Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार-योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान

Blog No.2024/017. 

Date: -26th, January,2024.      

मित्रांनो,

            एवढ्यातच म्हणजे 24 जानेवारीला केंद्र सरकारने बिहारचे भूतपूर्व मुख्यमंत्री,जननायक म्हणून प्रसिद्धीस पावलेले स्व.कर्पूरी ठाकूर यांना भारत सरकारचा सर्वोच्य नागरी सन्मान “भारतरत्न” (मरणोत्तर)  प्रदान करण्याचे घोषित करण्यात आले.1988 साली निर्वतलेले कर्पूरी ठाकूर,त्यानंतर जन्मलेल्या पिढीस माहित असणे थोडे अशक्यच पण सर्वसामान्य भारतीयांना त्यांची कितपत ओळख आहे माहित नाही.पण त्यांना हा सर्वोच्य सन्मान दिला जातो आहे कारण त्यांचे कार्यही त्या तोडीचे निश्चितपणे आहे.आज भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा.आज आपण स्व. कर्पूरी ठाकूर यांना जाणून घेऊ या. 

प्रास्ताविक

            महाराष्ट्र,देशातील इतर राज्यांचे तुलनेने एक पुढारलेले राज्य.पण भारताच्या उत्तरेकडील राज्ये अजूनही सामाजिक दृष्ट्या तेवढी प्रगत नाही.एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो.गोष्ट आहे 1980 सालची.म्हणजे 44 वर्षापूर्वीची.माझे काका मध्यप्रदेशातील सतना या गांवी रहात होते.चुन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले हे शहर मध्य रेल्वेच्या जबलपूर आणि अलाहाबाद (तेव्हाचे) यामध्ये लागत असे.त्यांचे क्वार्टर मूळ सतन्यापासून 8-10 किमी दूर होते.एक छोटेसे खेडेच होते ते.माझ्या काकांना गावात किंवा त्या कॉलनीत पंडित म्हणत असतं.मी त्यांच्या सोबत संध्याकाळी फिरायला बाहेर पडत असे. तेव्हा गावातले सगळे लोक “पाय लागू पंडितजी” म्हणत त्यांच्या पाया पडत,लहान थोर सारेच.मला खूप अभिमान वाटला काकांचा.पण पुढे पुढे मी काकांचा पुतण्या आहे म्हटल्यावर लोक माझ्याही पाया पडू लागले.लहानांचे एक वेळ ठिक पण माझ्यापेक्षा मोठे जेव्हा तो प्रयत्न करत,तेव्हा मी नही नही म्हणत दूर पळत असे.घरात काम करणाऱ्या मावशीला किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या भाजीवाल्यास अहो जाहो करणारा मी तसे करू देणे शक्य नव्हते.पण माझ्या लक्षात आले की तो मान माझ्या काकांना किंवा मला नसून माझ्या जातीला होता.हे सारे पटणारे नव्हते.  

            मनात आलं की सतन्यास ही परिस्थिती असेल तर सतन्याहून 500 किमी दूर असलेल्या बिहारमध्ये काय परिस्थिती असेल?कारण मध्यप्रदेश त्यातल्या त्यात बऱ्यापैकी प्रगत.त्याचे उत्तर तेव्हा काकांनी दिले होते. ते म्हणाले की बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर यांच्यामुळे मागासलेल्या लोकांना आवाज मिळाला,ओळख मिळाली. ते दोन वेळा,आधी डिसेंबर 1970 ते जून 1971 आणि नंतर जून 1977 ते एप्रिल 1979 असे दोनदा मुख्यमंत्री होते. कर्पूरी ठाकूर यांनी,1978 मध्ये, बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी 26% आरक्षण मॉडेल सादर केले.त्याचे सूत्र असे होते.या आरक्षणाच्या व्यवस्थेत इतर मागासवर्गीयांना 12%, अतिमागास वर्गाला 8%, स्त्रियांना 3%,आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBWs) उच्च जातींमधील लोकांना राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये 3% आरक्षण मिळाले.इतर मागासवर्गीयांना आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBWs) उच्च जातींमधील लोकांना राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारे ते पहिले मुख्यमंत्री आणि बिहार हे पहिले राज्य आहे.आज IAS आणि IPS चे दिसणारे प्रमाण याचे बऱ्यापैकी श्रेय कर्पूरी ठाकूर यांना जाते.       

समारोप

            यावर्षी म्हणजे स्व. कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून,त्यांच्या जयंतीला हा भारत सरकारचा सर्वोच्य नागरी सन्मान “भारतरत्न” (मरणोत्तर) त्यांना जाहीर करण्यात आला आणि बहुदा तो आज प्रदान केला जाईल.केंद्र सरकारने आणि नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हा पुरस्कार जाहीर करून मास्टर स्ट्रोक खेळल्याचे म्हटले जाते आहे.ते काही ही असो.पण ज्यांनी इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBWs) उच्च जातींमधील लोकांना राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचे महत्वाचे काम केले.अशा योग्य आणि देशाच्या खऱ्याखुऱ्या नेत्यास हा पुरस्कार दिला जातो आहे,याचा आनंद होतो आहे.आणि यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रशंसेचे धनी आहेत.     

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु, पुणे.

image courtesy Wikipedia


Comments

  1. Nice blog.. Right person selected for the Bharat Ratna. Leader of the masses

    ReplyDelete
  2. Karpuri Thakur, great leader and then CM of Bihar state had been awarded Bharat Ratna award 2024.This is a great honour to the leader of obcs and other people of poor category.Vinmra Abhivadan to Karpuri Thakur
    Anant Mise, Bengaluru

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...