Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

एक अनोखी सफर भाग 3

मग घरातून जेवायला यायचं निमंत्रण आलं. डाॅक्टरांच्या बहिणीने खुप छान जेवण बनवलं होत.चुलीवरचं जेवण साधंच होत. पण खुपच चविष्ट होतं. खुप दिवसांनी चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेतला होता. गप्पा मारता मारता जेवणं आटोपलं होतं. आमच्या रहाण्याची  व्यवस्था गव्हर्मेट रेस्टहाऊस मध्ये करण्यांत आली होती. आमचे सामान गाडीत ठेवलेले होते. आम्ही टॅक्सीत बसलो. गावाच्या बाहेर अर्थात गांव सुरू होता होताच  रेस्ट हाऊस  होतं. समोर  दोन दिवे रेस्ट हाऊसच्या डाव्या आणि उजव्या बाजूने असे तिरकस लावलेले  होते
.  म्हणायला  तेवढाच फक्त उजेड होता. बाकी  आजूबाजूला  जंगल होते त्यामुळे अंधार होता. दिवे यासाठी म्हटलं  कि ते आधी 25 ,60 किंवा 100 वॅटचे दिवे असायचे. ते   दिवे होते.  ट्युब लाईटही नव्हते. तिघा फॅमिलींना तीन रूम्स दिल्या होत्या. आम्हा दोघांच्या वाट्याला सगळ्यांत मधली आणि मोठी खोली आली होती. खोली नाही तो मोठा हाॅल होता. लग्नांत तशा  हाॅलमध्ये 25-30 लोक सहज झोपले असते. डबल बेडचा मोठा पलंग देखिल एका कोपर्यात ठेवल्यासारखा वाटत होता. जरा वर छता कडे बघितले तर 25 फुट उंचावर मंगलौरी कौलांचे छत होते. 2-3 जुने फॅन लावले होते. त्यातला मधला हळूच सुरू केला तसा हेलिकाॅप्टर जवळचं कुठे लॅड होतय अस वाटलं. थोडा वेळ आम्ही सगळे आमच्या रूम मध्ये गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यांत डाॅक्टर आले. काय कशी वाटली व्यवस्था , ठिक आहे ना.? आम्ही म्हटलं हो छान व्यवस्था केलीत. गांवाच्या मानाने व्यवस्था निश्चितपणे चांगलीच होती. रूममध्ये नाईट लॅम्प नसल्याचं डाॅक्टर म्हणाले. आम्ही हरकत नाही म्हटले कारण शहरात बाहेरून खुप उजेड येतो. त्यामुळे नाईट लॅम्पची गरज भासत नसे. मग दुसर्या दिवशी लवकर निघायच असल्याने आता आराम करावा असं ठरल. सगळी मंडळी  आपआपल्या खोलीत गेली. हाॅलला पाठीमागच्या भिंतीत एक मोठी खिडकी होती. सहज कुतूहुल म्हणून उघडली तर काय पलीकडे किर्र जंगल आणि अंधार आणि मुख्य म्हणजे खिडकीला ग्रीलच नव्हते. एका क्षणांत खिडकी बंद केली. मनांत विचार आला. ही खिडकी कुणीही तोडून सहज आत येऊ शकतो , जंगली प्राण्यासोबत इतरही धोके होते तिथे.  मी हादरलो होतो. त्यातच लाईट बंद केला तर नुसता अंधार. उजेडातही झोप लागली नसती. म्हणून बंद करून जवळचा टाॅर्च थोडा वेळ चालू ठेवला. म्हटलं झोप आली की बंद करू. आजूबाजूला जंगलच असल्याने रातकिड्यांच्या ओरडण्याने वातावरण अधिक भितीदायक झालं होत. त्यात सौ ची झोप हुकमी होती. तिला झोप लागल्यावर किती तरी वेळ मी  एकटाच जागा होतो. रात्री श्वापदांचे वेगवेगळे आवाज ऐकायला येत होते. छत उंच असल्याने छताकडे बघितलं  कि अधिकच भयाण वाटत होत. लहानपणी एकदा आजोळी मंगलौरी कौलांच्या छतावर नाग आढळला होता हेही नेमकं आताच आठवायचं होतं.  अस ईकडे तिकडे बघता बघता   आणि विचार करता करता केव्हा झोप लागली कळल नाही. टाॅर्च मात्र रात्रभर चालू असावा. कारण सकाळी सुरू झाला नाही. पण त्याने नेमून दिलेले काम चोख बजावलं होत.
सकाळ झाली होती. मला तशी आधी पासून सकाळी 6 वाजताच जाग येते. दार उघडून बाहेर आलो. बाजुचा आसमंत तोच , चोहोबाजूला घनदाट जंगल. पण दिवस उजाडला कि मनातली भिती कशी पळून जाते कळत नाही   काल रात्री सामसूम असलेल्या   रस्त्यावर थोडी वर्दळ सुरू झाली होती. बाजूची दारं बंद होती. पण आतून बोलण्याचा आवाज येत होता. समोरून डाॅक्टर साहेब येतांना दिसले. पाठोपाठ चहाची किटली वालाही येतांना दिसत होता. नमस्कार मी म्हटले. त्यांनीही नमस्कार म्हटले. त्यांचा आवाज ऐकून अजय आणि गुलाबराव बाहेर आले. नमस्कार चमत्कार झाले. डाॅक्टरांनी न्युज दिली कि हेमलकसा ,भामरागड ची परवानगी मिळाली नाही. नविन प्लॅन ठरला होता. सिरोंचाला जायचे ठरले होते. प्राणहिता नदीच्या पलिकडच्या तीरावर कालेश्वराचे सुप्रसिध्द मंदिर होते. नदीवर पुल नव्हता. नावेतुन पलीकडे जावे लागे. पलीकडचा तीर म्हणजे तेव्हाची आंध्र प्रदेशची आणि आताच्या तेलंगणाची सीमा. स्नान वगैरे आटोपून आम्ही तयार झालो. लगेच निघायचे होते कारण सिरोंचा 100 कि. मी वर होते. दोन अडीच तास लागणार होते. नंतर नागपूरलाही परतायचं होतं.
सिरोंचा च्या दिशेने गाड्या निघाल्या.
क्रमशः ......... पुढील भागात....

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...