Skip to main content

Posts

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

कविता संग्रह वाचन

कविता संग्रह आजकाल  कुणी वाचत की नाही  माहित नाही.  पण मी आज वाचून काढला. ज्याचे नांव आहे "तुझे गीत गाण्यासाठी". सुप्रसिध्द कवी मंगेश पाडगांवकर यांचा हा कविता संग्रह. कवितेचे रूप ,स्वरूप आणि अंतरंग वेगवेगळे असते.  या कवितासंग्रहात एकूण 104 कविता आहेत. यातील 30 कवितांना माझ्या माहिती प्रमाणे स्वरसाज चढवून त्यांचे गाण्यांत रूपांतर करण्यांत आले आहे. ही गाणी बहुतेक सर्वांना माहित आहे.  "तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे या" गीताने त्यांनी कविता संग्रहाची सुरूवात केली आहे. हे गाणे सुधीर फडकेंनी अजरामर केले. तर "माझे जीवन गाणे व्यथा असो आनंद असू दे" या पं. जितेंद्र अभिषेकीनी गाईलेल्या गीताने समारोप. पाडगांवकरांचे वैशिष्ठ हे की त्यांनी प्रेम गीत असो, विराणी असो. भक्तीगीत वा गझल वा युगुल गीत असो  सर्वाना न्याय दिला. कवितेच्या कुठल्याही प्रकारात त्यांचे शब्द कमी पडले नाहीत यातच त्यांचे मोठेपण जाणवते. या कविता संग्रहात "श्रावणांत घननिळा मध्ये एका कडव्यांत पाडगांवकर म्हणतात 'गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा' किंवा 'लाजून हासणे अन् हासून ते पहाणे...

लकी पेन

                                                                                                              आज सकाळी सकाळीच मोबाईलची रिंग वाजली . तस धावतच फोन घेतला. तर समोरून माझा मित्र सदा भोजनी ओरडलाच “ राजा लेका अभिनंदन “ . मी म्हटले  “कशाबद्धल? काय केले आहे मी? “.  “अरे कुण्या गावच पाखरू ला साहित्य अकादमी पुरस्कार  जाहिर झाला आहे. काल पासून मी, सारे मित्र , साहित्य अकादमीतले तुझे मित्र,  सारेच तुला शोधत आहेत ,  आहेस कुठे ?." त्याने एका दमात सारे सांगितले अन विचारले देखिल.              “अरे काय सांगतो आहेस? खरं काय ? मी काल पासून निवांत मिळावा म्हणून सातपुड्याच्या पायथ्याशी माझ गाव आहे तिथे आलो आहे. इथे रेंज चा जरा प्रोब्लेम आहे. म्हणूनच फोन स्वीच...

एक अनोखी सहल अंतिम भाग

कालेश्वरम् मंदिर आलापल्ली वरून ठरल्याप्रमाणे आम्ही 6.30 ला निघालो. आलापल्ली ते अहेरी कालचाच रस्ता होता. अहेरी ते सिरोंचा वेगळा रोड होता. त्या रस्त्यावरून खरे तर आम्ही पहिल्यांदाच जात होतो. ह्या रोड बध्दल राजुरा येथे असतांना लोक सांगत असत कि अहेरीच्या पुढे एवढे घनदाट जंगल आहे की दिवसा देखिल सुर्याचा प्रकाश पुर्णपणे मिळत नाही. आम्ही अहेरीहून निघालो . खुप दाट जंगल होतं. म्हणजे जंगलात डोकावून पाहिल तर विशेष दूरच दिसत नव्हतं. वेगवेगळ्या फुलांचे सुवास येत होते. रस्त्याच्या दुतर्फा झाडे असल्याने अशा कमानीतून आमची कार पुढे जात होती. कित्येक झाडांनी वेगवेगळे आकार धारण केलेले होते. हाॅरर फिल्म मध्ये अशाच झाडांचे शुटींग करित असावेत. हिरवा या एकाच रंगाच्या विविध छटा पहायला मिळाल्या. त्या वेळी मोबाईल इतका प्रगत नव्हता अन्यथा त्या सगळ्या छटा कॅमेर्यात कैद करता आल्या असत्या. तंत्रज्ञानाचा चांगला वापर ही खुप आहे. मध्येच एखादा  ओहोळ रस्त्याला ओलांडून जातांना मिळाला. जंगलातून आलेले स्वच्छ निर्मळ पाणी. खाली उतरून पाय बुडवायची ईच्छा व्हायची पण बाजूला घनदाट जंगल बघून मनांतच रहायची. आमची कार...

बुलेट बाबा मंदिर

माझ्या नोकरीतील शेवटच्या एल टी सी साठी मी राजस्थान ची निवड केली . भारंभार प्रेक्षणिय स्थळ न निवडता. जयपूर , रणथंबोर, अजमेर जवळील पुष्कर सरोवर, अजमेर शरीफ दरगाह, जोधपूर आणि उदयपूर असा दौरा होता. 4 नोव्हे ते 11 नोव्हे 2019. जातांना येतांना फ्लाईट असल्याने वेळेची बचत झाली आणि प्रत्यक्ष साईट सिईंगला वेळ देता आला. तुम्हाला वाटेल कि आता ह्या ट्रीपचे वर्णन या ब्लाॅग मधे असणार काय? नाही बिल्कुल नाही कारण साईट सिईंग म्हटल कि मला पु ल देशपांडेंनी केलेले वर्णन आठवतं. म्हणून तसल काही करणार नाही. पण मला राजस्थान मध्ये काही वेगळं आढळलं ते सांगणार आहे.       राजस्थान मध्ये किल्ल्यांचा रखरखाव पहाण्यासारखा आहे. तिथे किल्याचा काही भाग सरकारने व्यवसायिक उपयोगासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. जसे हॅडी क्राफ्ट , राजस्थानी पेहराव , कारिगरी चे स्टाॅल इ. या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्याचा उपयोग किल्ले संवर्धनासाठी केला जातो. त्यामुळे किल्ले सुस्थितीत आहेत. आपल्या इथे असे काही करायला हवे. असे मला वाटून गेले.     पर्यंटनाला वाहिलेले लोक आहेत. आम्ही ज्या टूर कंपनी...

