Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

एक अनोखी सहल भाग 2



एक अनोखी सहल भाग 2
एक अनोखी सहल हे नांव का दिले म्हणालं तर आम्ही तिघे त्यानंतर कुठेच गेलो नाही आणि अशा प्रकारची सहल नंतर कधीच अनुभवली नाही. अनेक दृष्टीने ती अनोखी होती.
तर ठरल्या प्रमाणे आम्ही निघालो होतो. रस्त्यात एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आणि पुढे निघालो. 11.30 ते 12.00 च्या दरम्यान आम्ही गडचिरोलीला पोहोचलो. गडचिरोली गावाबध्दल आणि नावाबध्दल कुतूहुल होतं. गडचिरोली जिल्हा निर्मिती च्या आधी चंद्रपूर हा आकाराने महाराष्ट्रातील सगळ्यांत मोठा जिल्हा होता. चंद्रपूर हा दुर्गम आणि मागासलेला जिल्हा होता. जास्तीतजास्त भुभाग हा जंगलाने व्यापला असल्याने आणि रस्ते आणि वाहतुकीची साधनेही नव्हती. म्हणून 1982 ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले होते आणि गडचिरोली ला गडचिरोली जिल्ह्याचे ठिकाण घोषित करण्यात आले होते. आता या गोष्टीला 25 वर्षावर झाले होती. शहर तस नविनच वाटत होतं. मागास भागाची लक्षणं शहरांत जाणवत नव्हती. मोटार सायकल चे , मारूतीचे शोरूम . दुमजली ईमारती. जिल्हाधिकारी  कार्यालयाची बिल्डिंग नवीच होती. बरीच स्वच्छताही होती रस्त्यांवर. हाॅटेल साधेच होते. पण जेवण छान होतं आणि थोडी वेगळी चव होती. ती सगळ्यानाच आवडली. त्यानंतर डाॅक्टरांच्या प्रस्तावित काॅलेजची जागा बघण्यासाठी जायचं होत.तिथून 10 कि मी दूरवर म्हणजे गडचिरोली-धानोरा रस्त्यावर चाटगांव येथे  जायचे होते. त्याप्रमाणे आम्ही अर्ध्या तासात तिथे पोहोचलो. तिथे पुर्ण जंगलच होते. सागवानाच्या झाडामधून फोटोसेशन झालं तिन्ही कपल्सचं. अनोखी सफर याही दृष्टीने होती. आम्ही तिघेही पहिल्यांदाच मुलांना सोबत न घेता दोघेच ट्रीपवर निघालो होतो. चातगांवहून गडचिरोली कडे निघालो होतो. हेमलकसा आणि भामरागड साठी पोलिस खात्याकडे परवानगी घ्यावी लागत असे कारण नक्षलवादी चळवळ मोठ्या प्रमाणांत कार्यरत होती.डाॅक्टरांनी तसा अर्ज केला असल्याचे सांगितले . परवानगी बध्दल मेसेज आला नव्हता. डाॅक्टर म्हणाले हेमलकसाला जास्त वेळ मिळावा म्हणून आपण आलापल्लीला जाऊन रात्रीचा मुक्काम करू. अहेरी तिथून जवळच आहे. तिथूनच परमिशनचे कळेल. आम्ही गडचिरोलीहून निघालो. 3 साडेतीन तासाचा प्रवास. साधारणतः डिसेंबर जानेवारी चा महिना . सगळीकडे हिरवगार होत. आजूबाजूच्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ पासून निघालेलो असूनही थकवा जाणवत नव्हता. एव्हाना गप्पांचा स्टाॅक संपल्याने महिला मंडळही निसर्गाचा आनंद घेत होतं. झाडांचे विविध आकार. हिरवा या रंगाच्याच वेगवेगळ्या छटा बघायला मिळाल्या. एका ठिकाणी रस्त्यावरूनच पाण्याचा ओहोळ वहात होता. सगळ्यांची पाण्यात पाय बुडवायची ईच्छा दिसली तर गाडी थोडी थांबावायला सांगितली. पाणी खुप स्वच्छ होत . खुप थंडही होत.खुप छान वाटलं. अहेरी आलं. बरीच गर्दी होती अहेरीत , बहुदा आठवडी बाजार असावा. पोलीस स्टेशन समोर गाडी थांबली. डाॅक्टर पोलिस स्टेशन मध्ये  गेले. तेवढ्या वेळांत आम्ही गरमगरम चहा आणि खाद्य पदार्थावर ताव मारला. टपरीवरचा चहा आणि गरमागरम भजे याची सर कशालाच येत नाही. तेवढ्यात डाॅक्टर आले. परवानगीचे अजूनही काही कळले नव्हते. मग ठरल्याप्रमाणे आम्ही अहेरीहून आलापल्लीकडे निघालो. 15-20 मिनीटाचे अंतर होते. 7 कि मी च्या रस्त्यात बर्याच लहान मोठ्या फांद्या टाकलेल्या होत्या. ड्रायव्हरने खाली उतरून बाजूला केल्या . मी ड्रायव्हरच्या बाजूला बसून होतो. म्हणून मी कुतूहुल म्हणून विचारले तर जागेवर पोहोचल्यावर सांगतो म्हणाला. ते नक्षलवाद्यांचे कृत्य असल्याचे कळले. असे नेहमीच चालत म्हणाला. आलापल्ली पुर्ण जंगलातच होते. विशेष मोठ गांव नव्हतं. संध्याकाळी 7 लाच सगळी दुकाने बंद झालेली दिसली. चहाची टपरी सुरू होती. तिथे चहा घेतला आणि डाॅ साहेबांच्या बहिणीच्या  घरी पोहोचलो. छोटेखानी घर , बाहेर थोडा बगीचा होता. तिथे गप्पा झाल्या. नक्षलवादी येतात का ईथे असे अजयने विचारल्यावर बहिणीचा मुलगा म्हणाला आपण चहा प्यायलो तिथे असतात. एव्हाना तुमच्या बध्दल त्यांनी सगळी माहिती  घेतली असणार.असही तो म्हणाला .माणसासारखी माणस हो ती कशी ओळखायला येणार. 
क्रमशः. . . .......     ...... .

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...