Blog No.2024/038.
Date: -26th, February,2024.
मित्रांनो,
काही परिवारीक
महत्वाच्या कामासाठी नागपूरला आलो होतो.जरा वेळ होता,मग आम्ही जाम सावली येथील चमत्कारी
हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाऊन आलो.नागपूरहून छिंदवाडा रोड वर साधारणतः 72 किमी अंतरावर
हे मंदिर स्थित आहे. 12-13 वर्षापूर्वी पाह्यलेले हे मंदिर आता भव्य दिव्य स्वरूपात
पाहून आश्चर्य वाटले.आजचा ब्लॉग हा याच विषयावर.
सविस्तर
नागपूरपासून रोडने 72 किमी वर असलेल्या जाम सावलीला आपण साधारत: 1.30 तासात पोहोचतो. नागपूरहून बाहेर पडणे हे आता,नव्याने झालेल्या फ्लाय ओवर्स मुळे पूर्वी इतके कठीण राह्यलेले नाही.नागपूरहून सावनेरला जातांना उजव्या हाताला मध्य प्रदेशातील छिंदवाडा रोडवर, जाम सावली, डाव्या हाताला लागतं.थोड आंत गेल्यावर,उजव्या हाताला कार पार्किंगची व्यवस्था आहे.पार्किंग फी साध्या तरी रु.30/- एवढी आकारली.मग दुकानांच्या रांगेतून जवळपास अर्ध्या किमीवर गेल्यावर भव्य मंदिर दिसून येतं.दर्शनाला दर्शन रांगेत जावे लागतं.परवाच शनिवार येऊन गेल्यामुळे रविवारी तेवढी गर्दी नव्हती.
वैशिष्ठ
या
हनुमानजी मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे
येथील हनुमानजींची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे.इथ स्थानिक दुकानदारांना हनुमान निद्रावस्थेत
कां असे विचारले असता,फारसे काही हाती लागले नाही.पण एका आख्यायिकेप्रमाणे या मंदिरात अनेक वर्षांपूर्वी
लोक चोरी करण्यासाठी आले होते.या मूर्तीवर भरपूर सोन्याचे दागिने असल्याचे
चोरट्यांना समजले.असे म्हणतात की चोर येण्यापूर्वी जामसावली येथील ही हनुमानजींची मूर्ती
उभी होती.चोरट्यांनी ही मूर्ती काढण्याचा प्रयत्न केला,तेव्हा हनुमानजीची मूर्ती
खाली पडली आणि चोरटे मुर्तीखाली गाडले
गेले.
तसेच मंद्राद्री पर्वत आणण्यासाठी हनुमान प्रभू जेव्हा आले होते,तेव्हा त्यांनी काही काळ येथे विश्रांती घेतली होती.म्हणून येथे हनुमानजींची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे,असेही सांगतात.पण या दोन्ही आख्यायिकांना तथ्याचा आधार मला सापडू शकला नाही.
हे हनुमान मंदिर श्रद्धेचे केंद्र
हे
अद्भूत हनुमान मंदिर श्री राम भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.असं म्हटलं जातं की
जो भक्त या मंदिरात हनुमानावर श्रद्धा आणि भक्ति ठेवून येतो,त्याच्या मनोकामना येथे
पूर्ण होतात.मात्र,या निजलेल्या हनुमानजींच्या मूर्तीची
स्थापना कधी आणि कोणी केली? याचा पुरावा अजून सापडलेला नाही.असं
म्हणतात की श्री हनुमान स्वतः प्रकट झाले.मध्य प्रदेश आणि विदर्भातील असंख्य भाविकांच्या
या धार्मिक स्थानावर श्रद्धा आहे.आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने लोक येथे येतांना दिसतात.
जाम सावली हे जंगल क्षेत्रात येते आणि येथील जंगलात मुख्यतः औषधी वनस्पति आढळून
येते.मंदिराकडे जातांना लागणाऱ्या दुकानाच्या रांगेत मुख्यतः लहान मुलांच्या खेळण्यांची
दुकाने,धार्मिक साहित्याची दुकाने आढळली.तसेच खायच्या पदार्थांची दुकाने दिसून आली.थोड
वेगळं आकर्षण म्हणजे येथे मिळणारा कूल्हड चहा,म्हणजे मातीच्या भांड्यामधून मिळणारा
चहा.
मंदिराच्या वेळा
मंगळवार आणि शनिवार |
सकाळी 5.30 पासून रात्री 11.00 वाजे पावेतो |
अन्य दिवशी |
सकाळी 6.00 पासून रात्री 10.00 वाजे पावेतो
|
आरतीच्या वेळा
रविवार ते शुक्रवार |
सकाळी 6.30 वाजता आणि संध्याकाळी 6.30
वाजता |
शनिवारी |
सकाळी 5.30 वाजता आणि संध्याकाळी 5.30
वाजता |
आरतीच्या वेळेस मंदिरात भक्तांना प्रवेश नसतो.
समारोप
आजकाल जिकडे
मंदिरात दर्शनाला जातो,तिथे भक्तांची अलोट गर्दी बघायला मिळते. हे वाढलेले श्रद्धेचे
प्रतीक असेल तर चांगली गोष्ट आहे.कारण कुठेतरी श्रद्धा असली की मनुष्याच्या जिवनावर
त्याचा अनुकूल परिणाम दिसून येतो.पण जर गुन्हेगारी आणि अपराध वाढल्यामुळे,पापापासून
मुक्ती मिळवायची म्हणून देव दर्शन करायचे या भ्रामक समजुतीमुळे,जर ही गर्दी वाढतं असेल
तर हे सगळं न पटणार आहे.असो.तुमची श्रद्धा असल्यास श्रद्धा म्हणून आणि नसल्यास एक अनोखे
ठिकाण म्हणून या मंदिराला अवश्य भेट द्या.
तुम्हाला आजचा
ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे
पवनपुत्र हनुमान की जय 🙏🌺
ReplyDelete👌👌
ReplyDeleteChan mahitipurna blog
ReplyDelete