Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

कहाॅ तक ये मनको-एक सकारात्मक गाणं

Blog No.2024/230

Date :-29th, September,2024.

मित्रांनो,

           आज मला फेसबुकवर एक रिमाइंडर आलं. त्यावरून किशोरकुमारचं एक गाणं आठवलं. कोविड-19 चा  खूप फैलाव झाला होता. फार काही पॉजिटिव्ह गोष्टी कानावर येत नव्हत्या. माझ्या बँकेतल्या काही सहकाऱ्यांचे  निधन झाल्याच्या बातम्या येत होत्या. कोविड-19 संपेल की नाही आणि अजून किती लोकांना सोबत घेऊन जाणार असं वाटतं असतांना हे एक सकारात्मक गाणं मी म्हटलं आणि फेसबुकवर पोस्ट केलं.किती सुंदर अर्थ आहे या गाण्याचा.बऱ्याचदा,अशी गाणी मनाला उभारी देऊन जातात.आज आठवलं म्हणून त्यावर ब्लॉग लिहितोय. 

प्रास्ताविक

            एप्रिल,1979 ला “बातों बातोंमे” हा एक हल्के फूल्के मनोरंजन करणारा बासु चटर्जी यांचा चित्रपट आला होता. अमोल पालेकर आणि टीना मुनीम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात डेव्हिड, पर्ल पदमसी, असराणी आणि रणजीत चौधरी यांच्या सहाय्यक भूमिका होत्या. त्याच्यातील चारही गाणी खूप गाजली. “सुनिये कहिये”, “ना बोले तुम न मैने कुछ कहाँ, “उठे सबके कदम देखो रम पम पम” आणि कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे” ही ती चार गाणी.यातल्या “कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे” या गाण्याबद्दल मी बोलत होतो. किशोरकुमारनी गायलेले हे गीत, योगेश यांनी शब्दबद्ध केलेले आणि संगीत राजेश रोशन यांचे.

            कवि योगेश यांनी बऱ्याच चित्रपटांसाठी गीतं लिहिली,ज्यात “आनंद”, “रजनीगंधा”, “मिली”, “छोटी सी बात”, “मंजिल” आणि “शौकीन” हे महत्वाचे चित्रपट. तर आता “कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे” हे गीत आणि त्याचा अर्थ बघू या.                                  

कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे

उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे

अर्थ:- हा अंधार असा किती काळ टिकणार आहे आणि मनाला छळणार आहे. हे उदासीने भारलेले दिवस कधी न कधी संपतीलच.    

कभी सुख कभी दुखयही ज़िंदगी हैं

ये पतझड़ का मौसम घड़ी दो घड़ी हैं   

नये फूल कल फिर डगर में खिलेंगे

उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे (1)

अर्थ:- सर्व दिवस सारखे नसतात - कधी ते आनंदाचे तर कधी दुःखाचे आणि ह्याचेच नांव तर जीवन आहे.हा शरद ऋतू फार काळ टिकणार नाही.तोही निघून जाईल,आणि मग बाग नवीन फुलांनी बहरेल. हे उदासीने भारलेले दिवस कधी न कधी संपतीलच.

भले तेज कितनाहवा का हो झोंका

मगर अपने मन में तू रख ये भरोसा   

जो बिछड़े सफ़र में तुझे फिर मिलेंगे

उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे (२)

अर्थ:- हे दु:ख भले खूप त्रासदायक आहे आणि तीव्रता ही अधिक जाणवते आहे. पण तू स्वतःवर विश्वास ठेव. जे काही तू या प्रवासात गमावले आहे, ते सर्व तुला पुन्हा मिळणार आहे. हे उदासीने भारलेले दिवस कधी न कधी संपतीलच.       

कहे कोई कुछ भीमगर सच यही है

लहर प्यार की जो कभीं उठ रही है  

उसे एक दिन तो किनारे मिलेंगे

उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे (3)

 अर्थ:- लोक जे त्यांना बोलायचे आहे, ते बोलतच असतात.पण सत्य हेच आहे की तुझ्या मनात ज्या प्रेमाच्या भावना उत्पन्न झाल्या आहेत. त्यांना पूर्णत्व नक्कीच प्राप्त होईल. हे उदासीने भारलेले दिवस कधी न कधी संपतीलच.     


   सारांश:

            किती सुंदर अर्थ आहे या गीताचा. ही अशीच सगळी सुंदर गीत आपले जिवन भारून टाकतात. बऱ्याचदा ही गाणी काही प्रसंगाशी देखिल जोडलेली असतात. ही गाणी पुनः कधी कानावर पडली की ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवून देत असतात. जिवन असचं आहे मित्रांनो. जेवढे सकारात्मकतेने स्वीकाराल तेवढं चांगलंच होईल.जो भूतकाळ आहे तो सोडून द्या म्हणतात, पण तो विसरून कसं चालेल. त्यातच तर आपण संकटांना समर्थपणे तोंड दिल्याच्या आठवणी असतात.ज्या आपल्याला उद्यासाठी उभारी देतात.पण कालची दु:ख कुरवाळीत बसू नये,हे देखिल तेवढंच खरं आहे. एकंदरीत भूत,वर्तमान यातील सकारात्मक गोष्टी लक्षात ठेवायच्या हेच खरे.      

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु,पुणे


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...