एक अनोखी सफर भाग 3

मग घरातून जेवायला यायचं निमंत्रण आलं. डाॅक्टरांच्या बहिणीने खुप छान जेवण बनवलं होत.चुलीवरचं जेवण साधंच होत. पण खुपच चविष्ट होतं. खुप दिवसांनी चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेतला होता. गप्पा मारता मारता जेवणं आटोपलं होतं. आमच्या रहाण्याची  व्यवस्था गव्हर्मेट रेस्टहाऊस मध्ये करण्यांत आली होती. आमचे सामान गाडीत ठेवलेले होते. आम्ही टॅक्सीत बसलो. गावाच्या बाहेर अर्थात गांव सुरू होता होताच  रेस्ट हाऊस  होतं. समोर  दोन दिवे रेस्ट हाऊसच्या डाव्या आणि उजव्या बाजूने असे तिरकस लावलेले  होते .  म्हणायला  तेवढाच फक्त उजेड होता. बाकी  आजूबाजूला  जंगल होते त्यामुळे अंधार होता. दिवे यासाठी म्हटलं  कि ते आधी 25 ,60 किंवा 100 वॅटचे दिवे असायचे. ते   दिवे होते.  ट्युब लाईटही नव्हते. तिघा फॅमिलींना तीन रूम्स दिल्या होत्या. आम्हा दोघांच्या वाट्याला सगळ्यांत मधली आणि मोठी खोली आली होती. खोली नाही तो मोठा हाॅल होता. लग्नांत तशा  हाॅलमध्ये 25-30 लोक सहज झोपले असते. डबल बेडचा मोठा पलंग देखिल एका कोपर्यात ठेवल्यासारखा वाटत होता. जरा वर छता कडे बघि...

एक अनोखी सहल भाग 1

नोकरी जर ट्रान्स्फरेबल असेल तर आपलं जीवन हे ट्रेन सारखं असतं. आपली बदलीची ठिकाणं म्हणजे त्यावरची  स्टेशनं. एकदा बदलून दुसरीकडे गेलो कि ती माणसं आणि त्यातही तो स्टाफ परराज्यातील असेल तर भेटण्याचा योग दुर्मिळच असतो. अशा वेळी आपलं माणसं जोडण्याचं कौशल्य कामी येते. पुन्हा तेवढ्याने काम होत नाही. ती माणसं नेहमी करिता जोडून ठेवणं हे सुध्दा कसब तुमच्याकडे असायला हवं. मित्र म्हणून एकदा स्विकारलं की गुण दोषांसकट स्विकारायला हवं. हे करतांना आपणही दोषरहित नाही. हे स्वतःशी कबूल करावं लागत. काम सोप नाही पण करावं लागतं. या अशा ट्रान्स्फर्स मध्ये भेटलेल्या अनेक मित्रांपैकी  दोन मित्र म्हणजे अजय घाटे आणि गुलाबराव खडसे. अजय  जरा धीर गंभीर प्रवृतीचा म्हणजे विनोदाचे हास्याचे वावडे आहे असे नाही. पण चेहरा नेहमीच काहीतरी गहन विचार करीत असल्यासारखा. त्याच्या मनांत काही चालत असावं पण तो ओठावर येऊ देत नसे. एखाद्या वेळेस असही असेल पोरकटपणा त्याच्या ठाई अजिबात नव्हता /नाही.तेच गुलाबराव अतिशय जाॅली ,माणसं जोडायची कशी हे गुलाबरावां कडून शिकावं. त्यांच्या त्या विशिष्ट लयीत मोबाईल नंबर सांग...

एक अनोखी सहल भाग 2

एक अनोखी सहल भाग 2 एक अनोखी सहल हे नांव का दिले म्हणालं तर आम्ही तिघे त्यानंतर कुठेच गेलो नाही आणि अशा प्रकारची सहल नंतर कधीच अनुभवली नाही. अनेक दृष्टीने ती अनोखी होती. तर ठरल्या प्रमाणे आम्ही निघालो होतो. रस्त्यात एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आणि पुढे निघालो. 11.30 ते 12.00 च्या दरम्यान आम्ही गडचिरोलीला पोहोचलो. गडचिरोली गावाबध्दल आणि नावाबध्दल कुतूहुल होतं. गडचिरोली जिल्हा निर्मिती च्या आधी चंद्रपूर हा आकाराने महाराष्ट्रातील सगळ्यांत मोठा जिल्हा होता. चंद्रपूर हा दुर्गम आणि मागासलेला जिल्हा होता. जास्तीतजास्त भुभाग हा जंगलाने व्यापला असल्याने आणि रस्ते आणि वाहतुकीची साधनेही नव्हती. म्हणून 1982 ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले होते आणि गडचिरोली ला गडचिरोली जिल्ह्याचे ठिकाण घोषित करण्यात आले होते. आता या गोष्टीला 25 वर्षावर झाले होती. शहर तस नविनच वाटत होतं. मागास भागाची लक्षणं शहरांत जाणवत नव्हती. मोटार सायकल चे , मारूतीचे शोरूम . दुमजली ईमारती. जिल्हाधिकारी  कार्यालयाची बिल्डिंग नवीच होती. बरीच स्वच्छताही होत...