ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
आज निवांत बसलो असतांना गुलाम अलींची एक गझल आठवली. लग्न व्हायचं होतं.मुली सांगून येत होत्या. पहात होतो.पसंतीस येत नव्हत्या, कधी आईच्या कधी माझ्या. कमी कुणातच काही नसायचं पण ती आपल्या जाणीवातील कमी असायची.गझल खुप म्हणत असे मी तेव्हा. तर ही गझल
"हमे तो अब भी वो गुजरा जमाना याद आता है.
तुम्हे भी क्या कभी कोई दिवाना याद आता है" ची गोष्ट मला आठवली. माझी काॅलेज मधे एक मैत्रिण होती.माझ्या गाण्यांना ती भरभरुन दाद देत असे. काॅलेजमधे तर अगदी एखाद्या गोष्टीत एकवाक्यता झाली की "त्रिशूल" मधला "आपके और मेरे खयालात कितने मिलते जुलते है" हा शशी कपूरने हेमामालिनीस म्हटलेला डाॅयलाॅग आपल्याच साठी असं वाटत असे. मला असं वाटायचं कि ही आपल्या गाण्याला अगदी मनापासून म्हणजे त्यातला अर्थ समजून दाद देते आहे. म्हणून मुली पसंत पडत नसतांना मी एक दिवस ही गझल कागदावर पूर्ण उतरवून घेतली. बरं गंमत अशी असते की इतर वेळेस एखाद्यास तू वेडा आहेस का असे म्हटल्यावर प्रचंड रागावतो तो. पण तोच व्यक्ती तू तिच्या प्रेमांत वेडा झाला आहेस म्हटलं कि अगदी लाजतो त्याच्या अंगावर रोमांच उभे रहातात.हे वाक्य अगदी वारंवार म्हणावे असे त्याला वाटते.
तर ही गझल तिला पूर्णपणे लिहून पाठविली. मला तर जुने दिवस अजूनही आठवताहेत. तुला कुणा दिवान्याची आठवण आहे का? येतेय का?. 8 दिवसानी तिचे पत्र आले. त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने "वडा केला किंवा पचका केला" याचा काय अर्थ होतो ते कळले. तिचे पोस्ट कार्ड आले. तिने लिहीले होते. गझल छान आहे. कुणी लिहीली आहे रे?
माझ्या मनांत अगदी आलं होतं की तिला लिहावं तुला काय करायचयं गं कुणी लिहीली आहे ते. तू हे बघ ना की ही मी तुला कशासाठी पाठवली आहे. यशवंत देव सरांची क्षमा मागून लिहीतोय.
शब्द प्रधान गायकी ठिक आहे हो. पण समोरच्याने/समोरचीने अर्थासकट ऐकली/वाचली पाहिजे ना.
Comments
Post a Comment