ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
आज निवांत बसलो असतांना गुलाम अलींची एक गझल आठवली. लग्न व्हायचं होतं.मुली सांगून येत होत्या. पहात होतो.पसंतीस येत नव्हत्या, कधी आईच्या कधी माझ्या. कमी कुणातच काही नसायचं पण ती आपल्या जाणीवातील कमी असायची.गझल खुप म्हणत असे मी तेव्हा. तर ही गझल
"हमे तो अब भी वो गुजरा जमाना याद आता है.
तुम्हे भी क्या कभी कोई दिवाना याद आता है" ची गोष्ट मला आठवली. माझी काॅलेज मधे एक मैत्रिण होती.माझ्या गाण्यांना ती भरभरुन दाद देत असे. काॅलेजमधे तर अगदी एखाद्या गोष्टीत एकवाक्यता झाली की "त्रिशूल" मधला "आपके और मेरे खयालात कितने मिलते जुलते है" हा शशी कपूरने हेमामालिनीस म्हटलेला डाॅयलाॅग आपल्याच साठी असं वाटत असे. मला असं वाटायचं कि ही आपल्या गाण्याला अगदी मनापासून म्हणजे त्यातला अर्थ समजून दाद देते आहे. म्हणून मुली पसंत पडत नसतांना मी एक दिवस ही गझल कागदावर पूर्ण उतरवून घेतली. बरं गंमत अशी असते की इतर वेळेस एखाद्यास तू वेडा आहेस का असे म्हटल्यावर प्रचंड रागावतो तो. पण तोच व्यक्ती तू तिच्या प्रेमांत वेडा झाला आहेस म्हटलं कि अगदी लाजतो त्याच्या अंगावर रोमांच उभे रहातात.हे वाक्य अगदी वारंवार म्हणावे असे त्याला वाटते.
तर ही गझल तिला पूर्णपणे लिहून पाठविली. मला तर जुने दिवस अजूनही आठवताहेत. तुला कुणा दिवान्याची आठवण आहे का? येतेय का?. 8 दिवसानी तिचे पत्र आले. त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने "वडा केला किंवा पचका केला" याचा काय अर्थ होतो ते कळले. तिचे पोस्ट कार्ड आले. तिने लिहीले होते. गझल छान आहे. कुणी लिहीली आहे रे?
माझ्या मनांत अगदी आलं होतं की तिला लिहावं तुला काय करायचयं गं कुणी लिहीली आहे ते. तू हे बघ ना की ही मी तुला कशासाठी पाठवली आहे. यशवंत देव सरांची क्षमा मागून लिहीतोय.
शब्द प्रधान गायकी ठिक आहे हो. पण समोरच्याने/समोरचीने अर्थासकट ऐकली/वाचली पाहिजे ना.
Comments
Post a Comment