Blog No.2023/274
Date: - 30th, October 2023.
मित्रांनो,
कालचा भारत वि इंग्लंड हा सामना इतका एकतर्फी होईलस वाटत
नव्हतं. काल भारताने साहेबांना अगदी लीलया नमवून सहावा सामना आणि 12 गुण खिश्यात टाकले.पण
माझ्या दृष्टीने हा सामना संस्मरणीय ठरला तो वेगळ्या अर्थाने.काल प्रवासात होतो त्यामुळे
टीव्हीवर बघणे शक्य नव्हते.तसा मोबाईलवर बघता येतो,पण बॅटरी तेवढी तग धरत नाही.त्यामुळे
रेडियोवर कॉमेन्ट्री ऐकली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
प्रास्ताविक
टीव्ही नव्हता त्या काळात मॅचची मजा अनुभवायची ती रेडियोवरील
कॉमेन्ट्री ऐकून.त्या काळांत हिन्दी कॉमेन्ट्री इतकी ऐकली की त्या समालोचकांची नावे
आठवायला फारसा वेळ लागला नाही.जसदेव सिंग, रवी चतुर्वेदी, सुशील दोषी, मुरलीमनोहर मंजुल
ही नांवे लगेच आठवली.ही कॉमेन्ट्री ऐकण्यात खरंच खूप मजा यायची. ऑफ साइडला कुठल्या
पोजिशनवर कोण उभे आहे आणि ऑन साईड कुठल्या पोजिशनवर कोण उभे आहे हे सार माहित होतं
असे.आणखी एक गोष्ट आठवली ती म्हणजे त्याकाळी सुनील गावस्कर हे भारताचे सुपर बॅट्समन
होते. ते चांगले खेळत असतांना हमखास होणारी गोष्ट म्हणजे, समालोचक सुनील गावस्कर यांच्या
इतक्या प्रभावाखाली असतं की ते त्यांची तारीफ करायला लागत जसे “सुनील गावस्करको अब
क्रिकेट बॉल फुटबॉल के बॉल जैसे नजर आने लगा है, ऊनको आउट करना किसी भी बोलर को संभव
नही है असे म्हणत असताना ते एकदम ओरडत “और ये गावस्कर आउट.” आणि ये मार्शलकी एक बहोत
सुंदर गेंद थी,गावस्करही क्या,दुनियाका कोई भी बॅट्समन इस बॉलपे आउट हो जाता था.जिंकण्यासाठी
रन्सचे लक्ष अधिक असेल तर “यह टार्गेट मुश्किल जरूर है लेकिन नामुमकीन नही” हे वाक्य
समालोचकांच्या तोंडून वारंवार ऐकल्यामुळे माझा स्वतःचा कॉन्फिडंस मात्र अगदी नेहमी
करता वाढून गेला.
कालची मॅच
कालच्या मॅचने हे दर्शविले की पहिल्या 10 ओवर्स मध्ये तीन विकेट्स गेल्यावर देखिल
आपण मॅच विनीन्ग टोटल उभी करू शकतो. दुसऱ्या बाजूने विकेट्स जातं असतांना रोहित शर्माचे
शांतपणे धैर्याने खेळणे कौतुकास्पद होते. त्याला आधी के.एल. राहुलची साथ आणि नंतर सुर्यकुमार
यादवच्या 49 धावा तसेच बूमराह आणि कुलदीपचे संघाची धावसंख्या 229 पर्यन्त पोहोचविणे
ह्या साऱ्याच गोष्टी भारतीय संघासाठी नवीन आहेत.
बॅट्समन जरी रन्स उभारू शकले नाहीत तरी आम्ही सामना जिंकू
शकतो हा बूमराह, मोहम्मद शमी, कुलदीप आणि जडेजाने निर्माण केलेला विश्वास नक्कीच कौतुकास्पद
आहे. मोहम्मद शमीचे पदार्पण खरंच एक सुखचिन्ह आहे.आपण त्यांच्या शिवाय चार सामने जिंकले
होते.त्यामुळे त्याला आधी न घेतल्याची खंत जाणवली नाही. पण त्याच्या परत येण्याने आपल्या
वेगवान माऱ्याला अधिक धार आली आणि तो अधिक तिखट झाला हे निश्चित.इंग्लंडच्या संघाला
यापूर्वी कधी इतके गुढगे टेकतांना पाहिले नाही.पण क्रिकेट या खेळाला a great leveller म्हणतात ते उगीच नाही. 1983
च्या वर्ल्ड कप विजयानंतर आपल्या भारतीय संघाची अवस्था काही वेगळी नव्हती. अर्थात भारताच्या
विजयाला fluke म्हणणाऱ्या लोकांच्या बोलण्याला त्यामुळे बळ मिळालं
होतं तसं साहेबांच्या संघाच्या बाबतीत होणार नाही हे निश्चित.
सारांश
अर्थात कालची मॅच ऐकतांना मजा आली.पण आजकाल जे हिन्दीत समालोचन करतात. ते बऱ्या
पैकी क्रिकेट खेळलेले पूर्व खेळाडू असल्याने विनोद जास्त घडतांना आढळतं नाही. हे देखिल
तितकेच खरे. भारताचे श्रीलंका, साऊथ आफ्रिका
आणि नेदरलँड विरुद्ध सामने आता नोवेंबर महिन्यात खेळवले जातील.भारताने आजवरच्या सगळ्या
मॅचेस जिंकल्याने भारताचा सेमी फायनल मधील प्रवेश निश्चित आहे.बघूया बाकीच तीन संघ
कुठले आहेत ते.
आजचा हा ब्लॉग
तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स
मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया
उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी
रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
photo courtesy@amazon.in
Although it's still early to comment on last four, the first 3 positions are almost decided on the basis of their points. Need not even mention the names. It's he responsibility of the media, general public not to get over-hyped and look the game as a game only instead of winners or losers
ReplyDeleteखरंच, रेडिओवर काॅमेन्ट्री ऐकायला मजा येत असे.छान लिहिलंय प्रसाद.
ReplyDelete🙏
ReplyDelete