Skip to main content

Posts

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

हौसेला मोल नसतं.

नानासाहेब नुकतेच एका सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते.सेवानिवृत्तीच्या वेळेस ते चीफ इंजीनियर , पाटबंधारे विभाग,पश्चिम महाराष्ट्र विभाग होते.सेवानिवृत्त झाल्यावर provident फंड, अर्जित सुटयांचे रोखीकरण आणि ग्रॅच्युटी मिळून जवळपास एक करोंड एवढी रक्कम मिळाली होती.त्यांच्या वडिलांची जयसिंगपूर जवळ 17 एकर शेती होती.उस हे रोखीचे पीक.नानासाहेबांना एकच बहीण होती.तिचे पती संजय हे एका साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.त्यामुळे शेतीचे उत्पन्न सगळे नानासाहेबांच्या खाती जमा होत असे. त्यांचा मुलगा अमर एका एम.एन.सी, आय.टी.कंपनीत नोकरीला होता. त्यालाही तगडा पगार. त्याचे लग्न झाले होते.त्याची बायको अपूर्वा देखील एका एम.एन.सी आय.टी.कंपनीत नोकरीला. मुलीचे प्राचीचे मिस्टर सौरव हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते.जबलपूरला.   ही सर्व पार्श्वभूमी सांगायचे कारण हेच की त्यांच्या पैशाला कुणी दावेदार नव्हता.ना ते कुणावर अवलंबून.त्यांच्या पत्नीची,विद्याताईंची परदेश वारीची इच्छा होती. ती त्यांनी पहिल्याच महिन्यात पूर्ण केली.मोठ्या पदावर होते.त्याचा फायदा घेऊन त्यांनी पासपोर्ट,व्हिसा अगदी सगळे जमवून आण...

कोविड 19 , एम.एस एम. ई.उद्योग आणि वारश्याचे नियोजन (Succession Planning )

  मित्रांनो ,  आपण सगळेच जाणता आहात कि , कोविड 19 ने अखिल जगताला कसे आणि किती नुकसान पोहोचवले आहे.जीवित हानी तर झालीच. पण अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत.जागतिक अर्थव्यवस्थेला ह्याचा खूप मोठा धक्का बसला.आपला भारत देश ह्या जगाचाच हिस्सा किंवा भाग आहे.त्यामुळे भारताची देखील अपरिमित हानी झाली.अर्थ व्यवस्थेला खीळ बसली.भारत हा सामान्यतः सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांनी व्यापलेला देश.   भारताच्या एकूण जी डी पी च्या 36.9%  इतके योगदान सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांचे (उत्पादन क्षेत्र ) 2020-21 ह्या कालखंडाचा विचार करता होते.तेच निर्यातीत ह्याच कालखंडात 49.5% सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांचे राहिले आहे.जवळपास 15 करोंड लोकांना सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.(सौजन्य सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय , केंद्र सरकार) ह्याच कालखंडात मजुरांच्या   स्थलांतरांचा विषय ऐरणीवर आला.हे    स्थलांतर केलेले मजूर आपल्या गांवी परतले.पण नंतर सगळे कामावर हजर झाले नाहीत किंवा ते अनेक कौटुंबिक समस्यांमुळे कामावर परतू शकले नाहीत.जसे घराकडील...

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ

  नमस्कार मित्रांनो ,  कधी कधी आपल्याला एखादे गाणं म्हणा ,  गझल म्हणा खूप आवडतं असतं. आपल्याला गाण्याचे थोडे जरी अंग असेल तर आपण ते गाणं म्हणून पहातो किंवा नेहमी म्हणत असतो. हिन्दी किंवा मराठी गाणी तशी समजायला सोपी असतात. एखादेच काव्य दुरबोध असेल तर ते थोडेसे समजायला कठीण असतं. पण असं फार कमी वेळा होतं. पण हिन्दी गझल मधे कधी कधी उर्दू शब्द असतात आणि ते आपण समजून न घेता ,  गायकाचा आवाज  , चाल  , ताल  , लय ऐकून त्या गझल मधील त्या शब्दांचा अर्थ समजावून घेण्याच्या भानगडीत पडत नाही.   आज आपण एका अशाच गझलचा अर्थ समजावून घेणार आहोत. ती गझल आहे. "रंजीश ही  सही दिलही दुखाने के लिए आ" ह्या गझलचा अर्थ समजावून घेऊ या.   मी दोन ओळी आणि त्या नंतर त्याचा मराठीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. माणसाला जन्माला आल्यावर , जवळपास सगळ्याच गोष्टींची पहिल्यांदा सुरुवात करावीच लागते.नंतर ती अंगवळणी पडत असते. तर पाहू या.   रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ आ फिर से मुझे छोड के जाने के लिए आ   आपल्यात शत्रुत्व असो तरी म...

