Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

लहान मुलांना मधुमेह: साखर नाही सवयी कारणीभूत

ब्लॉग नं:2025/334

दिनांक:28 नोव्हेंबर, 2025. 

मित्रांनो,

साखर नाही, सवयी कारणीभूत!”

जास्त गोड खाल्लं तर डायबेटीस होतो!” हे वाक्यं आपण मुलांना किती वेळा ऐकविले असेल. जवळपास प्रत्येक भारतीय घरातलं हे एक कॉमन वाक्य आहे.पण सत्य हे आहे की,मधुमेहाचा खरा गुन्हेगार साखर नाही. अगदी कधीतरी खाल्लेला केक, आईस्क्रीम किंवा चॉकलेट यामुळे मुलांना डायबेटीस होत नाही.मग खरा गुन्हेगार  कोण हे जाणून घेण्यासाठी आजचा ब्लॉग वाचा.  

सविस्तर:  

नोएडातील motherhood हॉस्पिटलचे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ आणि निओनेटलॉजिस्ट,डॉ. अमित गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालमधुमेहाची कारणं खूप खोल आणि गुंतागुंतीची आहेत.यात मोठी भूमिका आहे अनुवंशिकता,स्थिर जीवनशैली,जास्त स्क्रीन टाइम,चुकीचे खाणे आणि शरीरातील इन्सुलिनच्या प्रक्रियेतील बदलांची. आजची मुलं चॉकलेट्समुळे नव्हे, तर “कमी हालचाल, जास्त खाणे आणि जास्त स्क्रीन” यामुळे जास्त धोक्यात येत आहेत.

मधुमेहाचा मुलांमध्येही वाढतोय धोका:

डॉ. गुप्ता म्हणतात,आज अनेक लहान मुलं डायबेटीसशी झुंज देत आहेत आणि त्यांना स्वतःलाही काय चाललंय ते समजत नाही. पालकांनाही ‘शुगर’ हा शब्द ऐकला की गोड खाण्याशी त्याचा संबंध जोडण्याची सवय आहे, पण सत्य खूप वेगळं आहे.” मधुमेह हा फक्त साखरेशी जोडलेला आजार नाही, तर शरीरातील इन्सुलिनची निर्मिती आणि त्याचा वापर कसा होतो त्यावर आधारित एक जटिल स्थिती आहे.

साखर आणि डायबेटीस: मोठे गैरसमज

डॉ. गुप्तांनी तीन लोकप्रिय मिथकांचा भेद केला आहे.

🔹 मिथक 1: “जास्त साखर खाल्ल्यामुळे डायबेटीस होतो”

तथ्य :

साखर एकटी डायबेटीसची कारणीभूत नाही.Type 1 डायबेटीस हा प्रत्यक्षात ऑटोइम्यून विकार आहे. शरीर स्वतःच इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट करतं.यात साखरेचा काहीही संबंध नाही.अनुवंशिकता हे मोठं कारण ठरतं.

2003 मधील Diabetes जर्नलमधील अभ्यासानुसार, कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असलेल्या मुलांमध्ये इन्सुलिन प्रतिकार अधिक दिसतो, मग त्यांनी गोड खाल्लं किंवा नाही याचा फरक पडत नाही.

🔹 मिथक 2: “डायबेटीस फक्त मोठ्यांनाच होतो”

तथ्य :

आज Type 2 डायबेटीस मुलांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. कारण, चुकीचं खाणं, स्थिर जीवनशैली

लठ्ठपणा, जास्त स्क्रीन टाइम, कमी शारीरिक हालचाल हे आहेत.  

JAMA Pediatrics मधील दोन वर्षांच्या अभ्यासाने सिद्ध केलं की मुलांमध्ये वाढलेली चरबी इन्सुलिन संवेदनशीलता घटवते आणि डायबेटीसचा धोका वाढवते. त्याचप्रमाणे, आणखी एका अभ्यासानुसार दिवसातून 2+ तास स्क्रीन टाइम असलेल्या मुलांमध्ये इन्सुलिन प्रतिकार वाढलेला दिसला.

🔹 मिथक 3: “डायबेटीस झाला की आवडती खाणंपिणं बंद!

तथ्य :

असं अजिबात नाही.मुलांना आवडत्या पदार्थांवर कायमची मर्यादा घालावी लागत नाही. फक्त किती खायचं आणि किती वेळा हे पालकांनी पाहणं गरजेचं.संतुलित आहार आणि प्रमाण महत्त्वाचं आहे.

पालकांसाठी मार्गदर्शन: मुलांना सुरक्षित ठेवण्याचे 5 महत्त्वाचे उपाय

1. स्क्रीन टाइम कमी करा:

मोबाइल, टॅब, टीव्ही यामुळे मुलं तासन्तास स्थिर बसतात.

➡️ दररोज ठराविक मर्यादा ठेवा.

➡️ त्याऐवजी खेळ, सायकलिंग, मैदानात धावणे यांना प्रोत्साहन द्या.

2. मुलांना रोज किमान 60 मिनिटं हालचाल आवश्यक:

त्यांना आवडतं खेळ, नृत्य, सायकल, पोहणे काहीही असू द्या.हलक्या-फुलक्या खेळांनीही इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.

3. आहारात गुणवत्ता, फक्त प्रमाण नाही:

            आहारात भाज्या, पूर्ण धान्य, फळं,प्रोटीन,पुरेसे पाणी देत चला. साखरदार पेये, पॅकेज्ड स्नॅक्स आणि प्रोसेस्ड फूड कमी करा.

4. नियमित आरोग्य तपासणी:

जर कुटुंबात डायबेटीसचा इतिहास असेल तर —

➡️ नियमित ब्लड शुगर तपासणी

➡️ जास्त तहान लागणे, वारंवार लघवी, अचानक वजन घटणे यासारखे लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला.

5. मुलांना योग्य शिक्षण द्या:

मुलांना भीती दाखवू नका.साखर “वाईट” आहे असं सांगू नका.

त्याऐवजी,

➡️ शरीरात इन्सुलिनची भूमिका

➡️ कसे संतुलित खाणं आवश्यक आहे. हे सोप्या भाषेत समजवा.

समारोप:

मधुमेह होण्यासाठी दोष फक्त साखरेचा नाही, जीवनशैलीचा आहे. डायबेटीस हा फक्त “साखर खाल्ली म्हणून होणारा आजार” नाही.हा अनुवंशिकता, जीवनशैली, आहार, हालचाल आणि शरीरातील इन्सुलिन प्रक्रियेचा एक संयुक्त परिणाम आहे.पालकांनी योग्य वेळी जागरूकता ठेवली तर मुलांचे जीवन पूर्णपणे बदलू शकते.आपली मुलं घाबरलेली नाही, तर माहितीपूर्ण आणि आरोग्य-जागरूक असणं अधिक आवश्यक आहे. म्हणून,साखरवर दोष देणं थांबवा, आणि सवयी सुधारायला सुरुवात करा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. महत्त्वपूर्ण माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...