Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

हिन्दी चित्रपट छावा,जबरदस्त

Blog No.2025/049. 

Date: -18th, February,2025 

मित्रांनो,

            परवा म्हणजे रविवारी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित “छावा” हा हिन्दी चित्रपट बघितला आणि या विषयावर ब्लॉग लिहिण्याचा मोह मला आवरला नाही.छत्रपती संभाजी महाराजांवर आलेला हा सुरेख चित्रपट आहे.एका मराठी योध्याचे सुरेख चित्रण करणारा हा चित्रपट.महाराष्ट्राच्या राजाच्या शौर्याची हिन्दी जगताला आणि त्या निमित्ताने अखिल भारताला दखल घ्यायला लावणारा हा चित्रपट आहे.मुघल साम्राज्य भरात असतांना आणि एकीकडे भारतातील अनेक राजे मुघलांचे मांडलीकत्व स्वीकारून,आपली चमडी वाचविण्याचे प्रयत्न करत असतांना,आपल्या महाराष्ट्रातील दोन महायोध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघल साम्राज्य आपल्या अतुल सामर्थ्याने थोपविलेच नव्हे,तर त्यांना जेरीस आणले आणि त्यांना आपला झेंडा महाराष्ट्रात फडकाविता आला नाही,या विचाराने उर भरून येतो.

सविस्तर:

            या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी विकी कौशल या अभिनेत्याची निवड करण्यात आली, तेव्हा वाटलं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका हा अभिनेता निश्चितपणे चांगली साकारू शकेल,कारण त्याने फील्ड मार्शलमध्ये छान भूमिका केली होती.पण छत्रपती संभाजी महाराज ही ऐतिहासिक भूमिका,त्या भूमिकेत दाखवावा लागणारा आत्मविश्वास,नजरेमधील धार आणि चेहऱ्यावरील कणखरपणा,शौर्य,हे सारं कितपत निभाऊ शकेल ही शंका माझ्या मनांत होती. पण विकी कौशलने ज्या ताकदीने छत्रपती संभाजी महाराज ही भूमिका उभी केली आहे,त्याला तोड नाही. छत्रपती संभाजी महाराजांना जेरबंद केल्यानंतर औरंगजेबाच्या समवेत असलेले गणोजी आणि कान्होजी शिर्के या दोन फितूर मराठी सरदारांकडे पाहून छत्रपती संभाजी महाराज जो जळजळीत नेत्रकटाक्ष टाकतात,तो प्रसंग विकी कौशलने अगदी जिवंत केला आहे. बऱ्हाणपूरमध्ये जी भीषण लढाई मराठे आणि मुघलांना होते,तिचे चित्रीकरण जबरदस्त केले आहे.

            रश्मिका मंदाना हिने येसुबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका जेवढे महत्व त्या भूमिकेला या चित्रपटात दिले होते,ती छान निभावली आहे, मुख्य म्हणजे ती एका मराठी साम्राज्याची सम्राज्ञी वाटते, (मराठी वाटते) दिव्या दत्ता हिने छत्रपती संभाजी महाराजांची सावत्र आई सोयराबाईची भूमिका जी  भूमिका नकारात्मक प्रकारची आहे,ती छान रंगवली.चेहऱ्यावरचा कणखरपणा आणि कोरडेपणा दिव्या दत्ताने छान दर्शविला आहे.आशुतोष राणा सेनापति हंबीरराव मोहित्यांच्या भूमिकेत छाप पाडून जातो.अकबराची भूमिका नील भुपालम याच्या वाट्याला आली आहे,तो मात्र आपली छाप सोडू शकला नाही.कवि कलशच्या भूमिकेत विनीत कुमार सिंहने रंग भरला आहे,तसेच डायना पेंटी हिने औरंगजेबाची क्रूर कन्या झिन्तुन्नीसाची भूमिका लक्षात राहिल अशा रितीने साकारली आहे.संतोष जुवेकर आणि मनोज कोल्हटकर या दोन मराठी अभिनेत्यांच्या छोट्या भूमिका या चित्रपटात आहेत.ए.आर. रेहमानला विशेष कौशल्य दाखवायला वाव नव्हता.

            आणि सगळ्यात शेवटी क्रूरकर्मा शहेनशहा औरंगजेबाची भूमिका दुर्लक्षित अभिनेता अक्षय खन्ना याने जबरदस्त ताकदीने रंगविली आहे,त्याचे चालणे,त्याचे बोलणे,त्याचे पहाणे सारेच आपल्याला ही विसरायला भाग पाडतात की हा खराखुरा औरंगजेब नसून अक्षय खन्ना आहे.शेवटी,आपल्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांसारखा एक पुत्र कां जन्माला आला नाही,हे औरंगजेबाचे वैफल्य त्याने छान दाखविले आहे.अक्षय खन्ना हा केवळ नट नसून तो एक गुणी अभिनेता आहे,हे त्याने आजपर्यंत अनेक भूमिकांमधून दाखवून दिले आहे.      

            चित्रपटात संवाद चांगले आहेत,पण बऱ्याच ठिकाणी संवादांना कात्री लावली गेल्याचे प्रकर्षाने आढळते.कादंबरी ‘छावा’त असणाऱ्या संवादाच्या मानाने सौम्य संवाद येथे ऐकायला मिळतात.यावरुन चित्रपटाला बऱ्याच प्रमाणात कात्री लावली असल्याचे जाणवते. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रकरणे वगळलीत असे वाटते. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन उत्तम आहे.            

समारोप:

थोडक्यात,हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांना जाणून घेण्यासाठी पहावा,त्यांचे शौर्य अनुभवण्यासाठी बघावा.तसेच तो विकी कौशल आणि अक्षय खन्ना या दोन अभिनेत्यांच्या जबरदस्त भूमिकांसाठी पहावा.आपल्याला शालेय इतिहासातून जेवढा मुघलांचा कळलाय,तेव्हा मराठ्यांचा माहित नाही,पण देखिल पहावा. बऱ्हाणपूरमध्ये, मराठा सैन्याने मुघलांचा इतका जबरदस्त पराभव केल्याचे ऐकिवात नव्हते, अशासाठी देखिल पहावा. या चिटपटाला माझे रेटिंग 5/5 किंवा ***** .    

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

  प्रसाद नातु, पुणे. 

image courtesy@youtube

Comments

  1. Very nice 👌 👍 👏

    ReplyDelete
  2. मीनल ओगलेFebruary 18, 2025 at 3:12 PM

    सुंदर लिहिले आहे .आजच हा सिनेमा बघायचा बेत आहे.👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...