गुजरा जमाना

हमे तो अब भी आज निवांत बसलो असतांना गुलाम अलींची एक गझल आठवली. लग्न व्हायचं होतं.मुली सांगून येत होत्या. पहात होतो.पसंतीस येत नव्हत्या, कधी आईच्या कधी माझ्या. कमी कुणातच काही नसायचं पण ती आपल्या जाणीवातील कमी असायची.गझल खुप म्हणत असे मी तेव्हा. तर ही गझल  "हमे तो अब भी वो गुजरा जमाना याद आता है. तुम्हे भी क्या कभी कोई दिवाना याद आता है" ची गोष्ट मला आठवली. माझी काॅलेज मधे एक मैत्रिण होती.माझ्या गाण्यांना ती भरभरुन दाद देत असे. काॅलेजमधे तर अगदी एखाद्या गोष्टीत एकवाक्यता झाली की "त्रिशूल" मधला "आपके और मेरे खयालात कितने मिलते जुलते है"  हा शशी कपूरने हेमामालिनीस म्हटलेला डाॅयलाॅग आपल्याच साठी असं वाटत असे. मला असं वाटायचं कि ही आपल्या गाण्याला अगदी मनापासून म्हणजे त्यातला अर्थ समजून दाद देते आहे. म्हणून मुली पसंत पडत नसतांना मी एक दिवस ही गझल कागदावर पूर्ण उतरवून घेतली. बरं गंमत अशी असते की इतर वेळेस एखाद्यास तू वेडा आहेस का असे म्हटल्यावर प्रचंड रागावतो तो. पण तोच व्यक्ती तू तिच्या प्रेमांत वेडा झाला आहेस म्हटलं कि अगदी लाजतो त्याच्या अंगावर रोमांच उभे रहा...

विठ्ठल दर्शन

रोज रोजच व्हावे,  मज विठ्ठल दर्शन चरणी मस्तक ठेवावे,  व्हावे कृतार्थ हे मन रोज रोज अर्पावा,  त्यास प्राजक्ताचा हार गळ्यामध्ये शोभे त्याच्या, बघा मौक्तिकाची सर. हळद कुंकू बुक्या ने, त्याचा मळवट भरवावा. भरजरी पितांबर,   त्याच्या मग कटी नेसवावा. पंचारती ने मग त्यास,  ओवाळावे आळवावे. पांडुरंगाचे हे रुप,  सदा मनी हो वसावे.

गणेश भजन

Blog No.2023/246 Dated 21-09-2023.  मित्रांनो,           साधारणतः 25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आमच्या कडे फक्त दिड दिवसांचा गणपती असतो. पहिल्या दिवशी  आरती आटोपल्यावर जेवण आटोपून आम्ही गप्पा मारत बसलो. आणि रात्री मला जाग आली. एक गणपतीचे स्तुतिपर गीत मला सुचले.           मी धडपडत उठलो. एक वही आणि पेन घेतला. स्फुरलेले गीत लिहून काढले. दोन कडवी सुचली होती. ती लिहून काढली. त्या नंतर मी त्यात कडवी जोडायचा प्रयत्न केला, पण सुचल्या नाहीत. ती   गणेश स्तुति मी आज येथे पोस्ट करत आहे. त्याला त्याचं वेळा मला त्याची चाल सुचली.  गणपती स्तुती                तुझ्या सारखा तू गणराया  तुझी प्रार्थना येई फळा. देतो विद्या सकळासी तू देई सुख शांती सकळा  !! विद्यापती तू मंगलमुर्ती  नाम तुझे रे सदैव ओठी. विद्याची गर लाभता  येईल संगती ती चपळा !1! नामाचे तव महात्म्य इतुके जळून जातील सर्व पातके. सुखःकर्ता तू दिन दुबळ्यांसी दुष्ट कापती चळाचळा !2! रचनाकार@ प्रसाद नातु

कविता संग्रह वाचन

कविता संग्रह आजकाल  कुणी वाचत की नाही  माहित नाही.  पण मी आज वाचून काढला. ज्याचे नांव आहे "तुझे गीत गाण्यासाठी". सुप्रसिध्द कवी मंगेश पाडगांवकर यांचा हा कविता संग्रह. कवितेचे रूप ,स्वरूप आणि अंतरंग वेगवेगळे असते.  या कवितासंग्रहात एकूण 104 कविता आहेत. यातील 30 कवितांना माझ्या माहिती प्रमाणे स्वरसाज चढवून त्यांचे गाण्यांत रूपांतर करण्यांत आले आहे. ही गाणी बहुतेक सर्वांना माहित आहे.  "तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे या" गीताने त्यांनी कविता संग्रहाची सुरूवात केली आहे. हे गाणे सुधीर फडकेंनी अजरामर केले. तर "माझे जीवन गाणे व्यथा असो आनंद असू दे" या पं. जितेंद्र अभिषेकीनी गाईलेल्या गीताने समारोप. पाडगांवकरांचे वैशिष्ठ हे की त्यांनी प्रेम गीत असो, विराणी असो. भक्तीगीत वा गझल वा युगुल गीत असो  सर्वाना न्याय दिला. कवितेच्या कुठल्याही प्रकारात त्यांचे शब्द कमी पडले नाहीत यातच त्यांचे मोठेपण जाणवते. या कविता संग्रहात "श्रावणांत घननिळा मध्ये एका कडव्यांत पाडगांवकर म्हणतात 'गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा' किंवा 'लाजून हासणे अन् हासून ते पहाणे...