Skip to main content

विटामिन D ची कमतरता घातक

ब्लॉग नं.2025/15 3 दिनांक: 3 मे, 2025. मित्रांनो, सध्याच्या जीवनशैलीत व्हिटामीन डी ची कमतरता सामान्य झाली आहे.सतत टेन्शन येणे , डिप्रेशनमध्ये जाणे , कंबरदुखी , पाठदुखी किंवा मसल्स क्रॅम्प्स येणे ही लक्षणे दिसली तर तुमच्या शरीरात व्हिटामीन डी कमी आहे का , याची तपासणी करणे गरजेचे आहे. कारण व्हिटामीन- D ची कमतरता शरीराला आतून पोकळ बनवते ; यासाठी काय खायला हवे, हे आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. सविस्तर: व्हिटामीन डी का महत्त्वाचे ? व्हिटामीन डी केवळ हाडांसाठीच नाही,तर मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी च्या अहवालानुसार , या व्हिटामीनच्या अभावामुळे मानसिक स्थितीवर परिणाम होतो , आणि डिप्रेशन होण्याची शक्यता वाढते.जर तुम्हाला उन्हात जाणे शक्य नसेल , तर काही खाद्यपदार्थांच्या मदतीने तुम्ही व्हिटामीन डी ची पूर्तता करू शकता. तज्ञांच्या मते , व्हिटामीन डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.त्याआधी व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे,शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात.हे आपण पाहू या.     1. हाडांची समस्या: ...

जाम सावली येथील अद्भुत हनुमान मंदिर

 Blog No.2024/038. 

Date: -26th, February,2024. 

मित्रांनो,

         काही परिवारीक महत्वाच्या कामासाठी नागपूरला आलो होतो.जरा वेळ होता,मग आम्ही जाम सावली येथील चमत्कारी हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाऊन आलो.नागपूरहून छिंदवाडा रोड वर साधारणतः 72 किमी अंतरावर हे मंदिर स्थित आहे. 12-13 वर्षापूर्वी पाह्यलेले हे मंदिर आता भव्य दिव्य स्वरूपात पाहून आश्चर्य वाटले.आजचा ब्लॉग हा याच विषयावर.

 सविस्तर

            नागपूरपासून रोडने 72 किमी वर असलेल्या जाम सावलीला आपण साधारत: 1.30 तासात पोहोचतो. नागपूरहून बाहेर पडणे हे आता,नव्याने झालेल्या फ्लाय ओवर्स मुळे पूर्वी इतके कठीण राह्यलेले नाही.नागपूरहून सावनेरला जातांना उजव्या हाताला मध्य प्रदेशातील छिंदवाडा रोडवर, जाम सावली, डाव्या हाताला लागतं.थोड आंत गेल्यावर,उजव्या हाताला कार पार्किंगची व्यवस्था आहे.पार्किंग फी साध्या तरी रु.30/- एवढी आकारली.मग दुकानांच्या रांगेतून जवळपास अर्ध्या किमीवर गेल्यावर भव्य मंदिर दिसून येतं.दर्शनाला दर्शन रांगेत जावे लागतं.परवाच शनिवार येऊन गेल्यामुळे रविवारी तेवढी गर्दी नव्हती. 

वैशिष्ठ

            या हनुमानजी मंदिराची  विशेष गोष्ट म्हणजे येथील हनुमानजींची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे.इथ स्थानिक दुकानदारांना हनुमान निद्रावस्थेत कां असे विचारले असता,फारसे काही हाती लागले नाही.पण एका  आख्यायिकेप्रमाणे या मंदिरात अनेक वर्षांपूर्वी लोक चोरी करण्यासाठी आले होते.या मूर्तीवर भरपूर सोन्याचे दागिने असल्याचे चोरट्यांना समजले.असे म्हणतात की चोर येण्यापूर्वी जामसावली येथील ही हनुमानजींची मूर्ती उभी होती.चोरट्यांनी ही मूर्ती काढण्याचा प्रयत्न केला,तेव्हा हनुमानजीची मूर्ती खाली पडली आणि चोरटे  मुर्तीखाली गाडले गेले.

            तसेच मंद्राद्री पर्वत आणण्यासाठी हनुमान प्रभू जेव्हा आले होते,तेव्हा त्यांनी काही काळ येथे विश्रांती घेतली होती.म्हणून येथे हनुमानजींची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे,असेही सांगतात.पण या दोन्ही आख्यायिकांना तथ्याचा आधार मला सापडू शकला नाही. 

हे हनुमान मंदिर श्रद्धेचे केंद्र

            हे अद्भूत हनुमान मंदिर श्री राम भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.असं म्हटलं जातं की जो भक्त या मंदिरात हनुमानावर श्रद्धा आणि भक्ति ठेवून येतो,त्याच्या मनोकामना येथे पूर्ण होतात.मात्र,या निजलेल्या हनुमानजींच्या मूर्तीची स्थापना कधी आणि कोणी केली? याचा पुरावा अजून सापडलेला नाही.असं म्हणतात की श्री हनुमान स्वतः प्रकट झाले.मध्य प्रदेश आणि विदर्भातील असंख्य भाविकांच्या या धार्मिक स्थानावर श्रद्धा आहे.आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने लोक येथे येतांना दिसतात.    

       जाम सावली हे जंगल क्षेत्रात येते आणि येथील जंगलात मुख्यतः औषधी वनस्पति आढळून येते.मंदिराकडे जातांना लागणाऱ्या दुकानाच्या रांगेत मुख्यतः लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने,धार्मिक साहित्याची दुकाने आढळली.तसेच खायच्या पदार्थांची दुकाने दिसून आली.थोड वेगळं आकर्षण म्हणजे येथे मिळणारा कूल्हड चहा,म्हणजे मातीच्या भांड्यामधून मिळणारा चहा.

मंदिराच्या वेळा

मंगळवार आणि शनिवार

सकाळी  5.30 पासून रात्री 11.00 वाजे पावेतो

अन्य दिवशी

सकाळी  6.00 पासून रात्री 10.00 वाजे पावेतो

 

आरतीच्या वेळा

रविवार ते शुक्रवार

सकाळी 6.30 वाजता आणि संध्याकाळी 6.30 वाजता

शनिवारी

सकाळी 5.30 वाजता आणि संध्याकाळी 5.30 वाजता

आरतीच्या वेळेस मंदिरात भक्तांना प्रवेश नसतो.

समारोप

        आजकाल जिकडे मंदिरात दर्शनाला जातो,तिथे भक्तांची अलोट गर्दी बघायला मिळते. हे वाढलेले श्रद्धेचे प्रतीक असेल तर चांगली गोष्ट आहे.कारण कुठेतरी श्रद्धा असली की मनुष्याच्या जिवनावर त्याचा अनुकूल परिणाम दिसून येतो.पण जर गुन्हेगारी आणि अपराध वाढल्यामुळे,पापापासून मुक्ती मिळवायची म्हणून देव दर्शन करायचे या भ्रामक समजुतीमुळे,जर ही गर्दी वाढतं असेल तर हे सगळं न पटणार आहे.असो.तुमची श्रद्धा असल्यास श्रद्धा म्हणून आणि नसल्यास एक अनोखे ठिकाण म्हणून या मंदिराला अवश्य भेट द्या.     

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु, पुणे      

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...