Blog No.2024/230
Date :-29th, September,2024.
मित्रांनो,
आज मला फेसबुकवर एक रिमाइंडर आलं. त्यावरून
किशोरकुमारचं एक गाणं आठवलं. कोविड-19 चा खूप फैलाव झाला होता. फार काही पॉजिटिव्ह गोष्टी
कानावर येत नव्हत्या. माझ्या बँकेतल्या काही सहकाऱ्यांचे निधन झाल्याच्या बातम्या येत होत्या. कोविड-19 संपेल की नाही आणि अजून
किती लोकांना सोबत घेऊन जाणार असं वाटतं असतांना हे एक सकारात्मक गाणं मी म्हटलं
आणि फेसबुकवर पोस्ट केलं.किती सुंदर अर्थ आहे या गाण्याचा.बऱ्याचदा,अशी गाणी मनाला उभारी देऊन जातात.आज आठवलं म्हणून त्यावर ब्लॉग लिहितोय.
प्रास्ताविक
एप्रिल,1979 ला “बातों बातोंमे” हा एक हल्के
फूल्के मनोरंजन करणारा बासु चटर्जी यांचा चित्रपट आला होता. अमोल पालेकर आणि टीना
मुनीम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात डेव्हिड, पर्ल पदमसी, असराणी आणि रणजीत चौधरी यांच्या सहाय्यक
भूमिका होत्या. त्याच्यातील चारही गाणी खूप गाजली. “सुनिये कहिये”, “ना बोले तुम न मैने कुछ कहाँ”, “उठे सबके कदम
देखो रम पम पम” आणि “कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे” ही ती चार
गाणी.यातल्या “कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे” या गाण्याबद्दल
मी बोलत होतो. किशोरकुमारनी गायलेले हे गीत, योगेश
यांनी शब्दबद्ध केलेले आणि संगीत राजेश रोशन यांचे.
कवि योगेश यांनी बऱ्याच चित्रपटांसाठी गीतं लिहिली,ज्यात “आनंद”, “रजनीगंधा”, “मिली”,
“छोटी सी बात”, “मंजिल” आणि “शौकीन” हे
महत्वाचे चित्रपट. तर आता “कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे” हे गीत आणि त्याचा अर्थ बघू या.
कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे
उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे
अर्थ:- हा अंधार असा
किती काळ टिकणार आहे आणि मनाला छळणार आहे. हे उदासीने भारलेले दिवस कधी न कधी
संपतीलच.
कभी सुख कभी दुख, यही ज़िंदगी हैं
ये पतझड़ का मौसम घड़ी दो घड़ी हैं
नये फूल कल फिर डगर में खिलेंगे
उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे (1)
अर्थ:- सर्व दिवस सारखे नसतात - कधी ते आनंदाचे तर कधी
दुःखाचे आणि ह्याचेच नांव तर जीवन आहे.हा शरद ऋतू फार काळ टिकणार नाही.तोही निघून
जाईल,आणि मग बाग नवीन फुलांनी बहरेल. हे उदासीने भारलेले दिवस कधी न कधी संपतीलच.
भले तेज कितना, हवा का हो झोंका
मगर अपने मन में तू रख ये भरोसा
जो बिछड़े सफ़र में तुझे फिर
मिलेंगे
उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे (२)
अर्थ:- हे दु:ख भले खूप
त्रासदायक आहे आणि तीव्रता ही अधिक जाणवते आहे. पण तू स्वतःवर विश्वास ठेव. जे
काही तू या प्रवासात गमावले आहे, ते सर्व तुला
पुन्हा मिळणार आहे. हे उदासीने भारलेले दिवस कधी न कधी संपतीलच.
कहे कोई कुछ भी, मगर सच यही है
लहर प्यार की जो कभीं उठ रही है
उसे एक दिन तो किनारे मिलेंगे
उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे (3)
अर्थ:- लोक जे त्यांना बोलायचे आहे, ते बोलतच असतात.पण सत्य हेच आहे की तुझ्या मनात ज्या प्रेमाच्या भावना उत्पन्न झाल्या आहेत. त्यांना पूर्णत्व नक्कीच प्राप्त होईल. हे उदासीने भारलेले दिवस कधी न कधी संपतीलच.
सारांश:
किती सुंदर अर्थ आहे या गीताचा. ही अशीच सगळी सुंदर गीत आपले जिवन
भारून टाकतात. बऱ्याचदा ही गाणी काही
प्रसंगाशी देखिल जोडलेली असतात. ही गाणी पुनः कधी कानावर पडली की ते प्रसंग
डोळ्यासमोर उभे राहतात. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवून देत असतात. जिवन असचं आहे
मित्रांनो. जेवढे सकारात्मकतेने स्वीकाराल तेवढं चांगलंच होईल.जो भूतकाळ आहे तो
सोडून द्या म्हणतात, पण तो विसरून कसं चालेल. त्यातच तर आपण
संकटांना समर्थपणे तोंड दिल्याच्या आठवणी असतात.ज्या आपल्याला उद्यासाठी उभारी
देतात.पण कालची दु:ख कुरवाळीत बसू नये,हे देखिल तेवढंच खरं
आहे. एकंदरीत भूत,वर्तमान यातील सकारात्मक गोष्टी लक्षात
ठेवायच्या हेच खरे.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा
वाटला,हे कमेन्ट बॉक्स
मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया
उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी
रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु,पुणे
ReplyDelete👍
Meaningful song
ReplyDelete