Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

रमाबाई रानडे

 

Blog No. 2023/20  

Date 24th, January 2023 .



मित्रांनो,

            तुम्हाला ती झी मराठीवरील मालिका आठवते,ज्यात स्पृहा जोशीची भूमिका खूप गाजली होती. तुम्ही अंदाज केला असल्यास तुम्ही बरोबर ओळखलेत. “उंच माझा झोका” या रमाबाई रानडे ह्यांच्या जीवनावर आधारित ही मालिका खूप लोकप्रिय झाली.आज रमाबाई रानडे ह्यांचा जन्म दिवस. सांगली जिल्हयातील देवराष्ट्रे ह्या छोट्याशा गावात कुर्लेकर परिवारात 25 जानेवारी,1862 ला त्यांचा जन्म झाला.त्या पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर.त्या काळी स्त्रियांना शिक्षण देणे हे निषिद्ध मानले जात असल्याने,त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकविले नाही. त्यांचा केवळ 11 व्या वर्षी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह लावून देण्यात आला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे लग्नाच्या वेळेस विधुर होते आणि भारतातील सामाजिक सुधारणेचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती. घरातील इतर स्त्रियांचा विरोध पत्करून त्यांनी रमाबाईस शिकविण्याचे ठरविले.रमाबाईंना सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेसाठी आपली मदतनीस म्हणून बनविण्यासाठी मदत केली. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे पुढे जाऊन रमाबाईंनी आपले सर्व आयुष्य महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनविण्यात खर्च केले. न्यायमूर्ती रानडे यांनी तरुण रमाबाईंना मराठी,इतिहास,भूगोल, गणित आणि इंग्रजी लिहिण्याचे आणि वाचण्याचे धडे दिले.                   

 

रमाबाईच्या कार्याचा प्रारंभ

            नासिक हायस्कूल मधे रमाबाईंनी प्रथमच प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली.न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी त्यांचे भाषण लिहून दिले होते.त्या नंतर त्या मुंबईत प्रार्थना समाजासाठी कार्य करु लागल्या.त्यांनी मुंबईत महिला आर्य समाजाची शाखा स्थापन केली. 1893 ते 1901 ह्या काळांत त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या.त्यानंतर त्यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी कलोबची स्थापना करून महिलांना भाषा,सामान्य ज्ञान,टेलरिंग आणि हातकामाचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक वर्ग सुरु केले.

 

न्यायमूर्ती रानडे यांच्या मृत्यु पश्चातचे जीवन           

            1901 ला न्यायमूर्ती रानडे यांचे निधन झाले.पतीच्या मृत्युनंतर त्या मुंबई सोडून पुण्यास आपल्या वडीलोपार्जित घरात येऊन राहिल्या.एक वर्ष स्वतःच लादलेल्या विजनवासानंतर त्या बाहेर पडल्या.पतीचे स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेचे काम त्यांनी आपल्या शिरावर घेतले.1904 मधे भरलेल्या भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सत्राचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले.स्त्रियांचे सामाजिक प्रबोधन,निवारण, अडचणीत असलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी 1909 मधे त्यांनी “सेवा सदन” सारखी सामाजिक संस्था स्थापन केली.1915 ला त्याची नोंदणी झाली.सेवा सदनने जुन्या शैक्षणिक विभागांचा विस्तार करून नवीन विभाग सुरु केले.त्यांनी एक महिला प्रशिक्षण महाविद्यालय,तीन वसतीगृहे विकसित केली.त्यापैकी एक वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरे परिविक्षाधीन परिचारिकांसाठी.

 

विशेष सामाजिक कार्ये

मध्यवर्ती कारागृहात, विशेषत: महिला विभागाच्या त्या नियमित अभ्यागत होत्या.तुरुंगातील कैद्यांमध्ये स्वाभिमान जागृत करणे.सुधारगृहातील मुलांना भेट देऊन त्यांच्याशी बोलणे आणि सणासुदीच्या प्रसंगी त्यांना मिठाई वाटणे इत्यादि त्या करीत असत.त्या नियमितपणे स्थानिक रुग्णालयांमध्ये रुग्णांना भेट देत, फळे, फुले आणि पुस्तकांचे वाटप करत.1913 मध्ये त्या  गुजरात आणि काठियावाडमध्ये दुष्काळग्रस्त लोकांसाठी मदत करण्यासाठी गेल्या होत्या.त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांतही,आषाढी आणि कार्तिकी मेळ्यांच्या वेळी त्या सेवा सदनच्या स्वयंसेवकांसह संत ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला यात्रेकरूंना मदत करण्यासाठी,त्या आळंदीला गेल्या होत्या.हा उपक्रम हाती घेऊन त्यांनी महिलांसाठी एका नव्या प्रकारच्या समाजसेवेची पायाभरणी केली.1921-22 मध्ये त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये महिला मताधिकार चळवळीची संघटना स्थापन केली.1920 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीच्या शिखरावर असताना रमाबाईंनी कापसाचा चरखा कसा चालवायचा हे देखील शिकले.

अखेरीस 1924 साली रमाबाईंचे वयाच्या 62 व्या वाढदिवसाला निधन झाले.अशा या स्त्रियांच्या सुधारणा,त्यांचे सामाजिक उत्थान आणि प्रगती साठी जीवनभर झटणाऱ्या ह्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वास त्यांच्या 160 व्या जयंती आणि  98 व्या पुण्यतिथि निमित्त माझे लाख लाख प्रणाम.

 

 

    प्रसाद नातु,पुणे.                       

Comments

  1. विनम्र अभिवादन🙏🌺🌺
    रा. रा. जोशी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...