Skip to main content

वाईट झोपेच्या स्थितीचा पाठीच्या कण्यावर परिणाम

ब्लॉग सं. 2025/14 8 दिनांकः 2 9 मे , 2025. मित्रांनो ,              झोप व्यवस्थित झाली नाही की, अगदी मूड चेंज होण्यापासून तो पोट खराब होण्यापर्यंत,विविध समस्या निर्माण होतात. म्हणून झोप अत्यंत महत्वाची समजली जाते.आधी कसं होतं. झोपेसाठी एखादा बिछाना असला,एक उशी असली आणि पांघरण्यासाठी एक चादर असली झालं हा हिशोब होता. पण आजकाल झोप सुद्धा अगदी शास्त्रीय पद्धतीने कशी घ्यावी,याच्या विविध पोस्ट नेटवर बघायला मिळतात. आजच्या ब्लॉग मध्ये झोपेची स्थिती जर चुकीची असेल तर,त्याचे काय परिणाम होतात,हे आपण जाणून घेणार आहोत. सविस्तर: झोप ही आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या शरीराच्या पुनरुज्जीवनासाठी आणि ऊर्जा पुनः भरून निघण्यासाठी झोप आवश्यक असते. परंतु , झोपताना घेतलेली चुकीची स्थिती,आपल्या पाठीचा कणा (स्पाइन) आणि आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.झोपेची स्थिती योग्य नसल्यास,पाठीचा कणा वेगळ्या पद्धतीने ताणला जाऊ शकतो , ज्यामुळे वेदना , अस्वस्थता , आणि गंभीर स्वरूपाचे स्नायू व हाडांचे विकार निर्माण होण्याची शक्यता वाढते. झोपेच्य...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 123.  

Date: 16th,June 2024

मित्रांनो,

            मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू.

सविस्तर:

            मराठीत पोळी, किंवा हिन्दीत रोटी,अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये, बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे, तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले नान पसंत केले जाते. भारतातील अनेक भागांमध्ये,लोक फक्त दुकानात मिळणाऱ्या पॅक केलेल्या गव्हाच्या पिठापासून पोळी बनवितात. जसजसे लोक आरोग्याबाबत जागरूक होत आहेत,तसतसे ते कमी कॅलरी आणि उच्च फायबर सामग्री असलेल्या ज्वारी-बाजरी-आधारित रोट्या निवडत आहेत.

            अलीकडेच, पोषणतज्ञ रुचिता बत्रा हिने वजन कमी करण्यासाठी, काही उत्तम रोट्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये,तिने कमी कॅलरी आणि सूक्ष्म पोषक घटकांच्या श्रेणीसह येणाऱ्या विविध प्रकारच्या रोट्यांची यादी दिली आहे.तिने गव्हाच्या रोटीचा उल्लेख करून पोस्टची सुरुवात केली, जी कदाचित भारतातील सर्वात सामान्य रोटी किंवा पोळी आहे.बत्रा लिहितात की गव्हाच्या रोटीमध्ये अंदाजे 70 ते 80 कॅलरीज असतात.आणि ती "ब जीवनसत्त्वे आणि खनिजे" यांचा एक चांगला स्रोत आहे.

            नाचणीच्या रोटीमध्ये सुमारे 80 ते 90 कॅलरीज असतात.नाचणीमध्ये कॅल्शियम,अँटिऑक्सिडंट्स आणि आहारातील फायबर जास्त प्रमाणात असतात.ज्यांना हाडांच्या आरोग्यासाठी पोषण आवश्यक आहे, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.या यादीत पुढे ज्वारीची भाकरी दिली आहे.एका ज्वारीच्या भाकरीमध्ये फक्त 50 ते 60 कॅलरीज असतात.ज्वारीच्या भाकरीचे विशेष म्हणजे तिचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले घटक म्हणजे,ते रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवत नाहीत. याव्यतिरिक्त, ज्वारीचे पीठ ग्लूटेन-मुक्त आहे.जे ग्लूटेन-मुक्त पीठ पर्याय शोधत असलेल्यांसाठी एक योग्य पर्याय बनवते.ज्वारी रक्तातील साखरेची पातळी कमी किंवा नियंत्रित करू पाहणाऱ्यांसाठी योग्य आहे,हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

            मल्टीग्रेन रोटी किंवा विविध धान्यांची पोळी ही मोठ्या प्रमाणात पोषक तत्वांनी भरलेली असते.विविध प्रकारची खनिजे आणि जीवनसत्त्वांचा आहारात समावेश करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. मल्टीग्रेन रोटीमध्ये 80 ते 100 कॅलरीज असतात. या पर्यायांमध्ये, वजन कमी करण्यासाठी ज्वारी सर्वोत्तम असल्याचे दिसून येते.

पिठाच्या निवडीव्यतिरिक्त, रोटी बनवण्याची प्रक्रिया देखील त्याच्या कॅलरीजच्या संख्येत योगदान देते.जर एखाद्याने तुप किंवा तेल भरपूर वापरुन रोटी किंवा पोळी बनविली,तर कमी किंवा चरबी नसलेल्या रोट्यांच्या प्रमाणात अर्थातच आपोआप जास्त कॅलरीज मिळतील.एकूणच बाजरीचे पीठ आरोग्यासाठी आणि पचनासाठी अत्यंत अनुकूल असते.

समारोप:

            मला आठवतंय आधीच्या काळी गव्हाच्या तुलनेत ज्वारी आणि बाजरीचे दर कमी होते.आणि कुणाकडे ज्वारी आणि बाजरीची भाकरी असेल तर त्याला गहू विकत घेणे परवडत नसावे,अशी एकूण धारणा असायची. पण आजकाल जग खरोखर बदलतंय गव्हाची पोळी खाणारे अगदी अभिमानाने सांगतात,आमच्या जेवणात एकदा तरी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी असतेच.  

            तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

image courtesy@YouTube 

Comments

  1. छान महिती
    खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात उपयुक्त माहिती सांगितली आहे

    ReplyDelete
  3. छान माहिती.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...