तान संघर्ष,चीन आणि तायवान संघर्ष. इस्राइल आणि हमास या हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अहिंसा आणि करुणेचा महात्मा गांधी यांचा विचार किती महत्वाचा आहे हे दिसून येते.रोज टीव्ही वर एकमेकाविरुद्ध करण्यात येणारी हिंसक आणि खोटी विधाने बघता महात्मा गांधी इथेच होऊन गेले कां हा विचार मनाला शिवून जातो.त्यातल्या त्यात आत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या योजनेमुळे महात्मा गांधीच्या स्वावलंबन या विचाराला पुढे नेण्याचे कार्य चालू हे पाहून बरे वाटते.

      आज महात्मा गांधींची 76 वी पुण्यतिथी.त्या थोर विचारवंताला,थोर स्वतंत्र सेनानी आणि थोर महापुरुषाला माझी विनम्र श्रद्धांजली.तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु, पुणे.   

                 


Comments

  1. महात्मा गांधींच्या विचारांची आज गरज भासू लागली आहे

    ReplyDelete
  2. Although I am die-hard supporter of the statesmanship shown by Acharya Chanakya, Chatrapati Shivaji Maharaj, warriors who created Maratha supremacy upto 1818, freedom struggle of1857, the astute diplomacy shown by Bal Gangadhar Tilak and the list will be incomplete without the mention of garland of so many revolutionaries and their Supreme sacrifice, I still respect some of the Gandhi an thoughts like Antyodaya programme.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...