Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेताय?

 Blog No.2024/020. 

Date: -29th, January,2024.     

मित्रांनो,

            भारतीय विद्यार्थी आणि कोचिंग क्लासेस यांचे आजकाल एक घट्ट नाते झाले आहे.हे पूर्वी नव्हते असे नाही. पण आजकाल पालकांना देखिल असे वाटते की,आपल्या मुलाला आपण कोचिंग क्लासेसमध्ये घातले नाही याचा अर्थ आपण मुलाचे नुकसान करत आहोत किंवा आपण अगदीच जुन्या आणि मागास विचारांचे आहोत.पण तुम्हाला माहिती आहे की भारताच्या कोचिंगच्या राजधानीत म्हणजे राजस्थानातील कोटा येथे  2023 मधे एकूण 26 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.म्हणजे सरासरी दोन आठवड्यामागे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली.आता केंद्र सरकारने यात लक्ष घातले आहे.त्या बाबत सविस्तर पाहू आजच्या ब्लॉगमध्ये. 

सविस्तर

गेल्या आठवड्यातच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोचिंग सेंटर्सना त्याच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.ही मार्गदर्शक तत्वे काय आहेत हे पाहण्याआधी आपण हे बघूया की कोटा येथील कोचिंग सेंटर्सचे प्रकरण केव्हापासून आणि त्यानंतर ते इतरत्र कसे विस्तारले.बहुदा 1980 च्या दशकात कोटा येथे बन्सल क्लासेस सुरु झाले. (अर्थात या बद्दल त्यांना दोषी धरता येणार नाही) एका माजी इंजीनियरने आपल्या प्रकृतीच्या कारणाला कंटाळून आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन आपले कौशल्य विद्यार्थ्यांना देण्यासाठी आणि त्यांना स्पर्धा परीक्षांना तयार करण्यासाठी खाजगी शिकवणी वर्ग घेणे सुरु केले.त्याचे कौशल्य आणि शिकविण्याची पद्धत असेल की ज्यामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास होऊन चांगल्या नोकऱ्या पदरात पाडून घेऊ लागले.बन्सल क्लासेसचे 2012 पर्यन्त इतकी प्रगती झाली की त्यांची 8 मजली इमारत झाली.त्यांनी वार्षिक ₹100 कोटींहून अधिक कमाई केली होती.   

हे यश इतर विद्यार्थ्यांना आकर्षित करत होते.पालकांना असा विश्वास वाटू लागला की अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय पदवी मिळवली की मुलांच्या जीवनाची सुरुवात चांगली होईल.खरं तर ही स्पर्धा वेडेपणाची होती. 2022 मध्ये वैद्यकीय कॉलेजचे प्रवेशद्वार असलेल्या NEET परीक्षेसाठी,18 लाख विद्यार्थ्यांनी 92,000 जागांसाठी स्पर्धा केली होती.त्यामुळे कोचिंग सेंटर्सनी आपल्या फीमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली.त्यात त्यांचा हव्यास वाढल्यामुळे त्यांनी ‘फाऊंडेशन कोर्सेस’ सुरू केले. 12 वर्षांपेक्षा कमी वयाचे विद्यार्थी जे सहाव्या इयत्तेच्या आसपास होते त्यांना शिकवणे सुरु केले.पालकही या मोहजाळात फसत गेले.पण मग या मुलांच्या नियमित शाळेचे काय? तर अनेक प्रकरणांमध्ये कोचिंग सेंटर्सची शाळांशी छुपी हातमिळवणी होती. त्या मुलांच्या शाळा त्यांना शाळेत न येता देखिल दहावी आणि बारावीच्या सार्वजनिक परीक्षांना बसू देऊ लागल्या.कोचिंग सेंटर्स अर्ध-शाळा बनली. आणि उद्योग तेजीत आला. हा गोरखधंदा ६०,००० कोटीं पर्यन्त वाढला. 

            मग हे कोचिंग क्लासेस सर्वत्र सुरु झाले.या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये त्याच विद्यार्थ्यांना राहायची सोय उपलब्ध करून देण्यात येते. ज्याची रॅंक इतरांपेक्षा चांगली आहे.याचा त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो. काही कोचिंग क्लासेस निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देतांना सुरक्षा नियमांकडे लक्ष देत नाही.काही वर्षांपूर्वी सुरतमधील एका कोचिंग सेंटरला आग लागून 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.या इमारतीत टेरेसवर बेकायदेशीर बांधकाम होते,लाकडी जिने, अग्निशामक साधने नव्हती असे कळते.या सर्व कारणांमुळे शेवटी सरकारला हस्तक्षेप करण्याची गरज वाटली. 

