Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

लता मंगेशकर

 Blog No.2023/251          

Date:- 28th,September 2023.

मित्रांनो,

               आज स्व. लता मंगेशकर यांची जयंती. खरं तर आजही लता दीदींच्या नावापुढे स्व. लिहायचं म्हणजे कससच होतं, लता दीदी आपल्यात नाहीत ही कल्पना करवत नाही आणि हे असे सारं त्या गेल्यानंतर दिड वर्षांनी होतंय.मग सांगा एक गीत 2013 साली संगीतबद्ध झालेलं, आलं,पण ऐकायला उशिरा मिळालं. अन हृदयात कालवाकालव व्हायला लागली.ऐकताच वेड्यासारखा मी स्वतःशीच म्हणालो नाही, लता दीदी तुम्ही नाही असं म्हणायचं. गाऊ नका लागेल तर, पण कृपया असं म्हणू नका. आज लता दीदींच्या जयंती दिनी हेच गाणं आठवूया.

 प्रास्ताविक      

               हे गीत आहे कविवर्य बा.भ. बोरकरांनी लिहिलेलं आणि सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेल. शब्द आधी बघू आणि मग गाणं ऐकू.                        

आता विसाव्याचे क्षण

आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी
सुखे ओवीत ओवीत
, त्याची ओढतो स्मरणी

काय सांगावे नवल,दूर रानीची पाखरे
ओल्या अंगणी नाचता
होती माझीच नातरे

कधी होती डोळे ओले,मन माणसाची तळी
माझे पैलातले हंस
डोल घेती त्याच्या जळी

कशी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली
आश्वासती येत्या जन्मी
होऊ तुमच्याच मुली

मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे
दूर असाल तिथे हो
नांदतो मी तुम्हांसवें.

            आठवणीतील गाणी या वेबसाइटवर हे गाणं पूर्ण वाचायला मिळालं. पण त्याच बरोबर संगीत दिग्दर्शक यांनी गीताबद्दल लिहिलेला सुंदर ब्लॉग.सलील कुलकर्णी म्हणतात “माझ्या या रचनेला दीदींचा स्वर मिळाला ही भाग्याची गोष्ट.” एक वृद्ध जोडपं आपल्या आयुष्यातील सुखाच्या, दुखा:च्या क्षणाची आठवण काढत आहेत.मला असं वाटतं या गीतातून “आता विसाव्याचे क्षण” म्हणजेच चिरनिद्रा घेण्याची वेळ समीप येत आहे.

            आजी आजोबा बोलत बसले आहेत आणि नातवंडाची आठवण येणार नाही हे कसं होईल. म्हणून बोरकर लिहितात  “काय सांगावे नवल,दूर रानीची पाखरे, ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातरे. या वयामद्धे आलेला हळवेपणा त्यांच्या या गीतातील प्रत्येक ओळीत,ठायी ठायी भरलेला आढळतो.

            सलील कुलकर्णी यांनी म्हटलंय की त्यांना या गीतातील “आता” हा शब्द खूप भावला. खरं आहे हे, या “आता”नेच मला भारावून टाकलं. बाकी गीत काय आहे. हे तेव्हा तरी समजून घ्यायची आणि ऐकायची इच्छा तेव्हा झाली नव्हती. आता तुम्ही ऐका आणि तुमचे कमेन्ट अवश्य येऊ द्या.     

लता दीदी तुम्हाला श्रद्धांजली नाही, हा शब्द नाही लिहिता येणार, शब्दसुमनांजली, आदरांजली वाहतो. अशाच तुमच्या स्वरांच्या रूपाने आमच्यात वर्षानुवर्षे वास्तव्य करावं.      

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  


प्रसाद नातु,पुणे

       

 

 

 

        

 

 

 

Comments

  1. खूप सुंदर लिहीले आहे.हे गाणं ऐकले कीं मन हळवं होते.

    ReplyDelete
  2. आदरांजलि😢🌺🌺

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...