Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98       

Date: 21st, April 2023. 


मित्रांनो,

               आज अक्षय्यतृतीया आहे.अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही.असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.

 प्रास्ताविक

               माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात्रा करून पुण्य मिळवायला पहातात.गंगेत जाऊन स्नान केल्याने सर्व पापे धुतली गेली असे म्हणतात.अरे इतकी भीती वाटते ना मग पाप कर्म करू नका ना.

 आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

हे सर्व बघितले की मला आठवतो तो संत चोखोबा यांचा अभंग, जो पंडित जितेंद्र अभिक्षेकी यांनी गायला. तुमच्या पैकी अनेकांनी हा अभंग ऐकला असेल कारण आकाशवाणीवर भक्ति संगीतात हा अभंग हमखास ऐकायला मिळायचा.संत चोखोबा म्हणतात “आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन.” मला पुराण कळत नाही आणि वेदातील वचने देखिल कळत नाहीत. ते जरी असे म्हणत असले तरी माझ्या मते त्यांना आपल्या पेक्षा जास्त ज्ञान होते. चोखोबा म्हणतात “आगमाची आढी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा” चोखोबा म्हणतात आगम हे अध्यात्मातील तत्वज्ञान आहे,ज्याचे शैव पंथी आचरण करीत असतात आणि निगम म्हणजे वेदांना प्रमाण मानणारे वैष्णव पंथी आचरण करतात. म्हणजेच शैव परंपरेतील आगमाची आढी आणि वैष्णव परंपरेतील निगमाचा  भेद काय हे मला माहिती नाही,तसेच शास्त्रात काय आहे हे देखिल मला माहित नाही.

पुढे चोखोबा म्हणतात, “योग,याग,तप, अष्टांग साधन, न कळेची दान व्रत तप” अर्थात मला योग विद्या काय आहे ते माहिती नाही, याग म्हणजे यज्ञ काय ते माहित नाही,तो कां केला जातो,त्याचे महत्व काय हे मला काहीच माहित नाही. तप म्हणजे तपश्चर्या म्हणजे काय? ती कशासाठी करावी लागते हे मला माहित नाही. तसेच मोक्षप्राप्ती साठी करावी लागणारी आठ प्रकारची योग साधने कोणती ती देखिल मला माहित नाहीत. दानाचे आणि व्रताचे महत्व देखिल मी जाणत नाही. असे चोखोबा म्हणतात.

शेवटी चोखोबा म्हणतात “चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा,गाईन केशवा नाम तुझे.” चोखोबांचे हे विचार मला भावतात. ते म्हणतात की हे परमेश्वरा,देवा विठ्ठला माझा भोळा भाव आहे आणि असं म्हणतात की तू तर भावाचा भुकेला आहेस.मग मी कशाला दुसरे काही करू मला त्याची गरज वाटत नाही. मी तुझे नाम गात राहीन. वारकरी संप्रदायात नामाचे महत्व अनन्य साधारण आहे.

 समारोप

तुम्हाला वर लिहिलेले म्हणजेच वेद,योग,याग,तप, अष्टांग साधन,दान, व्रत, तप, आगम आणि निगम काही देखिल माहित नसले तरी तुमचा परमेश्वर चरणी भाव आहे, श्रद्धा आहे तर त्याच्या नुसत्या नामाचे गायन केले तरी पुरेसे आहे.असाच या अभंगाचा मतीतार्थ आहे.या सर्व गोष्टी करायच्या असतील तर खुशाल करा पण त्यात देखिल भावभक्तीने करण्याची गरज आहे. केवळ उपचार म्हणून नको असे मला वाटते.तुम्हाला काय वाटत ते ह्या ब्लॉग मधे दिलेल्या कमेन्ट बॉक्स मध्ये लिहा. आणि हो लिहितांना आपले नांव शेवटी जरूर लिहा.

 ऐकुया हा अभंग 


 प्रसाद नातु,पुणे.

                                                         

 photo courtesy@ Amazon  

 


Comments

  1. ब्लॉक बिल्कुल योग्य वाटला, भक्ति ने घेतलेले नाम हेच तारक अस्ते

    ReplyDelete
  2. अनिल वेगिनवार

    ReplyDelete
  3. रामकृष्ण हरि🙏🌺🌺

    ReplyDelete
  4. जय राम कृष्ण हरी.

    ReplyDelete
  5. खूप छान. सोप्या आणि कमीत कमी शब्दात खूप काही सांगितले आहे.
    - पराग जोगळेकर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...