Skip to main content

मानसिक ताकद महत्त्वाची

ब्लॉग नं. 2025/154 दिनांक :- 4 जून,  2025. मित्रांनो, असं म्हटलं जातं की मानसिक ताकद हा जीवनाचा कणा आहे.आजच्या तणावग्रस्त आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत मानसिक ताकद ही एक महत्त्वाचे कौशल्य बनले आहे. मानसिक ताकद म्हणजे संकटांचा सामना करताना खंबीर राहण्याची क्षमता.ही फक्त कठीण प्रसंगांमध्ये सकारात्मक राहण्याचे नाव नाही ,  तर परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घेण्याची कुवत आहे.आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की, मानसिक ताकद म्हणजे काय? मानसिक ताकदीचे महत्व, मानसिक ताकद कमी होण्याची कारणे? आणि मानसिक ताकद सुधारण्यासाठी करावयाचे उपाय जाणून घेणार आहोत.           मानसिक ताकद म्हणजे काय?            मानसिक ताकद म्हणजे मानसिक ताणतणाव ,  भीती ,  अपयश ,  किंवा अडचणींना तोंड देत स्वतःला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनवणे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मानसिक ताकद महत्वाची भूमिका बजावते. मात्र ,  काही गोष्टी मानसिक ताकदीवर प्रतिकूल परिणाम करतात.  मानसिक ताक...

रंजीश ही सही

 Blog No. 2023/13

Dated 17th, January 2023 



नमस्कार मित्रांनो

    कधी कधी आपल्याला एखादे गाणं म्हणागझल म्हणा खूप आवडतं असतं. आपल्याला गाण्याचे थोडे जरी अंग असेल, तर आपण ते गाणं म्हणून पहातो किंवा नेहमी म्हणत असतो.हिन्दी किंवा मराठी गाणी तशी समजायला सोपी असतात.एखादेच काव्य  दुर्बोध असेल तर ते थोडेसे समजायला कठीण असतं. पण असं फार कमी वेळा होतं.पण हिन्दी गझल मधे कधी कधी उर्दू शब्द असतात आणि ते आपण समजून न घेता,गायकाचा आवाज,चाल,ताल,लय ऐकून त्या गझल मधील त्या शब्दांचा अर्थ समजावून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. पण दाद मात्र देत असतो.

    आज आपण एका अशाच गझलचा अर्थ समजावून घेणार आहोत.ती गझल आहे. "रंजीश ही सही दिलही दुखाने के लिए आ" ह्या गझलचा अर्थ समजावून घेऊ या. 

मी गझलच्या दोन ओळी आणि त्या नंतर त्याचा मराठीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.माणसाला जन्माला आल्यावर,जवळपास सगळ्याच गोष्टींची पहिल्यांदा सुरुवात करावीच लागते.नंतर ती अंगवळणी पडत असते. तर पाहू या. 

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ

आ फिर से मुझे छोड के जाने के लिए आ 

आपल्यात कटूता असो तरी माझ्या हृदयाला दुख द्यावे या साठी ये 

तू जरी मला सोडून  जाणार असशील तरी त्यासाठी तरी पुन्हा ये.

 पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो 

रस्म-ओ-रह-ए-दुनिया को बताने के लिए आ 

आपण पूर्वी एकत्र होतो म्हणून नाही तर

जगाचे जे रिती रिवाज आहेत त्यांचे पालन करण्यासाठी ये.  

 किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम

तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ ।

आपण एकमेकांपासून  विभक्त का झालो ह्याची कारणं मी कुणा कुणाला  सांगू 

तू माझ्यावर नाराज आहेस पण  या समाजासाठी तरी येऊन जा  

अब तक दिल-ए-ख़ुशफ़हम को तुझ से हैं उम्मीदें

ये आख़िरी शम्में भी बुझाने के लिए आ ।

माझ्या आशावादी हृदयांस तुझ्या कडून काही अपेक्षा आहेत. 

हे आशा रूपी दिवे विझविण्यासाठी तरी येऊन जा 

 इक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम

ऐ राहत-ए-जाँ मुझको रुलाने के लिये आ

खूप कालावधी पासून मी हक्काच्या लोकांना मुकलो.  

हे माझ्या प्रेमा.कमीतकमी मला रडविण्यासाठी तरी ये.

 कुछ तो मेरे पिंदार-ए-मुहब्बत का भरम रख

तू भी तो कभी मुझको मनाने के लिये आ

काही तरी तर माझ्या तुझ्या वरील प्रेमाचा आदर ठेव  

कधी तरी तू माझी समजूत काढायला ये ना 

 एक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम

ऐ राहत-ए-जाँ मुझ को तू रुलाने के लिए आ

दु:ख करण्याचे सौभाग्य देखील गेल्या काही काळांत माझ्या नाशिबात नाही 

हे  माझी मनशांति, तू कमीतकमी मला रडविण्यासाठी तरी येऊन जा. 

आता ऐकु या हे गाणे. 



 

           तुम्हाला हे आवडले का , हे कमेन्ट बॉक्स मधे जरूर लिहा,   


प्रसाद नातु .पुणे  

Comments

  1. नातूजी बहुत बढ़िया
    गज़ल के उर्दू या फारसी शब्दों के अर्थ पता चलने पर ग़ज़ल का पूरा आनंद उठा सकते हैं
    धन्यवाद
    रा रा जोशी वर्धा

    ReplyDelete
  2. गझल चा अर्थ सोप्या शब्दात छान सांगितला आहे. अनिल जोगळेकर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...