Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

रक्तदाबाची औषधे घेतल्याने मूत्रपिंड निकामी होतात?

ब्लॉग नं. 2025/028.

दिनांक: 28 जानेवारी, 2026. 

मित्रांनो,
            रक्तदाबाची औषधे रोज घेतल्याने मूत्रपिंड निकामी होतात” अशी एक भीती अनेकांच्या मनात असते आणि तो एक गैरसमजही अनेकांच्या मनांत आहे.त्यामुळे काही जण औषधे टाळतात,तर काही जण रक्तदाब नॉर्मल आला की, स्वतःहून औषधे बंद करतात. पण ही समजूत कितपत खरी आहे?

मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटल्सचे सल्लागार इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. परिन संगोई यांनी या गैरसमजुतीला स्पष्टपणे चुकीचे ठरवले आहे.जाणून घेऊ या आजच्या ब्लॉग मधे.

सविस्तर:
            रक्तदाबाची औषधे मूत्रपिंडांना नुकसान करतात का? याचे उत्तर स्पष्ट आहे – नाही. डॉ. संगोई सांगतात की, रक्तदाबाची औषधे मूत्रपिंडांना हानी पोहोचवत नाहीत.या उलट, उपचार न केलेला उच्च रक्तदाब हे मूत्रपिंडाच्या आजाराचे एक प्रमुख कारण आहे.दीर्घकाळ रक्तदाब जास्त राहिल्यास मूत्रपिंडातील अतिशय सूक्ष्म रक्तवाहिन्यांना हळूहळू इजा होते. त्यामुळे रक्तातील कचरा गाळण्याची मूत्रपिंडांची क्षमता कमी होते. ही प्रक्रिया

अनेक वर्षे “शांतपणे” चालू असते आणि रुग्णाला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.मग औषधे सुरू केल्यावर मूत्रपिंडाचा त्रास का लक्षात येतो? अनेकदा असे घडते की,रक्तदाबाचे निदान होईपर्यंत मूत्रपिंडांचे नुकसान आधीच सुरू झालेले असते. औषधे सुरू केल्यानंतर नियमित तपासण्या (क्रिएटिनिन, युरिया, GFR इ.) केल्या जातात.

तेव्हा आधीपासून असलेली मूत्रपिंडाची समस्या “समोर येते”. यामुळे लोकांना वाटते की औषधांमुळेच हा त्रास झाला. प्रत्यक्षात, हे नुकसान वर्षानुवर्षे नियंत्रणात न ठेवलेल्या रक्तदाबामुळे झालेले असते, औषधांमुळे नव्हे.रक्तदाब नॉर्मल झाला, तरी औषधे का थांबवू नयेत?

हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.डॉ.संगोई स्पष्ट करतात की,

1.रक्तदाब नॉर्मल दिसणे म्हणजे उपचार यशस्वी आहेत.

2. उच्च रक्तदाब ही बहुतेक वेळा आयुष्यभर चालणारी स्थिती असते.

3.अचानक औषधे बंद केल्यास रक्तदाब पुन्हा वाढू शकतो,आणि तोही कोणतीही लक्षणे न देता.

अचानक वाढलेला रक्तदाब खालील गंभीर धोके निर्माण करू शकतो. जसे की, हृदयविकाराचा झटका,

मेंदूचा पक्षाघात (स्ट्रोक), मूत्रपिंडांचे आणखी नुकसान

डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे बंद करणे किती धोकादायक?

स्वतःहून औषधे थांबवणे ही सर्वात मोठी आणि धोकादायक चूक आहे.काही रुग्ण सोशल मीडियावरील सल्ले ऐकतात.मित्रांचे अनुभव ऐकून निर्णय घेतात, “आता बरं वाटतंय” म्हणून औषधे बंद करतात, यामुळे रक्तदाब

पुन्हा अनियंत्रित होतो आणि अवयवांचे नुकसान झपाट्याने वाढू शकते.औषधांचा डोस बदलणे किंवा औषधे बंद करणे हे नेहमी डॉक्टरांच्या देखरेखीखालीच केले पाहिजे.जीवनशैली सुधारणा उपयोगी आहेत का? होय, नक्कीच.निरोगी जीवनशैलीमुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत होते, जसे की, मीठ कमी खाणे,नियमित चालणे / व्यायाम,वजन नियंत्रण,ताणतणाव कमी करणे आणि पुरेशी झोप घेत चला.  

समारोप:
            पण लक्षात ठेवा, या सवयी औषधांचा पर्याय नाहीत.काही रुग्णांमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधांचा डोस कमी होऊ शकतो, पण औषधे पूर्णपणे बंद करण्यासाठी काळजीपूर्वक वैद्यकीय निरीक्षण आवश्यक असते. Self- medication is always dangerous. एक  लक्षात ठेवा रक्तदाबाची औषधे. ही  हृदय,  मेंदू आणि  मूत्रपिंड या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करतात.यात दीर्घकालीन गुंतागुंत निर्माण करत नाहीत, तर त्यांना प्रतिबंध करतात.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती

    ReplyDelete
  2. खूपच उपयुक्त माहिती आहे. बरेच लोक औषधी बंद करून धोका पत्करतात.

    ReplyDelete
  3. उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...