Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

धनत्रयोदशी का साजरी केली जाते?

 ब्लॉग नं. 2025/293.

दिनांक: 18 ऑक्टोबर, 2025.

मित्रांनो,

           तसं पाह्यला गेलं तर,वसू बारस पासून दिवाळी उत्सवाला सुरुवात होते.गाय आणि वासरू यांची या दिवशी पूजा केली जाते.दिवाळी हा आपल्या देशात साजरा करण्यात येणारा सगळ्यात मोठा सण आहे. पूर्वीच्या काळी,आजकाल ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे एकंदर हवामान प्रभावित झाले आहे,असे नव्हते.मृग नक्षत्राला पावसाळा सुरू व्हायचा,सगळ्या गोष्टी वेळेवर होत असल्याने दिवाळीला शेतकऱ्यांच्या हाताशी पैसा येत असे.त्यामुळे हा उत्सव कार्तिक महिन्यात साजरा केला जात असे. आज धनत्रयोदशी,आजच्या दिवसाची कथा आणि महत्व,आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.                

🌟 धनत्रयोदशी का साजरी केली जाते?

धनत्रयोदशी कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला साजरी केली जाते.या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला असे पुराणात सांगितले आहे. ते देवतांचे वैद्य मानले जातात आणि आयुर्वेदाचे जनक म्हणून त्यांची पूजा केली जाते.त्यामुळे या दिवशी आरोग्य, आयुष्य आणि समृद्धीसाठी धन्वंतरीची उपासना केली जाते.याच दिवशी “धन” म्हणजेच संपत्ती, सुवर्ण, धान्य यांची पूजा केली जाते. म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी असे नाव पडले.

📖 धनत्रयोदशीची कथा:

एक प्रसिद्ध पौराणिक कथा अशी सांगितली जाते की,👇

प्राचीन काळी हिमालय नावाचा राजा होता. त्याला यमराजाने सांगितले की, त्याच्या मुलाचा मृत्यू चौथ्या दिवशी होणार आहे.राजा आणि राणी फार दु:खी झाले. त्यांनी देवांचे पूजन केले.त्या दिवशीच्या रात्री (त्रयोदशी), त्यांनी आपल्या मुलाला सोन्याच्या आसनावर बसवले.दारात दिवे लावले, सोन्या-चांदीचे दागिने ठेवले आणि संपूर्ण घर उजळवले.जेव्हा यमराज त्या मुलाचा प्राण घेण्यासाठी आले, तेव्हा त्या उजेडामुळे आणि सोने-रत्नांच्या तेजामुळे त्यांचे डोळे दिपले.ते त्या मुलाला न घेता परत गेले.त्या दिवसापासून ही तिथी मृत्यू टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी साजरी केली जाऊ लागली.

म्हणून या दिवशी यमदीपदान” करण्याची प्रथा आहे. रात्री घराच्या बाहेर, विशेषतः दक्षिण दिशेला, यमराजाच्या नावाने दिवा लावतात. असे मानले जाते की त्यामुळे अकाली मृत्यू टळतो.

💰 धनत्रयोदशीचे महत्व:

आरोग्य आणि आयुष्याचे रक्षण:

भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य मिळते.तसेच समृद्धी आणि संपत्तीची प्राप्ती होते. या दिवशी सुवर्ण, चांदी, भांडी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.असे मानले जाते की, या दिवशी केलेसंपत्तीत वाढ होते.

दिवाळीचा शुभ प्रारंभ:

धनत्रयोदशीपासून दिवाळीतील महत्वाच्या उत्सवांची सुरुवात होते.त्यानंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज असे दिवस येतात.

यमदीपदानाचे धार्मिक महत्व:

दक्षिण दिशेला दिवा लावल्याने अकाली मृत्यू टळतो आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात.असे म्हटले जाते.  

🪔 समारोप:

धनत्रयोदशी हा दिवस म्हणजे आरोग्य, समृद्धी, आयुष्य आणि प्रकाश यांचे प्रतीक.या दिवशी धन्वंतरी पूजन, सुवर्ण-खरेदी, यमदीपदान आणि आरोग्यसंपन्नतेची कामना केली जाते.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

 


 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...