ब्लॉग नं.2025/072
दिनांक:- 13 मार्च,
2025.
मित्रांनो,
काल सहज
मूड बदलावा म्हणून गज़ल ऐकत बसलो होतो.मला गुलाम अली यांच्या गज़ल खूप आवडतात.त्यांच्या आवाजात जी फिरत आहे आणि
शब्दोच्चारामध्ये जी नजाकत आहे.ती अक्षरशः वेड लावते.मधे केव्हा कुठे एखादी सुरेल
तान किंवा आलाप घेतील,ते देखील आपल्याला त्या धुंदीत ठेवूनच.अशीच एक गज़ल मसरूर अन्वर यांची, “हमको किसके ग़म ने मारा,
ये कहानी फिर सही”.ऐकता ऐकता मनात आलं,
याच्यावर ब्लॉग लिहिता येईल.थोडा ब्लॉगवरचा विषय देखील चेंज होईल आणि म्हणतात की Change हा हवाच आणि तो चांगल्यासाठी असेल तर मग क्या बात है.
सविस्तर:
या गझलच्या सुरुवातीला,एक छान सा शेर आहे.
गझलकार म्हणतो,,
दिल की चोटों ने कभी चैन से रहने न
दिया ।
जब चली सर्द हवा मैंने तुझे याद किया ।
इसका रोना नहीं क्यूँ तुमने किया दिल
बर्बाद ।
इसका ग़म है कि बहुत देर में बर्बाद
किया ।
मराठी अर्थ;
मनाला झालेल्या वेदनांनी मला
कधी स्वस्थ बसू दिले नाही.
म्हणूनच असेल की थंड हवा
सुटली तशी तुझी आठवण आली.
मला या गोष्टीचे वाईट वाटत नाही
की,तू माझं मन मोडलंस,बेचिराख केलस
खेद या गोष्टीचा आहे की हे
सारं तू फार उशिरा केलस.
पुढे गझलकार म्हणतो,
हमको किसके ग़म ने मारा, ये कहानी फिर सही ।
किसने तोड़ा दिल हमारा, ये कहानी फिर सही ।
मराठी अर्थ;
कुणी दिलेल्या दु:खामुळे मी
दु:खी झालो.ही बाब अलहिदा.
माझं हृदय कुणी तोडलं ही बाब
अलहिदा..
पुढे गझलकार म्हणतो,
दिल के लूटने का सबब पूछो न सबके सामने
।
नाम आएगा तुम्हारा, ये कहानी फिर सही ।
मराठी अर्थ;
माझे हृदय कुणी चोरले हे
सर्वांसमोर विचारू नकोस.
कारण तुझेच नाव घेतले जाईल,
ही बाब अलहिदा..
पुढे गझलकार म्हणतो,
नफरतों के तीर खा कर, दोस्तों के शहर में ।
हमने किस किस को पुकारा, ये कहानी फिर सही ।
मराठी अर्थ;
मित्रांच्या शहरात असून
देखिल टोचून बोलणी ऐकायला मिळाली.
तेव्हा मी कुणाकुणाला हाक
दिली, ही बाब अलहिदा.
पुढे गझलकार म्हणतो,
क्या बताएं प्यार की बाजी, वफ़ा की राह में ।
कौन जीता कौन हारा, ये कहानी फिर ।
मराठी अर्थ;
मी तर प्रेमात निष्ठेच्या
मार्गानेच चाललो होतो.
यात जिंकले कोण आणि हरले ही बाब अलहिदा.
समारोप:
थोडक्यात
काय तर,प्रेमभंग झालेला प्रेमी निराश आहे,उदास आहे, दु:खी आहे.पण तो दु:खी या
गोष्टीमुळे नाही की त्याचा प्रेमभंग झाला आहे.तर त्याला खेळवलं गेलंय,त्याचा गेम
केलाय,त्याला पुरत प्रेमाच्या अथांग सागरात आकंठ बुडवून मग सोडून दिल आहे.याचं
दु:ख आहे.इतके झाल्यावर देखील तिचे नांव जमान्यासमोर येऊ नये ही त्याची इच्छा
आहे.त्याच्या मित्रांच्या शहरात,त्याने कुणाकुणाला हाक मारली नाही.पण त्याला
कुणाचा आधार मिळाला नाही,उलट टोचून बोलणी खावी लागली.ह्याचे दु:ख त्याला अधिक
आहे.तो प्रेमात हरला की जिंकला याचे त्याला देणे घेणे नाही.निष्ठेच्या मार्गाने
जाऊन देखील ही अवस्था आहे,याचे दु:ख अधिक आहे.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, याविषयी कमेंट बॉक्स मधे जरूर लिहा. पुढील
ब्लॉग येई पर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, आनंदी रहा, मस्त जगा.
प्रसाद नातु.
जबरदस्त, गझल मध्ये इतका सामर्थ्य असतं हे पहिल्यांदा समजलं. कारण पहिल्यांदाच गझल वाचली आणि समजून घेतली केवळ आपल्यामुळेच.खूप खूप धन्यवाद🙏🙏
ReplyDelete