Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

लहान मुलांना मधुमेह: साखर नाही सवयी कारणीभूत

ब्लॉग नं:2025/334

दिनांक:28 नोव्हेंबर, 2025. 

मित्रांनो,

साखर नाही, सवयी कारणीभूत!”

जास्त गोड खाल्लं तर डायबेटीस होतो!” हे वाक्यं आपण मुलांना किती वेळा ऐकविले असेल. जवळपास प्रत्येक भारतीय घरातलं हे एक कॉमन वाक्य आहे.पण सत्य हे आहे की,मधुमेहाचा खरा गुन्हेगार साखर नाही. अगदी कधीतरी खाल्लेला केक, आईस्क्रीम किंवा चॉकलेट यामुळे मुलांना डायबेटीस होत नाही.मग खरा गुन्हेगार  कोण हे जाणून घेण्यासाठी आजचा ब्लॉग वाचा.  

सविस्तर:  

नोएडातील motherhood हॉस्पिटलचे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ आणि निओनेटलॉजिस्ट,डॉ. अमित गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालमधुमेहाची कारणं खूप खोल आणि गुंतागुंतीची आहेत.यात मोठी भूमिका आहे अनुवंशिकता,स्थिर जीवनशैली,जास्त स्क्रीन टाइम,चुकीचे खाणे आणि शरीरातील इन्सुलिनच्या प्रक्रियेतील बदलांची. आजची मुलं चॉकलेट्समुळे नव्हे, तर “कमी हालचाल, जास्त खाणे आणि जास्त स्क्रीन” यामुळे जास्त धोक्यात येत आहेत.

मधुमेहाचा मुलांमध्येही वाढतोय धोका:

डॉ. गुप्ता म्हणतात,आज अनेक लहान मुलं डायबेटीसशी झुंज देत आहेत आणि त्यांना स्वतःलाही काय चाललंय ते समजत नाही. पालकांनाही ‘शुगर’ हा शब्द ऐकला की गोड खाण्याशी त्याचा संबंध जोडण्याची सवय आहे, पण सत्य खूप वेगळं आहे.” मधुमेह हा फक्त साखरेशी जोडलेला आजार नाही, तर शरीरातील इन्सुलिनची निर्मिती आणि त्याचा वापर कसा होतो त्यावर आधारित एक जटिल स्थिती आहे.

साखर आणि डायबेटीस: मोठे गैरसमज

डॉ. गुप्तांनी तीन लोकप्रिय मिथकांचा भेद केला आहे.

🔹 मिथक 1: “जास्त साखर खाल्ल्यामुळे डायबेटीस होतो”

तथ्य :

साखर एकटी डायबेटीसची कारणीभूत नाही.Type 1 डायबेटीस हा प्रत्यक्षात ऑटोइम्यून विकार आहे. शरीर स्वतःच इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट करतं.यात साखरेचा काहीही संबंध नाही.अनुवंशिकता हे मोठं कारण ठरतं.

2003 मधील Diabetes जर्नलमधील अभ्यासानुसार, कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असलेल्या मुलांमध्ये इन्सुलिन प्रतिकार अधिक दिसतो, मग त्यांनी गोड खाल्लं किंवा नाही याचा फरक पडत नाही.

🔹 मिथक 2: “डायबेटीस फक्त मोठ्यांनाच होतो”

तथ्य :

आज Type 2 डायबेटीस मुलांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. कारण, चुकीचं खाणं, स्थिर जीवनशैली

लठ्ठपणा, जास्त स्क्रीन टाइम, कमी शारीरिक हालचाल हे आहेत.  

JAMA Pediatrics मधील दोन वर्षांच्या अभ्यासाने सिद्ध केलं की मुलांमध्ये वाढलेली चरबी इन्सुलिन संवेदनशीलता घटवते आणि डायबेटीसचा धोका वाढवते. त्याचप्रमाणे, आणखी एका अभ्यासानुसार दिवसातून 2+ तास स्क्रीन टाइम असलेल्या मुलांमध्ये इन्सुलिन प्रतिकार वाढलेला दिसला.

🔹 मिथक 3: “डायबेटीस झाला की आवडती खाणंपिणं बंद!

तथ्य :

असं अजिबात नाही.मुलांना आवडत्या पदार्थांवर कायमची मर्यादा घालावी लागत नाही. फक्त किती खायचं आणि किती वेळा हे पालकांनी पाहणं गरजेचं.संतुलित आहार आणि प्रमाण महत्त्वाचं आहे.

पालकांसाठी मार्गदर्शन: मुलांना सुरक्षित ठेवण्याचे 5 महत्त्वाचे उपाय

1. स्क्रीन टाइम कमी करा:

मोबाइल, टॅब, टीव्ही यामुळे मुलं तासन्तास स्थिर बसतात.

➡️ दररोज ठराविक मर्यादा ठेवा.

➡️ त्याऐवजी खेळ, सायकलिंग, मैदानात धावणे यांना प्रोत्साहन द्या.

2. मुलांना रोज किमान 60 मिनिटं हालचाल आवश्यक:

त्यांना आवडतं खेळ, नृत्य, सायकल, पोहणे काहीही असू द्या.हलक्या-फुलक्या खेळांनीही इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.

3. आहारात गुणवत्ता, फक्त प्रमाण नाही:

            आहारात भाज्या, पूर्ण धान्य, फळं,प्रोटीन,पुरेसे पाणी देत चला. साखरदार पेये, पॅकेज्ड स्नॅक्स आणि प्रोसेस्ड फूड कमी करा.

4. नियमित आरोग्य तपासणी:

जर कुटुंबात डायबेटीसचा इतिहास असेल तर —

➡️ नियमित ब्लड शुगर तपासणी

➡️ जास्त तहान लागणे, वारंवार लघवी, अचानक वजन घटणे यासारखे लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला.

5. मुलांना योग्य शिक्षण द्या:

मुलांना भीती दाखवू नका.साखर “वाईट” आहे असं सांगू नका.

त्याऐवजी,

➡️ शरीरात इन्सुलिनची भूमिका

➡️ कसे संतुलित खाणं आवश्यक आहे. हे सोप्या भाषेत समजवा.

समारोप:

मधुमेह होण्यासाठी दोष फक्त साखरेचा नाही, जीवनशैलीचा आहे. डायबेटीस हा फक्त “साखर खाल्ली म्हणून होणारा आजार” नाही.हा अनुवंशिकता, जीवनशैली, आहार, हालचाल आणि शरीरातील इन्सुलिन प्रक्रियेचा एक संयुक्त परिणाम आहे.पालकांनी योग्य वेळी जागरूकता ठेवली तर मुलांचे जीवन पूर्णपणे बदलू शकते.आपली मुलं घाबरलेली नाही, तर माहितीपूर्ण आणि आरोग्य-जागरूक असणं अधिक आवश्यक आहे. म्हणून,साखरवर दोष देणं थांबवा, आणि सवयी सुधारायला सुरुवात करा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. महत्त्वपूर्ण माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...