Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

धनत्रयोदशी का साजरी केली जाते?

 ब्लॉग नं. 2025/293.

दिनांक: 18 ऑक्टोबर, 2025.

मित्रांनो,

           तसं पाह्यला गेलं तर,वसू बारस पासून दिवाळी उत्सवाला सुरुवात होते.गाय आणि वासरू यांची या दिवशी पूजा केली जाते.दिवाळी हा आपल्या देशात साजरा करण्यात येणारा सगळ्यात मोठा सण आहे. पूर्वीच्या काळी,आजकाल ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे एकंदर हवामान प्रभावित झाले आहे,असे नव्हते.मृग नक्षत्राला पावसाळा सुरू व्हायचा,सगळ्या गोष्टी वेळेवर होत असल्याने दिवाळीला शेतकऱ्यांच्या हाताशी पैसा येत असे.त्यामुळे हा उत्सव कार्तिक महिन्यात साजरा केला जात असे. आज धनत्रयोदशी,आजच्या दिवसाची कथा आणि महत्व,आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.                

🌟 धनत्रयोदशी का साजरी केली जाते?

धनत्रयोदशी कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला साजरी केली जाते.या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला असे पुराणात सांगितले आहे. ते देवतांचे वैद्य मानले जातात आणि आयुर्वेदाचे जनक म्हणून त्यांची पूजा केली जाते.त्यामुळे या दिवशी आरोग्य, आयुष्य आणि समृद्धीसाठी धन्वंतरीची उपासना केली जाते.याच दिवशी “धन” म्हणजेच संपत्ती, सुवर्ण, धान्य यांची पूजा केली जाते. म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी असे नाव पडले.

📖 धनत्रयोदशीची कथा:

एक प्रसिद्ध पौराणिक कथा अशी सांगितली जाते की,👇

प्राचीन काळी हिमालय नावाचा राजा होता. त्याला यमराजाने सांगितले की, त्याच्या मुलाचा मृत्यू चौथ्या दिवशी होणार आहे.राजा आणि राणी फार दु:खी झाले. त्यांनी देवांचे पूजन केले.त्या दिवशीच्या रात्री (त्रयोदशी), त्यांनी आपल्या मुलाला सोन्याच्या आसनावर बसवले.दारात दिवे लावले, सोन्या-चांदीचे दागिने ठेवले आणि संपूर्ण घर उजळवले.जेव्हा यमराज त्या मुलाचा प्राण घेण्यासाठी आले, तेव्हा त्या उजेडामुळे आणि सोने-रत्नांच्या तेजामुळे त्यांचे डोळे दिपले.ते त्या मुलाला न घेता परत गेले.त्या दिवसापासून ही तिथी मृत्यू टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी साजरी केली जाऊ लागली.

म्हणून या दिवशी यमदीपदान” करण्याची प्रथा आहे. रात्री घराच्या बाहेर, विशेषतः दक्षिण दिशेला, यमराजाच्या नावाने दिवा लावतात. असे मानले जाते की त्यामुळे अकाली मृत्यू टळतो.

💰 धनत्रयोदशीचे महत्व:

आरोग्य आणि आयुष्याचे रक्षण:

भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य मिळते.तसेच समृद्धी आणि संपत्तीची प्राप्ती होते. या दिवशी सुवर्ण, चांदी, भांडी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.असे मानले जाते की, या दिवशी केलेसंपत्तीत वाढ होते.

दिवाळीचा शुभ प्रारंभ:

धनत्रयोदशीपासून दिवाळीतील महत्वाच्या उत्सवांची सुरुवात होते.त्यानंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज असे दिवस येतात.

यमदीपदानाचे धार्मिक महत्व:

दक्षिण दिशेला दिवा लावल्याने अकाली मृत्यू टळतो आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात.असे म्हटले जाते.  

🪔 समारोप:

धनत्रयोदशी हा दिवस म्हणजे आरोग्य, समृद्धी, आयुष्य आणि प्रकाश यांचे प्रतीक.या दिवशी धन्वंतरी पूजन, सुवर्ण-खरेदी, यमदीपदान आणि आरोग्यसंपन्नतेची कामना केली जाते.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

 


 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...