कोचिंग क्लासेससाठी मार्गदर्शक तत्त्व

1.       खाजगी कोचिंग सेंटर्स पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकणार नाहीत.

2.       पालक/विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये नावनोंदणी करण्यासाठी संस्था त्यांना दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकणार नाहीत..

3.       कोचिंग सेंटर 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकणार नाहीत. या केंद्रांमध्ये सामील होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांची 10वी-इयत्ता परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

4.       प्रशिक्षण संस्था कोणत्याही दाव्यासंबंधी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करू शकणार नाहीत.

5.       कोचिंग सेंटरकडे शिक्षकांच्या पात्रतेची अद्ययावत माहिती असलेली वेबसाइट असेल.त्यांच्या वेबसाइटवर अभ्यासक्रम/अभ्यासक्रम, यशाचा कालावधी, वसतिगृह सुविधा (असल्यास), शुल्क, त्रास-मुक्त धोरण इत्यादी तपशीलांचा समावेश आहे.

6.       संस्थेचे कोचिंग वर्ग त्यांच्या शाळांच्या तासांच्या कालावधीत चालवले जाणार नाहीत.

7.       अभ्यासक्रमांसाठी आकारले जाणारे कोचिंग शुल्क परवडणारे असले पाहिजे.आकारलेल्या शुल्काच्या पावत्या उपलब्ध करून द्याव्या लागतात. कोचिंग सेंटरला विविध अभ्यासक्रमांच्या शुल्काचा दाखला देऊन प्रॉस्पेक्टस जारी करणे आवश्यक आहे. प्रॉस्पेक्टसमध्ये प्रशिक्षकांची संख्या आणि इतर सर्व तपशील देखील समाविष्ट आहेत.

8.       कोचिंग सेंटरचे बांधकाम संरक्षण संहिता,बिल्डिंग सेफ्टी कोड आणि इतर मानकांचे पालन करेल आणि सरकारने ठरवल्यानुसार योग्य संस्थांकडून फायर आणि बिल्डिंग सेफ्टी प्रमाणपत्र प्राप्त करावे लागेल.

9.       विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी, कोचिंग सेंटरमध्ये प्रथमोपचार किट आणि वैद्यकीय मदत/उपचार सुविधा असेल.

10.  रुग्णालये, आपत्कालीन सेवांसाठी डॉक्टर, पोलिस हेल्पलाइन माहिती, अग्निशमन सेवा हेल्पलाइन, मुलींची हेल्पलाइन आणि इतर अनेक यासारख्या संदर्भ सेवांची सूची. प्रदर्शित केले जातील, आणि विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल माहिती असेल.

11.  शिक्षण केंद्राचे बांधकाम पूर्णपणे विद्युतीकरण आणि हवेशीर असावे आणि इमारतीच्या प्रत्येक वर्गात पुरेशी प्रकाशाची व्यवस्था केली जाईल.

12.  सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि पिण्यायोग्य पिण्याचे पाणी उपलब्ध असेल.

13.  कोचिंग सेंटरमध्ये आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असले पाहिजेत आणि संरक्षण व्यवस्थित ठेवले पाहिजे.

समारोप

         केंद्र सरकारने जरी ही मार्गदर्शक तत्वे ठरवून दिली असली तरी,त्या तत्वानुसार हे कोचिंग क्लासेस काम करत आहेत की नाही,हे तपासून पाहिल्याशिवाय आपल्या पाल्याला अशा कोचिंग क्लासेस मधे प्रवेश घेऊन द्यायचा की नाही हे शेवटी पालकांना निश्चित करायचे आहे. केवळ एखाद्या कोचिंग क्लासचे नांव चांगले आहे म्हणून जर पालक या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतील तर केंद्र सरकार काय कुणीच काही करू शकणार नाही. तेव्हा योग्य खबरदारी घ्या.  

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु, पुणे.    

Comments

  1. The basic question is why we need coaching classes and guides? What our students need is good books. At least the student must read one his choice of book picked him choice of book out of 5 prescribed books on say 3 subjects of his choice and present an essay /post with limit set on word limit. A competition should be arranged on this without any marks system and prizes should be given in each category. The student must express his thoughts. At the end the awardee should be subjected to an assessment interview, to check whether these are his thoughts.
    This will ensure personality development, pleasure, Joy and importantly these are his thoughts
    All round development

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...