ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...
आज निवांत बसलो असतांना गुलाम अलींची एक गझल आठवली. लग्न व्हायचं होतं.मुली सांगून येत होत्या. पहात होतो.पसंतीस येत नव्हत्या, कधी आईच्या कधी माझ्या. कमी कुणातच काही नसायचं पण ती आपल्या जाणीवातील कमी असायची.गझल खुप म्हणत असे मी तेव्हा. तर ही गझल
"हमे तो अब भी वो गुजरा जमाना याद आता है.
तुम्हे भी क्या कभी कोई दिवाना याद आता है" ची गोष्ट मला आठवली. माझी काॅलेज मधे एक मैत्रिण होती.माझ्या गाण्यांना ती भरभरुन दाद देत असे. काॅलेजमधे तर अगदी एखाद्या गोष्टीत एकवाक्यता झाली की "त्रिशूल" मधला "आपके और मेरे खयालात कितने मिलते जुलते है" हा शशी कपूरने हेमामालिनीस म्हटलेला डाॅयलाॅग आपल्याच साठी असं वाटत असे. मला असं वाटायचं कि ही आपल्या गाण्याला अगदी मनापासून म्हणजे त्यातला अर्थ समजून दाद देते आहे. म्हणून मुली पसंत पडत नसतांना मी एक दिवस ही गझल कागदावर पूर्ण उतरवून घेतली. बरं गंमत अशी असते की इतर वेळेस एखाद्यास तू वेडा आहेस का असे म्हटल्यावर प्रचंड रागावतो तो. पण तोच व्यक्ती तू तिच्या प्रेमांत वेडा झाला आहेस म्हटलं कि अगदी लाजतो त्याच्या अंगावर रोमांच उभे रहातात.हे वाक्य अगदी वारंवार म्हणावे असे त्याला वाटते.
तर ही गझल तिला पूर्णपणे लिहून पाठविली. मला तर जुने दिवस अजूनही आठवताहेत. तुला कुणा दिवान्याची आठवण आहे का? येतेय का?. 8 दिवसानी तिचे पत्र आले. त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने "वडा केला किंवा पचका केला" याचा काय अर्थ होतो ते कळले. तिचे पोस्ट कार्ड आले. तिने लिहीले होते. गझल छान आहे. कुणी लिहीली आहे रे?
माझ्या मनांत अगदी आलं होतं की तिला लिहावं तुला काय करायचयं गं कुणी लिहीली आहे ते. तू हे बघ ना की ही मी तुला कशासाठी पाठवली आहे. यशवंत देव सरांची क्षमा मागून लिहीतोय.
शब्द प्रधान गायकी ठिक आहे हो. पण समोरच्याने/समोरचीने अर्थासकट ऐकली/वाचली पाहिजे ना.
Comments
Post a Comment