Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

एक अनोखी सहल भाग 1



नोकरी जर ट्रान्स्फरेबल असेल तर आपलं जीवन हे ट्रेन सारखं असतं. आपली बदलीची ठिकाणं म्हणजे त्यावरची  स्टेशनं. एकदा बदलून दुसरीकडे गेलो कि ती माणसं आणि त्यातही तो स्टाफ परराज्यातील असेल तर भेटण्याचा योग दुर्मिळच असतो. अशा वेळी आपलं माणसं जोडण्याचं कौशल्य कामी येते. पुन्हा तेवढ्याने काम होत नाही. ती माणसं नेहमी करिता जोडून ठेवणं हे सुध्दा कसब तुमच्याकडे असायला हवं. मित्र म्हणून एकदा स्विकारलं की गुण दोषांसकट स्विकारायला हवं. हे करतांना आपणही दोषरहित नाही. हे स्वतःशी कबूल करावं लागत. काम सोप नाही पण करावं लागतं.
या अशा ट्रान्स्फर्स मध्ये भेटलेल्या अनेक मित्रांपैकी  दोन मित्र म्हणजे अजय घाटे आणि गुलाबराव खडसे. अजय  जरा धीर गंभीर प्रवृतीचा म्हणजे विनोदाचे हास्याचे वावडे आहे असे नाही. पण चेहरा नेहमीच काहीतरी गहन विचार करीत असल्यासारखा. त्याच्या मनांत काही चालत असावं पण तो ओठावर येऊ देत नसे. एखाद्या वेळेस असही असेल पोरकटपणा त्याच्या ठाई अजिबात नव्हता /नाही.तेच गुलाबराव अतिशय जाॅली ,माणसं जोडायची कशी हे गुलाबरावां कडून शिकावं. त्यांच्या त्या विशिष्ट लयीत मोबाईल नंबर सांगण्याच्या सवयीमुळे त्यांना फोन लावतांना बोटं नावाकडे  जात नाहीत तर की पॅड कडे  जातात अगदी आज पावेतो. उंची बेताचीच पण वागणं इतक राॅयल कि त्या उंची कडे कोण बघणार.      दोघेही बॅकेतील सहकारी या व्यतिरिक्त संबंध एवढे घट्ट होण्यासाठी साम्य कोणतेच नाही. म्हणायला आम्ही कधी एकमेकांची मत छेदली नाहीत. एकमेकांच्या मतांचा आदर केला हाच आम्हाला जोडून ठेवणारा घट्ट दुवा म्हणता येईल. 
नागपूरला असतांना एका रविवारी आम्ही म्हणजे मी आणि सौ. , खडसेंच्या घरी गप्पा मारायला गेलो. 2010 ची गोष्ट . त्यावेळेस लोक असे एकमेकांच्या घरी जात येत असत. एक दिवस जरा थोडा चेंज रूटीन पासून. अलीकडे हे सारे इतिहास जमा होत चाललय. आम्ही रविवारी पाच साडे पाचच्या सुमारास खडसेंच्या घरी पोहोचलो तर तिथे अजय आणि संजीवनी म्हणजे अजयची अर्धांगिनी  बसलेले दिसले. गुलाबराव म्हणाले वा आज खुप छान योग जुळून आला. मग काय आमच्या मनसोक्त गप्पा झाल्या .खुप दिवसांनी तिघे असे एकत्र आलो होतो. वेगळेवेगळे तर भेट व्हायची  आमची. एवढ्यात गुलाबरावांना कुणाचा तरी फोन आला म्हणून ते गॅलरीत गेले. मग आत येत म्हणाले, नातु साहेब डाॅ प्रमोद साळवेचा फोन होता. मला म्हणाले कि गडचिरोलीला या एकदा, भामरागडचा , हेमलकसाचा प्रोग्राम बनवू , तेव्हा मी त्यांना म्हटले साहेब घरी आले आहेत त्याना विचारून घेतो, येता का? डाॅ म्हणाले मग केव्हा येता आणि काय ते कळवा.
मग त्यानी अजयलाही विचारलं ,चलणार का. तो   जाऊया म्हणाला.  भामरागड आणि हेमलकसा एका दिवसांत जाऊन येण्यासारखे नव्हते. सुट्टी घ्यावी लागली असती .कमीतकमी एक दिवसाची तरी. सुट्टी अजयला मिळालीही असती. पण मी आणि गुलाबराव एकाच ब्रॅचला मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर. त्यामुळे आम्हाला दोघांना एकदम सुट्टी मिळाली नसती.   मग रविवारला जोडून येणारी सुट्टी पाहायला कॅलेंडर हाती घेतलं. अगदी पुढच्या महिन्यात पहिल्याच आठवड्यात अशी सुट्टी होती. झाले ठरले होते. मी आणि सौ. , श्री व सौ खडसे आणि श्री व सौ घाटे अस जाण्याचं ठरलं. गुलाबरावांनी डाॅ. साळवेना कळविलं आणि टॅक्सीची जबाबदारी स्वतःकडे घेतली. सकाळी गाडीने खडसे कपल निघेल  ते मि आणि मिसेस घाटे ना घेऊन  आमच्या घरी येतील आणि आमच्या घरून हाय-वे जवळ असल्याने आमच्या घरूनच प्रस्थान करण्याचे ठरले.
      नागपूरहून गडचिरोलीला जायचे दोन रस्ते होते. एक जाम, वरोरा , चंद्रपूरहून आणि दुसरा उमरेड , नागभीड असा जवळपास  जंगली भागातून जाणारा रस्ता. हा जवळचा रस्ता आहे. 70 कि मी चा फरक आहे. आम्ही याच रस्त्याने जायचे ठरविले. आम्ही घरी आलो. मुलांना सांगितले. ते काही हरकत नाही जा म्हणाले. 
       ठरल्याप्रमाणे रविवार उजाडला. आम्ही तयारच होतो. इतक्यांत प्रसाद चला ,आलोय रे आम्ही. आम्ही सगळे ठिक 7.30 वाजता निघालो.   उमरेड मार्गे जायचे ठरविले होते. त्याप्रमाणेच निघालो होतो. 11.30 पर्यत पोहोचू असा अंदाज होता. तेव्हा गुगल मॅप वगैरे तेवढंस् नव्हतं. कि मी चे फलक बघूनच अंतर किती उरलय. ते लक्षांत यायचं. दोन्ही बाजूला जंगल सुरू झालं ते एन्जाॅय करित आम्ही निघालो. आता तर कुठे सुरूवात होती. पुर्ण 2 दिवसाचा प्लॅन होता.
क्रमशः ...........2


Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...