Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

रेडियोवरील क्रिकेट मॅचची कॉमेन्ट्री

 Blog No.2023/274           

Date: - 30th, October 2023. 

    

मित्रांनो,

               कालचा भारत वि इंग्लंड हा सामना इतका एकतर्फी होईलस वाटत नव्हतं. काल भारताने साहेबांना अगदी लीलया नमवून सहावा सामना आणि 12 गुण खिश्यात टाकले.पण माझ्या दृष्टीने हा सामना संस्मरणीय ठरला तो वेगळ्या अर्थाने.काल प्रवासात होतो त्यामुळे टीव्हीवर बघणे शक्य नव्हते.तसा मोबाईलवर बघता येतो,पण बॅटरी तेवढी तग धरत नाही.त्यामुळे रेडियोवर कॉमेन्ट्री ऐकली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

 प्रास्ताविक

               टीव्ही नव्हता त्या काळात मॅचची मजा अनुभवायची ती रेडियोवरील कॉमेन्ट्री ऐकून.त्या काळांत हिन्दी कॉमेन्ट्री इतकी ऐकली की त्या समालोचकांची नावे आठवायला फारसा वेळ लागला नाही.जसदेव सिंग, रवी चतुर्वेदी, सुशील दोषी, मुरलीमनोहर मंजुल ही नांवे लगेच आठवली.ही कॉमेन्ट्री ऐकण्यात खरंच खूप मजा यायची. ऑफ साइडला कुठल्या पोजिशनवर कोण उभे आहे आणि ऑन साईड कुठल्या पोजिशनवर कोण उभे आहे हे सार माहित होतं असे.आणखी एक गोष्ट आठवली ती म्हणजे त्याकाळी सुनील गावस्कर हे भारताचे सुपर बॅट्समन होते. ते चांगले खेळत असतांना हमखास होणारी गोष्ट म्हणजे, समालोचक सुनील गावस्कर यांच्या इतक्या प्रभावाखाली असतं की ते त्यांची तारीफ करायला लागत जसे “सुनील गावस्करको अब क्रिकेट बॉल फुटबॉल के बॉल जैसे नजर आने लगा है, ऊनको आउट करना किसी भी बोलर को संभव नही है असे म्हणत असताना ते एकदम ओरडत “और ये गावस्कर आउट.” आणि ये मार्शलकी एक बहोत सुंदर गेंद थी,गावस्करही क्या,दुनियाका कोई भी बॅट्समन इस बॉलपे आउट हो जाता था.जिंकण्यासाठी रन्सचे लक्ष अधिक असेल तर “यह टार्गेट मुश्किल जरूर है लेकिन नामुमकीन नही” हे वाक्य समालोचकांच्या तोंडून वारंवार ऐकल्यामुळे माझा स्वतःचा कॉन्फिडंस मात्र अगदी नेहमी करता वाढून गेला.

 कालची मॅच

               कालच्या मॅचने हे दर्शविले की पहिल्या 10 ओवर्स मध्ये तीन विकेट्स गेल्यावर देखिल आपण मॅच विनीन्ग टोटल उभी करू शकतो. दुसऱ्या बाजूने विकेट्स जातं असतांना रोहित शर्माचे शांतपणे धैर्याने खेळणे कौतुकास्पद होते. त्याला आधी के.एल. राहुलची साथ आणि नंतर सुर्यकुमार यादवच्या 49 धावा तसेच बूमराह आणि कुलदीपचे संघाची धावसंख्या 229 पर्यन्त पोहोचविणे ह्या साऱ्याच गोष्टी भारतीय संघासाठी नवीन आहेत.

               बॅट्समन जरी रन्स उभारू शकले नाहीत तरी आम्ही सामना जिंकू शकतो हा बूमराह, मोहम्मद शमी, कुलदीप आणि जडेजाने निर्माण केलेला विश्वास नक्कीच कौतुकास्पद आहे. मोहम्मद शमीचे पदार्पण खरंच एक सुखचिन्ह आहे.आपण त्यांच्या शिवाय चार सामने जिंकले होते.त्यामुळे त्याला आधी न घेतल्याची खंत जाणवली नाही. पण त्याच्या परत येण्याने आपल्या वेगवान माऱ्याला अधिक धार आली आणि तो अधिक तिखट झाला हे निश्चित.इंग्लंडच्या संघाला यापूर्वी कधी इतके गुढगे टेकतांना पाहिले नाही.पण क्रिकेट या खेळाला a great leveller म्हणतात ते उगीच नाही. 1983 च्या वर्ल्ड कप विजयानंतर आपल्या भारतीय संघाची अवस्था काही वेगळी नव्हती. अर्थात भारताच्या विजयाला fluke म्हणणाऱ्या लोकांच्या बोलण्याला त्यामुळे बळ मिळालं होतं तसं साहेबांच्या संघाच्या बाबतीत होणार नाही हे निश्चित.

 सारांश    

               अर्थात कालची मॅच ऐकतांना मजा आली.पण आजकाल जे हिन्दीत समालोचन करतात. ते बऱ्या पैकी क्रिकेट खेळलेले पूर्व खेळाडू असल्याने विनोद जास्त घडतांना आढळतं नाही. हे देखिल तितकेच खरे. भारताचे  श्रीलंका, साऊथ आफ्रिका आणि नेदरलँड विरुद्ध सामने आता नोवेंबर महिन्यात खेळवले जातील.भारताने आजवरच्या सगळ्या मॅचेस जिंकल्याने भारताचा सेमी फायनल मधील प्रवेश निश्चित आहे.बघूया बाकीच तीन संघ कुठले आहेत ते.     

               आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.   


photo courtesy@amazon.in                                                                                                                        

 

Comments

  1. Although it's still early to comment on last four, the first 3 positions are almost decided on the basis of their points. Need not even mention the names. It's he responsibility of the media, general public not to get over-hyped and look the game as a game only instead of winners or losers

    ReplyDelete
  2. खरंच, रेडिओवर काॅमेन्ट्री ऐकायला मजा येत असे.छान लिहिलंय प्रसाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...