Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

आत्मचिंतन करा आणि स्वतःस ओळखा

Blog No. 2023/61      

Date: 10th, March 2023.



मित्रांनो,

               आज कविवर्य मंगेश पाडगांवकर सरांची जयंती. त्यामुळे तुम्हाला नक्कीच वाटले असणार की,आजचा ब्लॉग निश्चितपणे कविवर्य मंगेश पाडगांवकर सरांवर असणार. नाही मित्रांनो, आज तुम्ही विविध माध्यमांवर दिवसभर त्यांच्या विषयी खूप वाचणार आणि ऐकणार देखिल.माझा प्रयत्न नेहमीच वाचकांना म्हणा रसिकांना कही हटके द्यावे हा असल्याने मी आज पाडगांवकर सरांवर नाही लिहिणार. 


               पण त्यांची एक कविता ही एक भावगीत देखिल आहे. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक त्याचा संदर्भ मी येथे घेणार आहे. नाही, रसग्रहण देखिल नाही करणार. जीवनाचा खरोखर आनंद घ्यावयाचा असेल तर, या जन्मावर आणि या जगण्यावर प्रेम करणे आवश्यक आहे आणि ते आपण करीत देखिल असतोच.      


प्रास्ताविक

                माणूस हा समाजशील प्राणी असल्याने त्याला समाजात वावरायला म्हणा रमायला आवडते. तसेच तो कुटुंबवत्सल देखिल आहे. घरातील वडील किंवा बाबा आणि आई ह्यांचेवर बरेच काही वाचायला मिळतं. कारण बाबा किंवा आई हे स्वतःच्या सुखाचा विचार न करता आपल्या मुलांना आपल्याला काय सर्वोत्तम देता येईल ह्याचा, आपल्या आपल्या परिस्थितीनुसार नेहमीच प्रयत्न करीत असतात.त्यात जबाबदारी पडली तर आई वडिलांचा आणि भावंडांचा विचार करीत असतात. पण हे सारे करण्याच्या प्रयत्नात, विचारात,आनंदात ती व्यक्ति स्वतःला हरवून बसते. स्वतःला काय हवे आहे,काय करायचे होते हे विसरून जाते. मग स्वतःबद्दल चार ओळी लिहा म्हटलं तर लिहू शकत नाही. माझ्या वयाच्या लोकांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर बरेचसे पाणी पुलाखालून वाहून गेले.पण जे आता तरुण आहेत किंवा जे 40 ते 50 ह्या वयोगटातील आहेत,त्यांनी थोडे स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 




स्वतःकडे लक्ष देणे म्हणजे नेमके काय?

1. स्वतः बद्दल जाणून घ्या :- मला जीवनात काय हवे आहे, जीवनाचे माझं काय उद्दिष्ट आहे? मला स्वतःला काय आवडतं? मला काय करावसं वाटतं? मला काय केल्याने आनंद मिळतो. त्या गोष्टींचा शोध घ्या. 


2. वर सांगितल्याप्रमाणे केले तर कधी कधी लोक तुम्हाला स्वार्थी म्हणू शकतात पण हा स्वार्थीपणा अजिबात नाही.हा आत्मशोधनाचा म्हणा/आत्मचिंतनाचा एक प्रकार आहे. जो तुमचे जीवन समृद्ध करण्यास उपकारक ठरतो. 


3. स्वतःच्या शरीरावर प्रेम करा. सर्वांचे सारे काही करण्याच्या प्रयत्नात,विशेषतः महिला वर्ग,स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते.असे होऊ देऊ नका. तुम्हाला आवश्यक आणि झेपेल तेवढा व्यायाम करा. व्यायामाला सुरुवात करतांना आधी थोडा मग हळूहळू वाढवत न्या. आजकाल व्यायाम करतांना देखिल मृत्यु आल्याचे वाचायला मिळते. दिवसातील एक तास स्वतःसाठी द्या. 


4. वाचन केल्याने वेळ तर चांगला जातोच पण वाचनाने मन निरोगी राखण्यास/राहण्यास मदत होते. तुम्हाला जे आवडते ते वाचा. (सोशल मीडिया वरुन येणारे फॉरवर्ड मेसेज सोडून)


5. ध्यानधारणा करणे ही तितकेच आवश्यक आहे. ध्यानधारणा अर्थात मेडीटेशन केल्याने नकारात्मक विचारांचा नाश होण्यास मदत होते तसेच शरीर आणि मनास नविन ऊर्जा मिळून,नव्या उत्साहाने कार्य सुरू करता येते. त्या सोबत तुमच्या चिंता,यातना दूर होण्यास मदत होईल. 


6. असे म्हणतात की सर्व सुखाचा मार्ग पोटातून जातो. म्हणून आठवड्यातून एकदा आपल्या आहारात आपल्या आवडीच्या पदार्थाचा समावेश करा.आज काल डॉक्टर्स ही कबूल करायला लागलेत की पोट स्वस्थ तर शरीर स्वस्थ. 


7. इतरांशी तुलना करु नका. कारण हयातून कदाचित नैराश्य येण्याची शक्यता असते.विशेषतः जीवनातील उद्दिष्टाच्या बाबतीत स्वतःशी तुलना करा. मी मागील वर्षी कुठे होतो. अन आज कुठे आहे. त्याच वेळी दुसरे काय म्हणतात किंवा काय म्हणतील ह्याची काळजी करण्यापेक्षा त्यातून शिकण्याजोगे आत्मसात करा आणि बाकीच्या कडे दुर्लक्ष करा. जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकणे शिका. जास्त बोलण्याने कधी कधी आपल्यातील उणिवा दुसऱ्यांपर्यंत विनासायास पोहोचतात.    


8. सकारात्मक रहा आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. म्हणजे सारे सोपे होईल. 


9. आवश्यक तेवढी झोप घ्या. हे यासाठी लिहितो आहे की कुणी जागे आहे म्हणून आपण कंपनी देण्यासाठी जागे राहू नका. तुम्हाला जेवढी झोप आवश्यक वाटते तेवढी घ्या.कारण त्यामुळे शारीरिक स्वास्थ आणि मानसिक आरोग्य लाभते. 


10. संगीत म्हणजे गाणं किंवा शास्त्रीय संगीत किंवा तुम्हाला जे आनंद देते ते ऐका,येत असेल तर म्हणा. आपल्याला माहित असतं की आपण लता दीदी किंवा किशोरकुमार नाही म्हणून आपण म्हणायचे नाही असे नाही. Music is a great tension releaser असे म्हणतात ते खोटे नाही.     


तात्पर्य 

            शेवटी हेच म्हणेन की यातील बऱ्याच गोष्टी आयुष्यात करण्याचा मी स्वतः प्रयत्न केला जरी 100% केल्या नसतील किंवा ज्या केल्यात त्यात 100% यश मिळाले असेल असे देखिल नाही.पण म्हणून प्रयत्न सोडलेला नाही आणि ज्या गोष्टी जमल्या नाही त्या आता बघतोय. 

                आज कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जयंती निमित्त त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.त्यांच्या असंख्य कवितांच्या रुपाने ते अजूनही आपल्यात आहेत आणि राहतील.    



  प्रसाद नातू ,पुणे       

                                                           


Comments

  1. Sir, tumhi khoop chan lihita. Short and sweet. Today's blog is really useful for the younger generation. 👍

    ReplyDelete
  2. छान उदबोधक ब्लॉग 👍🙏
    : रा.रा. जोशी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...