मित्रांनो,
नोटांवरील चित्र आणि बरेच काही :-
आज काल
देशांत काही तरी वाद निर्माण करायचा आणि देशातील सामान्य माणसाचे समस्यांकडील लक्ष
दुसरीकडे वळवायचे. असे उद्योग सुरु आहेत. नुकतेच नोटांवर हिंदू देवदेवतांची चित्रे
छापावित असे ट्वीट करण्यात आले आणि त्यानंतर प्रत्येक जण नांव सुचवू लागला.कुणी छत्रपती
शिवाजी महाराज,कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कुणी स्वा.सावरकर, कुणी अगदी आपल्या देशाचे
पंतप्रधान मोदीजी यांचे नांव सुचविले. खरं तर सध्या महात्मा गांधीचे चित्र ते
बदलवायची काही गरज नाही आणि कुणी तसे सुचविले नाही.पण नवीन काही तरी कुणी तरी
सुचवायचे आणि मग त्याला इतरांनी विरोध
करायचा असे सुरु आहे. नोटांवर कुणाचे चित्र असले काय आणि नसले काय त्याने सामान्य
जनतेला काहीच फरक पडत नाही. महात्मा गांधी यांचे चित्र असलेल्या नोटा लाच म्हणून स्वीकारल्या जातात
आणि त्या दडवून ठेवल्या जातात. ह्याहून दुर्दैवाची गोष्ट कुठली.भ्रष्टाचाऱ्याला त्या
नोटांवरचे महात्मा गांधी यांचे चित्र बघून
देखिल लाज, शर्म वाटत नाही.मग काय बोलावे.
काही
वर्षापूर्वी पोस्टाच्या तिकिटे महापुरुषांच्या नांवे छापण्यावर राजकारण करून झाले.पोस्टाच्या
तिकिटावर कुणाचे का चित्र असेना.त्याने सामान्य जनतेला काहीच फरक पडत नाही.पण तरी
आपल्या पक्षाचे सरकार आले की,लगेच आपल्या नेत्याचे चित्र असलेले तिकीट छापायचे असे
रूढ झाले होते.मग काही लोक असे म्हणत विरोध करु लागले की ते तिकीट त्याचे काम झाले
की कचऱ्यात दिसते आणि त्या महापुरुषांचाचा/ नेत्यांचा अपमान होतो. म्हणून कुणाचा
फोटो छापायला नको, हे सुद्धा झाले.काही वर्षांनी हे सर्व विस्मरणात गेले.
आज खरे
तर रुपयांचे अवमूल्यन होतं आहे.डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो आहे.म्हणून एका बाजूला
ओरड चालू आहे.रुपयाचे अवमूल्यन रुपया
मजबूत झाला की किंवा डॉलरची घसरण झाली तर थांबेल ही.पण पैशाची क्रयशक्ती कमी होत चालली आहे.ती वाढणे
केवळ अशक्य. आज रु.100/- ची नोट बाजारात घेऊन गेलो, की एखाद्या छोट्याशा पिशवीत मावेल एवढे तरी
सामान येते कां हो? त्या अर्थी जे पैश्याचे मूल्य कमी झाले आहे.आता त्या नोटेवर महापुरुषांचे
चित्र छापून,त्या महापुरुषांचे अवमूल्यन करू नका. एवढीच विनंती करावीशी वाटते.कारण
नोटांवर ह्या महापुरुषांचे फोटो छापण्यापेक्षा त्या महापुरुषांचे विचार, आपल्या
मनावर कोरले जावेत ह्यासाठी काही करायची आवश्यकता आहे. महापुरुषांचे नुसते गोडवे
गाण्यापेक्षा,त्यांचे आचरण प्रत्यक्ष नेत्यांनी करून लोकांपुढे आदर्श निर्माण
करायला हवा. देशात महापुरुषांचे इतके पुतळे उभारले आहेत, पण त्या पुतळ्याकडे बघून,कुणी
बोध घेतल्याचे काही बघायला मिळत नाही.त्यामुळे नोटांवर महापुरुषांचे फोटो छापून
काही साध्य होईल असे मला तरी वाटत नाही. आपल्या काय वाटते हे ह्या ब्लॉगवर कोमेंट्स
बॉक्समधे लिहा आणि आपले विचार व्यक्त करा.
प्रसाद
नातु, पुणे,
नोटांवर महापुरुषांचे फोटो छापण्यापेक्षा त्यांचे विचार मनावर कोरणे व त्याप्रमाणे आचरण करणे हा आपला विचार खरोखरच अनुकरणीय
ReplyDelete